
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
मृत्यु केवल शरीर ले जाती है, मोह तो जन्मों तक पीछा करता है।* *मुक्ती का मार्ग*
*Buddha ki Vipassana meditation se* #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #✍️सुविचार #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik
मजूरमंत्री व बांधकाममंत्री
नाझी जर्मनीने १ सप्टेंबर १९३९ रोजी पोलंडवर हुकूमशाही आक्रमण केले. लोकशाहीवादी इंग्लंडने ३ सप्टेंबर १९३९ ला पोलंडची बाजू घेऊन जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले आणि ब्रिटिश साम्राज्यांतर्गत हिंदुस्थान हा देशही युद्धग्रस्त असल्याचे घोषित केले. अशा प्रकारे हुकूमशाही विरुद्ध लोकशाही असे स्वरूप धारण केलेले दुसरे महायुद्ध सुरू झाले.
दुसऱ्या महायुद्धात हुकूमशाहीवादी जर्मनीचा पाडाव करून विजय मिळविण्याकरिता ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानातील सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य मागितले. काँग्रेसने हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या साम्राज्यवादी ब्रिटिश सरकारला सहकार्य करण्याचे नाकारले. लोकशाहीच्या विजयासाठी जर्मनीचा पाडाव आणि इंग्लंडचा विजय होणे आवश्यक आहे, अशा धारणेने आणि इंग्रज सरकारच्या सहकार्याने अस्पृश्योद्धाराचे कार्य करीत राहण्याच्या उद्देशाने डॉ. आंबेडकर यांनी व त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने इंग्रज सरकारला सहकार्य देऊ केले. त्यावेळी हिंदुस्थानातील इंग्रज सरकारला डॉ. आंबेडकर यांच्या विद्वत्तेचे, अनुभवाचे आणि कर्तृत्वाचे महत्त्व कळू लागले. म्हणून इंग्रज सरकारने हिंदुस्थानचा राज्यकारभार चालविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकार्य घेण्याचे ठरविले.
इंग्रज सरकारने प्रथम जुलै १९४१ मध्ये हिंदुस्थानच्या सरंक्षण सल्लागार समितीवर डॉ. आंबेडकर यांची नियुक्ती केली. ते देशाच्या संरक्षणाशी संबंधित अशा महत्त्वपूर्ण समितीचे सभासद झाले. हिंदुस्थानच्या संरक्षणासाठी जे काही करावे लागणार होते, त्याच्यासाठी डॉ. आंबेडकर यांचाही महत्त्वपूर्ण सल्ला उपयोगी पडणार होता.
९ जुलै १९४२ च्या आदेशाने गव्हर्नर जनरलने म्हणजे हिंदुस्थानच्या व्हाइसरॉयने जाहीर केले, की डॉ. आंबेडकर यांची गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलवर करण्यात आलेली नेमणूक ब्रिटनच्या महाराजाने मान्य केलेली आहे. डॉ. आंबेडकर यांच्याकडे मजूर खाते आणि जोडीला बांधकाम खातेही देण्यात आल्याचे मान्य केलेले आहे.
हिंदुस्थानचा राज्यकारभार चालविणारे व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांचे जे मध्यवर्ती मंत्रिमंडळ होते, त्या मंत्रिमंडळात मजूर खात्याचे व बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून डॉ. आंबेडकर यांना अभूतपूर्व असे मोठ्या मानाचे स्थान मिळाले होते. तत्पूर्वी हिंदुस्थानातल्या कोणाही अस्पृश्य व्यक्तीला इतक्या मोठ्या मानाचे स्थान मिळालेले नव्हते. ज्ञानसंपन्न आणि क्रांतिकारक डॉ. आंबेडकरांच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याचा हा गौरव होता. अस्पृश्यांना अभिमान वाटावा, असे डॉ. आंबेडकरांचे मध्यवर्ती मंत्रीपद होते. गुणी, ज्ञानी, उच्चविद्याविभूषित आणि कर्तृत्ववान अस्पृश्य व्यक्ती किती उच्च पदावर पोचू शकते, त्याचे आदर्श उदाहरण मंत्रीपदावर पोचलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी २० जुलै १९४२ रोजी आपल्या मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. जबाबदारीचे इतके मोठे व उच्च पद मिळाले म्हणजे व्यापक लोकहिताचे आणि अस्पृश्योद्धाराचे कार्य उत्साहाने करीत राहण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे, अशा जाणिवेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मनस्वी आनंद झाला!
हिंदुस्थानच्या मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सहभागी झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई ऐवजी दिल्लीत राहू लागले. ते २२, पृथ्वीराज रोड, नवी दिल्ली येथे सरकारी बंगल्यात राहू लागले.
मंत्री म्हणून डॉ. आंबेडकर लोकहिताच्या व अस्पृश्योद्धाराच्या वेगवेगळ्या योजनांची आखणी करू लागले आणि त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य व्यक्तींचा, योग्य अधिकाऱ्यांचा आणि योग्य संधीचा सदुपयोग करून घेऊ लागले. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे ठरविले. ते आपली जबाबदारी उत्कृष्ट रीतीने सांभाळू लागले आणि मजूर वर्गाचे जे जे हित करता येईल ते ते करू लागले.
७ ऑगस्ट १९४२ रोजी नवी दिल्ली येथे 'फोर्थ जॉइंट लेबर कॉन्फरन्स' भरली होती. तीमध्ये 'कामगारकायद्यांमध्ये एकवाक्यतेची आवश्यकता' या महत्वाच्या विषयावर मजूरमंत्री डॉ. आंबेडकर यांचे माहितीपूर्ण भाषण झाले. त्यांच्या मतानुसार हिंदुस्थानच्या सरकारने इ.स. १९३५ च्या कायद्यानुसार संघराज्यात्मक घटना निर्माण केलेली आहे. अशा स्थितीत मध्यवर्ती सरकारच्या आणि प्रांतांच्या सरकारांच्या कामगारकायद्यांमध्ये एकवाक्यता असणे गरजेचे आहे. असे असेल तरच कामगारांचे हित साधले जाईल. केंद्राच्या व राज्यांच्या बढतीविषयक कायद्यांत एकवाक्यता असावी, औद्योगिक तंटे मिटविण्याच्या प्रक्रियेत एकवाक्यता असावी, नोकर आणि मालक यांच्यासंबंधीच्या सर्व बाबींवर चर्चा करण्यात एकवाक्यता असावी, असे महत्त्वाचे मुद्दे डॉ. आंबेडकरांनी सुचविले. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष व्ही. व्ही. गिरी यांनी या कॉन्फरन्सचे स्वागत केले होते. कारण कामगारांच्या हिताच्या दृष्टीने ही कॉन्फरन्स त्यांना महत्त्वाची वाटली होती.
दिल्ली येथील डिप्रेस्ड क्लासेस वेल्फेअर असोसिएशनने २३ ऑगस्ट १९४२ रोजी वेंजार्स रेस्टॉरंट येथे मजूरमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार केला आणि त्यांना इंग्रजी भाषेत असलेले मानपत्र समारंभपूर्वक दिले. ज्या असोसिएशनने हा सत्कार समारंभ आयोजित केला होता, पुढे तिचे नामकरण 'दिल्ली शेड्युल्ड कास्ट्स वेल्फेअर असोसिएशन' असे झाले आणि तिचे कार्यालय 'एम. ए. रोड, आंबेडकर भवन, न्यू दिल्ली' येथे सुरू झाले.
मजूरमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या वाईट दशेचे रूपांतर चांगल्या दशेत होऊ शकेल, अशा उपाययोजना' असा विषय घेऊन एक विस्तृत पत्र लिहून ते छापून घेतले. ते छापील पत्र ५६ पानांचे होते. त्यांनी हे ५६ पानांचे पत्र कार्यवाही होण्याच्या उद्देशाने हिंदुस्थानचे व्हाइसरॉय म्हणजेच गव्हर्नर जनरल यांना २९ ऑक्टोबर १९४२ रोजी दिल्ली येथे सादर केले.
'मध्यवर्ती कायदेमंडळात व मध्यवर्ती मंत्रिमंडळात अस्पृश्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे. प्रांतिक आणि मध्यवर्ती...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙂Positive Thought #✍️सुविचार #💙 भीमसैनिक 💙
*Dear Babasaheb,*
...
*हातात तिरंगा आणि डोळ्यांत स्वाभिमानाची ज्योत घेऊन, तुमचीच दूरदृष्टी आम्हाला सतत मार्गदर्शन आणि सामर्थ्य देत आहे.*
*तुम्ही आम्हाला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य दिले आणि समानता, बंधुत्व व न्यायाचा मार्ग दाखवला.*
*जरी तुम्ही आज शारीरिकरित्या आमच्यात नसलात, तरी प्रत्येक संघर्षात तुमचे विचार आमच्यासोबत राहतात.*
*जेव्हा कधी आम्हाला निराश वाटते, तेव्हा तुम्ही आमची शक्ती, आमची प्रेरणा आणि आमच्या हक्कांचा आवाज म्हणून आमच्यासमोर उभे राहता.*
*संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे महान योद्धे आणि लाखो वंचित व उपेक्षित लोकांचे खरे मार्गदर्शक म्हणून, तुम्ही आमच्यासाठी सदैव पितृतुल्य राहाल.*
*पितृदिनानिमित्त, लाखो लोकांचे मुक्तिदाते आणि प्रेरणास्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र आदरांजली.*
*#डॉबाबासाहेबबेदकर #फादर्सडे*
*#jaybhim #constitucion #explorepage* #💙 भीमसैनिक 💙 #✍️सुविचार #🙂Positive Thought #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜
*#अनुसूचित_जातीत_फूट_पाडू_पाहणाऱ्यां_विरोधकासाठी #आंबेडकर_हेच_उत्तर_आहे..*
*#Anandraj_Ambedkar*
*#कल_भी_आंबेडकर*
*#आज_भी_आंबेडकर*
*या भारतामध्ये जेव्हा जेव्हा सरकार समाजाच्या विरोधात निर्णय घेतो तेव्हा तेव्हा फक्त त्यांना भिडण्याची टाकत फक्त फक्त आंबेडकर घराण्यांमध्ये आहे आणि शेवट पर्यंत न्या मिळेपर्यंत लढा करणारे म्हणजे आंबेडकर घराणे फक्त समाजाच्या हितासाठी कार्य करणारे स्वतःसाठी स्वार्थासाठी कधीच कार्य करत नाही फक्त आणि फक्त समाजाच्या भल्यासाठी कार्य करणारे म्हणजेच आंबेडकर घराणे त्यांची बरोबरी कोणी करणार ही नाही कोणाला होणार ही नाही*
*#उपवर्गीकरण_होऊ_देणार_नाही*
*#उपवर्गीकरण_विरोधी_विराट_महामोर्चा*
*#AnandrajAmbedkar*
*#उपवर्गीकरण*
*#DrBabasahebAmbedkar*
*#SaveReservation*
*#आरक्षण* #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙂Positive Thought #✍️सुविचार #💙 भीमसैनिक 💙
_ आयुष्य कधीच कायम सारखं राहत नाही. काही दिवस हलके वाटतात, तर काही दिवस असह्यपणे जड वाटतात.
आणि कदाचित आत्ता तुम्ही थकला असाल... भावनिकदृष्ट्या खचला असाल... आणि मनातल्या मनात खंबीर राहण्याचा प्रयत्न करत असाल.
पण हे लक्षात ठेवा की कोणतेही वादळ कायम टिकत नाही. #💙 भीमसैनिक 💙 #✍️सुविचार #🙂Positive Thought #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜
आज तुम्हाला होणारी वेदना ही तुमच्या कथेचा शेवट नाही. कधीकधी कठीण टप्पे तुम्हाला अधिक शहाणे, अधिक सामर्थ्यवान आणि शांतीच्या जवळ नेण्यासाठी येतात.
म्हणून अजून हार मानू नका. हळूहळू पुढे जात राहा. कारण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुमच्या लक्षात येईल की... याच कठीण काळातून तुमचं एक अधिक कणखर रूप घडत होतं.
जर तुम्ही शांतपणे लढत असूनही पुढे जात असाल, तर हे एक स्मरण म्हणून जतन करा. जर तुम्ही हार मानण्यास नकार देत असाल, तर "strong" अशी कमेंट करा. सखोल भावनिक ज्ञान आणि उपचारांसाठी फॉलो करा.
#खंबीर रहा #उपचाराचा प्रवास #अंतर्गत शक्ती #जीवनाची प्रेरणा #भावनिक शहाणपण
*ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे, अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत.*
*गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तन,मन,धन कुर्बान करतात ते धन्य होत.*
*आणि अस्पृश्यांना त्यांची माणुसकी पुर्णत: मिळेपर्यंत जे बऱ्या-वाईटाची, सुख-दु:खाची, संकटाची, वादळांची, मान-अपमानाची पर्वा न करता एक सारखे झगडत राहतात ते धन्य होत.*
*-डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*#babasaheb* /*#ambedkar #Jaibhim*. #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙂Positive Thought #✍️सुविचार #💙 भीमसैनिक 💙
Never give up Don't fear the struggle X !!
