
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
@sanjayji7708
हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।रामकृष्णहरी
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४४९ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा तुला माझी आठवण सुद्धा येत नाही हे मला समजले आहे कळले आहे त्यामुळे आता माझा जीव तरी मी कशासाठी सांभाळू. हे अनंता तु तरी आता माझ्या संचिता विषयी काय करशील माझे संचित तसे आहे की तुला माझी आठवण येत नाही त्यामुळे माझ्या जगण्याचा धिक्कार असो. देवा तु पतीत पावन आहेस तुझ्या किर्तीचा ठसा सर्वत्र पसरलेला आहे त्यामुळे तु माझा उध्दार करशील या आशेनेच मी निवांत राहिलो होतो. देवा तुझ्या वाचून दुसरा माझा कोण अंगिकार करणार आहे तुला इतकी हाक मारून देखील तु माझ्याकडे येत नाहीस तुझी भेट देत नाहीस याचा अर्थ असा की तु माझ्या विषयी निष्ठुर झाला आहेस हे मला समजले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु माझ्या जीवाची निराशा केली आहेस त्यामुळे आता मी तुझ्यासाठी माझ्या जीवाचा ही नाश करेल.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.११/०५/२०२६
वार-सोमवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏आई माझी काळुबाई #🙏भक्ती सुविचार📝
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४४९ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
हे देवा मागे तु पुष्कळ भक्तांचे अडचणीच्या वेळी रक्षण केलेस त्यांनी तुझे नाम घेतले की त्यांचे निर्वाणीच्या वेळेस तु त्यांच्यासाठी धावून गेलास. हे मला चांगल्याच रितीने माहित झाले आहे त्यामुळेच मी तुझा धावा करीत आहे. हे पांडुरंगा तुला माझ्याविषयी मात्र आता विसर पडला आहे त्यामुळे मी आता काय करू हे तुच मला सांग. हे नारायणा तुम्हाला अजूनही माझ्याविषयी दया का येत नाही असे तुम्ही मला तुमच्यापासून दूर का धरले आहे? तुकाराम महाराज म्हणतात हे केशीराजा आता तुझ्या वाचून माझा जीव जाऊ पाहत आहे त्यामुळे माझ्या भेटीसाठी तु लवकर उडी घालावी.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१०/०५/२०२६
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏आई माझी काळुबाई #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏 #✍ज्ञानेश्वरी📖
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४४७ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
लोभावर लक्ष ठेवून लोभाचे हीत मनात बाळगून जो न्यायधीश असत्य न्याय निवाडा करतो, त्याच्या पूर्वजांचे पतन होते आणि तो स्वतः व त्याचे पूर्वज देखील नरकात किडे होऊन पडतात असे जाणावे. त्याला निश्चयानेच कोटी गोहत्या केल्याचे पातक लागत असते. स्री प्रत्येक मासाला जो विटाळ स्रर्वत असते, तोच विटाळ खोटा न्याय निवाडा करणाऱ्या न्यायाधीश आपल्या पूर्वजांना पाजीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा खोट्या न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधीशाला यम त्रास देऊन त्याला नक्कीच कठोर शासन करेल.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०८/०५/२०२६
वार-शुक्रवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏आई माझी काळुबाई
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४४५ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा मी जिकडे पाहिल तिकडे मला देवच दिसावा असाच भक्तिभाव माझ्या ठिकाणी तु कृपा करून द्यावास. मी एकदेशी झालो असून देहालाच मी समजून मी गुणदोषांणी संपन्न झालो आहे. देवा मी ज्या ठिकाणी पाया पडेल तेथे तुमचे चरण असून माझे मस्तक तुमच्या चरणावर पडावे इतर ठिकाणी कोठेही माझे मस्तक पडून वाया जाणार नाही असे तुम्ही करा. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या जिवाला विश्वातील सारे विषमता आणि भेद नाहीसे करून तुमच्याच ठिकाणी माझ्या जीवाला आश्रय देऊन त्याचा तुम्ही स्वीकार करा.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०६/०५/२०२६
वार-बुधवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏आई माझी काळुबाई #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४४४ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
आपले मन शुद्ध व स्वच्छ करून नारायणाचे स्मरण करावे. तरच हा भवसिंधु तरुण जाता येईल व भवबंध तोडता येईल. अंतकरणात शुद्ध भक्तिभाव पाहिजे आणि खरे श्रद्धेचे बीज तेथेच असते. तुकाराम महाराज म्हणतात जसा लवणाचा खडा पाण्यात टाकला की तो पाणी रूपच होतो.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०५/०५/२०२६
वार-मंगळवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏आई माझी काळुबाई
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४४२ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा तुमचे पाय चित्तात राहावे ही मी तुम्हाला शेवटची विनंती करत आहे. देवा माझे मन तुमच्या सान्निध्यात राहील असेच कृपादान तुम्ही माझ्यावर करा. देवा माझे भाग्य उजळल्या शिवाय तुमची भेट तरी कशी होईल परंतु नुसते केवळ तुमचे चिंतन जरी केले तरी तुमची भेट घडण्यासारखेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझी विनंती ही एक कळकळीची असून ती विठ्ठलाने ऐकून पूर्ण करावी.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०४/०५/२०२६
वार-सोमवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝
🌼🌼 || श्री ज्ञानेश्वर महाराज कृपा || 🌼🌼
🏵️ गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची (पुणे) 🏵️
🙏 पालकांनो लक्ष द्या! 🙏
आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी
📚 शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक व संस्कारयुक्त शिक्षणाची सुवर्णसंधी!
📢 सन २०२६-२७ साठी प्रवेश सुरू झाले आहेत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯 आमची वैशिष्ट्ये:
✅ वारकरी संप्रदायाचे संस्कार
✅ कीर्तन, भजन व अध्यात्मिक शिक्षण
✅ स्वच्छ निवास व उत्तम सुविधा
✅ फिल्टर पिण्याचे पाणी
✅ घरगुती व पौष्टिक जेवण
✅ सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन
✅ CCTV सुरक्षा व्यवस्था
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📖 संस्थेतील उपक्रम:
✨ लेखी व तोंडी परीक्षा
✨ पारितोषिक वितरण
✨ संत जयंती व पुण्यतिथी उत्सव
✨ वक्तृत्व व सांस्कृतिक स्पर्धा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👦 प्रवेश:
➡️ इयत्ता २ री ते १० वी पर्यंत
📄 आवश्यक कागदपत्रे:
📌 आधार कार्ड
📌 शाळा दाखला
📌 मार्कशीट
📌 पासपोर्ट फोटो
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🍛 भोजन व्यवस्था:
✔️ सकाळचा नाश्ता
✔️ दुपारचे व रात्रीचे जेवण
✔️ आठवड्यातून एकदा गोड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
💰 फी:
➡️ वार्षिक ₹३५,०००/-
➡️ प्रवेशावेळी ₹२०,०००/-
➡️ उर्वरित ₹१५,०००/- (दिवाळीनंतर)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
⚠️ सूचना:
📵 मोबाईल वापरास मनाई
📅 महिन्यातून एकदा पालक भेट
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🌟 आपल्या मुलाला संस्कार + शिक्षण + उज्ज्वल भविष्य द्या! 🌟
📞 संपर्क:
संस्थापक/अध्यक्ष
ह.भ.प. संजयजी महाराज ढाकणे
📱 ९५९५०३०९०५
सचिव
ह.भ.प. मयूर महाराज राठोड
📱 ८८३०६४०६७३
📍 पत्ता: आळंदी देवाची, पुणे
🚨 प्रवेश मर्यादित – लगेच संपर्क करा! 🚨 #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏आई माझी काळुबाई #✍ज्ञानेश्वरी📖
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४४१ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा मी आता माझे पूर्ण शरीर तुम्हाला अर्पण केले आहे त्यामुळे त्याचा तुम्ही स्वीकार करून परिपूर्ण करून घ्यावे. देवा तुम्ही सर्व जाणते आहात तुम्हाला सर्व समजते पण मला तुमची पूजा कशी करावी तेच समजत नाही. पोटाला आलेल्या बाळाचे सर्वकाही दुखणे भाणे सुख-दुःख जाणून घेणे हे आई चे कामच आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी मला बालकाला तुम्ही कडेवर घ्यावे अशी माझी इच्छा आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०३/०५/२०२६
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४४० -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
हे नारायणा माझ्या मनात कोणती इच्छा आहे हे तुम्हाला माहित नाही काय परंतु तुम्हाला माझ्या मुखातून ती इच्छा ऐकायची आहे आणि तुम्हांला हेच आवडते. अहो तुम्ही मला सारखे बोलून माझे बोलणे वाढवता आणि लाडाने माझ्याकडून काहीतरी करकर करून घेता. देवा मी बोललेले सर्व शब्द चांगले व उत्तम असून ते कधी वायाला गेले आहेत काय? तुकाराम महाराज म्हणतात या गोष्टीचा अर्थ असा की माझ्यासारख्या बाळाला सारखे सारखे तुम्ही बोलायला लावता आणि तुम्ही स्वतःची करमणूक करून घेता.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०२/०५/२०२६
वार-शनिवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏आई माझी काळुबाई #✍ज्ञानेश्वरी📖
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४३९ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा तुमच्या पाया जवळ जे वारकरी आलेले आहेत त्यांसी मी विनविले आहे. त्यांच्याजवळ मी एक पत्रही दिले आहे त्या पत्रामध्ये मी काय काय लिहिलेले आहे ते ऐका, माझी पहिलीच विनंती लिहिली ती म्हणजे मला रंकाला तुम्ही विसरू नका. देवा त्याविषयीच मी सारखी चिंता करतो आणि या चिंतेनेच माझी अशी चिंताग्रस्त अवस्था झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची भेट व्हावी यासाठी तर मी खरा संसारावर रुसलो आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०१/०५/२०२६
वार-शुक्रवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏आई माझी काळुबाई #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝












