-Kalpana K
#✍️भक्ती संदेश #💐संत महंत🙏 #🌻आध्यात्म 🙏 . .[] ज्ञानेश्वरीतील ज्ञानमृत चिंतन []
. -----------------------------------
. . आत्म्याने शरीरात प्रवेश केला की, सत्व,रज,तम हे
. त्रिगुण त्याला घेरतात
. त्यामुळे ' मी म्हणजे देह ' असे तो म्हणू लागतो.
. मरेपर्यंत ममत्वाचा अभिमान धरतो
. व संसारबंधनात पडतो.
. . [] ज्ञानेश्वरीतील ज्ञानमृत चिंतन []
*************************************************
. तरी सत्व रज तम l तिघांची हे नाम l
. आणि प्रकृती जन्म l भूमिका यया ll
*****************[ ज्ञाने. अ.१४/ १३८]***************
. --------[] अर्थ [] --------
या तीन गुणांना सत्व, रज, तम अशी नावे आहेत व त्यांची उत्पत्ती माझ्यापासून होते.
. --------[] विश्लेषण []--------
. त्रिगुणांची माहिती देताना भगवंत म्हणतात, ' हे महाबाहो, सत्व, रज व तम असे हे गुण आहेत व ही प्रकृति त्यांची जन्मभूमी आहे. हे गुण देहामधील अविनाश आपल्याला बंधन करतात असे दिसते.'
. सत्व, रज व तम हे तीन गुण असून प्रकृतीच्या पोटीच ते जन्माला येतात. सत्वगुण उत्तम. रजोगुण मध्यम व तमोगुण कनिष्ठ होय.
. आत्म्याने शरीरात प्रवेश केला की लगेच हे त्रिगुण त्याला घेरतात त्यामुळे ' मी म्हणजे देह ' असे तो म्हणू लागतो. मरेपर्यंत ममत्वाचा अभिमान धरतो व संसारबंधनात पडतो.
. ही तिगुणात्मक प्रकृती असुरी असल्यामुळे ते माणसाला बांधून टाकते, कारण प्रत्येक कार्यामागेसुद्धा, कर्मामागेसुद्धा कारण हे असतेच.
. सुख व प्रकाश देणारा सत्वगुण असतो, तृष्णा, राग उत्पन्न करणारा रजोगुण असतो आणि अज्ञान पांघरलेला प्रमाद व निद्रायुक्त असा तमोगुण असतो. या तीन गुणांची ही त्रिगुणात्मक प्रकृती आहे. या तीनही गुणांना प्रकृती किंवा माया जन्म देते.
. आपल्या डोळ्यावरील त्रिगुणात्मक पट्टे बाजूला सारली की, भगवंताचे दर्शन घडते.
. ll राम कृष्ण हरी, माऊली ll