ShareChat
click to see wallet page
search
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ५ फेब्रुवारी इ.स.१२९४ देवगिरीचे यादव साम्राज्य संपुष्टात - महाराष्ट्र पारतंत्र्यात यादव साम्राज्यावरील पहिला इस्लामी हल्ला झाला तो १२९४ च्या काळात. जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी हा दख्खनस्वारी करिता यादवांवर लक्ष ठेउनच होता. त्याने निष्णात योजना आखली. देवगिरी वर असलेल्या यादवांचे सैन्य देवगिरी पासून दूर जाताच त्यावर हल्ला करायचा,कारण यादवांचे सैन्य विभागलेलं नसे. वर सांगितल्या प्रमाणे यादवांचे सैन्य होयसळ साम्राज्यावर मोहिमेत व्यस्त असताना अल्लाउद्दीन ला आयती संधी मिळाली आणि त्याने अत्यंत शांतपणे देवगिरीच्या दिशेने कूच केली. आपण दक्षिणेत चाललो आहोत अशी बतावणी करत, जंगल मार्गाने आपल्या छावण्या लावत अल्लाउद्दिन देवगिरीच्या दिशेने निघाला. देवगिरीपासून ८० मैलावर असलेल्या लासूर गावी जेव्हा अल्लाउद्दिन येऊन पोचला त्यावेळेस रामचंद्रदेवला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली परंतु आता वेळ निघून गेली होती. रामचंद्राच्या सेनापतीने प्रतिकाराचा प्रयत्न केला खरा पण खिलजीच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि बघता बघता देवगिरी किल्ल्याला अल्लाउद्दिन खिलजीने वेढा घातला. अचानक समोर आलेला नव्हे थेट दाराशी येऊन ठेपलेला शत्रू पाहता रामचंद्रची काहीही तयारी नव्हती. त्याने आपला मुलगा शंकरदेवला तत्काळ परत येण्याचा निरोप तर धाडला होता खरा पण त्याच्या आगमनापर्यंत तग धरू शकेल इतकी देवगिरी किल्ल्याची तयारी नव्हती. आतील अन्नधान्यसाठा देखील पुरेसा नव्हता. त्यामुळे रामचंद्रने किल्ल्यातच शरणागती पत्करली आणि मोठ्या प्रमाणावर सोने, मोती, दागिने आणि हत्ती व घोडे खिलजीला देण्याचे काबुल केले. सोबतच वार्षिक महसूलही देऊ केला. त्याने शरणागती पत्करताच काही काळात रामचंद्रचा मुलगा संपूर्ण सैन्यासह देवगिरीवर दाखल झाला. त्याने खिलजीवर हल्ला करण्यचा प्रयत्न देखील केला मात्र त्यात त्याला यश आले नाही. अन अशा तर्‍हेने दख्खनचे सर्वात मोठे साम्राज्य उत्तरेतील परकीय शक्तीचे पायिक बनले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/k-47fEyegFk 📜 ५ फेब्रुवारी इ.स.१६६४ (माघ वद्य चतुर्थी, शके १५८५, संवत्सर सौम्य, वार शनिवार) राजे शहाजीराजे यांच्या समाधीवर छत्री अर्पण केली. शहाजीराजांच्या समाधीवर छत्री... छत्रपती शिवाजी महाराजांनी राजे शहाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समाधीवर छत्री अर्पण केली. राजे शहाजीराजांचे कर्नाटक येथील होदीगिरे येथे घोड्यावरून पडून निधन झाले होते. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचा फार मोठा आधार नियतीने हिरावून घेतला. छत्रपती शिवरायांनी राजे शहाजीराजांच्या समाधीवर छत्री अर्पण केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ५ फेब्रुवारी इ.स.१६६४ शके १५८५ च्या माघ वद्य चतुर्थीला म्हणजे ५ फेब्रुवारी १६६४ ला महाराज सुरतेची लुट घेऊन राजगडी पोहचले. १८ जानेवारी १६६४ रोजी औरंगजेब लाहोरहून दिल्लीस पोहचला असता त्यास शिवाजी महाराज्यांकडून सुरतेच्या लुटची वार्ता समजली व त्याला याची खंत वाटून सुरतेच्या लुटीचा सूड घेण्याचा निश्चय केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ५ फेब्रुवारी इ.स.१६६४ नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान. ६ जानेवारी - ९ जानेवारी १६६४ पर्यंत महाराजांनी मनसोक्त सूरत लुटली. बाद्शःची सुरत बतसुरत झाली. सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले. शहाजी राजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले. लुटीचा माघ काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात पोचले आणि तडक मागे जुन्नरहुन मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला. मुकुंदसिंहांस अटकाव करण्यासाठी महाराजांचा बाळसवंगडी नारों बापूजी मुदगल सरसावला. नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे पुत्र. वडगावजवळ नारो बापुजिंच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला. मुघलांनकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजिंच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले. तो दिवस होता ५ फेब्रुवारी १६६४. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ५ फेब्रुवारी इ.स.१६७० ( माघ वद्य दशमी, शके १५९१, संवतस्त सौम्य, शनिवार ) सूर्याजी काका मालुसरे यांना सिंहगडाची किल्लेदारी :- सिंहगडाच्या युद्धात ८० वर्षांचे शेलारमामा ह्यांनी अद्वितीय पराक्रम गाजवला. त्याचबरोबर तानाजी काकांचे बंधू सूर्याजी काका ह्यांनी खचून न जाता मराठी सेनेला धीर देऊन व मोठी कामगिरी करून सिंहगड जिंकला. हे सगळं पाहून शिवराय खरंच भारावले आणि शेलरमामांचा सत्कार करून पालखीचा मान दिला व सूर्याजी काकांना सिंहगडाची सुभेदारी दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/k-47fEyegFk 📜 ५ फेब्रुवारी इ.स.१६८३ (माघ वद्य चतुर्थी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार सोमवार) पोर्तुगीज मुलूखातून मोगलांची हल्ला करण्याची तयारी! पोर्तुगीज मुळखातून मोगलांची हल्ला करण्याची तयारी! रणमस्तखान व बहादूरखान कल्याण-भिवंडी मोहिमेवर होते. याचवेळी छत्रपती संभाजी महाराज मोगलांची कल्याण भिवंडीतील रसद बंद करण्याचे प्रयत्न करत होते. मात्र औरंगजेबाने पोर्तुगिजांना जबर तंबी दिल्याने पोर्तुगीज मुलखातून मोगली सैन्य बिनधास्तपणे ये-जा करत होते. धान्य, रसद, सैन्य, सामग्री आता पोर्तुगीजांच्या मुलखांतून मुक्तपणे येत होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ५ फेब्रुवारी इ.स.१७६६ ऑक्टोबर १७६५ मध्ये पेशवे निजामाच्या समाचारासाठी निघाले. राक्षसभुवनाच्या लढाईत निजाम चीतपट झाला असला, तरीही त्याची अंतस्थ कूटकारस्थाने सुरूच होती. म्हणूनच दि. ५ फेब्रुवारी सन १७६६ या दिवशी माधवरावांनी निजामाची भेट घेतली. भेटीप्रीत्यर्थ दोघांनीही एकमेकांचा सन्मान केला, भेटीदाखल उंची वस्त्रे आणि नजराणे दिले. वस्तुतः हा निजाम कसा आहे हे माधवरावसाहेब पक्के ओळखून होते. परंतु, यानिमित्ताने त्यांनी केलेले राजकारण एखाद्या मुत्सद्दयाहूनही सरस होते. 'जर निजाम आणि पेशव्यात सख्य झाले तर पुन्हा कोणीही कुरापती काढण्यास धजावणारही नाही' म्हणूनच केवळ दाखवण्यापुरता का होईना, सलोखा ठेवून आपला हेतू साध्य करावा हेच उत्तम! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ५ फेब्रुवारी इ.स.१७८८ गोव्याचा गव्हर्नर फ्रांसिश्कू कुज्य द मिनेझिश याने कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज तिसरे यांना पाठविलेल्या पत्राचा तर्जुमा! "तुमचे वकील सुलतानराव भोसले हे इकडे मदतीच्या कराराबाबत वाटाघाटी करण्यासाठी आले होते. त्यांना आम्ही तुमच्याकडून वाटाघाटी करण्यास आधिकारपत्रे आणण्यासाठी म्हणून कोल्हापूरला पाठविले होते. परंतु ते इकडे परतले नाहीत. त्या दरम्यान वाडीचे सावंत यांनी आमच्याशी तह करण्याची निकड दर्शविल्याने त्यांच्याशी आम्हाला तह करावा लागला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ५ फेब्रुवारी इ.स.१८०४ इंग्रजांच्या पराभवानंतर यशवंतरावांनी गुप्त रीत्या एक संयुक्त दल उभारण्यासाठी जयपूर, जोधपूर, उदयपूर, बेगम समरू, रोहिल्याचा मुख्य गुलाम मुहम्मद व काहीशीख राजांना पत्रे पाठविली. तसेच दौलतराव शिंद्यांकडे वकील पाठवून इंग्रजांबरोबरची मैत्री संपुष्टात आणण्याचे आवाहन केले (५ फेब्रुवारी १८०४). त्याचा नेमका उलट परिणाम झाला व इंग्रजांनी यशवंतरावांस एकाकी पाडण्याचे व त्यांचे साथीदार फोडण्याचे धोरण अंगीकारले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - IuMIII THECp ARA ORS SHIVDINVISHESH CREATEDB Rahul Borse Patil शिवदिनविशेष @ಿಡತನಿ 56ಣ88@o छत्रपती शिवाजी महाराजांनी शेलरमामांचा सत्कार करून पालखीचा मान दिला व सूर्याजी मालुसरे यांना सिंहगडाची cf..! सुभेदारी the qreat maratha warriors the great marathawarriors the great marathawarriors IuMIII THECp ARA ORS SHIVDINVISHESH CREATEDB Rahul Borse Patil शिवदिनविशेष @ಿಡತನಿ 56ಣ88@o छत्रपती शिवाजी महाराजांनी शेलरमामांचा सत्कार करून पालखीचा मान दिला व सूर्याजी मालुसरे यांना सिंहगडाची cf..! सुभेदारी the qreat maratha warriors the great marathawarriors the great marathawarriors - ShareChat