प्रदीप भारत
517 views 23 hours ago
मला माझ्या जीवनातील काही अलौकिक घटना आठवत आहेत, त्या सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला सगळ्यात जास्त कोण ओळखते? आपल्या घरातील भाऊ-बहीण, आपले मित्र... बरोबर ना?? माझी लहान बहीण मी १० वीत असताना खूपच प्रेमाने समजवत असे की, "वार्षिक परीक्षा १० दिवसांवर आली आहे, अभ्यास कर." पण मी हो म्हणून टाळून देई. एकदा वडिलांनी मला सकाळी ४ वाजता उठवले व सांगितले, "बाजूचा मुलगा दिवस-रात्र अभ्यास करत आहे, तू का बिंधास्त झोपला आहेस?" मीही अभ्यास करू लागलो, पण खरे सांगू, मन लागतच नसे. परीक्षा पेपरला जेव्हा सर्व शाळेत जमा होत, तेव्हा सर्व मुले शांत, निवांत होती आणि मी मात्र आनंदी होतो. हातात पेपर आल्यावर परीक्षेच्या एकाही प्रश्नाचे उत्तर मला येत नसे, तरीही कसलेही टेन्शन चेहऱ्यावर नसे. बिचारी मुले भीत-भीत paper लिहीत व मी सतत त्या मुलांना पाहत असे आणि पेपरवर चित्रे काढत असे; कोणतेही, मनाला वाटेल ते! माझी बहीण माझ्या मागच्या बेंचवर होती, तिला प्रत्येक ड्रॉइंग दाखवत असे. ती त्यावेळी माझ्याबद्दल काय विचार करत असे, देव जाणे! याचे पुढील जीवन कसे घडेल... जो बाजूला राहणारा मुलगा, जो इतका हुशार होता, तो पुढे जाऊन वाईट संगतीत पार बिघडला, व्यसनी झाला. माझे भाग्य थोर, मला सत्संग मिळाला व मला एकपेक्षा एक महान लोक जीवनात मिळाले. माझी कोरी पाटी होती; मी अध्यात्म घोळून पिले, जसे चातक पक्षी पावसाचे पाणी पितो, तसे माझे झाले. केवळ अध्यात्म, एके अध्यात्म! नो मिक्स, शुद्ध प्राशन केले. जीवनात एकच गोष्ट शिकायला मिळाली, चांगल्या संगतीने आयुष्याचे सोने होते व वाईट संगतीने आयुष्याचे गटार होते व वास येतो. चांगली संगत जीवनाला दिशा देते व जीवन सुंदर, तेजोमय बनवते आणि वाईट संगत जीवन तोडफोड करून भंगार बनवते, माणूस कंगाल होतो. सत्संगात प्रामाणिकपणे जेव्हा तुम्ही काम करता किंवा निष्ठेने वागता, तेव्हा तुमच्या अंतरंगात एक दिव्य शक्ती जागृत होते. अदृश्य गुरुतत्व आपले सुदर्शन चक्र सतत आपल्या बाजूला ठेवून देते, हे आपल्याला कळत नाही. आपले कोणीतरी २४ तास संरक्षण करत आहे. जेव्हा तुम्ही प्रामाणिक आध्यात्मिक बनता, तेव्हा ती शक्ती आपल्या आजूबाजूला आहे, याची जाणीव प्रत्येक क्षणी आपणास होते. ती शक्ती जागृत झाली की आपल्याला वाईट गोष्टींपासून ती संरक्षण करते व आपले जीवन देदिप्यमान होत जाते. जगाचे भले व्हावे हा विचार आपला नसतो, त्या दिव्य शक्तीचा असतो; ती आपल्याकडून तसे कार्य करून घेते. हे मला फार उशिरा कळले. जेव्हा जेव्हा मी महान लोकांना, त्यांच्या महान कार्याला पाहतो, तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या दिव्य शक्तीला व त्यांच्या भक्तीला मी पाहतो. जगात कोणीही असेच महान बनत नाही??? त्यांच्यासोबत एक दिव्य, अलौकिक शक्ती वास करते, ती त्यांचे रक्षण करते व वेळोवेळी अंतरंगातून मार्गदर्शन करते, म्हणून लोक महान होतात. प्रयत्न सर्वच करतात जीव ओतून, पण सक्सेस तेच दिव्य लोक होतात व इतिहासात त्यांचेच नाव अजरामर होते. बाकीचे लोक काळाच्या आत गायब होतात व त्या महान लोकांची दैवी शक्ती सदा-सर्वदा जागृत असते. त्या महान पुरुषांचे नुसते स्मरण केले तरीही अनेक लोकांची कामे होतात व त्यांना आंतरिक एक ऊर्जा मिळते. बोध--- समजते आहे ना?? मला काय सांगायचे आहे ते, हा सुवर्णयोग आहे... ज्यांना ज्यांना हा विषय अचूक समजेल, त्यांचे जीवन महान होईल. जर परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते, तर निसर्गाचा नियम फक्त परिस बदलू शकतो, हो ना??? तुम्ही हजारो लोखंडाचे तुकडे घ्या व दिवस-रात्र त्यावर प्रक्रिया करा, सोने होणार नाही; पण परिस ते सहज करतो. तसेच एक दिव्य व्यक्ती तुमच्या जीवनात आली की तुमचेही जीवन सहज बदलते, हे कधीही लक्षात ठेवा. व्यक्तीत दोष असू शकतात, पण त्याच्याजवळ असणाऱ्या दिव्य शक्तीत वैश्विक ताकद असते. ती तुमच्यावर प्रसन्न असली की तुमच्या समस्या सहज निघून जातील. मी माझ्या गुरूंना हृदयापासून वंदन करतो की, त्यांच्या कृपेने माझे जीवन घडले आहे; नाहीतर आम्ही नर्मदेतील धोंडे होतो, ज्यांच्यात पाण्याचा एक थेंबही जात नसे. कृपा ही जादू आहे! असो... 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌼🌼🌼🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय सनातन संस्कृति! #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव #🧾भगवद्गीता श्लोक🙏
17 shares

More like this