*सद्गुरु श्री देवेंद्रनाथ लघुकथा-१४*
*शक्तिचा अहंभाव-*
श्री मच्छिंद्रनाथ श्री कालभैरवाच्या दर्शनासाठी गदातीर्थाकडे जाऊ लागले!
बाजूने समुद्र दिसत होता!
डोंगरावरून जात असतां समुद्राची अथांगता नजरेत नजरेत भरण्यासारखी होती!
श्री मच्छिंद्रनाथ ते निसर्ग सौंदर्य पाहून प्रसन्न झाले!
उंच वाढलेली नारळाची हिरवीगार झाडे फारच आकर्षक दिसत होती!
श्री मच्छिंद्रनाथ हे निसर्ग सौंदर्य आपल्या नजरेत साठवित होते!
अशा प्रसन्न अवस्थेत डोंगरातून जाता जाता श्री मच्छिंद्रनाथांच्या पायाला एक मोठा दगड लागला व ते क्षणभर वाकले!
त्यांच भान रस्त्याकडे नव्हतच.
दगडाच्या बाजूला होतं!
पण एका मोठ्या दगडाला काही बाजूला चटकन न होता आल्यामुळे श्री मच्छिंद्रनाथांना ठेच लागल्यासारखं क्षणिक झालं.
त्यावेळी त्यांचे लक्ष डाव्या पायातील तोड्याकडे गेलं व त्यांना हसूच आलं!
त्या तोड्यानंच माता महाकालीशी रणयुध्द माजवील!
मातेशी भांडावं लागलं!
कुडाळ प्रांतातील महाकालीचे दैवत जागृत होते.
श्री मच्छिंद्रनाथ त्यांच्या दर्शनासाठी गेले असता त्यांनी सिद्धवाणीने मातेची स्तुति केली व दर्शनासाठी प्रार्थना केली.
माता सिद्ध कंठातील वाणीने प्रसन्न मुद्रेने श्री मच्छिंद्रनाथापुढे उभी राहिली!
मातेला विनयाने प्रणाम केला त्यांनी!
'माते तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो!'
'कोण वत्सा ?'
'मी मच्छिंद्रनाथ! अवधूतांचा शिष्य' जति!
'जति' असे म्हणत मातेने मच्छिंद्रनाथांच्या पायातील कड पाहिलं आणि ती मन मोकळेपणे हसली.
श्री मच्छिंद्रनाथ अधिकच गोंधळले.
माते! काय घडलं असं हसायला ?
'जती ना तू ?
पायात कड ?'
सिद्ध जतीचं आहे माते हे ?
सिद्ध जती तू ?
होय माते!
काय हवं तुला ?
मला स्वतःसाठी काही नको माते पण मी जे शाबरी कवित्व करणार आहे त्या कार्यात तुझा आशीर्वाद हवा!
आणि जिथं माते तुझं नाव येईल तिथं मंत्रांकित कार्य करावे!
जति तुझं कार्य करू मी ?
का असं म्हणते माते ?
अरे पतीता!
तुला का मी ओळखलं नाही ?
पण तू मला न ओळखताच म्हणतोस की कार्यासाठी तुझ्या शाबरीत राबू ?
माते काय वाईट करतोय मी ?
जोगड्या! कोळ्याचा तू पुत्र आणि भाषा मात्र जति सिद्धाची ?
काय सामर्थ्य आहे रे तुझ्याजवळ जति सिद्ध म्हणून पायात शिव तोडा घालायचा ?
माते, हे तू बोलतेस ?
मग कोण तुझ्यातला कोणी जती बोलतोय का ?
मी महाकाली आहे.
शिवाचे प्रतापवंत अस्त्र, काय प्रताप सिद्धीचा आहे तो दाखव आता नाही तर शिक्षा मिळेल'
असं म्हणून मातेने आरोळी ठोकली व आकाशात प्रवेश करून श्री मच्छिंद्रनाथाकडे क्रोधाने पाहू लागली.
तिच्या आरोळीने आसमंत दणाणला, झाडावरची माकडभितीने धपाधप पडली, ससे घाबरून सैरावैरा पळू लागले, तो नाद त्या जंगलात चांगलाच घुमला!
श्री मच्छिंद्रनाथांनी युद्धाचा पवित्रा घेतला व मनात म्हटले, मातेला शक्तिचा फारच अहंभाव झालेला आहे.
जती सिध्दाची शक्ती शक्तीतच आहे हे ही विसरलेली आहे.
श्री मच्छिंद्रनाथांनी आपल्या नेहमीच्या अस्त्रयुध्द प्राविण्याची चुणूक वासव शक्तिच्या योजनेने दाखविली!
नाथांनी त्वरित वज्रास्त्र पेरले!
पण माताहि काही कमी नव्हती, तीने ते वज्रास्त्र शैलाद्रीवर आपटले!
त्यामुळे पर्वत दुभंगून त्याचे तुकडे-तुकडे झाले!
हा सारा प्रकार पाहून अत्यंत चतुरपणे श्री मच्छिंद्रनाथाने वाताकर्षणाचा मंत्र प्रयोग केला!
मातेचा श्वास रोखून धरीला!
वाताकर्षण मंत्राच्या प्रयोगाने माता बेजार झाली व विव्हळू लागली!
त्यावेळी मातेने आदिनाथांच्या धावा सुरू केला!
माता विव्हळ अस्थेत धावा करु लागताच आदिनाथ तेथे आले!
तेथे श्री मच्छिंद्रनाथाला पाहुन आदिनाथांना फार आनंद झाला.
मच्छिंद्रनाथा, कालिकेची ही अशी का स्थिती केलीस ?
आदिनाथा, शक्तीला अहंभाव होता!
शक्ती बीजाला प्रधान न मानता स्वयं प्रधान झाल्यानं हे कटूताडन करावं लागलं!
आदिनाथा! क्षमा करा ह्या आपल्याला दासाला!
शक्तिला अहंभाव का झाला ?
-आदिनाथ गंभीर होऊन म्हणाले.
"आदिनाथा, मी विनम्र भावे मातेला माझ्या जीवब्रम्हाच्या शाबरी कवित्वाला तुझा आशीर्वाद असू दे व तू जिथं तुझं नाव येईल तिथं तू कार्यवत हो"असं म्हटलं तर फार क्रोधानं मातेने युद्ध पुकारलं व अशी रळी माजविली!
आदिनाथा!
शक्तिला उन्माद आला की स्वयं अवस्थाच राहत नाही हे मातेला कळावे म्हणून हे ताडन करावं लागलं!
क्षमा करा आदिनाथा!
मच्छिंद्रनाथा, पण तू स्वतः स्वयं नाथ बीज असताना तुच तुझ्या शक्तीशीच युद्ध का नाही केलंस ?
हसत आदिनाथ म्हणाले.
आदिनाथा! स्वयं अवस्थेतील शक्ती आचार प्रवृत्तीची नको का ?
कोणता आचार ?
कौलाचार!
कौलाचार ?
आदिनाथा, शिव व शक्ती ही अकूल कूल आहे.
मग शक्तीला स्वयंभू कसं म्हणता येईल ?
पण शक्ति स्वयंभू नाही म्हणूनच स्वयंभूनं शक्तिचा नको का विचार करायला ?
खोचकपणे आदिनाथ म्हणाले.
आदिनाथा, शक्तिला जर स्वयंभूचा विसरच पडला तर त्याची जाणीव शक्तीला नको का करून द्यायला ?
युक्तिवाद चांगला आहे मच्छिंद्रनाथा!
आता मातेला उठव!
शक्ती शिवाय शिव नाही!
मच्छिंद्रनाथांनी महाकाली आपल्या कवित्वाला अंकित व्हावी ह्यासाठी श्री आदिनाथांकडून वर मागून घेऊन नंतर मग वाताकर्षण अस्त्र काढून घेतले!
माता जागृत अवस्थेत येताच डोळे उघडून पाहते तर समोर शिवजी आदिनाथ!
आदिनाथांना नमस्कार करून मातेने मच्छिंद्रनाथांकडे पाहिले.
त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी विनयाने नतमस्तक होवुन नमस्कार केला!
त्यावेळी माता म्हणाली, बघा आदिनाथा, मच्छिंद्रनाथ आता कसा विनयानं नमस्कार करतोय ते!
माते माझं काही चुकले का ?
मच्छिंद्रनाथ म्हणाले.
चुकलं नाही तर काय ?
माता रागाने म्हणाली, मी शिवशक्ति आहे.
शिवा शिवाय कशी असू शकेन!
का हो आदिनाथ ?
शक्ति शिवा शिवाय नाही पण शिव जीवाशिवाय नाही.
आदिनाथ शांतपणे म्हणाले.
म्हणजे काय प्रभू ?
मातेने आश्चर्याने विचारले.
शिव हा जीवराम आहे!
आणि जीव हा शिवराम आहे.
मग माते शक्ति ही शिवा शिवाय जीवरामाजवळ असू शकत नाही का ?
आदिनाथा, हे उलट सुलट बोलणं मला समजत नाही.
आपला आदेश असेल तर मी जीवशक्ति शिवरामासाठी होईन- माता हसत म्हणाली.
माते, मच्छिंद्रनाथ, जती आहे!
सिद्ध आहे!
सिद्धांताचे बीज पृथ्वीतलावर कलियुगात पेरण्यासाठी तो अवतरला आहे.
सिद्धांत व शिवात काय फरक आहे माते ?
सिद्ध हा स्वयंभू आहे!
तो निरंजन आहे.
शिवात असुनही नसल्यासारखाच आहे म्हणूनच तो सिद्ध आहे!
अशा अनंत शक्ती तो आपल्या सिद्धावस्थेने निर्माण करील!
ह्या सिद्धांत आणि माझ्यात काहीच फरक नाही, ते दासोsहं अवस्थेत राहून सोsहं आहेत म्हणूनच ते शैवी वैष्णवाचारी आहेत!
पण तू जर त्यांच्याजवळ राहिलीस तर ते शक्तीचारीही होतील व कौलमताचा पुरस्कार मानवकुलासाठी करतील!
आदिनाथ, मातेला समजावून म्हणाले.
आदिनाथ! माझ्या सारं लक्षात आलं.
मच्छिंद्रनाथाला पाहिल्यावर मी आपलं रुप त्यांच्यात पाहिलं पण ही खरी शिवशक्ति आहे का हे आजमावण्यासाठी हे युद्ध मी केलं.
माते आता तरी खात्री झाली का ?
मच्छिंद्रनाथ विनयानं हात जोडून मातेला म्हणाले.
मच्छिंद्रनाथा, तू जति आहेस पण जतीचा वेश करून सर्वच जाती थोडेच होतात!
जति तपी असावा लागतो!
ते तपबळ तुझ्यात आहे की नाही ते आजमावलं!
माता म्हणाली.
पण माते!
हे बळ माझ्यात नाही याचे ज्ञान आता तरी झालं का ?
मच्छिंद्रनाथा! तू शिव व शक्ती एकाच ठिकाणी आणू शकतोस हे तू आता सिद्ध केलं आहेस.
योग्याचं तप हेच बळ आहे.
योगी शिव असेल तर त्यांचे तप शक्ती आहे.
कौलाचार हाच योगकुलात आहे. खरं ना ?
माते! आपण सर्व शक्तीमान आहात.
मी जास्त काय बोलणार ?
मच्छिंद्रनाथ म्हणाले.
माते, मच्छिंद्रनाथाची इच्छा आहे की तू त्याच्या शाबरी विद्येस सहाय्यभूत व्हावस!
माझीही इच्छा आहे की तू त्याच्या कवित्वास आशीर्वाद द्यावास!
नाहीतरी जीवब्रह्मसेवा करणाऱ्या शक्तित तू सामावलेली आहेस!
खरं ना ?
हसत आदिनाथ म्हणाले.
खरं आहे आदिनाथा!
आपण म्हणता त्याप्रमाणे मी मच्छिंद्रनाथाच्या शाबरी कवित्वास सहाय्यभूत होईन.
पण नाथा!
हे स्वयंभू नाथ असताना माझ्या सहाय्याची, आशीर्वादाची वा मर्जीची काय गरज ?
अगदी खोचक प्रश्न मच्छिंद्रनाथाकडे पहात माता म्हणाली.
नाथ स्वयंभू आहेत पण जीवब्रह्म स्वयंभू नाहीत.
हे सारं काही ते करीत आहेत ते विश्वाच्या कलियुगातील कलीच्या उन्मादाला ताब्यात आणण्यासाठी!
पण आदिनाथा हे देखील कलिच आहेत ना ?
नाथ कली ?
हसत आदिनाथांनी विचारले!
आदिनाथा, मच्छिंद्रनाथ अवधूत पाण्यात पाणी, आकाशात आकाश, जीवात जीव, युगात युग मग कलियुगात हे कोण ?
माता हसत म्हणाली.
माते! आम्ही जाती अवधूत तर आहोतच पण तू जशी द्वैतभावांत शक्ती आहेस तसे आम्ही पण द्वैत भावांत शिवशक्तीरूप आहोत!
नाही का ?
युक्तिवादांत फारच चतुर आहेस!
माता हसत म्हणाली.
माते, सर्व जीवात्म्यांना महात्मे नाही होता येणार म्हणून परम शिवाच्या स्वप्नाला आकार द्यायचा असेल तर द्वैतभावांत आपण शक्तिरुप राहून कलीचा उन्माद कमी नको का करावयास ?
मच्छिंद्रनाथ म्हणाले.
हा कलीचा उन्माद कसा कमी होणार ?
माता उत्सुकतेने म्हणाली.
माते, ज्या जीवात्म्यांना कलीच्या लोभानं पीडलं आहे व देहाला क्लेश होत आहेत तो क्लेश शिव जिवासही भोगावा लागतो.
तो शिवजीवाचा भोग कमी करण्यासाठी शक्तिचा विनियोग करून भोग कमी करावयास हवा.
ह्यासाठी आमचं तपबल माते तुझ्या चरणी अर्पण करून ही जीवब्रह्म सेवेच्या व्रतास सहाय्य कर म्हणून प्रार्थना करीतो!
मच्छिंद्रनाथ विनयानं म्हणाले.
त्यावेळी आदिनाथहि समाधानाने हसले!
मच्छिंद्रनाथा! तुझी इच्छा ही शिवइच्छाच आहे.
माझा आशीर्वाद आहे तुला!
असं मातेने म्हणताच मच्छिंद्रनाथांनी भावनावश होऊन मातेच दर्शन घेतलं व युद्धाचा जो प्रमाद घडला त्याबद्दल क्षमा मागितली!
त्यावेळी माता आदिनाथांकडे पाहत म्हणाली,
आदिनाथा, मच्छिंद्रनाथाचा हा विनय जर त्याच्या सिद्धकुळात असाच राहिला तर मी सदैव त्यांच्या सेवेतच आहे!
मातेने असे म्हणताच आदिनाथांनाहि फार प्रसन्न वाटलं!
मातेचा निरोप घेऊन आदिनाथ गेले व नंतर तीन दिवस मातेच्या सहवासात मच्छिंद्रनाथ राहिले.
जाताना मातेने महाकाली अस्त्र मच्छिंद्रास आठवण म्हणून प्रसन्नतेने दिले व म्हणाली, नाथा तुम्ही जिथं जाल तिथं मी शक्तिरूप तुमच्या जवळच आहे!
माते! मुलाला आई कशी सोडणार!
पण मुलानं आईला विसरता कामा नये!
हा कुलाचार नक्कीच पाळला जाईल माते!
त्यावेळी मातेने मातृप्रेमानं मच्छिंद्रनाथांना वात्सल्याने आलिंगन दीलं व मच्छिंद्रनाथांच्यातच विलीन झाली!
ही आठवण होताच, मच्छिंद्रनाथांना भावनावेग आवरेना.
ते जवळच्या झाडाजवळ थांबले व आसनस्थ होऊन मातेच्या ध्यानांत मातेचे नामस्मरण करू लागले!
।।ओम महाकाली देवतोभ्यो नमः।।
हा मंत्रच शक्तीला शक्तिरूप देत होता!
आणि आसमंत त्यातच लुप्त होत होता!
शक्तीला अहं राहिला नाही फक्त भाव राहिला रूप राहिलं ते विश्वाचं!
आणि ध्यान राहीलं ते शिवाचं की ज्यांत श्री मच्छिंद्रनाथाच सामावलेले गेले होते!
*आदेश, अलख निरंजन.... #मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏
#बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ #मायंबा वाले मच्छिंद्रनाथ #मायारुपी दादागुरु मच्छिंद्रनाथ महाराज #👣श्री मच्छिंद्रनाथ भक्त👣


