
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
@sanjayji7708
हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।रामकृष्णहरी
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७५ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा आम्ही अज्ञानी आहोत तुझ्या स्वरूपाचे मुख्य वर्म कोणते आहे हे आम्ही कसे जाणावे? कारण तुझ्या स्वरूपाचा अंत पार नाही असे श्रुती सांगत आहे. त्यामुळे हे ऋषिकेशा मला जसा तु हवा हवा वाटतो तसाच तु सुकुमार लहान व्हावे. आणि देवा तुझी चतुर्भुज रूप दाखवून माझी इच्छा तु पूर्ण कर. देवा तुझे स्वरूप म्हणजे सप्तपाताळा पेक्षा खाली सप्त स्वर्गाच्याही पलीकडचे आहे. असा मी लहान आहे आणि तुझे स्वरूप मी माझ्या डोळ्याने कसे पाहू शकेल? तुकाराम महाराज म्हणतात मला माहित आहे ज्या भक्ताला जसे तुझे रूप आवडेल तसा तु होतोस. हे पंढरीनाथा विठोबा असा तु आहेस.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२६/०२/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७४ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
कोणतेही कर्म सहजरीतीने केले तर ते भगवंताला सहज अर्पण होते परंतु कर्माचा कर्ता मी आहे असा जर अभास झाला, तर आपण केलेले कर्म हे हरी कडे न जाता पुन्हा आपल्याकडे येतात, आपण जर म्हटलं की हे कर्म हरीचेच आहे तर ते हरिला अर्पण होते ही आपल्या चित्तात आठवण धरत रहावी. हरी हा सर्वत व्यापक आहे आणि हाच वेदाचा मुख्य सिद्धांत आहे. त्यामुळे हरीचे चिंतन करण्यासाठी आपले चित्त नेहमी सावध असू द्यावे. संन्यासश्रम स्वीकारताना विरीजाहोम करावा लागतो या होमाचा अर्थ असा होतो की मी देह नाही मी आत्मा आहे. मग विरजा होम केला तरी ज्याने संन्यासाश्रम स्वीकारला आहे त्याने पुन्हा मी देह आहे या संकल्पावर का बर यावे? देहामध्ये काम क्रोध आहे अंतरंग विकारांनी मलिन झाली आहे मग यज्ञकर्मात स्वहा करण्यात कसले पुण्य आहे? वासनेचे मुंडनच झाले नाही तर यज्ञात मंत्र उच्चारून व पूजा करून काय उपयोग आहे? हे सर्व साधने करण्यापेक्षा सर्व साधनांचे उपाय करण्यापेक्षा हरी प्राप्ती करून घेण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे विठोबाचे पाय. आणि जो विठोबाच्या पायाचे ध्यान करेल तो परमार्थाचा मार्ग चुकेल काय? तुकाराम महाराज म्हणतात आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐका ती गोष्ट करण्यापासून तुम्ही चुकू नका. इतर कोणतेही साधने करण्याची खटाटोप करण्यात तुम्हाला धोका आहे त्यामुळे एका हरीला शरण जा हेच तुमच्या हिताचे आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२५/०२/२०२६
वार-बुधवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७३ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
ब्रम्हज्ञान जर एका दिवसात कळाले असते तर सर्वांचा अभिमान तात्काळ गळून गेला असता. सर्व विकारांना जिंकणाऱ्या शुकांच्या मागे देखील अभिमान लागला होता नंतर त्यांना व्यासांनी त्यांची अंतरमुख दृष्टी केली. त्यांना मुद्दामून जनकाच्या भेटीसाठी व्यासांनी पाठविले व देहाभिमानाचे खोटे नाणे आहे हे सिद्ध केले. देहाभिमान हा खोटा आहे हे सिद्ध करून दाखवल्या नंतर शुकाचारी मेरुपर्वतावर अभ्यासासाठी गेला. तुकाराम महाराज म्हणतात मग शुकाचार्यने मेरू पर्वतावर जाऊन समाधी साधली आणि हा सर्व प्रकार ज्या काळात चालू होता त्यावेळी आम्ही तेथे उपस्थित होतो.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२४/०२/२०२६
वार-मंगळवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७२ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
उंबरातील किडकाला हे उंबरच म्हणजे सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते. अशी उंबरे त्या झाडाला किती असतात आणि असे उंबराची झाडे नवखंडा मध्ये किती असतात? आम्हाला जे दिसतं तेच आमच्यासाठी ब्रह्मांड वाटते परंतु असे अगणित ब्रह्मांड आहेत जे विराटाच्या एका केसावर आहेत. असे विराटाच्या अंगावर अगणित केस आहेत ते मोजू गेले तर मोजताही येत नाहीत. असे कोट्यावधी विराट आहेत आणि हे सर्व ज्याच्या पोटात साठवले गेले आहेत. असा हा नंदाचा बाळ मुकुंद आहे एवढा व्यापक हा परमानंद असूनदेखील स्वतःला तान्हे लेकरू म्हणून घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशी ही ईश्वराची अगम्य लिला आहे परंतु केवळ ब्रम्हज्ञान झाल्यामुळे मला ही ईश्वराची लिला समजली आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२३/०२/२०२६
