Dr Amol Melage
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩 १४ ऑगस्ट १६४९ छत्रपती शिवरायांना औरंगजेबाचा पुत्र "मुरादबक्ष" याचे पत्र. १४ ऑगस्ट १६४९ पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला. १४ ऑगस्ट १६५७ मराठ्यांनी कोकणातील "दंडाराजपुरी" जिंकली पण "किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, आणि हा प्रयत्न अयशस्वी झाला. या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही. १४ ऑगस्ट १६६० जून १६६० रोजी शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्रामदुर्गावर, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी मात्र अवघ्या ३५०च्या फौजेनिशी किल्ला ५५ दिवस लढवला. अखेर १४ ऑगस्ट १६६० रोजी भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले, हे पाहून शाहिस्ते खानाला स्फुरण चढले त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती