Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
ShareChat
click to see wallet page
@63559539
63559539
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
*आयुष्यात दुःख असते.* *जन्म, म्हातारपण, आजार,* *मृत्यू, आवडत नसलेल्या गोष्टी सापडणे, आवडत्या गोष्टी सोडून जाणे हे सर्व दुःख आहे.* *ज्याच्या विचारांमध्ये सत्य आहे तो खरोखर बुद्धांसोबत आहे. जो दुःखाच्या उष्णतेमध्ये थंड सावली बनतो तोच बुद्धांच्या शिकवणींचा खरा साक्षात्कार आहे."* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜
🙏 प्रेरणादायक बॅनर - ShareChat
निंदा इस संसार का नियम है प्रशंसा तो लोग मजबूरी और स्वार्थ से करते है। #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
💪बुद्धांची तत्वे📜 - ShareChat
00:14
*आर्थिक–शैक्षणिक स्वातंत्र्यानंतरही संघटनांची कमजोरी : दोष नेत्यांचा की समाजाचा?* *आज आंबेडकरी समाज उपाशी नाही. तो अनपढही नाही. घरं आहेत, नोकऱ्या आहेत, डिग्र्या आहेत, परदेशातून पैसे येतात, हातात स्मार्टफोन आहेत, स्टेटस अपडेट होतात, जयंतीला हजारो लोक जमतात. तरीही एक प्रश्न छळतो—हा समाज अजूनही विस्कळीत का आहे? कारण आता समस्या अन्यायाची नाही, समस्या दिशाहीन अभिमानाची आहे* *आज प्रत्येक गावात संघटना आहेत. काहींना “मिशन” आहे, काहींना “फ्रंट” आहे, काहींना “सेना” आहे, काहींना “परिषद” आहे. प्रत्येक संघटनेला अध्यक्ष आहे, प्रत्येक अध्यक्षाला बॅनर आहे, आणि प्रत्येक बॅनरवर बाबासाहेबांचा फोटो आहे. पण प्रश्न असा आहे या फोटोंखाली बसून समाजासाठी एकही ठोस निर्णय का होत नाही? कारण संघटना आता समाज घडवण्यासाठी नाहीत, तर स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी उरल्या आहेत* *कटू सत्य ऐका:* *आजचा आंबेडकरी समाज दबलेला कमी आणि फुटलेला जास्त आहे. ही फूट शत्रूने पाडलेली नाही, ही फूट आपण स्वतः निर्माण केलेली आहे* *“माझी संघटना”, “माझा नेता”, “माझं व्यासपीठ” या अहंकारातून समाजाची सामूहिक बुद्धी खच्ची झाली आहे. बाबासाहेबांनी जे संविधान दिलं, ते वापरण्याऐवजी आपण ते फक्त भाषणात चघळतोय* *आज पैसा आहे. शिक्षण आहे. संपर्क आहे. तरीसुद्धा हा पैसा समाजात संघटित शक्ती म्हणून का उभा राहत नाही? कारण आपण वर्गणी देतो ती विद्यार्थ्यांसाठी नाही, उद्योगासाठी नाही, कायदेशीर लढ्यासाठी नाही—ती देतो स्पर्धात्मक जयंती, दिखाऊ कार्यक्रम आणि एकमेकांना पाडण्यासाठी. पैसा वाढला, पण दृष्टी वाढली नाही. डिग्र्या वाढल्या, पण दिशा नाही.* *संघटना म्हणजे दुकान नाही की ज्यावर “माझं नाव” मोठ्या अक्षरात झळकावलं की काम झालं. संघटना म्हणजे जबाबदारी. आणि आज जवळजवळ कोणतीही संघटना आपल्याला हे सांगू शकत नाही की गेल्या एका वर्षात तिने गावात नेमकं काय बदललं. *किती मुलांना शिक्षण मिळालं? किती युवकांना रोजगार मिळाला? किती लोकांना संविधानाची ताकद समजली? उत्तर जर शून्य असेल, तर ती संघटना नव्हे—तो फक्त फोटोशूट ग्रुप आहे.