Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
ShareChat
click to see wallet page
@63559539
63559539
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
कामगारांचे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर भाग 2 म्हणाले, 'संप करणे हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे. मनुष्याच्या इच्छेविरुद्ध त्याला काम करण्यास भाग पाडणे म्हणजे त्याला गुलाम बनविणे होय. कामगाराला शिक्षा करणे म्हणजे त्याला गुलाम करणे. संप म्हणजे कामगारांचा आपण कोणत्या अटींवर नोकरी करण्यास तयार आहोत, ते सांगावयाचे स्वातंत्र्य असलेला पवित्र हक्क होय. कामगारांच्या नागरिक स्वातंत्र्याची गळचेपी करणारा हा कायदा प्रगती विरोधक असल्यामुळे कामगारांच्या संप करण्याच्या हक्काला त्याने मर्यादा घातली आहे. संप करणे बेकायदेशीर ठरविले आहे. जे सरकार आपण कामगारांच्या मतावर निवडून आलो असा दावा करते, त्या सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाशी विश्वासघात केला आहे' म्हणून निषेध संप करण्याचे जाहीर केले. संपाच्या पूर्वतयारीसाठी वेगवेगळ्या कामगार संघटना एकत्र आल्या. ६ नोव्हेंबर १९३८ रोजी कामगार नेत्यांच्या बैठकीत संपाची रूपरेषा आखण्यात आली. ७ नोव्हेंबर १९३८ रोजी प्रचंड मिरवणूक काढण्याचे ठरविले. यातील ९० टक्के स्वयंसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे होते. हा संप होऊ नये म्हणून त्यावेळच्या शासनाने कामगारांवर आणि कामगार नेत्यांवर दबाव आणला पण तरीही संपाला कामगारांचा अधिकच पाठिंबा मिळत गेला. अखेर ७ नोव्हेंबर १९३८ रोजी संप घडवून आणलाच. कामगारांवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात ७२ लोक जखमी झाले. ३५ लोकांना अटक झाली. त्या दिवशी बहुतेक सर्व कापड गिरण्या व इतर उद्योगांतील कारखाने आणि नगरपालिकेचे सर्व कामकाज बंद होते. अमळनेर, जळगाव, चाळीसगांव, धुळे, पुणे या ठिकाणापर्यंत संपाचे लोण पसरले होते. एकीकडे कामगारांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले तर दुसरीकडे मालकवर्गांत कामगारांचे अभेद्य आंदोलन बघुन दहशत निर्माण झाली. संध्याकाळी कामगार मैदानावर कामगारांची प्रचंड सभा भरली तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रणांगणावर जशी एखादी मुलुखमैदानी तोफ आग बरसते, शत्रूवर तुटून पडते तशी तुफानी तोफ त्यावेळेच्या शासनाविरुद्ध डागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगारांचे नेते म्हणून जगभर प्रसिद्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढवय्ये, समर्थ, प्रभावी नेते म्हणून शासनावर व इतर समाजावर प्रभाव पाडू शकले. राजकीय तत्त्वे बाजूस ठेवून कामगारांच्या हितासाठी कामगार संघटना मजबूत आणि अभेद्य झाली. मुंबई नगरपालिकेच्या कामगारांची 'म्युनिसिपल कामगार संघ' व 'बॉम्बे पोर्ट ट्रस्ट' च्या कामगारांचीही संघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बांधली होती. या दोन्ही ठिकाणचे बहुसंख्य कामगार बाबासाहेबांच्या युनियनचे सदस्य होते. ७ एप्रिल, १९४२ ला जॉईन्ट लेबर कॉन्फरन्स दिल्लीला भरली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर हितासंबंधीच्या कायद्यात एकवाक्यता असणे जरुरीचे आहे, असे विचार प्रकट केले. ते याप्रमाणे - १. कामगार कायद्याचे एकत्रीकरण, २. औद्योगिक विवाद अधिनियमात समेट घडवून आणण्याची यंत्रणा निर्माण करणे, ३. देशाच्या महत्त्वाच्या बाबींवर कामगार आणि मालक यांच्याशी वाटाघाटीसाठी तरतूद करणे. २ जुलै, १९४२ रोजी व्हॉईसरॉयने आपल्या कार्यकारी मंडळात वाढ केली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मजूरमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. २० जुलै, १९४२ रोजी बाबासाहेबांनी मजूर मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. मजूरमंत्री पदाच्या कारकिर्दीत बाबासाहेबांनी कामगारांच्या हिताच्या अनेक गोष्टी केल्या. कामगारांच्या हिताचे ते कायदे सध्या अस्तित्त्वात आहेत. कामगारांच्या हक्काची जपणूक व्हावी म्हणून त्यांनी 'लेबर ऑफिसर' चे पद निर्माण केले. 'सेवायोजन कार्यालये' स्थापण्याचा निर्णय त्यांच्याच कारकिर्दीत घेण्यात आला. रात्री स्त्रियांना काम करण्याची बंदी घातली. स्त्रियांच्या प्रसूतीकाळात त्यांना विशेष भरपगारी रजा, वाढत्या महागाईच्या निर्देशांकाच्या आधारावर महागाई भत्त्याची पूर्तता. डिसेंबर १९४५ पहिल्या हप्त्यात मुंबई सचिवालयात विभागीय कामगार प्रशासकांच्या परिषदेचे उद्घाटन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले विचार आजही कामगार, मालक व सरकार यांना मार्गदर्शक ठरावेत असे आहेत. या भाषणात ते म्हणाले, औद्योगिक अशांतता टाळण्यासाठी किंवा ती कमी करण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे समेट घडवून आणण्यासाठी योग्य अशी समेट यंत्रणा हवी. दुसरी गोष्ट औद्योगिक कलह कायद्यात सुधारणा केली पाहिजे आणि तिसरी गोष्ट कामगारांना कमीत कमी किती पगार असावा हे शासनाने ठरविले पाहिजे, यापुढे सत्तेच्या बळावर औद्योगिक शांतता प्रस्थापित करता येणे शक्य नाही. कायद्याच्या बळावर ती शक्य आहे, ही सूचना आशादायक वाटते. त्यात तीन बाजू गुंतलेल्या आहेत. पहिली म्हणजे स्वतः कामगारांनीच आपले काम करण्याचे कर्तव्य ओळखले पाहिजे म्हणजे त्यांनी कामचुकारपणाची वृत्ती टाकून दिली पाहिजे. मालकाने योग्य ते वेतन देणे याचेच नाव पिळवणूक थांबविणे आणि त्यांनी काम करण्यास सुखावह परिस्थिती निर्माण करणे, याचेच नाव कामगार कल्याण होय. तिसरी गोष्ट म्हणजे सरकार आणि समाज यांनी औद्योगिक संबंध सलोख्याचे राहावेत यासाठी जपले पाहिजे. हे सार्वजनिक काम आहे तो मालक कामगार यामधील करार नाही हे ओळखले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधीमंत्री झाल्यानंतर एका सत्कार समारंभाच्या वेळी त्यांनी म्हटले, हे पद आपण जे स्वीकारले, ते केवळ माझा मानसन्मान वाढावा, कितीं वाढावी किंवा विद्वत्तेचे प्रदर्शन व्हावे म्हणून स्वीकारले नसून, यायोगे मला दलित बांधवांना माणुसकीचे हक्क घटनेद्वारे प्रदान करता येतील, दुर्बल, शोषित, पीडित, कामगारवर्गाला अधिक न्याय देता येईल व मी व्हॉईसरॉय यांच्या मंडळावर, कामगार मंत्री असताना जे कामगारविषयक कायद्यांचे अपूर्ण काम राहिले आहे ते पूर्ण करण्याची अधिकृतरीत्या संधी प्राप्त होईल, म्हणून हे पद स्वीकारले आहे. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार कल्याण धोरण किती पुरोगामी स्वरूपाचे होते हे सिद्ध होते. कामगारांच्या हिताची जपणूक करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेली दक्षता व निःस्वार्थी वृत्ती आजच्या कामगार नेत्यांनी अभ्यासावी. अशा कामगार नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम...! संदर्भ : १) डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र खंड ७ चां. भ. खैरमोडे, सुगावा प्रकाशन, पुणे, द्वितीयावृत्ती १९९८ २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन, नवी मुंबई, सातवी आवृत्ती, १९९० ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अॅन्ड स्पिचेस खंड - १०, म.रा. साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, पुनर्मुद्रण, १९९९ ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे, खंड २ - प्रदीप गायकवाड, क्षितीज पब्लिकेशन, नागपूर, तिसरी आवृत्ती, २००३ ५) समग्र आंबेडकर चरित्र - खंड ११, १५, १६, १७ अॅड. बी. सी.कांबळे, सुगावा प्रकाशन, पुणे, द्वितीयावृत्ती २००७६) स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙂Positive Thought #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - NTOUCHA JUSTICL NEQUALITY Zixras NTOUCHA JUSTICL NEQUALITY Zixras - ShareChat
कामगार नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य परळसारख्या कामगार वस्तीत असल्याने कामगारांच्या प्रश्नांची व परिस्थितीची त्यांना चांगली माहिती होती. अस्पृश्यांच्या मुक्तीचे कार्य करीत असतानाच शेतकरी व कामगार यांची हलाखीची स्थिती व त्यांच्यावरील अत्याचार दूर करण्यासाठी ऑगस्ट १९३६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'स्वतंत्र मजूर पक्षाची' स्थापना केली. या पक्षाचा उद्देश आणि धोरण ठरविताना काही मुद्यांवर भर दिला. १. कामगारांच्या मजुरीची किमान मर्यादा ठरवून देणे. २. कामाचे तास कमी करणे. ३. कामाचे योग्य वेतन. ४. कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या बालकांसाठी शिक्षणाची सोय करणे. ५. कामगारांसाठी स्वस्त घरे, भरपगारी रजा, आजारी रजा, वयोवृद्धत्त्वाचे पेन्शन, अपघाती नुकसान भरपाई. ६. कामगारांच्या नोकरीची शाश्वती, बढती यासंबंधी थेट कायदेशीर तरतूद करणे. कामगार नेतेपदाच्या कारकिर्दीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून केली. खोती नष्ट होऊन कुळांच्या ताब्यातील जमीन रयतवारी पद्धतीने त्यांच्याच मालकीची व्हावी असा हेतू होता. परंतु राज्यकर्त्यांनी हा प्रश्न रेंगाळत ठेवला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी सरकारच्या विधिमंडळावर मोर्चा न्यायचा निर्णय घेतला. 'या विधेयकाला पाठिंबा द्या' अशी घोषणा देत मोर्चा विधिमंडळाकडे निघाला. आझाद मैदानाजवळ मोर्चा अडविण्यात आला. प्रचंड सभेसमोर भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, 'जगामध्ये दोन वर्ग आहेत. गरीब व श्रीमंत, पिळले जाणारे व पिळणारे, तिसरा मध्यमवर्ग परंतु तो अगदी लहान आहे. म्हणून शेतकरी व कामगार यांनी दैन्याची कारणे कोणती आहेत याचा विचार करावा. त्यांच्या दैन्याची कारणे त्यांना पिळणाऱ्यांच्या श्रीमंतीत आहेत असे दिसून येईल. त्याला उपाय एकच, तो म्हणजे त्यांनी जातीनिरपेक्ष बुद्धीने मजुरांची आघाडी संघटित करून आपले खरे हित करतील असेच कार्यकर्ते विधिमंडळावर निवडून देणे. त्यांनी असे जर घडवून आणले तरच त्यांना आसरा आणि वस्त्र यांचा लाभ होऊ शकेल. राष्ट्रासाठी जे अन्न व इतर संपत्ती निर्माण करणारे ते तुम्ही भुकेकंगाल होणार नाही.' शेतकऱ्यांप्रमाणे रेल्वे कामगारांचीही संघटना बांधण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाती घेतले. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे रेल्वे कामगारांची भव्य परिषद भरविली. या परिषदेसमोर बोलताना ते म्हणाले, 'ब्राह्मणशाही व भांडवलशाही हेच कामगारांचे दोन मुख्य शत्रू आहेत. ब्राह्मणशाही याचा अर्थ ब्राह्मणांना लाभलेली सत्ता, त्यांचे विशेष हक्क अगर जात असा करीत नाही. माझ्या मते, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय यांचा अभाव म्हणजे ब्राह्मणशाही. ब्राह्मणशाहीचे उत्पादक ब्राह्मणच असले तरी तिची मर्यादा ब्राह्मण समाजापर्यंत नाही. ब्राह्मणशाहीचे दुष्परिणाम केवळ सामाजिक हक्क, आंतरजातीय विवाह आणि सहभोजने यावर होत नाही तर या ब्राह्मणशाहीने सामाजिक हक्क, नागरी हक्क नाकारले आहेत, याची नोंद घेतली पाहिजे. दलित वर्गातील कामगारांना काम मिळण्याची व नोकरीतील बढतीची संधी या ना त्या कारणाने नाकारली जाते. रेल्वेतील कामगार, गँगमन नोकरीतच आयुष्यभर कुजत आहे. रेल्वे मास्तरच्या घरी चोवीस तास गुलामाप्रमाणे रेल्वे हमाल राबतो, पण खलाशीची अगर फायरमनची नियमित नोकरी मात्र त्याला नाकारली जाते. ही अवस्था दूर करण्यासाठी सर्व रेल्वे कामगारांनी संघटनेत एकत्र येऊन त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा मुकाबला केला पाहिजे.' या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आवाहनामुळे रेल्वे कामगारांत चैतन्य निर्माण झाले. सप्टेंबर १९३८ च्या सुमारास औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात विचारार्थ मांडले गेले. या विधेयकाला विरोध करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर... पुढील भागात मुक्तिदाता विशेषांक #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - 4r2432` 4r2432` - ShareChat
जगात आग लागली आहे, दान करून ती विझवा. सर्व वरदान धम्माच्या वरदानांनीच मिळतात. एके काळी, भगवान श्रावस्तीतील अनाथपिंडिका येथील जेतवन विश्रामगृहात राहत होते. मग, रात्र सरल्यावर, आपल्या तेजाने संपूर्ण जेतवन उजळवणारी एक देवता, भगवंत जेथे होते तेथे आली. भगवंतांना वंदन करून ती एका बाजूला उभी राहिली. भगवंत त्या बाजूला उभ्या असलेल्या देवतेला म्हणाले: जेव्हा घराला आग लागते, जो आपली मालमत्ता बाहेर काढतो, ते त्याच्या स्वतःच्या हितासाठीच असते; नाहीतर ती तिथेच जळून राख झाली असती. त्याचप्रमाणे, हे संपूर्ण जग आगीच्या ज्वाळांनी आणि मृत्यूच्या ज्वाळांनी पेटलेले आहे. दान देऊन ती आग विझवा; जे दिले जाते त्याचे चांगले रक्षण होते. दान दिल्याने आनंद मिळतो; दान न दिल्यानेही तीच अवस्था होते. चोर ते चोरून नेतात, किंवा राजा ते घेऊन जातो, किंवा आग लागते, किंवा ते नष्ट होते, आणि शेवटी, हे शरीर आणि त्याची सर्व मालमत्तासुद्धा, सर्व काही गमावले जाते. हे जाणून, शहाणे लोक उपभोग घेतात आणि दानही करतात. आपल्या क्षमतेनुसार दान आणि उपभोग घेतल्याने, माणूस कोणत्याही टीकेशिवाय आनंद प्राप्त करतो. म्हणून भक्तिभावाने दान करा. नमो बुद्धाय #🙂Positive Thought #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - ShareChat
सही संगत जीवन बदल देती है।" #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - ShareChat
00:14
सवलतीसाठी अस्पृश्य रहावे काय ? "मी गांधीजींना असे आश्वासन दिले होते की, कमीतकमी हानीकारक मार्ग मी स्वीकारीन, तद्नुसार आता बौद्ध धर्म स्वीकारून मी हिंदू समाजाच्या दृष्टीने एक, उपकारक कृत्यच करीत आहे. कारण, बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचेच अंग आहे," असे उद्‌गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ता. १३/१०/१९५६ रोजी सायंकाळी 'धर्मांतरा' विषयी पत्रकारांशी बोलताना काढले. वृत्तपत्रकांबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जी मुलाखत झाली ती खाली दिलेली आहे. या धर्मांतरामुळे घटनेने अस्पृश्य वर्गाला ज्या खास सवलती दिल्या आहेत, त्या जातीला त्याविषयी काय? