
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
*जिच्या स्वार्थत्यागामुळे मला ही स्थिती प्राप्त झाली !*
*प्रिय रामू नमस्ते...*
*पत्र पोहचले. गंगाधर आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटते. नशिबाचा ठेवा. त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही.*
*तुझा अभ्यास चालला आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. पैशासंबंधाने तजवीज करीत आहे. मी अन्नास मोताद झालो आहे. तेव्हा मजजवळ पाठविण्यास काही नाही. तरीपण तुमचा बंदोबस्त करीत आहे. वेळ जर लागला आणि तुझे पैसे जर संपले तर दागिने मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने तुला भरून देईन.*
*यशवंत व मुकुंद यांचे शिक्षण कसे काय चालले आहे? कळविले नाहीस.*
*माझी प्रकृती ठीक आहे. काही चिंता नसावी. अभ्यास काही संपला नाही. जून महिन्यात येणे होईल असे दिसत नाही. पुढे कळवीन.*
*सखू व मंजुळा यांच्यासंबंधी काही कळत नाही. तुला पैसे पोहचल्यानंतर मंजुळाला व लक्ष्मीच्या आईस एक-एक (प्रत्येकी) लुगडे घेणे. शंकराची काय हालहवाल? गजरा कशी आहे ?*
*रमाबाई पतिराजांना म्हणत, "साडेचारशेची नोकरी आहे. तीच आपणाला पुरे. पुढच्या अभ्यासाचा नाद सोडून द्यावा. आता संसारात लक्ष घालून नेटका संसार करावा."*
*डॉक्टर म्हणाले, "तू जर माझ्या विद्याभ्यासात असे अडथळे आणू लागशील तर मी दुसरी बायको करीन. तुझ्यासारख्या अडाणी स्त्रीला त्याची काय किंमत?" रमाबाई म्हणत, "जा. वाटेल तेवढ्या बायका करा. पण माझ्या घरात मी एकीलाही पाऊल टाकू देणार नाही."*
*नंतर दोघेही हसतात.*
*"रमा, ही आपल्या समाजाची मुले आईबापांना सोडून बोर्डिंगात राहतात. त्यांना तेथे गोडधोड जेवायला मिळते. पण त्यांना मटणमासे मिळत नाहीत. तेव्हा आपण श्राद्धाचे जेवण मटणमांसाचे करू या. तू असले जेवण करीत नसशील तर तसे मला सांग. मी मुलांना हॉटेलात नेऊन जेवण देईन."*
*रमाबाईची इच्छा पुरणपोळीची होती, पण अखेर पतीचा हट्ट पुरविला व ५०-६० मुलांना मटणमांसाचे जेवण दिले...*
*संदर्भ माझी आत्मकथा*
*(मुक्तीदाता विशेषांक)* #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought
*सत्य ओरडत नाही; ते शांततेतही स्पष्ट असते. खोट्याला आधाराची आवश्यकता असते; सत्य स्वतःच उभे राहते. आपण सत्याला घाबरतो कारण ते आपल्याला बदलते. पण तोच बदल आपल्याला प्रकाशमान आणि मुक्त करतो. जे बदलण्यास घाबरत नाहीत तेच सत्याच्या जवळ असतात. बुद्धाच्या अनुयायांनी, धैर्य ठेवा; सत्य नेहमीच मुक्त करते.* #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜
अंदर से बहुत लड़ना पड़ता है, बहार से शांत दिखने के लिए..! #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought
*बाबासाहेबांनी सांगितलेले आठवणी*
*"माझ्यासाठी वधू ठरविण्याच्या बाबतीत माझ्या वडिलांना दंड द्यावा लागला. आपल्या मुलाला अनुरूप वधू मिळावी म्हणून माझ्या वडिलांना वधूच्या शोधात खूपच प्रवास करावा लागला. त्यासाठी त्यांनी बराच पैसाही खर्च केला. एखाद्या ठिकाणी एखादी सुस्वरूप मुलगी आहे असे समजले की तिकडे माझे वडील अगदी न चुकता जायचे. अशा प्रकारे माझ्यासाठी वधू शोधण्यात त्यांनी बरेच फेरफटके मारले. नंतर त्यांनी एक मुलगी माझ्यासाठी वधू म्हणून निश्चित केली. आमच्या चाळीतल्या पद्धतीप्रमाणे पंचाच्यामार्फत त्यांनी साखरपुडाही केला. नंतर काही दिवसांनी माझ्या वडिलांना कुणीतरी सांगितले की दुसऱ्या एका ठिकाणी एक मुलगी फारच सुंदर सुस्वभावी, सुस्वरूप व शरीराने बांधेसूद अशी आहे. तेव्हा माझ्या वडिलांनी पहिला साखरपुडा रद्द केल्याचे त्या मुलीच्या आईवडिलांना कळविले. त्या मुलीच्या आईवडिलांनी अखेर पंचामध्ये न्यायाची मागणी केली. पंचमंडळींनी सारखपुडा रद्द केल्याबद्दल माझ्या वडिलांना दंड केला. दुसरी मुलगी माझ्या वडिलांनी पाहिली. माझ्यासाठी वधू म्हणून त्यांना ती पसंत ही पडली आणि त्या मुलीचा साखरपुडाही त्यांनी केला. पण पहिल्या साखरपुड्याप्रमाणेच हाही साखरपुडा माझ्या वडिलांनी रद्द केला आणि त्यासाठी पुनः त्यांनी दंडही भरला. अशा प्रकारे माझ्या वडिलांनी माझ्याकरिता वधू म्हणून ठरविण्यास दोन वेळा दंड भरला. शेवटी त्यांना कोणीतरी भिकाजी वनंदकरांची मुलगी रामाबाई पत्र्याच्या चाळीत आपल्या भावाबरोबर राहते*
*असे सांगितले. शेवटी माझ्या वडिलांनी हीच मुलगी माझ्यासाठी वधू म्हणून निश्चित केली. त्याप्रमाणे लग्नाचा मुहूर्तही काढला. माझे लग्न कुठल्या तरी खेड्यात किंवा चाळीत झाले नाही. भायखळा स्टेशनजवळ एक लहानसे हनुमान मंदिर आहे त्या मंदिरासमोरच लग्नसोहळा झाला. आता लग्नात हजारो रुपये खर्च करण्यात येतात. माझ्या लग्नात जेवणाच्या पंक्तीच्या वेळी काही लोकांना ताटांच्या अभावी तव्यामध्ये वाढावे लागले. पण माझ्या वडिलांची वधूची तिसरी निवड मात्र फारच यशस्वी ठरली असे म्हणायला हरकत नाही." या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांनी भायखळ्यावरून जाता येता एकदोन वेळा त्यांचे लग्न ज्या ठिकाणी झाले ते हनुमान मंदिर मला दाखविले. तव्यात लोकांना जेवावे लागले हे सांगत असताना त्या वेळची गंमत म्हणून ते फारच हसत...*
*लेखक बळवंत हनुमंतराव वराळे गुरुजी*
*संदर्भ डॉ आंबेडकरांचा सांगाती*
*(मुक्तीदाता विशेषांक)* #🙂Positive Thought #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
*दारूच्या जादूत तरुणाई: बुद्धाचा धर्म, सामाजिक अनुभव आणि वैज्ञानिक इशारे*
*औषध नाही, फक्त एक फसवणूक*
*आजच्या समाजात दारू पिणे ही एक सामान्य सवय बनली आहे. विशेषतः चेहऱ्यावर मिशा येण्याआधीपासूनच, आपल्या तरुणांना दारू पिण्याची सवय होत आहे. दारू पिल्याने आनंद, धैर्य आणि स्वातंत्र्य मिळेल असे मानले जाते. पण प्रत्यक्षात ते आनंद नाही - ते हळूहळू होणारा आत्म-नाश आहे. म्हणूनच भगवान बुद्धांनी दारूबद्दल सांगितले आणि इशारा दिला की "दारू मोठ्या वाघापेक्षा जास्त धोकादायक आहे".*
*बौद्ध धर्मात दारू: अपघाताचे मूळ कारण*
*बौद्ध धर्मातील पाच शीलांपैकी एक म्हणजे सुरमेरय मज्जा पमदत्तन विरामणी - म्हणजे मादक पदार्थांपासून दूर राहणे. भगवान बुद्धांनी स्पष्टपणे सांगितले की मद्यामुळे निष्काळजीपणा नष्ट होईल आणि माणसामध्ये शहाणपण कमी होईल. मद्यपी त्याच्या शब्दांवर आणि कृतींवर नियंत्रण गमावतो. तो धार्मिकतेच्या मार्गापासून दूर जाईल.*
*दारू आणि संपत्तीचे अवशेष*
*ज्यांना दारूचे व्यसन आहे ते निश्चितच त्यांची संपत्ती गमावतील, असे भगवान बुद्ध म्हणतात. आजच्या समाजात हे स्पष्ट आहे. काही जण व्यवसायाच्या नावाखाली आणि काही जण राजकीय अधिकाराच्या नावाखाली बेकायदेशीर संपत्ती जमा करत आहेत, परंतु अशा लोकांना दारूचे व्यसन लागले तर ते खरी शांती गमावतील. तुमच्याकडे पैसे असू शकतात पण तुम्हाला मनाची शांती मिळू शकत नाही. आयुष्यमान निश्चितच कमी होईल. बाहेरून हास्य आणि मुद्रा असली तरी आत फक्त असंतोष, भीती आणि अस्थिरता आहे.*
*दारूची सवय आणि सामाजिक चिंता*
*दारू माणसातील विवेकबुद्धी हिरावून घेते. दारू पिणारा माणूस विनाकारण नशेत जातो, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडतो. कुटुंबातील वाद, मित्रांमधील स्पर्धा, समाजात हिंसाचाराला कारणीभूत ठरणारे वर्तन - हे सर्व दारूच्या व्यसनाचे थेट परिणाम आहेत. सर्वांशी चांगले राहण्याची सामाजिक बुद्धिमत्ता दारूमुळे नष्ट होईल.*
*दारूचा आरोग्यावर होणारा परिणाम*
*दारू पिण्यामुळे आरोग्य बिघडणे अपरिहार्य आहे. उच्च रक्तदाब, यकृताचे आजार आणि*
दीर्घकाळात पक्षाघात, मेंदूचा बिघाड देखील होऊ शकतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने डिमेंशिया होण्याचा धोका असतो. स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्याची क्षमता मंदावणे, अस्थिर वर्तन हे सर्व मद्यपानाचे गंभीर दुष्परिणाम आहेत. *
*दारू आणि नैतिक पतन*
*दारूमुळे मानवी वर्तन अश्लीलतेत बदलते. मद्यपी लोक इतरांशी ज्या पद्धतीने बोलतात ते असंस्कृत बनते. समाजात त्यांचा खरा आदर नाही. चांगले शिष्टाचार, नैतिक मूल्ये, स्वाभिमान - हे सर्व दारूपुढे हरवते. बौद्ध धर्मात याला "अपघात" असे स्पष्टपणे म्हटले आहे. *
*भारतीय महर्षींकडून इशारे*
_महर्षी नारायण गुरुंनी दारूबद्दल कडक इशारा दिला आणि असे म्हटले:
*"बुद्धिमान हे अपंगत्व आहे, दारू हे शहाणपण आहे* *मध्यान्हाच्या सेवेत दारू विषारी असते:"*
*म्हणजे, दारू मनाला क्षीण करते; ज्ञानी म्हणतात की ते विषासारखे आहे.*
*संत रविदासांनी स्पष्टपणे सांगितले होते की "गांजाच्या पाण्यापासून बनवलेले मद्य सेवन करू नका". यावरून असे दिसून येते की मद्य हे निसर्गतःच वाईट आहे.*
*खरे स्वातंत्र्य दारूपासून दूर राहण्यात आहे*
*दारू व्यापाऱ्यांना नफा देते पण मद्यपींना तोटा देते. ते केवळ व्यक्तीच नाही तर कुटुंब आणि समाजाचाही नाश करते. बुद्ध धर्माने दाखवलेला मार्ग स्पष्ट आहे - जर तुम्ही सतर्क असाल तर तुमचे रक्षण होईल. दारूपासून दूर राहणे हीच खरी ताकद आहे, खरी स्वातंत्र्य आहे.*
*आर्य नागसेन बोधी*
*एमए., एम.फिल., टीपीटी., एलएल.बी*
*सद्दम्मा धर्मोपदेशक*
*भावथु सब्बा मंगलम* #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought
महान बनने के लिए पहले इमानदार बनना पड़ता है, खुद से भी और कर्म से भी..! #🙂Positive Thought #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
#बहुजनांची_आई
#माता_रमाई_भिमराव_आंबेडकर
#यांच्या_१२८_व्या_जयंती_निमित्त_सर्व
#जनतेस_हार्दिक_शुभेच्छा..!
*#वर्षे_२_रे
#भव्य_मिरवणुक
माझ्या भीमाची सावली, दिन दलितांची आई...
अशी भाग्यशाली त्यागमुर्ती माझी आई माता रमाई...
माता
*ज्यांच्या त्यागावर करोडो जनांचा उधार झाला त्या त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे तरी शेकडोच्या संख्येत सामील व्हा.*
*मिरवणुकीचा मार्ग :- भैय्यासाहेब आंबेडकर विहार प्रभात नगर येथून सुरवात ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत शेवट.*
*वेळ:- दुपारी 03.00 वाजता.*
*दिनांक 07/02/2026*
*#आयोजक : #नवयुवक_भीम_जयंती_मंडळ
#🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought
*१९२५ च्या नंतर बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती जरी सुधारत चालली होती तरी पती-पत्नीला आपला संसार आनंदाचा आहे असे वाटत नव्हते. दोन्ही जीव मनात झुरत असत. रमाबाई मनात कुढत रहात त्यामुळे त्यांना आजारपणात महिनेच्या महिने अंथरूणाला खिळून रहावे लागे. साहेबांनी कुटुंबाशी असलेला संबंध हळूहळू तोडला. दोन तीन महिन्यांनी एखाद्या रविवारी ते घरी जात. सर्वांन डोळ्याखाली घालत व अर्ध्यापाऊण तासात परत ऑफिसात येत. त्यांचे जेवण घरून येई, कधी ते जेवण खात किंवा परत करीत.*
*साहेब ज्या दिवशी जेवण घरी परत पाठवीत, त्या दिवशी रमाबाई जेवत नसत काही दिवसांनी हे साहेबांना समजले. तेव्हा जेवणाचा डबा परत न करण्याचे त्यांनी ठरविले. ते जेवण घेत व नको असेल तेव्हा जवळच्या एखाद्या माणसाला ते जेवण खावयास भाग पाडीत व रिकामा डबा घरी पाठवून देत. साहेबांचा हा उपनाम रमाबाईंना कळला. त्या फार दुःखी झाल्या.*
*एकदा ते मलेरियाने आजारी पडले. अंगात ताप असतानाही ते अंथरूणाल पडून वाचन करू लागले. भेटीस आलेल्या माणसाशी ते गप्पा मारू लागले. दररोजच्या बैठकीतील लोक त्यांना विनवीत की, तुम्ही औषध घ्या. पण ते ऐकेनात. शेवटी त्या रात्री त्यांचा ताप वाढला. ते अंथरुणावरच पडून राहिले. रमाबाईन है समजले. साहेबांना घरी घेऊन या म्हणून त्यांनी शंकरला त्यांच्या ऑफिसात पाठविले. परंतु साहेब घरी गेले नाहीत. तेव्हा रमाबाई स्वतः ऑफिसात आल्या.*
*त्या आलेल्या पहाताच साहेबांच्या आसपास बसलेले लोक उठून उभे राहिले व त्यांनी रमाबाईंना बसायला खुर्ची दिली. पण त्या उभ्याच राहिल्या व घरी चला म्हणून विनवू लागल्या. परंतु साहेब मोठ्याने ओरडले, 'तू घरी जा.' रमाबाई अश्रू पुशीत ऑफिसच्या बाहेर पडल्या व घरी आल्यावर ढसाढसा रडू लागल्या. त्या दोन दिवस जेवल्या नाहीत. त्यांनी साहेबांसाठी दोन तासांनी मुसंबीचा रस व ताक पाठवून दिले. तिसऱ्या दिवशी साहेबांचा ताप उतरला व त्यांनी ताकभात खाल्ला.*
*पत्नीकडे, संसाराकडे आणि वैयक्तिक सुख दुःखाकडे अशा रीतीने पाठ फिरविल्यानंतर साहेबांनी वाचन, लेखन, प्रॅक्टिस व सामाजिक चळवळ या गोष्टींकडे सारे लक्ष केंद्रित केले व आपल्या नवीन संसारास सुरुवात केली...*
*लेखक हरिभाऊ पगारे (मुक्तीदाता विशेषांक)*
*संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर कौटुंबिक जीवन आठवणी* #भीमसैनिक #👑🔥💯💙कट्टर भीमसैनिक💙💯🔥👑 #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर
#💙 भीमसैनिक 💙 #👑🔥💯💙कट्टर भीमसैनिक💙💯🔥👑 #भीमसैनिक ज्याने स्वतःचा :चा जिवावर अस्तित्व निर्माण केलेलं असत त्याला कधीच हरणाची भीती नसते
*चित्त चंचल आहे, चपळ आहे, त्याला रक्षण करणे कठीण आहे. निवारण करण्यास दुष्कर आहे अशा चित्ताला बुद्धिमान माणुस सरळ करतो. जसा बाण बनविणारा बाणाला.*
*चित्तवग्ग*
*#धम्मपद #buddhist #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜








