ShareChat
click to see wallet page
search
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 #१_नोव्हेंबर_१६५९ खानाची भेट निश्चित होत होती. गोपीनाथपंत अफजलखानाच्या डेऱ्यात फेऱ्या मारत होते. त्यांच्या बरोबरचे हेर छावणीची बातमी काढत होते. राजे भेट जावळी येथेच व्हावी आणि ती पण किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी यासाठी आग्रही होते त्यामुळे तसे ठरले. 🚩🏇🚩🏇🚩 #१_नोव्हेंबर_१६७६ संभाजी राजे हे धर्मपत्नी येसूबाईसाहेब यांच्यासह शृंगारपूरात येऊन राहिले 🚩🏇🚩🏇🚩 #१_नोव्हेंबर_१६७९ २२ ऑक्टोबरला राजापूरहून आलेल्या ३७ मराठी गलबतांनी मराठ्यांना चांगलीच रसद पुरवली आणि इंग्रजांच्या आरमाराचा दम काढला. आता खांदेरीवर रसद पोहोचल्याने खांदेरी सुरक्षित होती. इंग्रज या रोजच्याच उपद्व्यापामुळे जेरीस आले. केग्वीन या त्रासाने वैतागला आणि त्याने १ नोव्हेंबर १६७९ रोजी मुंबईला जे इतिहासप्रसिद्ध पत्र लिहिले त्याचा हा सारांश - “नागाव नदीच्या मुखाशी नौका ठेवण्याच्या बेताविषयी गेल्या पत्रात आपल्याला कळवले होते त्याप्रमाणे दिवसा ते शक्य नाही आणि रात्री चंद्र मावळेपर्यंत गस्त देऊनही उपयोग नाही कारण शत्रूची गलबते उशिराने येतात व वल्ही मारण्यात त्यांची शिताफी अधिक असल्यामुळे त्या आमच्या हाती लागत नाहीत. आम्ही त्रस्त आहोत. त्यांना अडविण्याच्या बाबतीत आम्ही कसलीही कसूर होऊ देत नाही याची आपण शाश्वती बाळगावी परंतु त्या लहान सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात.आता आम्हाला असे वाटू लागले आहे की आमच्या कडेही तसल्या होड्या असतील तर आम्हाला कदाचित मदत होवू ही शकेल." 🚩🏇🚩🏇🚩 #१_नोव्हेंबर_१६८३ विरजईने फोंड्याला मोर्चे बांधले. मराठे किल्ला लढवण्यासाठी छातीचा कोट करून उभे ठाकले होते. वेढा फोडण्यासाठी खास संभाजीराजे स्वतः ८०० स्वार आणि मोठे पायदळ घेऊन निघाले. हे नुसते कळण्याचा अवकाश कि व्हाइसरॉयची भीतीने गाळण उडाली. 🚩🏇🚩🏇🚩 #१_नोव्हेंबर_१६९२ पन्हाळगडाला बादशहाचा नातू मुहम्मद मुईउद्दीन बेदारबख्त याचा वेढा पडला. हा पन्हाळा थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ८ वर्षे मोघली फौजेशी झुंजला आणि शेवटी २४ मे १७०१ रोजी दाणागोटा-दारुगोळा संपल्यामुळे नाईलाजाने मोघलांना शरण गेला. या किल्ल्याचे राखणकरते होते त्र्यंबकजी इंगळे. 🚩🏇🚩🏇🚩 #१_नोव्हेंबर_१७१८ फसलेल्या 'विजयदुर्ग' मोहिमेनंतर इंग्रजांनी ४ महीने तयारी करून प्रचंड ताकदीने 'खांदेरी'वर आक्रमण केले. पण ही मोहिमसुद्धा पूर्णपणे फसली आणि इंग्रजांची प्रचंड मनुष्य व शस्त्रहानी झाली. 🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩
इतिहास छत्रपतींचा - @historyof chhatrapati आज्जचै ऐतिहासिक दिनविशैष नोव्हेंबर १६७९ १ राजापूरहून आलेल्या ३७ भराढी गलबतांनी मराठ्यांना चांगलीच रसद पुखली आणि इंग्रजांच्या आरमाराचा दम काढला. @historyof chhatrapati आज्जचै ऐतिहासिक दिनविशैष नोव्हेंबर १६७९ १ राजापूरहून आलेल्या ३७ भराढी गलबतांनी मराठ्यांना चांगलीच रसद पुखली आणि इंग्रजांच्या आरमाराचा दम काढला. - ShareChat