वार-सोमवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७१ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
काही मूर्ख देवभक्त देवाला विशिष्ट मापा मध्ये घालून जप करण्यास बसतात. देहाचे मुरकुंडी करून नित्य नीज देवाची पूजा करायची असते परंतु विशिष्ट मापात देवाला घालून पूजा केली तर देवाची सांडलवंड केल्यासारखे होते. अमऱ्यादित परमात्म्याला मऱ्यादित समजणे यामध्ये देवाचा कोणत्याही प्रकारचा लहानपणा येत नसून उलट आपणच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ओस असल्यासारखे म्हणजे आपल्याच स्वरूपाला नाहीसे केल्यासारखे होते. काही लोक आपल्या शिष्यांना सांगतात की देवाचा या या वेळी जन्म झाला या या वेळी त्याचा अवतार समाप्त झाला परंतु तसे काहीही नसून हा संकोच पहिला टाकून द्यावा. असे सांगणारे काही लोक आहेत व ऐकणारेही लोक आहेत परंतु हे दोघेही अखंड जन्ममरणाचे वेठबिगारी करतात व सत्य समजून न घेता इतर माईक पदार्थांचा भार आपल्या पदरात बांधुन घेतात. असे लोक आपल्या रिकाम्या देहरूपी झोपडीत भ्रमाचे झडप म्हणजे दार लावून आत्म्याला त्यामध्ये अडकवून ठेवतात. हा प्रकार म्हणजे कसा होतो तर एखाद्याने गोदावरीच्या तीरावरच स्नान करण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी आड किंवा विहीर खाणावी असा मूर्खपणाचा हा प्रकार होतो. तुकाराम महाराज म्हणतात काही ठिकाणी नको ते उद्देश बळजबरीने केले जातात असा उद्देश करणाऱ्यांचे तोंड काळे होवो.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२२/०२/२०२६
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७० -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
ब्रम्हज्ञान नसताना उपदेशाचा जर बलात्कार म्हणजे बळजबरी केली तर, तो प्रकार म्हणजे गारुडयाने वानराला नाचवल्या सारखा होईल. जरी कोणी सांगितले धन धान्य मिळवावे, राज्य संपादन करावे, तर हे बोल ऐकण्यास जरी समाधानकारक असले तरी ते फोलफटा प्रमाणेच आहे. आणि अधिकार नसताना ब्रम्हज्ञानाचा जो उपदेश करतो तो प्रकार म्हणजे जमिनीत ओल असताना बीज पेरणे असा होतो आणि जो जमिनीत ओल नसताना बीज पेरतो त्याला मूर्खच म्हणावे. श्रेष्ठ लोक हे वेदाने सांगितल्याप्रमाणे आचरण करतात व जगाला तसे आचरण करायला लावतात कारण त्यांच्या ठिकाणी त्याला अनुभवाचा भक्कम आधार असतो. आणि आपल्या पदरात पाप बांधले जाईल असे काही वर्तन करू नये. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला मेघवृष्टीने उपदेश करत आहे तो तुम्ही ऐका व्यर्थ अभिमान धरून कोणाला काही सांगणे या मध्ये फार मोठा धोका असून सहज रीतीने मी जे काही सांगत आहे ते चांगले सांगत आहे व ते उत्तम आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२१/०२/२०२६
वार-शनिवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३६९ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
माझ्या पांडुरंगा सारखे सुखरूप या जगामध्ये दुसरे कोण आहे ते सांगा? पंढरीला सोडून इतर कोठेही जाण्याची गरज नाही हिंडण्याची गरज नाही आणि पंढरीत गेल्यावर मुंडण करण्याची गरज नाही व इतर साधना करण्याची आवश्यकता नाही. पंढरीत गेल्यानंतर चंद्रभागेचे स्नान करावे व हरिकथा ऐकावी हाच विधी आहे व त्याने सदासर्वकाळ चित्ताला समाधान मिळते. तुकाराम महाराज म्हणतात पंढरीमध्ये हरिनामाचा व जीव ब्रम्ह ऐक्याचा अवैध रुप काला आहे व हा लाभ वैकुंठाचे देखील दुर्लभ आसून हा विशेष लाभ संत संगतीने प्राप्त होतो.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२०/०२/२०२६
वार-शुक्रवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏
#🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 #🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३६८ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
राजाच्या सेवकाला जर एखाद्या दरिद्री भिकाऱ्याने त्रास दिला तर, हे नारायणा मग यामध्ये कोणाचा हीन पणा झाला हे तुम्हाला कळत नाही काय? लोखंडाची परीसा बरोबर भेट होऊन देखील लोखंडाचे सोने झाले नाही तर. तुकाराम महाराज म्हणतात तुझे नाव माझ्या कंठात असून देखील माझी काळा बरोबर भेट झाली तर यात हिन पणा कोणाचा आहे हे नारायणा ते तुम्हीच समजून घ्यावे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१९/०२/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🌻आध्यात्म 🙏 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची #🙏भक्ती सुविचार📝 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏 #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫











