
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
मृत्यूहीन मार्ग
सावधगिरी हा अमरत्वाचा मार्ग आहे; बेपर्वाई हा मृत्यूचा मार्ग आहे. सावधानता असलेले मरत नाहीत; बेपर्वाई असलेले जणू आधीच मेलेले असतात.
धम्मपद, आयत २१-
मुख्य संदेश:
**अप्पमदा**चा अनुवाद अनेकदा 'सावधगिरी' असा केला जातो, पण २०२६ मध्ये आपण त्याला **सामरिक उपस्थिती** म्हणू शकतो. ही एक अशी जाणीव आहे की, वेळ हे आपले सर्वात मौल्यवान साधन आहे आणि आपण घेतलेला प्रत्येक निर्णय—बोललेला प्रत्येक शब्द, मनात आलेला प्रत्येक विचार—हे आपल्या भविष्यासाठी पेरले जाणारे एक बीज आहे.
'सावध' असणे म्हणजे योग्य तातडीच्या भावनेने जगणे. याचा अर्थ तणावग्रस्त असणे असा नाही; याचा अर्थ आहे **जागृत** असणे. याचा अर्थ आहे, आपले आयुष्य आपल्यावर घडू न देता, उलट आपल्या प्रवासाचे जाणीवपूर्वक चालक बनणे. जेव्हा तुम्ही सावध असता, तेव्हा तुम्ही 'वेळ वाया घालवत' नाही - तुम्ही त्यात गुंतवणूक करता.
आज याचा सराव कसा करावा:
***"गोल्डन अवर" ऑडिट:***
तुमच्या दिवसाच्या पहिल्या तासाकडे आणि शेवटच्या तासाकडे लक्ष द्या. हे तास तुमचे 'अंतर्गत साम्राज्य' उभारण्यासाठी वापरले जात आहेत का, की निरर्थक स्क्रोलिंगमध्ये वाया जात आहेत? सजगता
तुमचे सर्वात मौल्यवान तास परत मिळवणे
***"चेक-इन" श्वास:***
आज तीन वेळा, तुम्ही जे काही करत असाल ते थांबवा आणि एक दीर्घ श्वास घ्या. स्वतःला विचारा: *"मी आत्ता जे करत आहे ते मला माझ्या ध्येयांच्या जवळ नेत आहे की दूर?"* "जागे होण्याची" ही साधी कृतीच अप्पमाडाचे सार आहे.
वाइल्डकार्ड नियम (एकाग्रतेची देणगी):
आज जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असाल, तेव्हा तुमचे १००% लक्ष त्यांच्यावर केंद्रित करा. फोन बाजूला ठेवा. खऱ्या अर्थाने तिथे उपस्थित राहा. तुमच्या लक्षात येईल की, नात्यांमध्ये 'लक्षपूर्वक' वागल्याने तुम्ही लक्षणीयरीत्या अधिक प्रभावशाली आणि आदरणीय बनता. #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙
*10 मे - स्वाभिमानी दिन*
*आम्हला स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा देणारे, कोणासमोर लाचार होऊ नका असे ठाम पने सांगणारे स्वाभिमानाने जगा स्वतःचे अस्तित्व स्वतः घडवा असे सांगणारे आमचा स्वाभिमान*
*वंचित-शोषित, जाती समूहांना राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे आग्रही, लोकशाहीचे सामाजिकरण करून स्वतंत्र आंबेडकरवादी राजकीय पक्ष मजबूत करणारे, संविधानिक हक्क-अधिकारांचे रक्षणकर्ते, अन्यायाविरुद्ध रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणारे वकील, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!*
*#PrakashAmbedkar* *#BalasahebAmbedkar*
*स्वाभिमानी_दिन* #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
१० मे
*चळवळीला लाचार करून संपवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही ते कदापि मान्य करणार नाही.*
*व्यक्तिगत फायद्यापेक्षा चळवळ मोठी आहे बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेत्याचा वाढदिवस !*
*देशातील भल्या भल्या प्रस्थापितांना घाम फोडणारे, वंचितांचे कैवारी, बहुजनहृदय सम्राट श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!*
*वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या न्यायहक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, प्रखर विचारवंत, अभ्यासू नेते आणि लाखो कार्यकर्त्यांच्या मनातील प्रेरणास्थान...*
*वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष*
*मा. श्री. प्रकाश आंबेडकर साहेब*
*आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा..!*
*आपले विचार, संघर्ष आणि समाजासाठीची निष्ठा आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे.*
*आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक-राजकीय वाटचालीस भरभरून यश लाभो हीच बुद्धचरणी प्रार्थना..!* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙
१० मे
*चळवळीला लाचार करून संपवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही ते कदापि मान्य करणार नाही.*
*व्यक्तिगत फायद्यापेक्षा चळवळ मोठी आहे बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेत्याचा वाढदिवस !*
*देशातील भल्या भल्या प्रस्थापितांना घाम फोडणारे, वंचितांचे कैवारी, बहुजनहृदय सम्राट श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!*
*वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या न्यायहक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, प्रखर विचारवंत, अभ्यासू नेते आणि लाखो कार्यकर्त्यांच्या मनातील प्रेरणास्थान...*
*वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष*
*मा. श्री. प्रकाश आंबेडकर साहेब*
*आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा..!*
*आपले विचार, संघर्ष आणि समाजासाठीची निष्ठा आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे.*
*आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक-राजकीय वाटचालीस भरभरून यश लाभो हीच बुद्धचरणी प्रार्थना..!* #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
आजच्या नव्या दिवसाला मी शपथ घेतो, की जीवनातील गोंधळातही मी माझे मन शांत ठेवीन, रागाऐवजी चेहऱ्यावर सौम्य स्मितहास्य ठेवीन, आणि कोणालाही दुखू नये म्हणून माझे शब्द मृदू ठेवीन.
मी पुरेसे ज्ञान मिळवायला, लोकांवर प्रेम करायला, आणि या जीवनात अजूनही अनेक सुंदर गोष्टी आहेत हे पाहण्यासाठी संयमाने जगायला शिकण्यास तयार आहे.
आई-वडिलांना शांती लाभो, नातेवाईक निरोगी राहोत आणि जे कोणी दुःखात आहेत त्यांना मनाने थोडा दिलासा मिळो, यासाठी प्रार्थना करा.
जरी आजचा दिवस थकवणारा किंवा कठीण असला तरी, मी माझे चांगले मन टिकवून ठेवण्याची, पुढे जाण्यासाठी स्थिर राहण्याची आणि पुढे येणाऱ्या चांगल्या कृपेवर विश्वास ठेवण्याची प्रार्थना करतो. #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙
विज आणि जलसंधारण..
भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्त व्यवस्था कशी आहे व तिने कसे फेरबदल केले, कशी हुकूमत गाजविण्याची व्यूहरचना रचली, याचे विवेचन त्यांनी आपल्या ग्रंथात केले. 'प्रॉब्लेम ऑफ रूपी'वर ग्रंथ लिहून पैशाचे अमूल्यन कसे घडते, याचे चित्र ग्रंथातून स्पष्टपणे मांडले. ईस्ट इंडिया कंपनी कशी भारतातील माणसांना लुटते, लुबाडणूक करते, गुलाम ठेवण्यासाठी काय योजना आखते, याचे शिक्षण भारतीयांना त्यांनी दिले. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते हे खऱ्या अर्थाने दिसून येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील शिक्षणव्यवस्था, महारवतनाचा प्रश्न, भारतीय जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था, जमिनीचा प्रश्न ग्रंथ भारतीयांना समजावून सांगितला. त्यांच्यात उभे राहण्याचे बळ निर्माण केले. खऱ्या अर्थाने शिक्षणच दिले. १९४२-४६च्या काळात ते सरकारमध्ये होते. तेव्हा त्यांनी विद्युत आयोग, जल आयोग, श्रम आयोग स्थापन केले. त्यांना भारतात वीजव्यवस्था
उभी राहिली पाहिजे. पाण्याचे नियोजन नीट झाले पाहिजे. श्रम करणाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी कायदे बनविले. आयोग गठित केले. पाण्याच्या नियोजनासाठी हिराकुंड धरणाची पायाभरणी त्यांनी केली. दामोदर व्हॅलीत लक्ष दिले. एवढेच नव्हे, तर जे लोक शेतकरी, गावकरी जमीन-घरे देतात, त्यांना उभे करण्यासाठी पुनर्वसनाचा विचार मांडला. जमिनीला जमीन आणि घराला घर, अशी भूमिका आंबेडकरांनी मांडली होती. भारतीयांचे हे शिक्षण-प्रशिक्षण आणि प्रबोधन प्रथमतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. शेती, पाणी आणि वाहतुकीची चिंता त्यांनी वाहिली.
डॉ. आंबेडकर समस्त शिक्षणाच्या बाजूचे होते. नुसते मुलांनी शिकावे, या बाजूचे नव्हते. महिलांनी शिकले पाहिजे, याकडे त्यांचा कल होता. म्हणून दलित महिला परिषदेत महिलांची उपस्थिती अविस्मरणीय असायची. महिलांनी शिकावे, लिहावे, वाचावे, याकडे त्यांचा कल होता. शिक्षण घेऊन नोकरी करावी. एवढेच नाही, तर सत्तेत सहभाग घेतला पाहिजे. निर्णय प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे. मत मांडले पाहिजे, असे डॉ. आंबेडकरांना वाटत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या काळात सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थिती फार वेगळी होती. भारतावर ब्रिटिशांची सत्ता असली, तरी राजे-महाराजे, जमीनदार, पाटील-पाड्यांची सत्ता गावगाड्यावर होती. राजे-महाराजे व पाटील-पाड्यांची सत्ता-संपत्ती सांभाळण्याचे काम उच्चवर्णीय करीत असत. प्रत्येक सत्ताधाऱ्याचा दिवाणजी उच्चवर्णीय होता. उच्चवर्णीय 'लिखाई पढाई'त तरबेज होते. राज्यकारभार, जमिनीच्या मालकी हक्काचे कागदपत्र, संपत्तीचा दस्तऐवज, सैन्याची नीती-धोरण ठरविण्यात उच्चवर्णीय समूह सत्ताधाऱ्यांचा मुख्य आधार होता. त्यामुळे शिक्षणात आणि शिक्षण देण्यात त्यांचा पुढाकार होता.
जातिव्यवस्थेमुळे उच्चवर्णीयांनाच शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे इतर जाती-जमातींमधल्या समूहांना शिक्षण मिळणे कठीणच होऊन बसले होते. इतर मागास जाती व दलित-आदिवासींना शिक्षणापासून दूर राहावे लागले. ब्रिटिशांच्या काळात सर्वांना शिक्षण घेता येऊ शकत होते. परंतु, जातिव्यवस्था व आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेणे अवघड झाले होते.
शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक परिस्थिती अनुकूल नव्हती. मात्र, त्यांचे वडील चिंता सैन्यात होते. कबीरपंथी असल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी होते. शिक्षण घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे डॉ. आंबेडकर शिक्षण घ्यायला लागले. परंतु, शिक्षण घेत असताना डॉ. आंबेडकरांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले. वर्गात बसता येत नव्हते. पाणी प्यायला मिळत नव्हते. शिक्षक जवळ येऊन वजाबाकी, भागाकार, गुणाकार समजावून देत नसत. मुलांसोबत खेळता येऊ भाग शकत नव्हते. फळ्यावर जाऊन लिहिता येत नव्हते. अशा सर्व परिस्थितीत त्यांना शिक्षण घ्यावे लागले. उच्च शिक्षण तसेच परदेशात जाऊन शिक्षण घेताना त्यांना खूप यातना व कष्ट सहन करावे लागले. शिक्षणातून अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र अवगत करू शकले. भारत गुलाम का, भारतात जातिव्यवस्था का, अस्पृश्यता का, स्त्री-पुरुष विषमता का, अशा व इतर प्रश्नांनी त्यांना घेरले होते. म्हणून ते या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यासाठी देशविदेशातील पुस्तके पालथी घालत होते. भारतीय समाजव्यवस्था अशी का आहे, भेदाभेद का करते, स्पृश्य-अस्पृश्य असा भेद का आहे, वर्गव्यवस्थेत अस्पृश्य-अतिशूद्र कसे काय आहेत, या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी शरीरस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून वाचन-मनन-चिंतन करीत होते. मी जे वाचतो.
दोन्ही डोळ्यांनी पाहतो, अनुभवतो, सहन करतो, त्यातून मुक्त झाले पाहिजे. माणसामाणसांतील भेदभाव संपला पाहिजे, या दृढनिश्चयाने डॉ. बाबासाहेब वाचन-मनन करायला लागले, अज्ञानी समाजाला शिक्षित करण्यासाठी हाडाची काडे व रक्ताचे पाणी करीत झटले. यासाठी ते शाळा-महाविद्यालये स्थापन करू लागले, गरीब, वंचित, पीडित लोकांत आत्मविश्वास जागविण्यासाठी बोलू लागले. वर्तमानपत्रे काढू लागले. लिहू लागले. मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारतातून भारतातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक परिस्थिती मांडू लागले. एवढेच नाही, तर त्यांनी जातिभेद निर्मूलनापासून तर बुद्ध अॅण्ड हिज धम्मा तसेच संविधान लिहून भारतीय समूहाला फार मोठी ताकद, क्षमता, आत्मविश्वास मिळवून दिला. त्यांनी भारताच्या सर्व क्षेत्रांचा अभ्यास करून जल-जंगल-जमीन, सिंचन, वीज, अर्थकारणावर आपली मते नोंदविली. भारतीय समाज समूह ज्ञानवंत झाला पाहिजे. आचार-विचार, नीती-नियम व शीलवान झाला पाहिजे, याकडे त्यांचे लक्ष होते. त्या दृष्टीने डॉ. आंबेडकरांनी कार्य केले...
कार्यसंपादक मुक्तीदाता विशेषांक #💙 भीमसैनिक 💙 #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought
*#Happy_Birthday_Saheb*
*#BalasahebAmbedkar*
*#स्वाभिमानी_दिवस_10_में*
#स्वाभिमानी_नेतृत्व
*#बहुजनांचे_हृदय_सम्राट*
*बाळासाहेब म्हणतात आताचा लढा हा रस्त्यावरच्या लढ्याबरोबरच विचाराचा ही लढा होणार आहे तेव्हा आंबेडकरी समुह,चळवळीतील कार्यकर्ता,लेखक,विचारवंत,आदीनी यांचा गांभीर्याने विचार करून एकदाचा ठोस निर्णय घेऊन कुठं जायचे आणि कुणाबरोबर जायचे याचा सद्सद्विविवेकबुद्धीने निर्णय घ्या सदोदित वैचारिक दृष्टीकोन बाळगणाऱ्या भीमसुर्याचा प्रकाश श्रद्धेय,बाळासाहेबांना जन्मदिवसाच्या मंगलकामना,साहेब शतायुषी व्हा,येथील वंचित,उपेक्षित,आंबेडकरी समाज आपल्यासोबत खंभीरपणे उभा आहे..!*
*एकटा आलो नाही युगाची साथ आहे
येणाऱ्या वादळाची ही सुरवात आहे.!* ❤️
*देश्यातील सर्वात मोठी ताकत,*
*देशातील शोषित-वंचित-पिडीतांचा बुलंद आवाज श्रद्धेय साहेब!*
*ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत दिली, स्वाभिमानाने जगण्याची दिशा दिली, अशा जननेत्याला मानाचा मुजरा!* #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙
प्रत्येकाला मृत्यूची भीती वाटते... पण सत्य हे आहे की - मृत्यू वाईट नाही, अपूर्ण जीवन वाईट आहे.
माणसे जगतात... पण त्यांच्या स्वप्नांशिवाय, त्यांच्या आनंदाशिवाय.
प्रत्येकाला कधी ना कधी जावेच लागते, काहींना लवकर... तर काहींना उशिरा.
म्हणून, आपण मृत्यूला घाबरू नये, तर त्या दिवसाला घाबरावे जेव्हा आपल्याला वाटेल की आपण आपले आयुष्य जगलोच नाही.
असे जगा की जेव्हा शेवट येईल, तेव्हा कोणतीही खंत राहणार नाही... केवळ शांती मिळेल.
#मृत्यू #जिंदगी #शांती #बुद्ध #जीवन #💙 भीमसैनिक 💙 #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought
दुःखाची कारणे CAUSES OF SORROW
पापञ्चे पुरिसो कविरा, न नं कविरा पुनष्युनं ।
न तम्हि छन्दं कचिराय, दुक्खो पापरस उच्चयो ।
जर पाप केले तर ते पुनः पुन्हा करू नये. त्यामध्ये रममाण होऊ नये. पापाचा संचय दुःखास कारणीभूत होतो. (धम्मपद ११७)
१. भगवान बुद्ध वास्तववादी होते. त्यांनी दुःखाची कारणे शोधली.
२. दुःखाची कारणे तीन प्रकारची आहेत आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे आहे.
३. आध्यात्मिक म्हणजे वैयक्तिक, व्यक्तीने स्वतःच्या वागणुकीने ओढवून घेतलेले दुःख, आपल्या कर्मामुळे उत्पन्न झालेले दुःख.
उदाहरणार्थ, एखाद्या दारुड्याने दारू पिऊन स्वतःच्या संसाराची धुळधाण आणि शरीराची राखरांगोळी स्वतःच्या हाताने करणे, याला 'आध्यात्मिक दुःख म्हणतात.
४. आधिभौतिक म्हणजे सामुदायिक दुःख. विषम वागणुकीमुळे आणि अन्यायामुळे ओढवणारी संकटे.
उदाहरणार्थ, अस्पृश्यांना होणारी सामाजिक दुःखे, समान संधी प्राप्त न होणे, बाला 'आधिभौतिक दुःख म्हणतात.
५. आधिदैविक म्हणजे नैसर्गिक, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी दुःखे.
उदाहरणार्थ, रेल्वे, विमान, आगबोट, मोटार अपघात आणि वादळ, महापूर आदी आपत्तीमुळे निर्माण होणारे दुःख याला 'आधिदैविक दुःख' म्हणतात.
६. भगवान बुद्धाने दुःखाची तीन कारणे शोधली आणि दुःख नाहीसे करण्याचा प्रभावी मार्गही सांगितला.
७. वैयक्तिक आचरणामुळे ओढवणारी दुःखे नाहीसे करण्यासाठी 'पंचशील' हे साधन आहे. सामूहिक दुःख नाहीसे करण्यासाठी 'अष्टांगिक मार्ग' आणि नैसर्गिक दुःख नष्ट करण्यासाठी 'शीलमार्ग' हे साधन आहे.
८. भगवान बुद्धाने पहिल्या प्रवचनात दुसरे आर्यसत्य 'दुःख समुदय नावाने सांगितले. दुःख समुदय म्हणजे दुःखाला सुद्धा कारणे आहेत.
९. भगवान बुद्ध म्हणतात, भिक्खूहो, दुःख समुदय नावाचे दुसरे आर्यसत्य म्हणजे जी पुन्हा-पुन्हा उत्पन्न होणारी व सर्वत्र आसक्ती उत्पन्न करणारी तृष्णा. ही तृष्णा तीन प्रकारची असते- १. कामतृष्णा (रूप, गंध, रस आणि स्पर्शाची प्रबळ आसक्ती), २. भवतृष्णा (रूप आदी विषयाच्या प्रती शाश्वत दृष्टीने युक्त राग उत्पन्न होणे), ३. विभव तृष्णा (रूप आदी विषयाच्या प्रती उच्छेद किंवा विनाशाची दृष्टी).
१०. वरील तीनही तृष्णा दुःखाचे कारण दर्शवितात.
मुक्तीदाता बुद्ध पौर्णिमा विशेषांक
संदर्भ धम्म सिध्दांत #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙
हमारी पहेचान थोड़ी कम है क्योंकि हम हर किसी के आगे पीछे नहीं घूमते.. #💙 भीमसैनिक 💙 #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर






