
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
@sanjayji7708
हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।रामकृष्णहरी
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४३९ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा तुमच्या पाया जवळ जे वारकरी आलेले आहेत त्यांसी मी विनविले आहे. त्यांच्याजवळ मी एक पत्रही दिले आहे त्या पत्रामध्ये मी काय काय लिहिलेले आहे ते ऐका, माझी पहिलीच विनंती लिहिली ती म्हणजे मला रंकाला तुम्ही विसरू नका. देवा त्याविषयीच मी सारखी चिंता करतो आणि या चिंतेनेच माझी अशी चिंताग्रस्त अवस्था झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची भेट व्हावी यासाठी तर मी खरा संसारावर रुसलो आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०१/०५/२०२६
वार-शुक्रवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏आई माझी काळुबाई #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४३८ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
आहो विटेवर उभे असणाऱ्या देवा तुम्ही आमच्या आजपर्यंत खूप खटपट चुकविली आहे. तुम्ही आमच्या सर्वांचे जन्म-मरणच चुकविले आहे त्यामुळे आता आम्ही कोणी व कोणावर रुसावे. आतापर्यंत विविध प्रकारचे संकल्प करण्यातच माझे बळ खर्च झाले आहे आणि त्या संकल्पाच्या भाराने विविध प्रकारचे सुख आणि दुःख रुपी फळे निर्माण झालेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची माझी भेट केवळ लोभाच्या सत्तेमुळे झाली. नाही तर माझ्यात एवढे बळ नव्हते कि तुमची माझी भेट व्हावी.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.३०/०४/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏आई माझी काळुबाई
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४३७ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा आता इतर खटपट व व्यर्थ बोलणे बास झाले. देवा माझी एक विनंती तुम्ही ऐका ते म्हणजे माझे मस्तक तुमच्या चरणावर असू द्यावे. हे दातारा माझ्याकडून जे आपराध घडले त्यांना तुम्ही क्षमा करा व यापुढेही करत राहा. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा तुम्हाला आमच्या सर्व व्यथा समजतात.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२९/०४/२०२६
वार-बुधवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३७६ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
या पृथ्वीतलावरील जेवढी काही वृक्ष आहेत वेली आहेत जेवढे काही वनचर पशु आहेत ते सर्व आमचे सोयरे आहेत आणि सुस्वर कंठाने आळवणारे पक्षी देखील आमचे जिवलग आहेत. आणि जास्त प्रकारचे वृक्ष वेली वनचर पशू-पक्षी हे वनात आढळतात आणि वनात एक वेगळेच सुख आहे तेथे एकांतही आहे व आम्हाला एकांतवासाची खूप आवड आहे. तेथे गेले की मग कोणत्याही प्रकारचा गुणदोष आपल्या अंगी येत नाही. वनामध्ये आकाशाचे मंडप आणि पृथ्वी आमचे आसण आहे तेथेच आम्हाला खूप करमते कधी कधी तर आम्ही तेथे आनंदाने क्रीडा ही करतो म्हणजेच खेळ खेळतो. देहा निर्वाहाकरता आमच्याजवळ गोधडी व पाणी पिण्यास एक कमंडलू आहे आणि वेळेची ज्ञान करून देण्याकरता आम्हाला वाऱ्याच्या गतीवरून वेळेचे ज्ञान होते. हरिकथा हे आमचे भोजन आहे त्याचा आम्ही विस्तार करू आणि हरिकथेची वेगवेगळे प्रकार करून आम्ही आवडीने सेवन करू. तुकाराम महाराज म्हणतात वनात आम्ही एकटे असल्यामुळे आम्ही आमच्या मनाशी संवाद करतो आणि परमार्थ विषयी आम्ही आमच्याशी संवाद साधून चर्चा करत असतो.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२८/०४/२०२६
वार-मंगळवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏आई माझी काळुबाई #✍ज्ञानेश्वरी📖
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४३५ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
