प्रदीप भारत
772 views 14 hours ago
स्वयं सुखी होण्याची त्रिसूत्री (भाग २) ​जमेल तितका अभ्यास करणे व जगाला समजून घेणे ​अभ्यास फक्त शाळेत करायचा असतो असे नाही. शाळा सुटल्यावर जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी अभ्यास करायचा असतो. ​एक असे वाक्य होते—‘जे लोक शाळेत शिकत नाहीत, त्यांना लोक लुटून किंवा फसवून हळूहळू शिकवतात.’ अनेक पावसाळे गेल्यावर लोकांना समजते की अभ्यास केला असता तर बरे झाले असते. ​अभ्यास केल्याने बुद्धी उत्साही व प्रसन्न राहते. कारण एकदा का आपल्याला आळसाने पकडले, की कोणताही माणूस अभ्यास करू इच्छित नाही. अभ्यासाची गोडी वाढवण्यासाठी महिन्यात एखादे पुस्तक विकत घेण्याची सवय ठेवा, वाचनालयात (लाइब्ररीत) जाण्याची सवय ठेवा किंवा घरातील पुस्तके चाळत बसा. ​‘पुस्तक वाचले की मस्तक शाबूत राहते.’ एक सवय लावायची—आपल्या आजूबाजूला कोणती माणसे आहेत? कोणापासून आपल्याला त्रास होतो? आणि तो का होतो? याचे कारण शोधा. ​प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. किती लक्ष द्यावे? तर जसे कबड्डी खेळताना चढाई (सर्व्हिस) करताना आपण जितक्या सावधतेने आत जातो, तितक्याच सावधतेने बाहेरही आले पाहिजे. पटकन झाला खेळ! तसेच जीवनातही सावधता पाहिजे. सावध तो सदा सुखी जगतो आणि बेसावध तो आयुष्यभर दुःखी जगतो. ​आज लोक अभ्यास न करता कोणाच्याही जीवनात प्रवेश करतात आणि नंतर अचानक सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा आपण सावध होतो की मी आता अडकलो! काही मार्ग भुलभुलैयासारखे असतात; एकदा आत गेल्यावर बाहेर पडण्याचा रस्ताच दिसत नाही. ​नित्य अभ्यास तुम्हाला जागृती देतो, हुशार बनवतो. निसर्गाचा एक नियम आहे, जो कोणीही कधी समजून घेतलाच नाही—जो चतुर बुद्धीने वागून लोकांना फसवतो किंवा स्वतःचाच फायदा पाहतो, त्याला निसर्ग स्वतःच्या अलौकिक दिव्य बुद्धीने जाळ्यात पकडतो. ​जसे शकुनी मामा—श्रीकृष्ण उभे राहिले. ​जसे काँग्रेस—RSS उभी राहिली. ​मी हे का सांगतोय? हे सहज समजणार नाही, इतके जबरदस्त नियोजन तुमच्या नकळत मागून तयार होत असते. ​अभ्यास तुम्हाला नम्र बनवतो. सतत अभ्यास करण्याची सवय असली की आपले स्वतःचे जीवन हळूहळू व्यापक होत जाते आणि जग कळू लागते. ​जसे ड्रायव्हिंग करताना मॅपवर ट्रॅफिक कुठे कुठे जाम आहे हे आपल्याला आधीच कळते, तसाच अभ्यास आपल्याला वेळेत सावध करतो. ​बोध: नित्य आनंदी राहायचे असेल तर चांगल्या व वाईट घटना पाहाव्याच लागतील; कारण हे जग निर्मिती व विनाश, धान्य उगवणे व नष्ट घेणे या सिद्धांतावरच निर्माण झाले आहे. ​१४० कोटी जनता भारतात आणि ७ अब्ज जगाची लोकसंख्या! कितीतरी नित्य चांगल्या-वाईट घटना घडत राहणार. आपण फक्त शिकत राहावे व आनंद घ्यावा. ​प्रत्येक घटना आपल्या मनासारखीच घडली पाहिजे असे नाही. पण ‘प्रत्येक घटना घडत आहे’ हे पाहण्याचा आनंद घेत राहू. जसे—आज आपली मॅच हरत असलो, तरी समोरची टीम आज चांगली खेळत आहे हेही पाहूया ना! म्हणजे आपल्या कोणत्या चुका झाल्या, ते आपल्याला दिसतील. ​असे म्हणतात की योगीजन, "अचानक मृत्यू येण्यापेक्षा माझा मृत्यू होताना मी साक्षात पाहीन," असा विचार करतात. तिथेही अभ्यास! मृत्यूसमयी काय होते, हासुद्धा एक सुवर्णयोग आहे. ​जय सनातन संस्कृती! 🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🌼🌼🌸🌼🌼🌼 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #😇भक्तांचा शनिदेव #🧾भगवद्गीता श्लोक🙏 #✍ज्ञानेश्वरी📖
6 shares

More like this