
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
@sanjayji7708
हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।रामकृष्णहरी
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३८६ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
सामान्यतः कोणत्याही लोकांशी मी बोलू नये असाच मी खूप वेळा विचार करतो. परंतु कोणते पाप आडवे येऊन उभा राहते कुणास ठाऊक माझ्या अंतरंगातील विचार गुण एकदमच बदलून जातो. संसाराच्या हातून माझा गळा मी सोडून घेतला आहे तरीदेखील माझ्यापुढे अशी अवकळा का येते हे मला काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुझ्या सेवेत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अडथळा येतोच आता याला मी काय करू?
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०९/०३/२०२६
वार-सोमवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३८५ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा आमच्या भाग्यानेच तुला अशी बुद्धी आली असावी म्हणजे आम्हाला भयातून आणि उपवत त्रासातून मुक्त न करण्याची बुद्धी आली असावी, असे म्हणजे आम्हाला भयातून व त्रासातून मुक्त करण्याचा योग पुन्हा येणार नाही, देवा तु आपल्यापासून आम्हाला भिन्न केलेस परंतु आमची अशी चेष्टा करण्यावाचून तुझे काही खोळबंले होते काय? देवा मूर्तिमंत पाप पुण्य कोठे आहे ते आम्हाला प्रत्यक्ष दाखव उगाच कशाचाही संकल्प आम्हाला का वाहायला लावतोस? तुकाराम महाराज म्हणतात देवा पांडुरंगा आता तुमची ही चेटूक गिरी तुम्ही आवरा आणि आमच्या पाठीमागे लावलेली कोटी पीडा ही नाहीशी करा.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०८/०३/२०२६
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३८४ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
हे विठ्ठला अरे तु हे खोटे जगत आम्हाला सत्य भासवले आहे व आम्ही ते खरे मानून विषयातच सुख मानीत बसलो आहोत त्यामुळे आम्हाला काळ किती त्रास देतो आहे तुच बघ. हे विठ्ठला अरे तुच एक सत्य आहेस सत्य आहेस सत्य आहेस मग आम्हाला हा जगताचा आकार का दाखविलास? देवा तुम्ही तुमची माया आता आवरा त्या मायेने आम्हाला भयभीत का केले आहे?
तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही इतके चतुर का झाला आहात अहो तुम्ही पूर्वी निर्विकार निर्गुण होते ना ते बरे होते.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०७/०३/२०२६
वार-शनिवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३८३ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
हरिनाम घेण्यासाठी किती वेळा जन्माला येऊन मेलो तरी मला काही वाटणार नाही कारण हरिनाम हेच मला बरे वाटते. कारण हरीच्या नावाविषयी मला इतकी आवड आहे की त्याला पारावारच नाही ते किती घेतले तरी असे वाटत नाही की आता बास झाले. हरीचे नाम म्हणजे जणू अमृताची खानच उघडली आहे ते कितीही घेतले तरी मनाची तृप्तिच होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हे नाम मुखाने आवडीने घेउन मनाला ते पचते देखील.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०६/०३/२०२६
वार-शुक्रवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३८२ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
माझ्या मुखा मध्ये हरिनाम आले हे माझ्या आवडीनुसार झाले आहे. आता हे हरिनाम इतके सेवन करू की मागे परत बाकी शिल्लक राहिली नाही पहिजे. हरिनाम साठवण्यासाठी मना सारखी मोठी जागा आहे आणि पुढे हरिनामाची अमुप राशी देखील आहे. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल या तीन अक्षरांनेच माझे सर्व कार्य पूर्ण झाले आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०५/०३/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३८१ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा तु मनात आणले तर काय करू शकत नाहीस डोंगराचे मोहरी आणि रंकाचा राजा तु करू शकतोस. हे पांडुरंगा अशुभाचे शुभ करणे हे तुझ्यासाठी काही अवघड नाही. देवा तुला सोळा सहस्त्र बायका असूनही तु ब्रम्हचारी कसा आणि दुर्वास ऋषींनी साठ खंड्या अन्न खाऊन देखील ते नीराहारी कसे हे आश्चर्य नाही काय? देवा पाच पतींचा भोग घेऊन देखील द्रोपदी सती म्हणजे पतीव्रता कशी आणि भीष्माचार्य सारख्या पित्रांचा वध करूनही धर्मराजाला पुण्य कसे प्राप्त झाले? देवा दशरथ राजाने ब्रम्हहत्या केली व पातकांची राशी ठरला तरीदेखील तु त्याच्या कुशीत जन्म घेतलास हे नवल नाही काय? नारद मुनींनी अनेक ठिकाणी चहाडी लावून भांडणे लावून दिली व त्या भांडणांमध्ये अनेक लोकांचे वध देखील झाले आहेत परंतु त्यांना अनुमात्र सुद्धा दोष लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मग यांच्या सर्वांच्या दोषा पुढे माझे दोष ते किती आहेत आता मी तुझ्या पायाशी सरता झालो आहे व निष्पाप होऊन तुझ्याच ठिकाणी राहिलो आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०४/०३/२०२६
वार-बुधवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३८० -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
या संसारात आल्यानंतर सुख कोठेही नाही त्यामुळे तुम्ही व्यर्थ हावभरी होऊ नका. संसार म्हणजे दुःखाचा बंदीखाणा आहे त्यामुळे येथे कोठेही सुखाचा विचार करता येत नाही. चौदा कल्प आयुष्य ज्याला आहे असा मार्कंडेय ऋषी सूर्यकिरणांच्या पासून त्रास होतो म्हणूनच झोपडी बांधून त्या खाली राहिला आहे.
तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे या बंदी खाण्यातून लवकर सुटून जा आणि हरीला हृदयात साठवून ठेव.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०३/०३/२०२६
वार-मंगळवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७९ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
मीठ जर पाण्यामध्ये मिसळले तर ते पाण्यापेक्षा वेगळे होऊन राहते काय? त्याप्रमाणे देवा मी तुझ्याशी समरस झालो असून तुझ्यातच मी हरवून गेलो आहे. अग्नी आणि कापूर यांचे मीलन झाले मग तेथे काजळी म्हणून काही शिल्लक राहते काय? तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी एक ज्योत आणि तुझी एक ज्योत दोन्ही मिळवल्या तर अग्नी एकच उरतो त्याप्रमाणे आपल्या दोघांचेही आत्मज्योत एकच झाली आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०२/०३/२०२६
वार-सोमवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७८ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
जन्माला आलेल्या सर्व लोकांनी आपण जन्माला येऊन काय करावे याचा सावधानतेने विचार करावा. आपले अंतकाळी काय होणार याविषयी विचार करावा कारण आपला प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ हे संसारातील कामे करण्यातच खर्च होत आहे. मुलांचे व मुलींचे सर्व काही व्यवस्थित करून देणे म्हणजे मंगल आहे असे नाही तर परमात्मा व आपल्या मध्ये जो लौकिकाचा आंतरपाट आहे तो बाजूला सारून देणे हे महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात लौकिकामुळेच तुमच्यापासून देव अंतरला आहे व तुमच्या डोळ्यावर अज्ञानाचा अंधार पडला आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०१/०३/२०२६
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏











