Dr Amol Melage
#🙏शिवदिनविशेष📜 आजचे ऐतिहासिक दिनविशेष २१ ऑगस्ट १६६१ (भाद्रपद शुद्ध षष्टी, शके १५८३, संवत्सर प्लव, बुधवार ) सर्व सरकारी कारकूनांना पालखीचा मान! पावसाळा सुरू झाल्याने महाराजांनी प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी, प्रशासन व्यवस्थेत लक्ष घातले. आजच्या दिवशी राजगडी वास्तव्यास असताना शिवरायांनी रामराजपंतांच्या जागी "नरहरी आनंदराव" यांना पेशवेपदी नेमले, तर "अनाजीपंतास" वाकनिशी दिली. तसेच इतर काही मंत्र्यांना पालख्यांची नेमणूक केली. २१ ऑगस्ट १६८१ औरंगजेबाने आपला दुसरा मुलगा आज्जम याला “शहा” हि पदवी देवून दक्षिणेच्या मोहिमेवर पाठवले. २१ ऑगस्ट १६८२ "किल्ले रामशेज" मराठ्यांकडून जिंकण्यासाठी मुघल सरदार "कासीमखान" याने किल्ल्याच्या बरोबरीने डेरे (मनोरा) उभे केले. पण मराठ्यांनी रात्रीतच ते नेस्तनाबूत केले. २१ ऑगस्ट १६८८ माहुली गड मुघलांच्या ताब्यात गेला. ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता, पुरंदरच्या तहात तो पुन्हा मोगलांकडे गेल्यावर १६७० मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर शंभुराजेच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फितुरीने जिंकून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. किल्ला फितुरीने घेण्यासाठी मुघल सरदार मातबरखानाने माहुलीचा किल्लेदार द्वारकोजी याचे मन वळवण्यासाठी नरसु महाडिक याला मध्यस्थ नेमले. त्याच्या प्रयत्नाने किल्लेदार द्वारकोजी मुघल सरदार अब्दुल कादिर याला भेटला आणि म्हणाला की,'साल्हेरचा किल्लेदार आसोजीप्रमाणे मला मनसब दिली तर मी किल्ला खाली करीन,आणि ४० हजार रुपये, १० घोडे, खिल्लत, इनाम आणि राहण्यासाठी जुन्नरजवळची दोन गावे वतन दिली तर मी स्वतः दरबारात हजेरी देण्यासाठी येईन. 'किल्लेदार द्वारकोजी अब्दुल कादिरला भेटला ती ता#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती