ShareChat
click to see wallet page
search
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #६_मार्च_१६७३ कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली. कोंडाजी फर्जंद यांनी साठ मावळ्यांसह पन्हाळा घेतला. महाराज निहायत खूश झाले कोंडाजी फर्जंदांची अस्मानी फत्ते झाली. मोहिमेसाठी २००० तरी याने मागणं अपेक्षित होतं पण मराठे जातीचेच निधड्या छातीचे! किती सैन्य मागावं याने? कोंडाजी फर्जंद नावाच्या या शूर मर्दानी राजांना सांगितलं राजे, ३०० गडी द्या फक्त...!! राजे अचंबित झाले! कोंडाजी फक्त ३००? पुरतील ? कोंडाजी म्हणला, राजे, ६० च पुरेत, पण अगदीच मोजके नको म्हणून ३००. राजांनी आपलं कडं काढून कोंडाजीला दिलं, कोंडाजी खुश झाले😀 किल्ल्याचे पहारे, किल्ल्याच्या कमजोर बाजू, कुठं कुठं तोफा आहेत? किल्लेदार कुठं असतो? पहारे कुठं कमी आहेत आणि नेमकी माहिती कळली. दिवस होता फाल्गुन कृ त्रयोदशी शके१५९५, ६ मार्च १६७३....!!!!!! कोंडाजी ६० जण घेऊन पुढं गेले आणि बोलले गड घेतो, गड घेऊन इशारत झाली की मग गडावर या🔥 त्यानं सैन्यासोबत अनेक कर्णे दिले होते तो नियोजनाचा भाग होता. सर्वजण गडाखाली गेले, दोर लाऊन सपसप कडा चढून गेले. तलवारी काढून मराठे सर्व किल्ल्यावर पसरले, पूर्वेला किल्लेदाराच्या महालाकडे हल्ला करायचा असे ठरले होते. इशारत झाली आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष सुरु झाले. किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला. आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या. किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला. कील्लेदार सुद्धा तलवार घेऊन मैदानात उतरला होता. नेमका कोंडाजीसमोर आला, कोंडाजीचा एक घाव मानेवर लागला आणि मुंडक उडालं. किल्लेदार पडला?!!! सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी बातमी गेली की किल्लेदार पडला. पूर्वी ज्या किल्ल्यावर माघार घ्यावी लागली होती तो किल्ला अवघ्या ६० जणांनी घेतला☝ गडावर भगवे निशाण मध्यरात्रीच लागले🚩 तोफांना बत्त्या दिल्या🔥 एक स्वार रायगडी राजांच्याकडे पाठवला🏇 तो किल्ल्यावर गेला तो दिवस☀️ चैत्र शु.प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा😀 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
इतिहास छत्रपतींचा - आजचे ऐतिहासिक दिनविशेष मार्च इ.स. 9&03 ६ ६ SCIIH@history bf chhatrapati वीर कोंडाजी फर्जंद यांणी किल्ले पन्हाळा जिंकण्यासाठी केवळ ६० मावळ्यांना सोबत घेऊन शत्रूच्या २५०० ते ३००० फौजेविरूद्धछ लढा देऊन फक्त ३ तासात ती लढाई जिंकली आणी पन्हाळा किल्ला जिंकला. आजचे ऐतिहासिक दिनविशेष मार्च इ.स. 9&03 ६ ६ SCIIH@history bf chhatrapati वीर कोंडाजी फर्जंद यांणी किल्ले पन्हाळा जिंकण्यासाठी केवळ ६० मावळ्यांना सोबत घेऊन शत्रूच्या २५०० ते ३००० फौजेविरूद्धछ लढा देऊन फक्त ३ तासात ती लढाई जिंकली आणी पन्हाळा किल्ला जिंकला. - ShareChat