* *आता स्पष्टपणे सांगायला हवं: संघटना विलीन करा असं कोणी म्हणत नाही, पण संघटन मंच तयार केल्याशिवाय पुढे जाणार नाही. झेंडे बाजूला ठेवा, अहंकार खाली ठेवा आणि एक टेबलावर बसा. कारण एकत्र येणं म्हणजे शरण जाणं नाही, एकत्र येणं म्हणजे शहाणपण. बाबासाहेबांनी सांगितलं होतं—संघटित व्हा. त्यांनी असं कधीच सांगितलं नाही की “तुकड्यांत विभागा आणि अध्यक्षगिरी करा”.* *सगळ्यात मोठा घाव पदांवर आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष—या पदांनी समाज घडलेला नाही, उलट फुटलेला आहे. पदांची भूक संपवा.* *समाजाला आता नावं नकोत, काम करणारे लोक हवेत. शिक्षणासाठी जबाबदार कोण? आर्थिक उपक्रमासाठी कोण? युवक–महिलांसाठी कोण? संविधान अभ्यासासाठी कोण? ज्याच्याकडे उत्तर नाही, त्याला मंचावर उभं राहण्याचा नैतिक अधिकार नाही* *कार्यक्रम कमी करा, परिणाम मागा. दर तीन महिन्यांत दहा कार्यक्रम नकोत, एक समस्या सुटली पाहिजे. गावात विद्यार्थी गळती असेल तर ती थांबली पाहिजे. बेरोजगार युवक असतील तर किमान काहींना तरी दिशा मिळाली पाहिजे. नाहीतर भाषणं, ठराव, *घोषणांचा काहीही अर्थ नाही. समाजाला आता “जय भीम” ऐकायचं नाही, समाजाला “काम झालं” हे पाहायचं आहे.* *युवक हा सगळ्यात मोठा विश्वासघात झालेला घटक आहे. डिग्रीधारक युवकाला तुम्ही फक्त घोषणा द्यायला, मिरवणूक काढायला आणि टाळ्या वाजवायला वापरता. त्याला निर्णय प्रक्रियेत जागा नाही, प्रोजेक्ट नाही, प्रशिक्षण नाही. मग उद्या तो युवक संघटना सोडून सिस्टममध्ये विरघळला, तर दोष त्याचा नसतो—तो दोष तुमच्या रिकाम्या नेतृत्वाचा असतो* *शेवटी एकच प्रश्न उरतो:* *बाबासाहेबांनी रस्ता दिला आहे, चालायचं की नाही हे कोण ठरवणार? संविधान हे तलवार नाही, ते साधन आहे. पण साधन वापरण्याची हिंमत नसेल, तर ते लोखंडच राहतं. आज जर आर्थिक आणि शैक्षणिक ताकद असूनही संघटना एकत्र आल्या नाहीत, तर उद्या हा समाज केवळ नावाला जागृत राहील—वास्तवात तो राजकीय आणि सामाजिक गुलामच असेल* *निवड तुमची आहे. भावनिक अभिमानावर जगायचं की संघटित विवेकावर भविष्य उभं करायचं? बाबासाहेबांचा फोटो छातीवर लावून चालायचं की त्यांचा विचार मेंदूत उतरवायचा? इतिहास एकच प्रश्न विचारेल—साधनं हातात असताना तुम्ही बदल घडवला का, की फक्त घोषणा दिल्या?* #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜
🙏 प्रेरणादायक बॅनर - a [ a [ - ShareChat
*संत गाडगे महाराज यांनी लोकशिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणले. लोकांना स्वच्छता,श्रमदान यांचे महत्त्व पटवून देत त्यांनी आपले आयुष्य लोककल्याणासाठी समर्पित केले. अंधश्रद्धा,भेदभाव नष्ट करण्यासाठी जनजागृती करणारे महान समाजसेवक संत गाडगे महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन..!* 💐💐💐💐💐 *स्वच्छ भारत के जनक कोई गांधी मोदी नही केवल बहुजन उद्धारक संत गाडगे बाबा हे राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छ* *कीर्तनाच्या माध्यमातून समाजात* *जनजागृती करणारे* *संत गाडगेबाबा* *डेबूजी झिंगराजी जानोरकर* *यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!* #💪बुद्धांची तत्वे📜 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
💪बुद्धांची तत्वे📜 - ShareChat
00:20
*खरी मुक्ती ही शाश्वत अस्तित्वाच्या भ्रमात नाही, तर नश्वरता आणि जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे असलेले ज्ञान ओळखण्यात आहे."* #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜
🙏 प्रेरणादायक बॅनर - True liberation lies not in the illusion of eternity; recognition of impermanence and but in the the wisdom beyond birth and death True liberation lies not in the illusion of eternity; recognition of impermanence and but in the the wisdom beyond birth and death - ShareChat
*संत गाडगेबाबा यांच्या कार्याला नमन!* *या देशातील वर्षोनुवर्षे चालत आलेल्या अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरोधात आवाज बुलंद करणारे, रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करणारे, मानवता हीच ईश्वर सेवा मानणारे, कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला क्रांतिकारी दिशा देणारे, देव दगडात नसून, माणसात असल्याचे सांगून परिवर्तन घडवून आणणारे गाडगे बाबा यांची आज जयंती.* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांचा ऋणानुबंध होता. हे दोन्ही महामानव आपल्या कामातून समाज परिवर्तन करत होते.* *गाडगे महाराज यांच्या कार्याला, विचाराला जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन.!* *#गाडगेमहाराज* #💪बुद्धांची तत्वे📜 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought
💪बुद्धांची तत्वे📜 - २३ फेब्रुवारी अंधश्रद्धा व अस्वच्छतेने पछाडलेल्या समाजाचे प्रबोधन करणारे स्ंत गाडगे সমাভাতা जयंतीदिनी D5 विनम्र अभिवादन...! GROUIp २३ फेब्रुवारी अंधश्रद्धा व अस्वच्छतेने पछाडलेल्या समाजाचे प्रबोधन करणारे स्ंत गाडगे সমাভাতা जयंतीदिनी D5 विनम्र अभिवादन...! GROUIp - ShareChat
*संत गाडगेबाबा यांच्या कार्याला नमन!* *या देशातील वर्षोनुवर्षे चालत आलेल्या अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरोधात आवाज बुलंद करणारे, रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करणारे, मानवता हीच ईश्वर सेवा मानणारे, कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला क्रांतिकारी दिशा देणारे, देव दगडात नसून, माणसात असल्याचे सांगून परिवर्तन घडवून आणणारे गाडगे बाबा यांची आज जयंती.* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांचा ऋणानुबंध होता. हे दोन्ही महामानव आपल्या कामातून समाज परिवर्तन करत होते.* *गाडगे महाराज यांच्या कार्याला, विचाराला जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन.!* *#गाडगेमहाराज* #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜
🙏 प्रेरणादायक बॅनर - D3= GROUP आपल्या किर्तनातून समाजाला शिक्षणाचा व स्वच्छतेचा संदेश देणारे a गाडंगे महाराज যামমা जयंती निमित्त নিলপ্স अभिवादन.! D3= GROUP आपल्या किर्तनातून समाजाला शिक्षणाचा व स्वच्छतेचा संदेश देणारे a गाडंगे महाराज যামমা जयंती निमित्त নিলপ্স अभिवादन.! - ShareChat
*संत गाडगेबाबा यांच्या कार्याला नमन!* *या देशातील वर्षोनुवर्षे चालत आलेल्या अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरोधात आवाज बुलंद करणारे, रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करणारे, मानवता हीच ईश्वर सेवा मानणारे, कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला क्रांतिकारी दिशा देणारे, देव दगडात नसून, माणसात असल्याचे सांगून परिवर्तन घडवून आणणारे गाडगे बाबा यांची आज जयंती.* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांचा ऋणानुबंध होता. हे दोन्ही महामानव आपल्या कामातून समाज परिवर्तन करत होते.* *गाडगे महाराज यांच्या कार्याला, विचाराला जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन.!* *#गाडगेमहाराज* #💪बुद्धांची तत्वे📜 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
💪बुद्धांची तत्वे📜 - D3= [0010 झाडूने परिसर आणि किर्तनाने मन साफ करणारे ಹತ್ತಾ मॅहालॉज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. D3= [0010 झाडूने परिसर आणि किर्तनाने मन साफ करणारे ಹತ್ತಾ मॅहालॉज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. - ShareChat
#🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜
🙂Positive Thought - ShareChat
00:47
प्रवेश - परवान्याच्या प्रतीक्षेत डॉ. आंबेडकरांचे पूर्वायुष्य अत्यंत दुःखमय होते. आपल्या देशाच्या लाखो माणसांना दासगुलामांचा दर्जा देणाऱ्या हिंदू समाजरचनेच्या सर्वात कडक आरोपपत्राचाच जणू तो आविष्कार होता. अस्पृश्य मानल्या गेलेल्या अस्पृश्य कुटुंबात जन्म लाभलेला आणि लहानपणापासून जातिग्रस्त समाजाच्या छळाला बळी ठरलेला तरुण भीम हा एव्हाना विषमता, अन्याय, भेदभाव आणि शोषण या संकल्पनांवर अधिष्ठित, चातुर्वर्ण्यवर उभारलेल्या हिंदू धर्मांतर्गत जातिव्यवस्थेच्या विरोधात पेटून उठलेला बंडखोर झाला होता. सामाजिक पूर्वग्रह त्याला नाउमेद करू शकले नाहीत याचे कारण धारिष्ट्य, चिकाटी व दीर्घोद्योग हे त्याचे सद्गुण होते. आगामी पृष्ठांतून डॉ. आंबेडकर त्यांचे स्वतःचे अनुभव सांगत आहेत. आयुष्यात त्यांच्या स्वतःच्या वाट्याला आलेले, तसेच त्यांनी इतरांच्या अनुभवांमधून उचललेले असे हे भीषण प्रसंग आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर परकीयांना अस्पृश्यतेचे अस्तित्व अर्थातच माहीत असते. पण ती त्यांच्या आसपास नसल्यामुळे प्रत्यक्षात तिचे स्वरूप किती जीवघेणे असते याची ते कल्पना करू शकत नाहीत. हिंदू बहुसंख्येच्या खेड्यात गावकुसाबाहेर राहणाऱ्या मूठभर अस्पृश्यांनी रोज खेड्यात जाऊन त्याची गलिच्छ घाण दूर करायची, सगळ्या अलबत्यागलबत्यांचे निरोप पोचवायचे, हिंदूंच्या दारोदार जाऊन अन्न गोळा करायचे, हिंदू वाण्याच्या दूरवरच्या दुकानातून मसाले व तेल विकत आणायचे, त्या खेड्याला सर्वार्थांनी स्वतःचे घर मानायचे आणि तरीही खेड्यातल्या कोणालाही स्पर्श करायचा नाही की कोणाकडून स्पर्श करवून घ्यायचा नाही हे कसे शक्य होते हे त्यांच्या ध्यानात येणेच अवघड असते. सवर्ण हिंदूंकडून अस्पृश्यांना दिल्या जाणाऱ्या वर्तणुकीची प्रभावी कल्पना त्यांना कशी द्यावी हा प्रश्नच आहे. हे दोन प्रकारांनी करता येईल. एकतर सर्वसाधारण वर्णन करायचे किंवा मग त्यांच्याशी होणाऱ्या वागणुकीच्या प्रत्यक्ष प्रकरणांचे इतिवृत्त सांगायचे. मला वाटते की पहिल्यापेक्षा दुसरा मार्ग अधिक प्रभावी होईल. ही उदाहरणे निवडताना मी अंशतः माझ्या स्वतःच्या अनुभवांचा तर अंशतः इतरांच्या अनुभवांचा आधार घेतला आहे. माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या काही प्रसंगांपासून मी प्रारंभ करतो. अस्पृश्य आणि हिंदू आमचे कुटुंब मूळचे मुंबई इलाख्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तहसिलात राहणारे होते. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट सुरु झाल्यापासूनच माझ्या पूर्वजांनी आपले वंशपरंपरागत व्यवसाय सोडून कंपनीच्या लष्करात नोकऱ्या धरल्या होत्या. कुटुंबाची हीच परंपरा माझ्या पित्यानेही पुढे चालवली आणि सैन्यात नोकरी शोधली. अधिकायाच्या पदापर्यंत ते वर पोचले आणि सेवानिवृत्त झाले. तेव्हा ते सुभेदार या हुद्यावर होते. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनीच आपल्या कुटुंबाला स्थायिक होण्याच्या इराद्याने दापोलीस आणले. पण काही कारणांनी त्यांनी तो इरादा बदलला. दापोली सोडून हे कुटुंब साताऱ्यास आले. तेथेव आम्ही १९०४ पर्यंत राहिलो. पहिला प्रसंग जो मला आठवतो आणि मी येथे नमूद करणार आहे तो आम्ही सातारा मुक्कामी असतानाचाच आहे. माझी आई तोपर्यंत मरण पावली होती. माझे वडील सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील गोरेगाव नामक दूरच्या गावी कोशपाल म्हणून नोकरी करत होते. हजारोंच्या संख्येने मृत्युमुखी पडत असलेल्या दुष्काळग्रस्त लोकांना रोजगार पुरविण्याच्या हेतूने त्या ठिकाणी मुंबई सरकारने तलाव खोदण्याचे काम सुरू केले होते. गोरेगावला जाताना मी, माझ्यापेक्षा मोठा असलेला माझा भाऊ आणि माझ्या थोरल्या मृत बहिणीची दोन मुले आम्हा सर्वांना वडिलांनी माझ्या आत्याच्या आणि काही दयाळू शेजाऱ्यांच्या हवाली केले होते. माझ्या आत्याइतकी प्रेमळ व्यक्ती मी कधीच पाहिली नव्हती, पण ती आमच्या काहीच कामाची नव्हती. ती काहीशी ठेंगणी होती आणि तिला पायांचा काहीतरी त्रास असल्यामुळे कोणाची तरी मदत घेतल्यावाचून तिला हिंडणे फिरणेही कठीण होते. बऱ्याच वेळा तर तिला उचलून इकडचे तिकडे करावे लागायचे. मला दोन बहिणी होत्या. त्या विवाहित होत्या आणि दूर आपापल्या घरी नांदत होत्या. आत्याला तिच्या असहाय अवस्थेमुळे जमत नसल्यामुळे स्वयंपाकपाणी हा आमच्यापुढे मोठाच प्रश्न होता. आम्ही चारही मुले शाळेत जात असू आणि स्वयंपाकही करत असू. भाकरी काही आम्हाला करता येत नसत म्हणून मग आम्ही पुलावावरच दिवस काढत असू. तो बेत सोपा असायचा. तांदूळ आणि मटणाचे तुकडे कालवून शिजवले की झाले. खजिनदार असल्यामुळे बाबा काही गाव सोडून साताऱ्याला आम्हाला भेटायला येऊ शकत नव्हते म्हणून मग त्यांनी आम्हालाच पत्र लिहून गोरेगावला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत त्यांच्यासोबत राहायला बोलावले होते. आम्ही सर्व मुले जायला मिळणार म्हणून अंतर्बाह्य उतावीळ झालो होतो, कारण तोपर्यंत आम्ही कोणीही रेलगाडीच पाहिलेली नव्हती.... पुढील भागात मुक्तीदाता विशेषांकb #📢एडिटिंग ट्यूटोरियल📷 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought
📢एडिटिंग ट्यूटोरियल📷 - ShareChat