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले :- "सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या सवलतीची तरतूद केलेले आहे, त्या धर्मांतरानंतर आम्हाला मिळतील. पण खास सवलतींचा प्रश्न का उपस्थित करता? त्याविषयी चिंता कशाला? घटनेने दिलेल्या खास सवलतींचा लाभ उठविता यावा म्हणून आम्ही सदासर्वकाळ अस्पृश्यच रहावे, असे तुम्हाला वाटते काय ? आम्ही मनुष्यत्व गाठण्याचा प्रयत्न करीत आहोत घटनेने दिलेल्या खास सवलती मिळाव्यात म्हणून ब्राह्मण अस्पृश्य होतील का?" वार्ताहर : त्यांना त्यांची गरज नाहीं ! डॉ. आंबेडकर : कदाचित त्यांना तशा खास सवलती मागण्याचाही काळ येईल. नाही कोणी म्हणावे? पण पूर्वी जेव्हा आम्ही विभक्त मतदार संघाची मागणी केली तेव्हा गांधीजींनी विरोध केला. मग आताच खास सवलतीचा मुद्दा कां पुढे केला जातो? बौद्ध धर्म स्वीकारताना खास राजकीय हक्कामध्ये माझे हितसंबंध गुंतलेले नाहीत, आणि जर विभक्त मतदार संघ आहेत. त्याची अवस्था अशी आज काय आहे? काँग्रेसने सर्वच जागा बळकावल्या आहेत ना? आणि आज अस्पृश्यांचे म्हणून जे प्रतिनिधी राखीव मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले त्यांनी कधी तरी अस्पृश्यांच रिताचे काही केले आहे काय? अशा जागा घेऊन करावयाचे तरी काय? प्रथम विचारक्रांती आवश्यक प्रश्न : आपण धर्मातराचा निर्णय का घेतला? उत्तर : शतकानुशतके सवर्ण हिंदुंनी आणि विशेषतः आमच्याशी तर व्यवहार केला म्हणून / ज्यांच्या नाकाला काही घाण असेल. तो प्रत्येक जण बौद्ध होईल. बौद्धधर्म हा विश्वधर्म आहे. माझे क्षेत्र मला केवळ अस्पृश्यांपुरतेच मर्यादित करावयाचे नाही. संपूर्ण भारतात धर्मचक्र प्रवर्तन घडवून आणावयाचे आहे. मी सांगतो ते चिरकाल मानावे, असे बुद्धाने कधीही सांगितले नाही. जे मी सांगितले ते काळाशी विसंगत असेल तेव्हा त्यात परिवर्तन करावे, असे सांगून त्याने इतकी मोकळीक दिली आहे. प्रथम लोकांच्या विचारात क्रांती करावी लागते, मग आचारक्रांती होते. प्रश्न : विचारात आणि आचारात काहीच तफावत राहणार नाही काय? उत्तर : फरक पडतोच; पण धर्माचे शिक्षणही समाजाला द्यावे लागते. अस्पृश्य वर्गातून जातीभेदाचे उच्चाटन करीन प्रश्न : पण एक जातीभेद सोडला तर तुम्ही बौद्ध आणि हिंदुधर्मात काय फरक दाखवाल? उत्तर : प्राण सोडला तर शरीरात काय राहिले, अशा सारखाच हा प्रशन आहे. हा जातीभेद तुम्हीच पाळता ना? जातीभेद वाढविला कोणी? ब्राह्मणांनी आम्हाला आणि मराठ्यांना कधीही मत स्वातंत्र्य दिले नाही. प्रश्न : हा जातीभेद अस्पृश्य वर्गातही होतो ना? तो बौद्धधर्म - स्वीकारानंतरही कायम राहणार नाही कशावरून? उत्तर : तो आम्ही तुमच्या कडूनच घेतला ना? पण त्यास आम्ही प्रतिरोध तर करू शकतो. मी शूर आणि धीट आहे. मी लोकांना कसे वागावे, याचे आदेश देईन नाही तर मी एकटाच बुद्ध होईन त्यात बिघडले कोठे? आणि माझा तर असा प्रश्न आहे की, बुद्धकालीन ब्राह्मणांना बौद्धधर्म कसा पटला? आणि आताच तो का पटत नाही. मी हा प्रश्न माझ्या जाहीर भाषणात विचारणारच आहे. राजकारण संन्यास घेणार नाही प्रश्न: धर्मातरानंतर शे.का. फे. चे काय होणार? उत्तर : कदाचित तो कायम राहील किंवा नवा पक्ष स्थापन होईल. मी मात्र बौद्धधर्मात प्रवेश केल्यानंतर शे.का.फे. चा सदस्य राहणार नाही. प्रश्न: बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर आपण काय करणार? उत्तर: मी 'मिशनरी' होणार आहे. पण राजकारणाचा संन्यास मात्र घेणार नाही. निवडणुकीलाही निक्षितपणे उभा राहीन. नवीन पक्ष व्यापक रहाणार प्रश्न: रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याचे आपण निश्चित केले आहे काय? उत्तर: हो ते नक्की ठरले आहे. मी त्या पक्षाची घटनाही तयार केली आहे. त्याच्या प्रिॲबलमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वावर हा पक्ष आचारलेला राहील असे मी स्पष्ट केले आहे. पार्लमेंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक विधेयकाची कसोटी या तीन निष्कर्षांवर पाहिली जाईल. प्रश्न: पण पक्षाचे तत्त्वज्ञान कोणते राहील? उत्तर : पक्षासाठी मुख्य गरज असते ती कणखर नेत्याची. प्रश्न: या पक्षाचे स्वरूप व्यापक राहील काय? उत्तर: हो या पक्षात सर्वांना प्रवेश दिला जाईल. द्विभाषिक मुंबई राज्य मोडून काढीन प्रश्न: द्विभाषिक विषयी आपले काय मत आहे? ते टिकेल का? उत्तर : ते मोडून काढणे हे तर माझे आद्य कर्तव्य आहे. ज्या सांस्कृतिक सीमा भारतात स्वाभाविकपणे निर्माण झाल्या आहेत, त्या आपण बदलू शकत नाही. नागपूर - तारीख १३ ऑक्टोंबर, १९५६ नागपूर येथे बौद्ध धर्म दीक्षा घेण्याच्या आदल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रकारांना दिलेली मुलाखत... संदर्भ प्रबुद्ध भारत, दि. २७ ऑक्टोंबर, १९५६. #🙂Positive Thought #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - 4r43 ` 4 4r43 ` 4 - ShareChat
बुद्धांचे जीवन एक तेजस्वी उदाहरण आहे. बुद्धांनी केवळ आपली शिकवणच मागे ठेवली नाही, तर आपल्या अनुयायांसाठी सर्वात स्पष्ट उदाहरण म्हणून आपले स्वतःचे जीवनही मागे ठेवले आहे. जगातील अनेक महान धार्मिक नेत्यांमध्ये, बुद्धांचे जीवन हे त्यांनी शिकवलेल्या गोष्टींचे एक उत्तम उदाहरण आहे. ते एक बोलायचे आणि दुसरेच करायचे असे नव्हते. त्यांची प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द, अगदी त्यांचे मौनदेखील अर्थपूर्ण होते आणि भावी पिढ्यांसाठी एक धडा ठरले. म्हणून, जर कोणी बुद्धांचे जीवन न समजता केवळ शिकवणींचा अभ्यास केला, तर त्या अभ्यासात मूळ साराची उणीव राहील. कारण त्यांचे जीवन हेच ​​त्या शिकवणींचे जिवंत प्रकटीकरण आहे. त्यांनी जे सांगितले ते अमूर्त सिद्धांत नव्हते, तर त्या अशा गोष्टी होत्या ज्यांचा त्यांनी अनुभव घेतला, ज्यांचा सराव केला आणि ज्या त्यांनी पाहिल्या. म्हणूनच, बौद्ध धर्म ही केवळ श्रद्धेची गोष्ट नसून, आचरणात आणता येणारा एक मार्ग आहे. बुद्धांचे जीवन हा याचा स्पष्ट पुरावा आहे की, लोकांमध्ये परिवर्तन घडू शकते, ते ज्ञानप्राप्ती करू शकतात आणि एक शांत, सजग जीवन जगू शकतात. म्हणून, बौद्ध धर्माचा अभ्यास करणे म्हणजे अफाट ज्ञान मिळवणे नव्हे, तर आत्मचिंतन करणे होय. तो अभ्यास वाक्पटुत्वाने बोलण्याबद्दल नसून, धर्मनिष्ठ जीवन जगण्याबद्दल आहे. बुद्धांच्या जीवनाकडे पाहून प्रत्येक व्यक्तीला स्वतःलाच दिसेल की, आपल्यात काय बदलण्याची गरज आहे, काय सोडून देण्याची गरज आहे आणि कशाची जोपासना करण्याची गरज आहे. बौद्ध धर्म शिकणे म्हणजे त्याची शिकवण शिकणे नव्हे, तर बुद्धाप्रमाणे कसे जगावे हे शिकणे होय. #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - ShareChat
लोग साथ तब तक देते हैं, जब तक उनसे मतलब होता है। #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर
🪷बुद्धांची तत्वे📜 - ShareChat
00:14
*आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका...* *चेंबूर, मुंबई येथील 'अस्पृश्य संघटना मंडळा' तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हीरक महोत्सवाच्या रूपाने इमारत फंडास १००१ रु. दिले. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुक्रवार दिनांक २९ मे १९५३ रोजी चेंबूर विभागाला भेट दिली. सदर प्रसंगी हँडबिले काढली नव्हती तरीही स्त्री-पुरूषांचा अफाट जनसमुदाय जमला होता.* *सदर प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी अस्पश्यांनी वापरावयाचा पोषाख आणि दागदागिने याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले,* *भगिनींनो व बंधुंनो,* *तुम्ही आतापर्यंत हे एक हजार एक रुपये धरून चा हजारावर रक्कम इमारत फंडाला दिली आहे, अशी माहिती माझे मित्र व शे.का. इंप्रुव्हमेंट ट्रस्टचे सेक्रेटरी श्री. उपशाम यांनी मला दिली आहे. तुमच्या वस्तीच्या मानाने ही रक्कम बरीच मोठी आहे. एवढी रक्कम तुम्ही दिल्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. तुम्ही जसे आपले कर्तव्य पार पाडले तसेच आपले सर्व लोक जर इमारत फंडाबद्दलचे आपले कर्तव्य पार पाडतील तर मुंबईतच हा फंड एक लाखावर जमेल व आपली इमारत टोलेजंग होईल अशी मला आशा वाटते.* *अलिकडे आपल्या समाजातील तरुणांचा व तरुणींचा पोशाख मला आवडतो. नेहमी आपणाजवळ कमीतकमी दोन पोशाख पाहिजेत. आपण जो धंदा करतो त्यावेळी घालावयाचा एक पोशाख व धंदा संपल्यानंतर, श्चिर्भूत झाल्यानंतर घालावयाचा दुसरा पोशाख, मी पाहातो की आमचे काही लोक निरनिराळ्या ऑफिसात व कंपन्यात कामाला असतात. तेथे त्यांना खाकी युनिफॉर्म मिळतो. हा पोशाख त्यांनी कामापुरताच घालावा. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्याला शोभेल असा पोशाख करावा. नोकरी-धंद्यातलाच पोशाख सभा, समारंभात किंवा लग्नकार्यासारख्या खाजगी प्रसंगी वापरणे बरे दिसत नाही....* *मुक्तीदाता विशेषांक* *संदर्भ जनता, दि. ६ जून,* *१९५३,* #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🪷बुद्धांची तत्वे📜
🙂Positive Thought - ShareChat
माझ्या बाळा, या आयुष्यात खूप थंड दिवसही येतील... थंडी वाऱ्यामुळे नाही, तर माणसाच्या हृदयातून येते. काही जखमा नेमक्या त्याच जागेतून होतात, जी जागा एकेकाळी सर्वात शांत मानली जात होती. पण लक्षात ठेवा, प्रत्येक हिवाळा शेवटी निघून जातोच. कोणतीही रात्र कायम टिकत नाही, आणि जर तुम्ही दुःखाला हृदयात जपून ठेवले नाही, तर ते आयुष्यभर टिकणार नाही. लोक तुम्हाला निराश करू शकतात, ते तुमच्याकडे पाठ फिरवू शकतात, ते उदासीन राहू शकतात... पण त्यामुळे तुमचे मन खचू देऊ नका. कारण सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्या थंड स्वभावाच्या व्यक्तीला भेटणे नव्हे, तर अंतिमतः आपला स्वतःचा अंगभूत दयाळूपणा गमावणे होय. म्हणून, माझ्या बाळा, आयुष्यातील अनेक अनिश्चिततांमध्ये, आपले हृदय उबदार ठेवायला शिक. प्रामाणिकपणे जगत राहा, प्रेम करायला शिक, कधी सोडून द्यायचे हे जाण, आणि हसायला शिक. कारण जेव्हा तुम्ही जगाच्या गोष्टींमुळे हाडापर्यंत खचून जात नाही, तेव्हा तोच एखाद्या व्यक्तीमध्ये आयुष्यात असू शकणारा सर्वात सुंदर गुण असतो. #buddha #BuddhaWisdom #vipassanameditation #buddhaquotes #🪷बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought
🪷बुद्धांची तत्वे📜 - ShareChat
बीता हुआ कल एक राख है और आने वाला कल एक धुआं। केवल 'आज' ही वह दीपक है जिसे तुम जला सकते हो। इसलिए इसे प्रेम से जियो।" #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜
🙂Positive Thought - ShareChat
00:14