*म्हणता म्हणता २०२५ संपत आले. काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत कडू गोड अनुभव आले.*
आपण घर बदलतो त्या वेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्या वेळेस आठवल्या शिवाय राहत नाही. कारण, त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो.
*व.पुं.नी एक सुरेल विचार मांडला आहे,*
*" आठवणींचे रम्य नजराणे देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते.."*
शेवटी भुतकाळ म्हणजे काय तर, अनेक अनुभव, आठवणी यांचं कोलाज.
असं म्हणतात, पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य...
*एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते तसंच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो.*
वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाहीत. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याच माणसांची गरज लागते. पुन्हा व.पु. म्हणतात तसं,
*" समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात..."*
*असो, सूर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावं लागतंच...*
*तसंच नवीन संकल्प करुन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ या..*
गुरू ठाकूर यांच्या या दोन ओळी फारच सुंदर आहेत,
*"आयुष्य वाहते म्हणूनी बेचैन उगा का व्हावे...*
*ओंजळीत येईल तितके आपले धरुनी चालावे..."*
🙏🏻 🙏🏻 🙏🏻 #☕good morning Friends🌞 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात

