ShareChat
click to see wallet page
search
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२०_फेब्रुवारी_१६६० छत्रपती शिवाजी महाराजांनी खारेपाटण जिंकले. प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले. शिवाजी महाराजानंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला, त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकून घेतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२०_फेब्रुवारी_१६६० ( फाल्गुन वद्य चतुर्थी, शके १५८१, संवत्सर विकारी, सोमवार ) शाहिस्त्या नगरमध्ये! मराठ्यांना संपवण्याच्या विचाराने निघालेला शाहिस्त्या नगरला पोहोचला व तेथे त्याने छावणी टाकली. त्याची छावणी म्हणजे एक शहरच होते. महाराज त्यावेळी अफझल वधानंतर आदिलशाही मुलखात प्रचंड दरारा राखून होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२०_फेब्रुवारी_१८०२ दौलतराव शिंदेंनी इंग्रजांचा तह स्विकारला नाही इंग्रज वकील कॉलिन्स हा उज्जैन येथे २० फेब्रुवारी १८०२ रोजी पोहोचला आणि मे महिन्यापर्यंत कॉलिन्सचा मुक्काम उज्जैन येथे होता, बडोद्याच्या गायकवाड प्रमाणेच दौलतराव शिंदे यांवरही तैनाती फौजेचा तह करावा म्हणून दडपण वाढत होते, यावेळी कॉलिन्सने दौलतराव शिंदें समोर एक चार कलमी मसुदा मांडला होता पण दौलतरावाने कॉलींस च्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२०_फेब्रुवारी_१८१८ #इंग्रज_आणि_सिंहगड:- नोव्हेंबर १८१७ मध्ये पुणे जिंकल्यावर इंग्रजांनी धडाधड मराठ्यांचे किल्ले घेण्याचा सपाटा लावला. सिंहगड आणि आसपासच्या किल्ल्यांचा ताबा घ्यायची जबाबदारी ब्रीगेडीअर जनरल थिओडोर प्रिट्झलरवर सोपवण्यात आली. ह्या कामगिरीसाठी मद्रास आणि मुंबई रेजिमेंटचे एकूण ४१०० सैनिक त्याला देण्यात आले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
इतिहास छत्रपतींचा - szn@history of chhatrapati| आजचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६६० २० अफझल वधानंतर शिवराय आदिलशाही मुलखात प्रचंड दरारा राखून होते, अशातच मराठ्यांना संपवण्याच्या विचाराने पुण्याकडे निघालेला शाहिस्त्या नगरला पोहोचला. szn@history of chhatrapati| आजचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६६० २० अफझल वधानंतर शिवराय आदिलशाही मुलखात प्रचंड दरारा राखून होते, अशातच मराठ्यांना संपवण्याच्या विचाराने पुण्याकडे निघालेला शाहिस्त्या नगरला पोहोचला. - ShareChat