Suraj Chavan
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 २९ ऑगस्ट इ.स.१६७७
दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचा प्रत्यय स्थानिकांसोबतच परकीय सत्ताधाऱ्यांनाही आला होता.डच व्यापारीही त्याला अपवाद नव्हते,त्यांच्या तेगेनापट्टणमच्या फॅक्टरीचा प्रमुख हर्बट जागेर याने आपल्या वकिलामार्फत शिवरायांना अर्ज करून आपल्या व्यापारासाठी त्यांच्या कौलाची आवश्यकता असल्याचे व शिवरायांची सदिच्छा भेट घेण्याची इच्छा असल्याचे कळवले होते. त्यामुळे शिवरायांनी त्यांना भेटीस येण्याची व व्यापार करण्याची परावनगी दिली. त्याप्रमाणे डच अधिकाऱ्याची व महाराजांची ६ ऑगस्टच्या दरम्यान भेट झाली होती. भेटीत महाराजानी त्यांना कौल देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी २६ ऑगस्ट ला डचाना पत्र देऊन शेरखानाच्यावेळी त्यांना मिळत असलेल्या सोयी चालू ठेवण्याचे आश्वासन दिले. फक्त महाराजांनी त्यात एक महत्वपूर्ण बदल केला तो म्हणजे गुलामांच्या व्यापाराला बंदी. ही माहिती जागेर व क्लेमेंट यांनी देवेनापट्टणमला पत्र पाठवून कळवली होती.
📜 २९ ऑगस्ट इ.स.१६८२
नाशिक जिल्ह्यातील साल्हेरचा किल्लावर मराठे खान्देशातून आणलेलली लूट ठेवत असत. साल्हेरच्या जवळचा मुल्हेर किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. साल्हेरचा किल्ला घेण्यासाठी शहाबुद्दीन खानाची नेमणूक करण्यात आली होती.त्याने साल्हेरच्या जवळ आपली छावणी दिली. किल्ला लढून ताब्यात येत नसल्याने तो फितुरीने घेण्यासाठी मुघलांनी प्रयत्न सुरू केले. साल्हेरचा किल्ला मराठ्यांच्या बाजूने परशुराम जोगीचा भाऊ लढवत होता. मुघल सरदार राहुल्लाखान आणि परशुराम जोगी यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या. या जोगीने ऑगस्ट १६८२ मध्ये रहुल्लाखानाला कळवले होते की जर बादशाही फौजा माझ्याबरोबर दिल्या तर साल्हेरचा किल्ला मी बादशाही अंमलात आणून देईन. पण प्रत्यक्षात त्याच्याकडून हा गड मुघलांच्या ताब्यात दिला गेला नव्हता.
📜 २९ आगस्ट इ.स.१६८६
(भाद्रपद वद्य ६, षष्ठी, शके १६०८, क्षय संवत्सर, वार रविवार)
इंग्रजांचे छत्रपती संभाजी महाराजांशी सलोख्याचे धोरण!
मोगल आणि इंग्रजांचे याच सुमारास सलोख्याचे संबंध नव्हते मछलीपट्टण आणि हुबळी येथील वखारी लुटण्याबाबत औरंगजेब बादशहाचा आदेश होताच कारण "व्यापार" हाच इंग्रजांचा उद्देश नव्हता तर त्यांना देशात सत्तेकडे जायचे असल्याने ते धिम्या गतीने मार्गक्रमण करत होते. त्यामुळे कोणासही न दुखावता ते रहात असत. सत्ताधीश होण्याचा त्यांचा मनसुबा होता आणि मुंबई हे सत्ता केंद्र तर सुरत हे व्यापार केंद्र होते. छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांस सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे पुढची पावले ओळखून बदलत्या परिस्थितीनुसार इंग्रज छत्रपती संभाजी महाराजांशी चांगला स्नेह वाढवत होते. अन खुपच सबुरीने वागत होते. त्यातच कॅप्टन केजवीनने छत्रपती संभाजी महाराजांशी तह करून तहाची कागदपत्रे सादर केल्यानंतर सुरतकरांनी छत्रपती संभाजी महाराजांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत असा स्पष्ट आदेशच त्यांना देण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांशी मैत्री करून आपली कामे करून घ्या. पोटात शिरा आणि गोड बोलून आपला कार्यभाग साधा असे आदेश देऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची, धैर्याची, धर्माची, साहसाची पुर्ण ओळख इंग्रजांना झाल्याची ही पोचपावतीच आहे.
📜 २९ आगस्ट इ.स.१६८६
मोगल सेनापती याकुतखानाने खेमसावंताला लिहीलेल्या पत्राची नोंद !
सिद्दीची लुटालूट चालूच होती. तो इ.स.१६८५ मध्ये आपले आरमार घेऊन मराठी प्रदेशात आला. त्यावेळी मराठ्यांच्या आरमारावर मोगलांनी हल्ला केला. सिद्दी परत फिरला. मोगलांनी आरमार प्रमुख गोविंद कान्हो यांना पकडले. ७-८ ते गुराबे बुडविली. शिपायांची कत्तल केली. दंडाराजपुरी आणि चौल जवळ मुघल सेनापती याकुतखान याने मराठ्यांचे सैन्यास मारले.
📜 २९ ऑगस्ट इ.स.१७०९
श्री
देव
स्वस्तिश्री श्री राज्याभिषेक शके ३६ विरोधी नाम संवत्सरे भाद्रपद शुद्ध शष्टी इंदूवारस क्षेत्रिय कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी यांनी राजश्री सरदारांनी पागा व शिलेदार (सिलेदार) व हवालदारांनी व कारकुणांनी व लोकांनी किलेहाय व माहालनिहाये व बाजे यास आज्ञा केली ऐसी जे श्री वास्तव चिंचवड यास मौजे चिखली तालुका हवेली प्रांत पुणे हा गाव कुलबाबा कुलकानू हालीपटी पेस्तरपटी देखील सरदेशमुखी सावोत्रा व सरपाटीलकी व सरगौडकी इनाम आहे ऐशस श्रीचा इनाम बिलाकुसूर चालवणे स्वामीस अगत्य आहे तरी तुम्ही ते जाणोन मौजे मजकूरीस घासदाणियाचा अगर फडफमारस वरकड कोणहे बाबेचा उपद्रव येक जरा न देणे रोखापत्र न करणे मौजे मजकुराचा ऐवज सदरहू बाबती देखील श्री कडे पावेल तुम्हास कथला कुसुर करावया गरज नाही बोभाट अलियास ताकिद होईल.
मर्यादेयं विराजते
मराठी अनुवाद
श्री राजा शाहू छत्रपती यांनी चिंचवडच्या देवाने दिलेली चिखली गावाची सनद यांना सरदेशमुखी आणि सरपाटीलकी आणि सरगौडकी इनाम आहे.
श्री चा इनाम बिल कसूर चालवणे कोणताही त्रास न देता व कोणताही उपद्रव न करता हे इनाम चालू द्यावे असे छत्रपती शाहू महाराजांचे आज्ञापत्र किंवा एक हुकुम आहे मराठी भाषेमध्ये आज्ञा.
आणि ही आज्ञा स्वराज्यातील सरदार शिलेदार पागा हवलदार कारकून किल्लेदार आणि सर्वसामान्य रयत जनता त्या सर्वांना ही अज्ञान लागू होती या आज्ञेचे सर्वांनी काटेकोर पालन करावे अशी छत्रपती शाहू महाराजांची आज्ञा
पाहायला गेले तर चिंचवड देवस्थानला चिखली गावची एक सनद आहे पण लक्ष देऊन पाहिले तर एका छत्रपती ची आपल्या सत्तेवर आणि आपल्या स्वराज्यातील सरदार किल्लेदार शिलेदार हवालदार कारकून आणि सर्वसामान्य रयत मधील जनता या सर्वांवर काय पकड आहे हे दिसून येते.
📜 २९ ऑगष्ट इ.स.१७८७
नाना फडणिसानी पुणे दरबारातील पोर्तुगीजांचा वकील नारायण शेणवी धुमे यास बोलवून घेऊन त्याच्यापाशी सोंधेच्या राजाची वास्तपूस केली. ते त्याला म्हणाले, 'संवदेकरांचे पोर्तुगीजानी आजपर्यंत काय केले ते कळून आलेच आहे. आता आपण त्याचे बरवे करू इच्छितो. त्याला आपल्या राज्यावर बसविण्यास शक्य झाल्यास पाहातो.' नाना फडणीस यांचे वरील उद्गार सूचक होते. पोर्तुगीजानी सोंधेच्या राजाचे काहीच बरे केले नव्हते. परस्पर मैत्रीच्या कराराखाली त्यानी सोंधेकरांचे महाल सैन्य धाडून आपल्या ताब्यात घेतले; परंतु सोंधेच्या राजाची त्या महालात काडीचीही सत्ता नव्हती.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏आई एकविरा 🙏 #🙏श्री स्वामी समर्थ📿
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*