Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
ShareChat
click to see wallet page
@63559539
63559539
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
*राजगृह आणि पोतराज* *दुपारची वेळ होती डॉ. बाबासाहेब राजगृहामध्ये आराम खुर्चीत बसून वाचन करीत होते रखरखत्या उन्हामुळे शांत वातावरण होते बाबासाहेब आपल्या वाचनात मग्न होते.* *या स्मशान शांततेचा भंग करणारा डूमडूम आणि चाबकाच्या फटक्याचा आवाज घरातील इतरांच्या कानावर पडत होता.* *हळूहळू हा आवाज वाढत होता. एक पोतराज उघडाबम कमरेपासून खाली नेसलेली विविध वस्त्रे, पायात घुंगराचे चाळ, हातात मोठा आसूड, त्याच्या बायकोच्या डोक्यावर मरिआईचा देव्हारा, पाठीवर कापडात बांधलेले लहानसे मूल, व तिच्या गळ्यात असलेले ढोलके ती जोराजोराने वाजवित होती.* *त्या तालावर पोतराज नाचत होता व आपल्या हातातील चाबकाचे स्वताच्या अंगावर फटकारे मारुन पैशासाठी हात पसरत होता आता मात्र पोतराज व त्याची बायको बंगल्यासमोर आल्यामुळे आवाज मोठा झाला होता बाबासाहेब वाचत असतांना त्यांचे लक्ष्य विचलित झाले. त्यांना वाटले एक दोन मिनिटांत हे थांबेल म्हणून ते तसेच बसून राहिले. पण आवाज काही बंद होईना.* *त्यांनी पुस्तक बाजूला ठेवून नोकराला बाहेर कोण आहे ते बघायला सांगितले. नोकराने पोतराज व त्याच्या बायको विषयी सांगितले. बाबासाहेब शांत बसून राहिले परंतु आवाज काही कमी होत नव्हता म्हणून बाबासाहेबानी त्यांना वर बोलावन्यास सांगितले. नोकराने हाक मारुन पोतराज व त्याच्या बायकोला वर येण्यास सांगीतले.* *बाबासाहेबानी वर येण्यास सांगीतले हे ऐकून त्यांची घाबरगुंडी उडाली. ते वाजविने-नाचने बंद करुन प्रचंड भीतीने निस्तेज होवून राजगृहाच्या जिन्याच्या पायऱ्या चढू लागले.* *त्यांच्या मनात भिती होती, आपल्यामुळे साहेबाना त्रास झाला असावा. वरच्या मजल्यावर त्यांनी दुरूनच बाबासाहेब आराम खुर्चीत बसलेले पाहिले आणि माना खाली घालून ते त्यांच्या समोर काही अंतरावर उभे राहिले.* *बाबासाहेबानी त्यांचे निस्तेज चेहरे, उन्हाने काळवंडलेले व घामाने भिजलेले शरीरे, त्यांच्या अंगावरील जीर्ण वस्त्रे व त्या बाईंच्या पाठीवरील मूल पाहून पोतराजला त्याचे नाव काय ते विचारले.* *एखादी नोकरी-धंदा का करीत नाहीस असे विचारले.* *हा भिक मागण्याचा धंदा तुम्हाला बरा वाटतो काय? त्यावर पोतराज बाबासाहेबाकडे न पाहता खाली मान घालुनच म्हणाला, मायबाप माझ नाव शिवराम पोतराज हाय. अन म्या शिकलो न्हाय म्हणून कुणी नोकरी देत व्हय अन धंद्यासाठी पैका न्हाय.* *मायबाप दोन पोर, आयबाप हाय त्यांच पोट कस भरू म्हणून शान हाच धंदा पत्कारला. त्या महामानवाचे हृदय पोतराजची परिस्तिती ऐकुन पाझरले. काही क्षण ते स्तब्ध झाले व त्याला म्हणाले, ठीक आहे. तुला जर धंद्यासाठी कुणी पैसे दिले, तर तू कोणता धंदा करशील? मायबाप माझ्या गावाकडे जावून चाय पाण्याची नाय तर वीडी पान सुपारीची टपरी टाकिन. पण मायबाप आम्हासनी पैका देतो कोण? बाबासाहेब पुन्हा स्तब्ध झाले आणि खुर्चीतून उठून कपटाकडे गेले. एक हजार रुपये आणले व विचार न करता त्या पोतराजच्या हातात ठेवले व म्हणाले, हे बघ शिवराम एक हजार रुपये आहेत. तू म्हणालास त्याप्रमाणे तुझ्या गावाकड़े जा, काहीतरी धंदा करुन तुझ्या कुटुंबाचे पालन कर आणि हा धंदा सोडून दे.* *एक महापुरुष आपल्या हातावर एक हजार रुपये ठेवत आहे, हे आपण एक दिव्य स्वप्न तर पाहत नाही ना? त्याने क्षणात स्वतःला सावरले, ही वस्तुस्तिति आहे हे त्याच्या लक्षात आले.* *त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा भरभरुन दान देणारा मायबाप महापुरुष आहे तरी कोण हे बघावे या उद्देशाने शिवरामने अश्रू भरलेल्या नयनांनी बाबासाहेबकडे एक दृष्टीक्षेप टाकला.* *शिवराम पोतराजसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कितीतरी महान होते. या गोष्टीला आज 75 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. त्यावेळचे एक हजार रुपये आज एक लाखापेक्षाही जास्त आहेत. दोघांनीही हात जोडून वाकून बाबासाहेबाना वंदन केले.* *येतो मायबाप म्हणून भराभरा जीना उतरून निघून गेले.* *शिवराम पोतराजने त्याच दिवशी मुंबई सोडली व आपल्या बिरहाडसह तो अहमदनगर जिल्ह्यातील गावाकडे गेला.त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण एक हजार रुपये त्याने आजपर्यंत कधीही पाहिले नव्हते.* *त्याने थोड़े पैसे घराच्या डागडुगीसाठी वापरले व बाकी पैशात पान सुपारी, वीडी,तम्बाखू वगैरेची टपरी लावली.* *दिवस जात होते, महीने जात होते. धंदा बऱ्यापैकी चालत होता.* *रोजच्या पैश्यातुन शिवराम आपले घर चालवून थोडे शिल्लक पैसे टाकत होता. त्याने दुसरीही टपरी सुरु केली. आता तो सुखाने जीवन जगत होता. अधुनमधुन त्याला बाबासाहेब यांची आठवण व्हायची. तो आपल्या मनातून त्यांना धन्यवाद द्यायचा.* *त्यांचे लाख आभार मानायचा. असे गरीबांचे वाली जन्माला यावेत इतराना सांगायचा. तो व्यथित होवून आपण बाबासाहेबाना हजार रूपये जावून दिले पाहिजेत म्हणायचा.त्यांच्यामुळे आज आपण खूप चांगले दिवस पाहत आहोत. असे त्याला मनोमन वाटायचे.* *अशी वर्षामागून वर्षे जात असतांना दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले.* *ही काळीज चिरणारी दुःखद बातमी जगभरात पसरली.* *विशेषतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाडयात पोहचली.* *जेंव्हा ही बातमी शिवराम पोतराज पर्यंत पोहचलि, तेंव्हा त्याने हंबरडाच फोडला. तो धाय मोकलून रडू लागला. तो रडताना म्हणत होता,* *बाबासाहेब तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व होतात* *तुम्ही आम्हाला जगायला शिकविलेत, एका पोतराजला माणूस बनवले. तुमचे पैसे कोणाला परत करू? डॉ.बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी अहमदनगरहून जी मंडळी मुंबईत दाखल झाली त्यात शिवराम पोतराजही आला.* *दादर स्टेशनला उतरून इतरासोबत राजगृहाकडे जात असताना राजगृह दृष्टीस पडताच, तो हंबरडा फोडून म्हणत होता, बाबासाहेब याच रस्त्यावरच्या पोतराज।ला तुम्ही माणूस बनविलेत.* *हाच तो राजगृह ज्याच्यामुळे आज मी सुखी झालो. आता तुमचे एक हजार रूपये कोणाला देवू? सांगा बाबासाहेब सांगा...* *हे त्याच्या रडन्यातील बोल ऐकूण त्या ठीकानी उपस्थित असलेल्या पत्रकारानी शिवराम पोतराजला घेरले व विचारले तुझ्या जीवनात बाबासाहेब कसे आले?* *तेव्हा शिवरामने आपल्या बाबतीत राजगृहावर घडलेला सर्व प्रसंग सांगितला व शेवट करताना म्हणाला,* *गरीबांचा वाली गेला व पुन्हा धाय मोकलुन रडू लागला.* *असे करुणेचे महासागर,* *मानवतेचे कैवारी होते बाबासाहेब.* *पुन्हा होणे शक्य नाही....* #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜
💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 - 1~ ১৯৫ 1~ ১৯৫ - ShareChat
*काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणजे इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. वर्षानुवर्षे अस्पृश्यतेचे चटके सहन करत जगणाऱ्या समाजाला माणूस म्हणून आपले हक्क, अधिकार मिळावेत, यासाठीचा हा सत्याग्रह होता.* *हा लढा हक्काचा होता, माणूस बनण्याच्या प्रक्रियेचा होता आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे हे साध्य होऊ शकले. त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन.* *तुम्ही दगडाला देव मानता परंतु जिवंत माणसाला माणूस मानत नाहीत... हा सत्याग्रह कुठल्याही देवा साठी किंव्हा धार्मिकते साठी नसून मानव समानतेसाठी आहे..!* *मंदिरात जाऊन काय आमचं कल्याण होणार नव्हता, प्रश्न हक्काचा होता, जर माझा भीम मंदिराची पायरी चढला नसता तर नाशिकचा काळा राम ऐतिहासिक झाला नसता* *2 मार्च 1930 काळाराम मंदिर सत्याग्रह* *हा सत्याग्रह देवासाठी नसून, तो समानतेसाठी आहे...!!! माणसाला माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी केलेला सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च इ.स. 1930 रोजी नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता* #☸️जय भीम #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
☸️जय भीम - 0 GROUPI ०२ मार्च HIURHIT माणुसकीची जाणीवॅ करून देण्यासाठी কললাসমাসম काळाराम मंदिर सत्याग्रह दिन निमित्त सर्वांना हादिक शुभच्छा.! 0 GROUPI ०२ मार्च HIURHIT माणुसकीची जाणीवॅ करून देण्यासाठी কললাসমাসম काळाराम मंदिर सत्याग्रह दिन निमित्त सर्वांना हादिक शुभच्छा.! - ShareChat
*काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणजे इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. वर्षानुवर्षे अस्पृश्यतेचे चटके सहन करत जगणाऱ्या समाजाला माणूस म्हणून आपले हक्क, अधिकार मिळावेत, यासाठीचा हा सत्याग्रह होता.* *हा लढा हक्काचा होता, माणूस बनण्याच्या प्रक्रियेचा होता आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे हे साध्य होऊ शकले. त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन.* *तुम्ही दगडाला देव मानता परंतु जिवंत माणसाला माणूस मानत नाहीत... हा सत्याग्रह कुठल्याही देवा साठी किंव्हा धार्मिकते साठी नसून मानव समानतेसाठी आहे..!* *मंदिरात जाऊन काय आमचं कल्याण होणार नव्हता, प्रश्न हक्काचा होता, जर माझा भीम मंदिराची पायरी चढला नसता तर नाशिकचा काळा राम ऐतिहासिक झाला नसता* *2 मार्च 1930 काळाराम मंदिर सत्याग्रह* *हा सत्याग्रह देवासाठी नसून, तो समानतेसाठी आहे...!!! माणसाला माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी केलेला सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च इ.स. 1930 रोजी नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता* #☸️जय भीम #🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
☸️जय भीम - 0) २ मार्च १९३० ٥٥٥٥ काळाशम मंदि२ शषत्याग्रह् दिन मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी लढलेला हा आधुनिक भारतातील सर्वात मोठा 0 सत्याग्रह हाता. 0) २ मार्च १९३० ٥٥٥٥ काळाशम मंदि२ शषत्याग्रह् दिन मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी लढलेला हा आधुनिक भारतातील सर्वात मोठा 0 सत्याग्रह हाता. - ShareChat
*नश्वरतेचे सौंदर्य हा जीवनाचा एक भाग आहे."* *सर्व काही येते - नंतर जाते.* *आनंद जातो.* *वेदनाही निघून जातात.* *आज तुमच्या शेजारी कोणीतरी आहे... उद्या वेगळे असू शकते.* *बौद्ध धर्म आपल्याला चिकटून राहायला शिकवत नाही.* *ते आपल्याला स्पष्टपणे पाहण्यास शिकवते:* *सर्व काही बदलते* *तुमचे मन ही अशी जागा आहे जिथे तुम्ही कधीही परत येऊ शकता.* *जेव्हा तुम्हाला नश्वरता समजते, तेव्हा तुम्हाला नुकसानाची भीती कमी होते, तुम्ही कमी आकलन करता आणि तुम्ही वर्तमानात अधिक खोलवर जगू लागता.* *आज, आयुष्याला हळूवारपणे धरा. आणि स्वतःलाही हळूवारपणे धरा.* *#अस्थायीत #बौद्धधर्म* *#बुद्धशिकवन #आंतरिकशांती* *#करुणा* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #☸️जय भीम
🙏 प्रेरणादायक बॅनर - beauty of impermanence The part 0f life is 0 Thuybiz beauty of impermanence The part 0f life is 0 Thuybiz - ShareChat
रुतबे को पहचान बनाकर रखा है हमने, लोग हैसियत से नहीं नाम से जानते है। #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #☸️जय भीम
🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ - ShareChat
00:20
या विश्वाला या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाच्या शांतीच्या धम्माची गरज आहे तुझेच धम्म चक्र फिरे जगावर #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ
🙂Positive Thought - ShareChat
00:20
जहाँ स्वार्थ की धूल हो, वहाँ विश्वास का वृक्ष नहीं उगता।" #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
🙏 प्रेरणादायक बॅनर - ShareChat
00:05
*जर तुम्हाला वाटत असेल की समानता ही प्रगतीची पहिली पायरी आहे* *कधी असं वाटतंय का की आपण प्रगतीबद्दल कितीही बोललो तरी काहीतरी आपल्याला नेहमीच मागे ठेवतं?* *बाबासाहेबांनी जवळजवळ एक शतकापूर्वी हे सांगितले होते: जात ही खोलीतील "राक्षस" आहे. जर असमानतेमुळे पायाच तुटला असेल तर तुम्ही अर्थव्यवस्था दुरुस्त करू शकत नाही किंवा राजकारणात सुधारणा करू शकत नाही.* *खरी प्रगती सामाजिक न्यायाने सुरू होते.* - *डॉ. बी. आर. आंबेडकर* *जातीचे उच्चाटन (खंड १, पृष्ठ ४७, ओळी १८-२०)* *#जयभीम* *#आंबेडकरमिशन* *#नागरी सेवक* #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ - like, Turn in any direction you Caste is the monster that crosses your political reform, You cannot have path you cannot have economic reform; unless you kill this monster DR B R AMBEDKAR Wwmambedkarinternationallcenter com GG like, Turn in any direction you Caste is the monster that crosses your political reform, You cannot have path you cannot have economic reform; unless you kill this monster DR B R AMBEDKAR Wwmambedkarinternationallcenter com GG - ShareChat
*जीवन बदलणारे साधे सत्य* *१. दुःख समजून घेणे ही मुक्तीची सुरुवात आहे.* *जेव्हा आपण जीवनाचे वास्तव स्वीकारतो तेव्हाच बदलाचे दार उघडते.* *२. करुणेने रागावर विजय मिळवा.* *द्वेषाने द्वेष शांत करता येत नाही; फक्त मैत्रीच तो विझवू शकते.* *३. मधला मार्ग निवडा.* *अति भोग आणि कठोर तपश्चर्या या दोन्हींपासून दूर राहूनच संतुलित जीवन शांती देते.* *४. सजगता ही खरी शक्ती आहे. ज्यांना वर्तमान क्षणाची जाणीव आहे तेच खऱ्या अर्थाने जिवंत आहेत.* *५. तुमच्या स्वतःच्या कृतींची जबाबदारी घ्या. जीवन हे बाह्य शक्तींनी नव्हे तर आपल्या विचारांनी आणि कृतींनी आकार घेते.* *६. अष्टांगिक मार्ग हा दुःखापासून मुक्तीचा मार्ग आहे. योग्य दृष्टिकोनापासून योग्य एकाग्रतेपर्यंत, तो जीवनाला प्रकाशाकडे घेऊन जातो.* *७. शांती बाहेरून नव्हे तर आत विकसित होते. जेव्हा मन शांत असते तेव्हा जग देखील शांत दिसते.,* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ
🙏 प्रेरणादायक बॅनर - ShareChat
#💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
💪बुद्धांची तत्वे📜 - ShareChat
00:14