:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४१३ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
माझी अशी कोणती मोठी भिड आहे की मला देव भेटेल, मी तर नावाचाच फार वाया गेलो आहे. माझी अशी कोणती सेवा देवाच्या जवळ रुजू झाली आहे व अशी कोणते सत्ताबळ माझ्याकडे आहे की जेणेकरून देव माझ्यावर कृपा करेल. माझी जाती व कुळ धर्म असे कोणते शुद्ध आहे की ज्यामुळे मला तुझ्या प्राप्तीचे वर्म समजेल. देवा मी असे कोणते तपोनिधी मोठे दानधर्म पुण्य केले आहे किंवा कोणती अशी माझ्या अंगी सत्ता बळ आहे की ज्यामुळे तु मला भेट देशील. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तर पूर्ण वाया गेलेलो आहे त्यामुळे भूमीला देखील भार झालो आहे आता यापुढे माझे काय होईल याविषयी विचार करू गेलो तर मला ते काही समजत नाही.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०५/०४/२०२६
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏आई माझी काळुबाई #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏


