
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
@sanjayji7708
हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।रामकृष्णहरी
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४७३ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
जे विठ्ठलाचे गीत अखंड गातात त्यांच्या पायी मी माझे चित्त ठेवीन. ज्यांना विठ्ठलाचे नाम आवडते ते माझे परम प्राणसखे आहेत. ज्यांना विठ्ठलाला आपल्या लोचनाने म्हणजे डोळ्यांनी पाहणे आवडते त्यांच्या पायाचे तीर्थ देखील मी स्वीकारील. ज्यांनी विठ्ठलाच्या ठिकाणी सर्व भक्ती भाव दिला आहे त्यांच्या पायी मी माझा जीव ठेवीन. तुकाराम महाराज म्हणतात हरीचा दास मी आहे असे जे म्हणून घेतात त्यांच्या पायाची माती मी होईल.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०४/०६/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४७२ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
भेद आणि अभेदाचा ताळा बसणे हे सहज शक्य नाही ते आपल्याला कळणारही नाही त्यामुळे साधकाहो तुम्ही आता नारायणाला आठवा. जर नामाचा छंद लावून घेतला तर त्याचे सर्व कार्य यथा संग पूर्ण होतात आणि अच्युताशी भेट होण्यास योग येत असतो. ज्याप्रमाणे नदीत पोहणाऱ्याला भवऱ्यापासून धोकाच असतो तो भवरा त्याला बुडवू शकतो त्याप्रमाणेच अगदी गावाच्या शिवेपर्यंत आलेल्या त्या वाटसरुला चोर पुरते लुबाडतात त्याप्रमाणे साधकाने शेवटपर्यंत आपली स्थिती स्थिर ठेवावी त्याला मोक्ष प्राप्त होईपर्यंत धोकाच असतो. तुकाराम महाराज म्हणतात कोणताही भाविक भक्त असो, साधक असो, जिज्ञासू असो, मुमुक्षु असो तो भक्तिभावे वाचून भव नदीच्या पार जाऊ शकत नाही हेच परमार्थातील मुख्य सार आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०३/०६/२०२६
वार-बुधवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #✍ज्ञानेश्वरी📖
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
रामकृष्ण हरी माऊली #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #✍ज्ञानेश्वरी📖
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४७१ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
धनवंत एक बहिर अंधळे । शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगीं ॥१॥
एखादा माणूस धनवान असला तरी तो बहिरा, अंधळा किंवा कुष्ठरोगासारख्या व्याधींनी ग्रस्त असू शकतो. म्हणजेच संपत्ती असूनही त्याला जीवनात दुःख भोगावे लागू शकते.
प्रारब्धाचि गति न कळे विचित्र । आहे हातीं सूत्र विठोबाचे ॥ध्रु.॥
प्रारब्धाची (पूर्वजन्मीच्या कर्मांची) गती फार विचित्र असते. कोणाला कोणते सुख-दुःख मिळेल हे आपल्याला समजत नाही. या सर्वाचा कारभार परमेश्वराच्या, म्हणजे विठोबाच्या हातात आहे.
आणीक रोगांचीं नांवें सांगो किती। अखंड असती जडोनियां ॥२॥
जगात कितीतरी प्रकारचे रोग, संकटे आणि दुःखे आहेत. ती माणसाच्या आयुष्याला सतत चिकटलेली असतात.
तुका म्हणे नष्ट संचिताचे दान खाता पावे सुख नेंदी ॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वसंचित पुण्य संपले की माणसाला सुख मिळत नाही. धन, वैभव असले तरी मनःशांती आणि खरे सुख लाभत नाही.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०२/०६/२०२६
वार-मंगळवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏आई माझी काळुबाई #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
#🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏आई माझी काळुबाई
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४७० -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा आजच्या प्रसंगी जगातील दुष्ट लोकांनी मला फार पीडा दिली आहे त्यामुळे माझे चित्त फार दुखावले गेले आहे. देवा दृष्ट जगाशी माझा संबंध तरी तु केव्हा तोडणार आहे ते काही मला कळत नाही मी तुझे पाय माझ्या मनात आठवून जीवन जगत आहेत. या जगाशी संबंध आला की अनेकांच्या अंतकरणाचे आणि माझी अंतकरण मिळून त्यांचे सुख दुखः बरेवाईटपणा माझ्या अंतःकरणात येते. तुकाराम महाराज म्हणतात जर एकांतवास घडला तरच जगाशी संबंध होणार नाही.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०१/०६/२०२६
वार-सोमवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏आई माझी काळुबाई
#🙏आई माझी काळुबाई #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
रामकृष्ण हरी माऊली #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏आई माझी काळुबाई
रामकृष्ण हरी माऊली #🙏भक्ती सुविचार📝 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई #🌻आध्यात्म 🙏 #✍ज्ञानेश्वरी📖












