#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३१_जानेवारी_१६६१
मुघल सरदार कारतलबखान हा मोठ्या फौजेनिशी कोकणातील नागोठणे, चौल, पेण ही ठाणी काबीज करण्यासाठी शाहिस्तेखानच्या हुकुमावरून निघाल्याची बातमी शिवरायांना मिळाली. शिवराय आधिच उंबरखिंडीत जावून खिंड अडवून उभे राहिले होते
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३१_जानेवारी_१६६३
शिवाजी महाराजांनी शामराजपंतांना पत्र पाठवले.
स्वराज्यात असलेला बुलंद बांका गड म्हणजे कोंढाणा गड.
शाहिस्तेखानाने गडावर फितुरी माजवून गड ताब्यात घेण्याची योजना आखली आहे अशी बातमी शिवरायांना लागली. कोंढाणा हातचा जाणे म्हणजे पुणे प्रांतच गमावून बसण्यासारखे होते.
शिवराय अस्वस्थ झाले नि त्यांनी शामराजपंतांना गडाबाबत काळजी व धैर्य निर्माण करण्यासाठी पत्र पाठवले.
शिवरायांनी तातडीने केलेल्या हालचालीमुळे कोंढाणा शाहिस्तेखानाच्या घशात जाऊ शकला नाही.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#३१_जानेवारी_१६८९
छत्रपती संभाजी राजेंचा संगमेश्वर चा मुक्काम लवकरच हलणार होता, पण काही अशुभ संकेत होण्याची चाहूल येसुबाई राणी सरकार यांच्या मनाला लागून होती.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३१_जानेवारी_१६७०
राजगडावर कोंढाणा घेण्यासाठीच्या हालचाली वाढल्या, जो कोंढाणा पुरंदरच्या तहात मुघलांच्या ताब्यात गेला तो कोंढाणा तानाजी मालुसरे स्वराज्यात पुन्हा आणण्यासाठी मावळ्यांची फौज उभी करत होते,
लवकरच कोंढाणा घेतल्याची गोड बातमी राजांना कळणार होती.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩


