mahesh m. shirkar
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१६ आॅगस्ट इ.स.१६६२*
"अण्णादी दत्तो प्रभूणीकर" हे वाकनिशी करत होते, त्यांना छत्रपती शिवरायांनी सुरनिशीचा हुद्दा सांगितला.
*१६ ऑगस्ट इ.स.१६८१*
आतापर्यंत केवळ मराठी मुलखाचीच नासधूस करणारा सिद्दी १६ ऑगस्ट पासून इंग्रजांनाही त्रास देऊ लागला. त्याने इंग्रज दलालाकडून पैशाची मागणी करून तसेच मुंबईच्या वखारीची नासधूस केली. मुंबईकरांनी हि तक्रार सुरातकरांना कळविताच त्यांनी कोणाही इंग्रज नागरिकाने सिद्दीच्या नोकरीत जाऊ नये असा हुकुम काढला. मुंबईकरांनी हा हुकुम ताबडतोब अमलात आणला.
*१६ ऑगस्ट इ.स.१७००*
आपल्या राजाला म्हणजेच छत्रपती संभाजीराजेंना हाल हाल करून मारले म्हणून मराठ्यांना जास्तच चिड आली. सभोवतालच्या मुघल प्रदेशावर घिरट्या घालून मराठ्यांनी उच्छाद मांडला. आजच्या दिवशी "हनुमंतराव निंबाळकर" यांनी सातारा मधील "खटाव" हे ठाणे काबीज केले व मुघलांकडून लढणाऱ्या मराठी सरदाराला ठार केले. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज