मालेगाव–अहिल्यानगर महामार्ग येवला शहरालगतून जात असल्याने परिसरात वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढ आणि अपुरी रस्ते सुविधा यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर दराडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची सभागृहाने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे येवला शहराच्या विकासाला चालना मिळून वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


