🆔Official_Sagar 💞💤👑
“छत्रपती शिवाजी महाराज प्रथम जिंजीस १५ हजार पायदळ व १६ हजार घोडेस्वार घेऊन वेढा दिला. तेव्हा विजापुरी किल्लेदार नासीर महंमदखान याने ७-८ हजार सैन्यानिशी तो किल्ला लढविला. तथापी शेवटी त्यांनी तो व आसपासचा मुलुखही घेतला...”
● शिवाजी महाराजांचा मुक्काम कावेरी तीरास आल्यानंतर शिवाजी महाराजांनी एकोजीस पत्रे लिहिली की,
“भले लोक आम्हापाशी पाठविणे. त्यावरून एकोजीने कांही भले लोक शिवाजीराजेंकडे पाठवून दिल्हे. त्या भले लोकांसी बहुता रीती घरोबियाचा वेव्हार बोलोन अर्धा वाटा बऱ्या बोले द्या म्हणोन शिवाजीराजेंने सांगोन पाठविले. त्याबराबरी शिवाजीराजेंतर्फेने भले लोक जाऊन एकोजी जवळी जाऊन बहुतां रीती बोलले की, गृहकलह करू नये. शिवाजीराजें आपला अर्धा वाटा मागतात तो द्यावा ऐसे बोलिले. एकोजीने कपटबुद्धिऐसी मनी धरिली की या समयांत बहुत थोर राजे जाले. खासा भेटीस येऊन हलभल नरमी बहुत दाखवावी, आणि शिवाजीराजेंचा वाटा बुडवावा ऐसी बुद्धी धरून वाटियाच्या निवाडियाचा तह न करिता एकोजी खासाच शिवाजी महाराजांच्या भेटीस आला...”
● शिवाजी महाराजांचा मुक्काम तिरूमलवाड्यास असताना म्हणजे जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात एकोजी २००० स्वार त्या उपरी शिवाजी महाराजांची एकोजीजवळ तक्रार अशी होती की,
“आम्ही बहुता रीती तुम्हासी बोलिलो की, आमचा अर्धा वाटा द्या. परंतु तुम्ही वाटा द्यावा हा विचार मनी धराच ना. मग जरूर जाले की, तुम्ही धाकटे भाऊ आपण होऊन आमचे भेटीस आलस आणि तुम्हाला धरावे, आणि वाटा मागावा हे गोष्टी थोरपणाचे इजतीमध्ये ल्याख नव्हे. या निमित्य तुम्हाला तंजावरास निरोप दिधला. तुम्ही चंजाउरास गेलेसी. याउपरी गृहकलह वाढऊं नये. वाढविल्याने उभयपक्षी कष्टी होईजेत. यैसे जाणून शामजी नाईक व कोनेरीपंत व शिवाजी शंकर या हाती मागते बहुतां रीती सांगोन पाठविले की, तुम्ही व आम्ही वांटे करून घेऊन परस्परे समाधाने राहू. परंतु तुम्ही संधी न कराच. युद्ध करावे यैसेच मनी धरले...” #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त