#💙 भीमसैनिक 💙 #✍️सुविचार #🙂Positive Thought #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜
धर्म हा गांजा आहे.असे ते म्हणतात. परंतु माझ्यात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील व माझ्या शिक्षणाचा जो काही जनतेसाठी उपयोग झाला असेल तो सर्व माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे परंतु धर्माचे ढोंग नको. हिंदू धर्म हा नरक आहे ही माझी समजूत अजूनही कायमच आहे. तेव्हा मला तुम्हाला एवढेच सांगावेसे वाटते की शिक्षणापेक्षा शीलाला अधिक महत्त्व द्या. तसेच आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दिनदुबळ्या जनतेच्या उध्दारार्थ न करिता जर शिकून आपली नोकरी भली आहे,आपली बायकोमुले भली या भावनेने आजचे शिकलेले तरुण वागणार असेल ,तर त्यांचा समाजाला काय उपयोग? तरुणांवर आज पडलेली जबाबदारी ओळखून त्यांनी त्या कार्यास लागावयास हवे आहे. जनतेच्या हाडीमासी भित्रेपणा खिळलेला दिसतो.आपले कायदेशीर हक्क बजावण्यासाठी सुद्धा ते धैर्याने पुढे येऊ शकत नाहीत. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरणे, सार्वजनिक राजरस्त्याने मिरवणूक नेणे वगैरे, लोक भित्रेपणामुळे करू शकत नाहीत. ही परिस्थिती फक्त तरुणच बदलू शकतील. परंतु त्यासाठी प्रथम कंबर कसली पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्राणयज्ञदल संस्था ठिकठिकाणी स्थापन करावयास हव्या आहेत. निसर्गसिद्ध हक्क मिळवण्यासाठी त्यांनी जोराचे लढे लढविले पाहिजे.
-डॉ. बी.आर.आंबेडकर
मनमाड १३फेब्रुवारी १९३८ अस्पृश्य कामगार परिषद
(संदर्भ- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१७,(२) पान नं.११४-११८)_
दि.२६ फेब्रुवारी १९३८रोजी 'जनता' मधून प्रसारित झालेला बाबासाहेबांचा लेख.
#viral #explore #trendingnow #reach #growth #facebookgrowth #facebook #fb #Posts #facebookpost #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #✍️सुविचार #💙 भीमसैनिक 💙
*शहाणपण हे भौतिक संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे 🕯*
*पाली:*
*पञ्ञा नराणं रतनं.*
*— अंगुत्तर निकाय*
*बुद्धांनी शहाणपणाचे वर्णन 'सर्वोत्तम रत्न' असे केले आहे, कारण ते कोणीही चोरू शकत नाही, नष्ट करू शकत नाही किंवा ते कधीही संपत नाही. संपत्ती नाहीशी होऊ शकते, सौंदर्य ओसरू शकते आणि कीर्ती लोप पावू शकते; परंतु शहाणपण मात्र जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्ग उजळत ठेवते. धम्म श्रवण करणे, त्यावर सखोल चिंतन करणे आणि ध्यानसाधना करणे यांतूनच खऱ्या शहाणपणाचा विकास होतो. हे शहाणपण आपल्याला अनित्यता, करुणा आणि कर्माचा नियम समजून घेण्यास मदत करते. ज्ञानी मन जीवनातील अनिश्चिततेच्या काळातही शांत राहते, कारण ते वास्तवाकडे स्पष्ट दृष्टीने पाहते.*
*#पञ्ञा*
*आपण उच्चारलेल्या सत्य शब्दांनुसार जगणे 🕯🪷*
*"यथा पि रुचिरं पुप्फं, वण्णवन्तं अगन्धकं; एवं सुभासिता वाचा, अफला होति अकुब्बतो." (धम्मपद ५१).*
*ज्याप्रमाणे एखादे फूल सुंदर आणि रंगीबेरंगी असूनही त्यात सुगंध नसतो, त्याचप्रमाणे जी व्यक्ती आपल्या चांगल्या शब्दांची प्रत्यक्ष कृतीत अंमलबजावणी करत नाही, तिचे ते सुवचन निष्फळ ठरते. बुद्ध आपल्याला धम्माचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करण्याचा आणि त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेचे रूपांतर अर्थपूर्ण व शांततापूर्ण कृतींमध्ये करण्याचा उपदेश करतात.*
*#Zen* #💙 भीमसैनिक 💙 #✍️सुविचार #🙂Positive Thought #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik
The goal of Buddhism is to keep the mind pure #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #✍️सुविचार #💙 भीमसैनिक 💙







