⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 ९ मार्च इ.स.१६६०
( चैत्र शुद्ध अष्टमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, शुक्रवार )
आपलेच स्वराज्यद्रोही :-
महाराज पन्हाळ्यावर अडकले असताना स्वराज्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी मायमूलखातले कपाळकरंटे वळवळू लागले. केदार खोपडे, गोंदाजी पासलकर यांनी वतन मिळाले तर मदत करू आशा पत्रांना उत्तर देणारी फर्मान आदिलशहाकडून मिळाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/dxumuI7fzw4
📜 ९ मार्च इ.स. १६६८
(चैत्र शुध्द सप्तमी शके १५९० संवत्सर किलक,सोमवार)
औरंगजेबाकडून शिवरायांना 'राजा' हा किताब.
मोगलांच्या पंचहजारी मनसबदारीवर औरंगजेबाकडून मान्यता घेऊन
संभाजी महाराज राजगडावर परतले होते. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन राजे आग्य्राहून निसटले होते. सगळीकडी ही बातमी पसरल्यामुळे औरंगजेबाचे हसू झाले होते. त्यामुळे किमान पुरंदर तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी तो आग्रही होता. ज्या वेळी मिर्झाराजे जयसिंग यांनी पुरंदरचा तह केला त्या वेळी त्यांनी औरंगजेबाला, 'राजा' हा किताब शिवरायांना घ्यावा अशी गळ घातली होती. जी औरंगजेबने सपशेल फेटाळून लावली होती. मात्र आता संधिसाधू औरंगजेबाने काळाची पावले ओळखून, छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशीही, इंग्रज, सिध्दी, पोर्तुगिज, डच इ. सत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात गाजत होते. याचमुळे मुअज्जम याच्या मध्यस्थीने याच दिवशी शिवरायांना 'राजा' हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ मार्च इ.स.१६६८
(चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५९०, संवत्सर किलक, सोमवार)
छत्रपती संभाजी महाराज नव्याने मोगली मनसबदार
मोगलांची मनसबदारी स्वीकारण्यासाठी संभाजीमहाराज राजगडावरुन निघाले. २७ ऑक्टोबर १६६७ ला ते औरंगाबादेला पोहचले. तेथे त्यांची व जसवंतसिंहाची भेट झाली. मोगली मनसबदारीबद्दल विचारविनिमय झाला आणि ४ नोव्हेंबर १६६७ रोजी शहजादा मुअज्जमकडून संभाजीराजांनी मनसब स्वीकारली. या मनसबीबद्दल त्यांना वऱ्हाडात जहांगिरी देण्यात आली, एक दागिन्यांनी मढवलेला हत्ती, रत्नजडित तलवार, पोषाख या गोष्टी भेट म्हणून देण्यात आल्या. सर्व तांत्रिक बाबींचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर संभाजीराजांना राजगडाला परत जाण्याची परवानगी देण्यात आली. राजे सफाईने वागत होते याचवेळी संभाजीराजांच्याबरोबर निराजी रावजी व प्रतापराव गुजरदेखील होते. त्यांच्या वतीने निराजी व प्रतापराव कारभार पाहतील असे ठरविण्यात आले होते. त्यामुळे पुढे जसवंतसिंहाच्या एका सैन्य तुकडीबरोबर संभाजीराजांची रवानगी राजगडी करण्यात आली व बादशहाकडे मनसब पक्की होण्याचे फर्मान पाठविण्यात आले.आजच्याच दिवशी म्हणजे ९ मार्च १६६८ रोजी संभाजीराजांच्या नव्या मनसबीवर शाही फर्मानाने शिक्कामोर्तब झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ मार्च इ.स.१६८९
(फाल्गुन वद्य त्रयोदशी, शके १६१०, संवत्सर विभव, शनिवार)
संभाजीमहाराजांना पकडल्याची हरजीराजांना बातमी!
मराठ्यांच्या धामधुमीत महाराष्ट्रात हाहा:कार उडालेला असताना
तिकडे कर्नाटकात संभाजी महाराजांच्या अटकेची बातमी नव्हती. उलट हरजीराजे महाडीक यांनी कर्नाटकात संभाजीमहाराजांच्या
सल्ल्यानुसार १६८९ सालापासून फ्रेंच व डचांशी चांगले संबंध ठेवण्यास
सुरुवात केली होती! हरजीराजे महाडीक हे फ्रेंच व डचांवर चांगले वजन ठेवून वागत होते. मात्र युरोपात त्याच सुमारास डच व फ्रेंचांचे लिग ऑफ औरंगाबादचे युद्ध सुरु होण्यास फ्रेंचांविरुद्ध मदत मागण्यासाठी डचांनी आता हरजीराजांशी
बोलणी सुरूकेली होती. मात्र याच सुमारास वज्राघात झाला, याच सुमास आजच्याच दिवशी म्हणजे ९ मार्च १६८९ रोजी महाराष्ट्रात संभाजीमहाराजांना मोगलांनी अटककेल्याची बातमी आली. या बातमीने हरजीराजे महाडीक मानसिकदृष्ट्या फार खचले! जीवनावरची त्यांची आसक्ती उडाली. कारण संभाजीमहाराजांचा फार मोठा आधार त्यांना होता. केवळ कर्तव्यभावनेने म्हणूनच ते स्वराज्यांची
सेवा करीत होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/dxumuI7fzw4
📜 ९ मार्च इ.स.१७३१
१७३१ साली मराठ्यांनी फिरंग्यांना(पोर्तुगीज) उत्तर फिरंगाणत(वसई प्रांत) हल्ले करून जेरीस आणले होते. मराठ्यांच्या उत्पातामुळे पोर्तुगीज पुरते वैतागले होते. मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी काय योजना केल्या आहेत त्याबद्दल ९ मार्च १७३१ रोजी उत्तर फिरंगाणच्या अधिकाऱ्याने गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयला पत्र लिहिले. तो पत्रात लिहितो, 'मराठ्यांनी आपल्या मुलखातून पुरता पाय काढलेला नसला तरी त्यांची चढाई थांबली आहे. उलटपक्षी आम्ही मात्र त्यांच्या मुलुखात जाळपोळ करण्याचा क्रम चालू ठेवला आहे. लढाईच्या दंग्यामुळे मराठ्यांच्या व्यापारउदिमाला मोठाच धक्का बसून त्यांची नुकसानी झाली आहे. बहुधा ते आता तहास यावेत आम्ही त्यांची शेकडो बायकापोरे पकडली आहेत. त्यांना आम्ही लवकरच बाटविणार आहोत. तेही त्यांना(मराठ्यांना) मोठे भयच आहे. इंग्रज आपल्याशी(पोर्तुगीज) मिळून आहेत. साष्टीच्या वेळी त्यांच्याच मदतीमुळे निभाव लागला. पुढेही ते मदत खचित करतील. पेशव्यांचे मोगलांशी वैमनस्य आहे. पण मोगल मराठ्यांसारखा विश्वासघातकी आहे. कदाचित तो पेश्व्यासही सामील व्हावयाचा. आंग्र्याशी आपला बिघाड आहे. शिद्दीही बिघडला आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ मार्च इ.स.१७४७
नानासाहेब पेशवे इकडे मोहिमांमध्ये गुंतले असताना सातारा दरबारातील पेशव्यांचे प्रतिनिधी बाबूजी नाईक बारामतीकर, नागपूरचे रघूजी भोसले, श्रीपतराव प्रतिनिधी, आनंदराव सुमंत, नारोराम मंत्री, यमाजी शिवदेव दाभाडे, गायकवाड इ. मंडळींनी शाहूमहाराजांच्या कानाशी एकच कुजबूज सुरू केली आणि शाहूराजांचे नानासाहेबांविरोधात कान फुकले. म्हणून या कटकटीला वैतागून दि. ९ मार्च १७४७ रोजी 'शिक्के कट्यार व जरी पटका हुजुरे पाठवून जामदारखान्यात दाखल करविले' आणि नानासाहेबांना पेशवेपदावरून दूर केले. बाजीरावांच्या काळात दौलतीला झालेले प्रचंड कर्ज नानासाहेब फेडू शकणार नाहीत ही शंका आसपासच्या मंडळींनी शाहूमहाराजांच्या मनात निर्माण केल्याने त्यांना ते खरे वाटून नानासाहेबांना पदच्युत केले. आता नानासाहेब एकतर पुन्हा पेशवेपद मिळवण्यासाठी झोळी पसरतील अथवा शाहूमहाराजांविरुद्ध बंड करतील असे दरबारातील
प्रतिस्पर्धांचे डावपेच होते. परंतु, नानासाहेबही राजकारणात मुरलेले होते. त्यांना विनातक्रार पेशवेपद सोडून उलट, "सर्वस्वी अपराधी अपत्य आहे. पायाशी कोणती सेवा (घडावी ते) सांगणे, (परंतु) आज्ञा होऊन (या) पायांचा वियोग न व्हावा..." अशी अर्जदास्त नानासाहेबांनी शाहूमहाराजांकडे केली. शिवाय पेशवेपदाच्या (नानासाहेबांच्या!) तोलामोलाचा एकही मनुष्य न दिसल्याने दि. १३ एप्रिल रोजी शाहूमहाराजांनी नानासाहेबांनाच पुन्हा पेशवेपदाची वस्त्रे दिली. यानंतर नानासाहेब लगेच कोकणात पुन्हा जम बसवू पाहणाऱ्या पोर्तुगीजांवर चालून गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ मार्च इ.स.१७४९
( चैत्र शुद्ध द्वितीया शके १६७१, शुक्लनाम संवत्सरात गुरुवार)
दि. ९ मार्च १७४९ या दिवशी नानासाहेबांचे पुत्र विश्वासराव यांची मुंज करण्यात आली. विश्वासरावांच्या मुंजीनंतर लगेचच नानासाहेबांचे सावत्र बंधू, मस्तानी आणि श्रीमंत बाजीरावपुत्र समशेरबहाद्दर यांचे लग्न पेठ संस्थानचे संस्थानिक लक्षधीर दलपतराय पवार यांची मुलगी लालकुंवर हिच्याशी करण्यात आले. (एप्रिल १७४९).
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू


