Amezing_Ashwini
447 views 6 days ago
लालूच... जगातील सर्वात विषारी बीज Greed...लालच जगात अनेक विषारी झाडं आहेत. त्यांच्या पानांमध्ये, मुळांमध्ये किंवा फळांमध्ये विष असतं. पण एक असंही झाड आहे, जे दिसतच नाही. त्याचं बीज प्रत्येक माणसाच्या मनात पडू शकतं. त्या बीजाचं नाव आहे—लालूच. हे बीज इतर बियांसारखं नसतं. त्याला काटे नसतात. उलट त्याला खूप सुंदर, रंगीबेरंगी आणि रसाळ फळं लागतात. त्या फळांवर लिहिलेलं असतं— झटपट पैसा... मोठं पद... सत्ता... प्रसिद्धी... कौतुक... मोठेपणा... ही फळं इतकी आकर्षक असतात की त्यात विष असू शकतं, याचा विचारही माणूस करत नाही. आणि याच क्षणाची वाट काही मतलबी माणसं पाहत असतात. कारण त्यांना माहीत असतं—लालूचेची बाधा झालेल्या माणसाला आपल्या स्वार्थासाठी वापरणं फार सोपं असतं. मग ते तुमच्याभोवती गोड शब्दांचं जाळं विणतात. "तुझ्यासारखा हुशार दुसरा कोणी नाही..." "तुझी खरी किंमत तुझेच लोक ओळखत नाहीत..." "तू खूप कर्तबगार आहेस..." "तू आमच्यासोबत राहिलास तर खूप पुढे जाशील..." हे ऐकताना माणूस अक्षरशः हरभऱ्याच्या झाडावर चढतो. त्याला वाटतं— "हो... माझी किंमत खरंच या लोकांना कळली आहे." पण त्या कौतुकामागे प्रेम नसतं... स्वार्थ असतो. हळूहळू लालूच विवेकावर ताबा मिळवते. मग योग्य-अयोग्याचा विचार कमी होतो. ज्यांनी आयुष्यभर साथ दिली, तीच माणसं आपल्याला चुकीची वाटू लागतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दोष दिसू लागतो. त्यांच्याशी वाद होतात. गैरसमज वाढतात. कधी कधी तर त्यांच्या विरोधात उभं राहून आपण त्यांचाच छळ करतो. आणि ज्याला आपण आपला समजतो, त्याच्या सांगण्यावरून आपल्या माणसांशी द्रोह करायलाही मागेपुढे पाहत नाही. कारण त्या क्षणी आपल्याला सत्य दिसत नसतं... लालूचेने दाखवलेली रंगीत स्वप्नं दिसत असतात. निसर्गातही याचं एक विलक्षण उदाहरण आहे. संड्यू (Drosera) नावाची एक मांसाहारी वनस्पती असते. तिच्या पानांवर छोटे-छोटे चमकणारे, चिकट थेंब असतात. ते कीटकांना आकर्षक वाटतात. कीटक त्या चमकणाऱ्या थेंबांकडे आकर्षित होतो, पानावर बसतो आणि क्षणात त्या चिकटपणात अडकतो. मग सुटण्यासाठी जितका धडपडतो, तितका अधिक अडकत जातो आणि शेवटी वनस्पती त्याच्यापासून पोषण मिळवते. लालूचही अगदी अशीच असते. ती आधी आकर्षित करते... मग अडकवते... आणि शेवटी माणसाला आतून खाऊन टाकते. फरक एवढाच— संड्यूच्या पानावर अडकलेला कीटक आपला जीव गमावतो... पण लालूचेच्या जाळ्यात अडकलेला माणूस अनेकदा आपली माणसं, आपला विवेक, आपला स्वाभिमान आणि शेवटी स्वतःचं माणूसपण गमावतो. मतलबी माणूस मात्र आपलं गणित शांतपणे मांडत असतो. जोपर्यंत त्याचं काम असतं, तोपर्यंत तो तुमचं कौतुक करतो. तुमच्या अहंकाराला खतपाणी घालतो. तुमच्यात आणि तुमच्या माणसांत अंतर निर्माण करतो. पण त्याचा स्वार्थ पूर्ण झाला की... तोच माणूस तुम्हाला तोंडाघाशी पाडतो. आणि तेव्हा लालूचेचा पडदा डोळ्यांवरून दूर होतो. तेव्हा कळतं— ज्याला आपण आपला समजलो, तो फक्त आपला वापर करून घेत होता. आणि ज्याला आपण परका समजलो... तोच खरं तर आपला होता. मग मन आरशासमोर उभं राहतं आणि एकच प्रश्न विचारतं— "लालसेपोटी मी कोणाला गमावलं?" उत्तर खूप वेदनादायक असतं. समजतं की... मी एका सभ्य, प्रामाणिक आणि आपुलकीच्या माणसाला दुखावलं... आणि एका मतलबी माणसाला साथ दिली. त्या क्षणी दुसरा कोणी शिक्षा करत नाही. स्वतःचं मनच न्यायाधीश बनतं. अपराधीपणाचं ओझं इतकं वाढतं की ज्यांची माफी मागायला हवी, त्यांच्या समोर उभं राहण्याची हिंमतही होत नाही. कारण काही चुका सुधारता येतात... पण काही चुकांनंतर माणसं आपल्या आयुष्यात परत येतीलच असं नसतं. म्हणून लालूच ही फक्त पैशाची हाव नाही. ती अशी मानसिक अवस्था आहे जी हळूहळू विवेक हिरावून घेते. ती माणसाला चुकीचं बरोबर वाटायला लावते. आपलं परकं करते... आणि परकं आपलं. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे— जेव्हा माणसातला माणूस मरतो तेव्हा माणूस जिवंत राहतो... पण त्याच्यातली माणुसकी, संवेदना आणि पश्चात्तापाची जाणीव हळूहळू मरून जाते. म्हणून आयुष्यात प्रगती जरूर करा. मोठी स्वप्नं जरूर पाहा. पैसा कमवा, यश मिळवा, मोठं व्हा... पण लालूच कमवू नका. प्रत्येक चमकणारं फळ गोड असतंच असं नाही. काही फळं पोट भरतात... आणि काही फळं आयुष्यभर मनात पश्चात्तापाचं विष पेरून जातात. म्हणूनच— लालूच हे जगातील सर्वात विषारी बीज आहे. कारण ते शरीर मारत नाही... ते माणसातला माणूस मारतं. संजीवनी क्षीरसागर मांडे ८-८-२६ लालच... दुनिया का सबसे ज़हरीला बीज दुनिया में कई ज़हरीले पेड़ होते हैं। उनके पत्तों, जड़ों या फलों में ज़हर होता है। लेकिन एक ऐसा पेड़ भी है, जो दिखाई ही नहीं देता। उसका बीज हर इंसान के मन में पड़ सकता है। उस बीज का नाम है—लालच। यह बीज दूसरे बीजों जैसा नहीं होता। इसमें काँटे नहीं होते। उल्टा, इस पर बहुत सुंदर, रंग-बिरंगे और रसीले फल लगते हैं। उन फलों पर लिखा होता है— जल्दी मिलने वाला पैसा... बड़ा पद... सत्ता... प्रसिद्धि... प्रशंसा... बड़ा बनने की चाह... ये फल इतने आकर्षक होते हैं कि इंसान यह सोचता ही नहीं कि इनके भीतर ज़हर भी हो सकता है। और इसी पल का इंतज़ार कुछ मतलबी लोग करते हैं। क्योंकि उन्हें पता होता है कि जिस इंसान के मन में लालच पैदा हो गया, उसे अपने स्वार्थ के लिए इस्तेमाल करना बहुत आसान होता है। फिर वे आपके चारों ओर मीठी बातों का जाल बुनते हैं। "तुम्हारे जैसा होशियार कोई नहीं..." "तुम्हारी असली क़ीमत तुम्हारे अपने लोग नहीं समझते..." "तुम बहुत काबिल हो..." "हमारे साथ रहोगे तो बहुत आगे बढ़ोगे..." यह सुनते-सुनते इंसान सचमुच हवा में उड़ने लगता है। उसे लगता है— "हाँ... सच में, इन लोगों ने मेरी क़ीमत पहचानी है।" लेकिन उस प्रशंसा के पीछे प्यार नहीं होता... स्वार्थ होता है। धीरे-धीरे लालच विवेक पर कब्ज़ा कर लेता है। फिर सही-गलत का विचार कम होने लगता है। जिन लोगों ने जीवनभर हमारा साथ दिया, वही हमें गलत लगने लगते हैं। उनकी हर बात में कमी दिखाई देने लगती है। उनसे बहस होती है, गलतफहमियाँ बढ़ती हैं और कभी-कभी हम उनके खिलाफ खड़े होकर उन्हें ही दुख पहुँचाने लगते हैं। और जिसे हम अपना समझते हैं, उसके कहने पर अपने ही लोगों से विश्वासघात करने तक को तैयार हो जाते हैं। क्योंकि उस समय हमें सच दिखाई नहीं देता... लालच के दिखाए हुए रंगीन सपने दिखाई देते हैं। प्रकृति में इसका एक अद्भुत उदाहरण है—संड्यू (Sundew) नाम का एक मांसाहारी पौधा। इसके पत्तों पर चमकती हुई छोटी-छोटी चिपचिपी बूंदें होती हैं। वे कीड़ों को आकर्षित करती हैं। कीड़ा उन चमकती बूंदों की ओर खिंचा चला आता है, पत्ते पर बैठता है... और फिर? वह फँस जाता है! बाहर निकलने के लिए जितना संघर्ष करता है, उतना ही अधिक फँसता जाता है। लालच भी बिल्कुल ऐसा ही है। पहले आकर्षित करता है... फिर फँसाता है... और आखिर में इंसान को भीतर से खा जाता है। मतलबी इंसान का काम पूरा हो जाने के बाद वह चला जाता है। और हमारे हाथ में क्या बचता है? सिर्फ़ पछतावा। तब समझ आता है— जिसे अपना समझकर हमने अपने ही लोगों को दुख पहुँचाया, वह कभी अपना था ही नहीं। और जिसे पराया समझकर हमने दुख पहुँचाया... वही वास्तव में हमारा था। तब मन में सिर्फ़ एक सवाल रह जाता है— "लालच के कारण मैंने किसे खो दिया?" और सबसे बड़ी सज़ा क्या होती है? जिससे माफ़ी माँगनी चाहिए, उसके सामने खड़े होने की हिम्मत भी नहीं बचती। इसलिए आगे बढ़िए... पैसा कमाइए... सफलता हासिल कीजिए... लेकिन लालच को अपने विवेक से बड़ा मत होने दीजिए। क्योंकि... लालच सिर्फ़ इंसान को गिराता नहीं, सबसे पहले उसके भीतर के इंसान को मार देता है। संजीवनी क्षीरसागर मांडे ८-८-२६ Greed... The Most Poisonous Seed in the World There are many poisonous trees in the world. Their leaves, roots, or fruits contain poison. But there is one such tree that cannot be seen at all. Its seed can fall into the mind of any human being. That seed is called—greed. This seed is unlike any other. It has no thorns. Instead, it bears beautiful, colourful and juicy fruits. Written on those fruits are— Instant money... a powerful position... power... fame... praise... the desire to become greater... These fruits look so attractive that a person never thinks they could contain poison. And this is exactly the moment some selfish people wait for. Because they know that a person consumed by greed is much easier to manipulate for their own benefit. Then they weave a web of sweet words around you. "There is no one as intelligent as you..." "Even your own people don't recognize your true worth..." "You are extremely capable..." "Stay with us, and you will go very far..." Listening to all this, a person begins to feel elevated. They start thinking— "Yes... these people have truly recognized my worth." But there is no love behind that praise... There is self-interest. Slowly, greed takes control of judgment. The ability to distinguish right from wrong begins to fade. The very people who stood by us throughout our lives begin to seem wrong to us. We start finding faults in everything they say. Arguments begin. Misunderstandings grow. Sometimes, we even stand against them and hurt them. And because someone we consider our own tells us to, we may even become willing to betray our own people. Because at that moment, we don't see the truth... We see only the colourful dreams shown to us by greed. Nature itself gives us a remarkable example of this—the carnivorous plant called Sundew. Its leaves have tiny, shining, sticky droplets. They attract insects. An insect is drawn towards those sparkling droplets and lands on the leaf... And then? It gets trapped! The more it struggles to escape, the more deeply it becomes trapped. Greed is exactly like that. First, it attracts... Then, it traps... And finally, it consumes a person from within. Once a selfish person's work is done, they walk away. And what are we left with? Only regret. Then we realize— The person we considered our own, for whom we hurt our own people, was never truly ours. And the person we considered a stranger... was actually the one who truly cared for us. Then only one question remains in our heart— "Whom did I lose because of greed?" And what is the greatest punishment? We may not even have the courage to stand before the person whose forgiveness we should seek. So, move forward... Earn money... Achieve success... But never let greed become greater than your conscience. Because... Greed doesn't merely bring a person down; it first kills the human being within them. Sanjeevani kshirsagar Mande 8-8-26 #Greed #HumanNature #LifeLessons #SelfAwareness #Conscience #Manipulation #ToxicPeople #LifeTruth #Relationships #Wisdom #EmotionalIntelligence #Humanity #MoralValues #SelfRespect #RealityOfLife Keywords: greed, manipulation, selfish people, conscience, human nature, life lessons, toxic relationships, emotional intelligence, self awareness, humanity, regret, wisdom #👧Girls status #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #✨शुक्रवार स्पेशल स्टेटस😍 #😎आपला स्टेट्स
15 shares

More like this