सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ६ सप्टेंबर इ.स.१६७५
राज्याभिषेक समारंभ आटोपताच डिसेंबर १६७४ मध्ये औरंगाबाद परिसरात आले आणि मुघली मुलखात लूट करण्याबरोबरच त्यांनी इंग्रजांच्या डूमगावच्या वखारीवर हल्ला केला आणि ती लुटून १० हजारांची लूट मिळवली. मुघल आणि आदिलशाही मुलखातील आपल्या वखारी सुरक्षित नसल्याचे लक्षात आल्याने इंग्रजानी सॅम्युअल ऑस्टिन याला आपल्या वखारीना कौल मागण्यासाठी शिवाजी महाराजांच्याकडे पाठवायचे ठरवले. याप्रमाणे महाराजांसाठी ५०० रुपयांचा नजराणा घेऊन ऑस्टिन आपला सहकारी रॉबर्ट हार्बीनसह रायगडाकडे निघाला. या भेटीत त्याने महाराजाना भेट देण्यासाठी लहान पितळी तोफ, मोरोपांत व आण्णाजीपंत यांच्यासाठी स्कारलेट कापड, १आरसा, १तोळा कस्तुरी,चिटणीस व सेनापती ना देण्यासाठी ३ यार्ड कापड व इतर भेटवस्तू सोबत घेतल्या. ऑस्टिन २ सप्टेंबरला निजामपूर येथे पोहोचला. तिथे त्याची भेट मोरोपंत व अण्णाजीपंतांशी झाली. पण ते पुढे जुन्नरला जाणार असल्याने त्यांच्याकडून महाराजासाठी पत्रे घेऊन ऑस्टिन रायगडावर गेला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
📜 ६ सप्टेंबर इ.स.१६८२
गनिमी काव्याच्या अजोड युद्ध तंत्राने मराठे सैनिक रणांगणात संख्येने अधिक असणाऱ्या शत्रू सैन्याला धूळ चारत असत. १६८२ च्या मे महिन्यात संगमनेर भागात मराठ्यांची एक सैन्य तुकडी गेली.हे समजताच तिथला मुघल ठाणेदार नारुजी याने आपले २ सरदार त्यांच्यावर पाठवले. नेहमीप्रमाणे मराठ्यांनी पळण्याचा आव आणला व मुघल सैन्याला अपेक्षित ठिकाणी आणून त्यांचा धुव्वा उडवला.पुढे ऑगस्ट महिन्यात सिन्नर येथे मराठ्यांनी लूट केली,तेंव्हा नारूजी त्यांच्यावर चालून गेला पण मराठ्यांचे सैन्यबळ पाहून तो माघारी फिरला.मराठ्यांच्या या आक्रमक हालचालींनी मुघल त्रस्त झाले होते."सप्टेंबर महिन्यात तळकोकणातुन येऊन मराठे सैनिक संगमनेर जवळच्या दावरी गावाहून जात होते,संगमनेर चा त्यावेळचा ठाणेदार रावजी याने आपल्याला त्या ठाणेदारीवर नेमले तर मी शत्रूचा बंदोबस्त करेन असे बादशहाला कळवले होते."
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ स्पटेंबर इ.स.१६८४
छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या चौल,वसई व दमण या भागावर स्वतः मोहिमेत हजर राहून त्या भागाची वाताहत केली. त्यामुळे गोव्याचा पोर्तुगीज विजरईने चिडून मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. पण यावेळी सुद्धा स्वतः शंभुराजे फोंडयाच्या मदतीला आले आणि त्यांनी पोर्तुगीजाना पळवून लावले.विजरई कोंदी द आलव्होर स्वतः या झटापटीत जखमी होऊन पळून गेला. त्यांचा पाठलाग करत मराठयांनी गोव्यावर हल्ला केला. पण शहा आलम १ लाख सैन्यासह गोव्याजवळ आल्यामुळे शंभुराजेंना हा हल्ला थांबवून पोर्तुगीजांशी तहाची बोलणी सुरू करावी लागली. तहाची बोलणी करण्यासाठी राजांनी कवी कलाशांची नेमणूक केली आणि सुलतान अकबर याला मध्यस्थ म्हणून नेमले. दीर्घकाळ चाललेल्या या वाटाघाटीतून अंजदिव बेटासंबंधीचा निर्णय न झाल्याने त्यासंबंधी विजरईकडून उत्तर घेण्याचे व तोपर्यंत लढाई थांबवण्याचे कवी कलश व पोर्तुगीज वकील यांच्यात ठरले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ सप्टेंबर १७५७
रघुनाथराव पेशवे, मल्हारराव होळकर हे उत्तरेत होते. १७५७ ला रघुनाथराव पेशवे यास नजीबखान रोहिला सरदार हा जिवंत सापडला. " त्यास गर्दन मारावी, जिवंत राहिल्यास नाश करील" अशी सूचना पुष्कळांनी रघुनाथराव पेशव्यांना केली. नाहीतरी नजीबखान हा उत्तरेत मराठयांना मोठा अडथळाच होता. नजीबखानान आपल्या वकील अंतस्थपणे मल्हारराव यांच्याकडे पाठवून कळविले, " मी तुमचा धर्मपुत्र आहे. त्यावरून मल्हाररावांनी दादासाहेबांना भीड घातली की याचा आपणास पुढे आपल्याकामी उपयोग होईल, यास
अपाय करू नये. मल्हाररावांच्या मुळे दादासाहेबांनी ही विनंती मान्य केली. म्हणून नजीबखानाचा पक्का बंदोबस्त करता आला नाही.
नजीबखाननं रघुनाथरावांस नाइलाजास्तव लेखी लिहून दिली, की राजधानीतील सर्वाधिकार सोडतो आणि अंतर्वेदीतील ठाणी सोडून स्वस्थळी निघून जातो, पुनः
दिल्लीच्या भानगडीत पडणार नाही. हा करार करून नजीबखान ता.६ सप्टेंबर रोजी दिल्ली सोडून गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ सप्टेंबर इ.स.१९६५
पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. ’ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ ही त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती. पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरूवात झाली. या युद्धात भारताने पाकिस्तानला सपाटून मार दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🙏 प्रेरणादायक बॅनर