आम्ही असे लोभी वैद्या सारखे नाही आहोत, काही वैद्य असे आहेत की जे पैशासाठी भलत्या रोग्याला भलतेच औषधे देतात. वैद्याने पैशासाठी रोग्याला कोणतेही आवडीचे पदार्थ खाण्यास सांगावे कोणतेही कुपथ्य करण्यास सांगावे हे योग्य नाही आणि रोग्याला बरे करण्यासाठी वैद्याने त्याची भीड किंवा त्याच्याशी सलगी करणे काहीच उपयोगाचे नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैद्य आहोत व रोग्याला बरे करण्यासाठी आम्ही कोणतीही त्याची भीड त्याची सलगी न ठेवता त्याला वेळ प्रसंगी चिरू, त्याला डाग देऊ, त्याला वेळ पडली तर त्याची आम्ही चिरफाड ही करू कारण, पुढे त्याचा परिणाम म्हणजे रोगी सुखी होणार आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२७/०४/२०२६
वार-सोमवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏आई माझी काळुबाई #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४३४ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
ज्याचा जसा अधिकार असेल तसा आम्ही त्याला उपदेश करू कारण ज्याला जे सहन होईल तेच त्याच्याकडे देणे योग्य ठरेल. मुंगीच्या अंगावर हत्तीच्या अंबरीचा भार घातला तर त्याने कोणते कार्य सिद्ध होणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात परध्या जवळ फासे वाघोरा आणि कूऱ्हाड इत्यादी सर्व साहित्य असतात परंतु त्याला योग्य वेळी योग्य प्रसंगी जे साहित्य उपयोगी पडेल तेच तो काढत असतो.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२६/०४/२०२६
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏आई माझी काळुबाई
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४३३ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
जे न बोलण्या सारखे आहे ते आम्ही आता उघडपणे बोलून सर्वांना एकच उपदेश करत आहोत. मेघ जसे वृष्टी करताना ठाव ठिकाणा पहात नाही सर्वांसाठी एक समान वृष्टी करते त्या प्रमाणे मी उपदेश करताना सर्वांना समान करत आहे आणि ज्याचा जसा भाव असेल तसा त्याला तो उपदेश फळ देईल. तुकाराम महाराज म्हणतात मी समाजाला उपदेश करताना कोणाला समाधान वाटावे किंवा मला समाधान वाटावे हा माझा हेतू नाही आणि मी तसे जर केले तर समोरच्यालाही त्रास आणि मलाही त्याचा त्रास होईल.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२५/०४/२०२६
वार-शनिवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४३२ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
धन, वित्त आणि कुळ यापेक्षा वैष्णव हे सगळ्यांपेक्षा महान आहेत. अशा महान थोर वैष्णवांच्या पदरात नारायण आहे व त्यांच्या हृदय पेटी मध्ये ही तोच आहे. वैष्णवांचे सर्व वागणे चालणे बोलणे हे गोड असून नारायण त्यांच्या हृदयात असल्यामुळे त्यांचे सर्व लाड पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात सूऱ्याला तरी उदय अस्त आहे परंतु वैष्णवांच्या तेज्याला कधीही अस्त नाही केवळ उदयच आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२४/०४/२०२६
वार-शुक्रवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏आई माझी काळुबाई #✍ज्ञानेश्वरी📖
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४३१ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
हरिनामामुळे ब्रह्मानंदापेक्षाही आनंदाला भरती येत आहे. हा भवसागर तरुन जाण्याकरता हरिनाम रुपी जहाज तयार झाले असून त्या जहाजावर आनंदाचा फरारा असलेले शिड लागले आहे. त्या जहाजामध्ये सर्व बाळ गोपाळ बसलेले आहेत व ते देवाकडे चालले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हरीची प्राप्ती करून घेण्यासाठी हरी नामाची चांगलीच वाट सापडलेली आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२३/०४/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏आई माझी काळुबाई #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
रामकृष्ण हरी माऊली #🙏भक्ती सुविचार📝 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏आई माझी काळुबाई












