Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
दलित साहित्य आणि नामांतराचा वाद
१ आंबेडकरवादी साहित्य हेच बौद्ध साहित्य !
बौद्धसाहित्याची व्याख्या
"प्रानीन युगात बुद्धाने व अर्वाचीन काळात कबीर, फुले, आंबेडकर या मानवता वाद्यांनी समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या मानवी मुल्यांचा पुरस्कार करून प्रज्ञा, शील, करूणा, मैत्री व शांती अधिष्ठित जण कल्याणकारी, विश्वव्यापी स्वतंत्र संकल्पना मंडली जी शास्त्रशुद्ध, बुद्धीप्रामाण्य व प्रवर्तनशील आहे. या सामाजिक न्यायाचा व सहिष्णूतेचा आदर्श समोर ठेवून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात दुःखी, पिडीत, शोषितांची न्यायी संघर्षासाठी विद्रोही आयडेंटीटी मांडणारे जे जे उदात्त, मंगल, सौदर्यवादी साहित्य असेल, मग कोणत्याही सजीवाने कोणत्याही ज्ञात प्रकारात विमुक्तीसाठी अभिव्यक्तीत केलेले, अथवा लिहिलेले ते 'बौद्ध साहित्य' म्हणून ओळखले जाईल".
२ बौद्ध साहित्यिक कोणास म्हणावे
जे साहित्यिक आंबेडकरी निष्ठा मानतात, ज्यांचा बौद्ध तत्वज्ञानावर विश्वास आहे, ज्यांचा आंबेडकरवादावर विश्वास आहे, ज्यांचे साहित्य हे आंबेडकरी प्रेरणेचे आहे. जे हिंदू धर्मातील सामाजिक व्यवस्था नाकारतात, दलितत्वाचा, दास्याचा धिक्कार करतात, जे समता स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात, जे हिंदू धर्माकडून बौद्ध धम्माकडे आणि दलित साहित्याकडून बौद्ध साहित्याकडे वळले आहेत व ज्यांच्या प्रेरणा मनू प्रेरणीत भाकडकथा नसून, बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर अशा वास्तववादी व शास्त्रशुद्ध, बुद्धिप्रामाण्य आहेत, ते साहित्यिक आंबेडकरवादी साहित्यिक किंवा बौद्ध साहित्यिक म्हणून संबोधले जातील. आम्ही बौद्ध झालो तरी समाजातील काही अंशी लोकांच्या मनातील हिंदू संस्कार पद्धती समूळ नष्ट झाली नाही. त्यामुळे समाजात अमूलाग्र बदल घडवून आणणे, तो बौद्ध सांस्कृतिकदृष्ट्या योग्य बनविणे हे समाज परिवर्तनाचे महान काम बौद्ध साहित्यिक घडवून आणणार आहेत. हे सर्व घडवून आणण्यासाठी जी साहित्यकृती ते निर्माण करतील, जे तत्वज्ञान मांडतील, बौद्ध तत्वज्ञान व आंबेडकरवाद हा त्यांचा मूळ पाया आधारभूत असणार आहे. म्हणून हे साहित्यिक आपल्या साहित्याला 'आंबेडकर प्रेरणेचे साहित्य', बौद्ध साहित्य अथवा
'आंबेडकरवादी साहित्य' म्हणून संबोधतात.
३ आंबेडकरवादी साहित्य हेच बौद्ध साहित्य
जेव्हा आपण आंबेडकरवादाचा पुरस्कार करतो, तेव्हा आमच्यासमोर रूढी, परंपरा यांना झुगारून सामाजिक क्रांती हे परिवर्तन आमचे उद्दिष्ट असते. आणि ते साध्य करण्यासाठी आम्ही आंबेडकरवादी भूमिका मांडत असतो. आंबेडकरवादाचे सर्व निकष हे बौद्ध साहित्यास लागू पडतात, बौद्ध साहित्य हे मानवी मूल्यांवर आधारित आहे. आणि डॉ. आंबेडकर हे मानवी मूल्यांचे पुरस्कर्ते आहेत. समता, स्वातंत्र्य व बंधुप्रेम, या संकल्पना बुद्धाच्या तत्वज्ञानात आहेत. व त्या डॉ. आंबेडकरांनी अंगीकारून घटनेद्वारा लोकशाही पद्धतीने मांडल्या आहेत. विश्वशांती, विश्वकल्याण, करूणा, मैत्री या संज्ञा बौद्धतत्वज्ञानातून आंबेडकरवादात आल्या आहेत. व या तत्वाशी प्रेरित होऊन आंबेडकरांनी सारा भारत देश बौद्धमय करण्याचे वर्तमान पाहिलेले आहे. म्हणूनच त्यांचा हा आदर्श आमच्या साहित्याचा विषय व आशय आहे, नव्हे तर ती आमची जीवननिष्ठा आहे. म्हणूनच बौद्धसाहित्यात बौद्धतत्वज्ञान व आंबेडकरवाद हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे बौद्धसाहित्य म्हणजे आंबेडकरवादी साहित्य, व आंबेडकरवादी साहित्य म्हणजे बौद्ध साहित्य ही भूमिका १४ आक्टोबर १९५६ पासून समाजामध्ये प्रवाहित आहे.
४ 'दलित साहित्य' आंबेडकरवादी साहित्य आहे का?
'दलित साहित्य' या नावाने जे जे साहित्य आजपातोर निर्माण केले गेले त्या प्रपंचात आंबेडकरी प्रेरणा ही जरी मूल स्थानी गृहीत धरली तरी, आंबेडकरवाद मात्र सर्व दलित साहित्यकृतीतून मांडला गेला आहे, अथवा हे साहित्य पूर्णतः आंबेडकरवादी साहित्य आहे, हे मानणे कठीण आहे. कारण दलित साहित्यात खरा आंबेडकरवाद मांडण्यात आला नाही. उदा. बलुत, आठवणींचे पक्षी, सूड, जेव्हा मी जात चोरली, ऊपरा, उचल्या, गोलपिठा, इ. कलाकृतीतून कोणता आंबेडकरवाद मांडला आहे. दोन्ही ही साहित्य प्रकारांनी जातीयवाद सोडला नाही तसेच प्रवर्तक साहित्य निर्मिले नाही. 'समुचित' व 'अस्मितादर्श' हिंदू विचारांचे आखाडे होऊन बसले आहेत. आंबेडकरांऐवजी कार्ल मार्क्स, मर्डेकर, कमलेश्वर बाबुराव बागुल, केशवसुत व हेगडेवार यांना गुरू मानून बुद्धा ऐवजीकार्ल मार्क्स, व ब्राम्हणी समरसतावाद मांडणे चालू ठेवले आहे. म्हणून दलित साहित्यात आंबेडकरवाद कमी व ब्राम्हण, कम्युनिष्टवाद, जातीयवाद जास्त मांडला आहे. म्हणून त्यांची प्रेरणा ही बौद्ध संस्कृती नसून...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