प्रदीप भारत
623 views 1 days ago
कृष्णाने भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, त्यामुळे या पृथ्वीवर व भारतात अनेक आत्मज्ञानी लोक निर्माण झाले. कितीतरी विचारवंत निर्माण झाले. कितीतरी पारमार्थिक अभ्यास करणारे निर्माण झाले. आध्यात्मिक प्रश्न व उत्तरे, स्व-संवाद चालू झाले. जगाला एक नवीन दिशा मिळाली. लोकांना चांगले जीवन माहीत होते, सुंदर जीवन माहीत होते, योगी जीवन माहीत होते; पण योगेश्वर जीवन, सर्वेश्वर जीवन, विश्वरूप जीवन, पूर्णत्व जीवन, अजरामर जीवन, अनंत-विशाल जीवन याचा परिचय संपूर्ण जगाला श्रीकृष्ण भगवंतांमुळे पाहायला मिळाला, जाणायला मिळाला, स्व-अनुभवास मिळाला. सर्वच भगवद्गीता-बोध वाचून त्यांचा आंतरिक DNA पूर्णपणे बदलला व ते सर्वच कृष्णमय झाले. विचार बदलले व ते कृष्णमय झाले. देहभाव विसरून त्यांचा स्वतःचा देहच कृष्णमय झाला. भारतात इतके चमत्कार घडू लागले, दृष्टान्त होऊ लागले. परमार्थात लोकांचे पटापट जीवन पालटू लागले, कारण गीता-बोध, श्रीकृष्णाचे प्रत्येक वाक्य जीवन बदलणारे होऊ लागले. हजारो लाखो गीते रचली गेली. हजारो लाखो गीतांवर अनेक महान महान गुरुजनांनी ग्रंथसंपदा निर्माण केली. कृष्णाचे गुणगान लोकांनी इतके केले की, "गीता जोही मन लावून एकदा वाचेल त्याचे जीवन बदलून जाईल", हे ब्रीदवाक्य जनमानसात गुंजू लागले. गीतेला सर्वोच्च आध्यात्मिक क्षेत्रात मान-सन्मान मिळाला. कोणीही वाचू शकतो, कोणीही समजू शकतो - कुटुंबातील माणूस, शाळेतील विद्यार्थी, गुरुजन, बिजनेस मॅन, डॉक्टर, सायंटिस्ट कोणीही! तर्कवितर्क करणारा खोजी किंवा जिज्ञासू कोणीही, त्याला पडलेल्या सर्वच प्रश्नांचे उत्तर गीता-बोध म्हणजे कृष्ण-बोध होता. बोध --- आम्ही भारतीय भाग्यवान आहोत की कृष्ण आपला आहे, आपल्या भारतात जन्माला आला, गीता ज्या भूमीत सांगितली, कृष्णाने लीला इथेच केल्या. मग बंधूंनो, आपण किती भाग्यवान! आपल्या सनातन संस्कृतीमध्ये इतके दिव्य, भव्य, महान लोक जन्माला आले व त्यांचे नामस्मरणही आपण करत नाही??? गर्वाने सर्व धर्मांच्या लोकांना सांगितले पाहिजे, "आमच्या श्रीकृष्णाची गीता ग्रेट आहे, सर्वोत्कृष्ट आहे." 🙏🏻🙏🏻🌼🌼🌸🌸🌸🌸 जय सनातन संस्कृती! #🧾भगवद्गीता श्लोक🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏
20 shares

More like this