
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
@sanjayji7708
हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।रामकृष्णहरी
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३८२ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
माझ्या मुखा मध्ये हरिनाम आले हे माझ्या आवडीनुसार झाले आहे. आता हे हरिनाम इतके सेवन करू की मागे परत बाकी शिल्लक राहिली नाही पहिजे. हरिनाम साठवण्यासाठी मना सारखी मोठी जागा आहे आणि पुढे हरिनामाची अमुप राशी देखील आहे. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल या तीन अक्षरांनेच माझे सर्व कार्य पूर्ण झाले आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०५/०३/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३८१ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा तु मनात आणले तर काय करू शकत नाहीस डोंगराचे मोहरी आणि रंकाचा राजा तु करू शकतोस. हे पांडुरंगा अशुभाचे शुभ करणे हे तुझ्यासाठी काही अवघड नाही. देवा तुला सोळा सहस्त्र बायका असूनही तु ब्रम्हचारी कसा आणि दुर्वास ऋषींनी साठ खंड्या अन्न खाऊन देखील ते नीराहारी कसे हे आश्चर्य नाही काय? देवा पाच पतींचा भोग घेऊन देखील द्रोपदी सती म्हणजे पतीव्रता कशी आणि भीष्माचार्य सारख्या पित्रांचा वध करूनही धर्मराजाला पुण्य कसे प्राप्त झाले? देवा दशरथ राजाने ब्रम्हहत्या केली व पातकांची राशी ठरला तरीदेखील तु त्याच्या कुशीत जन्म घेतलास हे नवल नाही काय? नारद मुनींनी अनेक ठिकाणी चहाडी लावून भांडणे लावून दिली व त्या भांडणांमध्ये अनेक लोकांचे वध देखील झाले आहेत परंतु त्यांना अनुमात्र सुद्धा दोष लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मग यांच्या सर्वांच्या दोषा पुढे माझे दोष ते किती आहेत आता मी तुझ्या पायाशी सरता झालो आहे व निष्पाप होऊन तुझ्याच ठिकाणी राहिलो आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०४/०३/२०२६
वार-बुधवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३८० -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
या संसारात आल्यानंतर सुख कोठेही नाही त्यामुळे तुम्ही व्यर्थ हावभरी होऊ नका. संसार म्हणजे दुःखाचा बंदीखाणा आहे त्यामुळे येथे कोठेही सुखाचा विचार करता येत नाही. चौदा कल्प आयुष्य ज्याला आहे असा मार्कंडेय ऋषी सूर्यकिरणांच्या पासून त्रास होतो म्हणूनच झोपडी बांधून त्या खाली राहिला आहे.
तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे या बंदी खाण्यातून लवकर सुटून जा आणि हरीला हृदयात साठवून ठेव.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०३/०३/२०२६
वार-मंगळवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७९ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
मीठ जर पाण्यामध्ये मिसळले तर ते पाण्यापेक्षा वेगळे होऊन राहते काय? त्याप्रमाणे देवा मी तुझ्याशी समरस झालो असून तुझ्यातच मी हरवून गेलो आहे. अग्नी आणि कापूर यांचे मीलन झाले मग तेथे काजळी म्हणून काही शिल्लक राहते काय? तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी एक ज्योत आणि तुझी एक ज्योत दोन्ही मिळवल्या तर अग्नी एकच उरतो त्याप्रमाणे आपल्या दोघांचेही आत्मज्योत एकच झाली आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०२/०३/२०२६
वार-सोमवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७८ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
जन्माला आलेल्या सर्व लोकांनी आपण जन्माला येऊन काय करावे याचा सावधानतेने विचार करावा. आपले अंतकाळी काय होणार याविषयी विचार करावा कारण आपला प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ हे संसारातील कामे करण्यातच खर्च होत आहे. मुलांचे व मुलींचे सर्व काही व्यवस्थित करून देणे म्हणजे मंगल आहे असे नाही तर परमात्मा व आपल्या मध्ये जो लौकिकाचा आंतरपाट आहे तो बाजूला सारून देणे हे महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात लौकिकामुळेच तुमच्यापासून देव अंतरला आहे व तुमच्या डोळ्यावर अज्ञानाचा अंधार पडला आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०१/०३/२०२६
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏
#🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७७ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका केसावर आहे असा जो विराट हरी आहे, असा हा हरी गवळ्यांच्या घरी त्यांचा उंबरा चढतांना हाताचा ठेका धरतो. या हरीने अनेक प्रकारचे मोठे मोठे प्रकारचे बलवान दैत्य मारले आहेत असे पुरानाने पवाडे गाऊन वर्णन केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात सर्व कला आणि चातुर्य त्याच्या अंगी आहेत .
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२८/०२/२०२६
वार-शनिवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७६ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
या पृथ्वीतलावरील जेवढी काही वृक्ष आहेत वेली आहेत जेवढे काही वनचर पशु आहेत ते सर्व आमचे सोयरे आहेत आणि सुस्वर कंठाने आळवणारे पक्षी देखील आमचे जिवलग आहेत. आणि जास्त प्रकारचे वृक्ष वेली वनचर पशू-पक्षी हे वनात आढळतात आणि वनात एक वेगळेच सुख आहे तेथे एकांतही आहे व आम्हाला एकांतवासाची खूप आवड आहे. तेथे गेले की मग कोणत्याही प्रकारचा गुणदोष आपल्या अंगी येत नाही. वनामध्ये आकाशाचे मंडप आणि पृथ्वी आमचे आसण आहे तेथेच आम्हाला खूप करमते कधी कधी तर आम्ही तेथे आनंदाने क्रीडा ही करतो म्हणजेच खेळ खेळतो. देहा निर्वाहाकरता आमच्याजवळ गोधडी व पाणी पिण्यास एक कमंडलू आहे आणि वेळेची ज्ञान करून देण्याकरता आम्हाला वाऱ्याच्या गतीवरून वेळेचे ज्ञान होते. हरिकथा हे आमचे भोजन आहे त्याचा आम्ही विस्तार करू आणि हरिकथेची वेगवेगळे प्रकार करून आम्ही आवडीने सेवन करू. तुकाराम महाराज म्हणतात वनात आम्ही एकटे असल्यामुळे आम्ही आमच्या मनाशी संवाद करतो आणि परमार्थ विषयी आम्ही आमच्याशी संवाद साधून चर्चा करत असतो.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२७/०२/२०२६
वार-शुक्रवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७५ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा आम्ही अज्ञानी आहोत तुझ्या स्वरूपाचे मुख्य वर्म कोणते आहे हे आम्ही कसे जाणावे? कारण तुझ्या स्वरूपाचा अंत पार नाही असे श्रुती सांगत आहे. त्यामुळे हे ऋषिकेशा मला जसा तु हवा हवा वाटतो तसाच तु सुकुमार लहान व्हावे. आणि देवा तुझी चतुर्भुज रूप दाखवून माझी इच्छा तु पूर्ण कर. देवा तुझे स्वरूप म्हणजे सप्तपाताळा पेक्षा खाली सप्त स्वर्गाच्याही पलीकडचे आहे. असा मी लहान आहे आणि तुझे स्वरूप मी माझ्या डोळ्याने कसे पाहू शकेल? तुकाराम महाराज म्हणतात मला माहित आहे ज्या भक्ताला जसे तुझे रूप आवडेल तसा तु होतोस. हे पंढरीनाथा विठोबा असा तु आहेस.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२६/०२/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏










