ShareChat
click to see wallet page
search
*एका भक्ताला एकदा स्वामी भेटतात. स्वामींना पाहून भक्त त्यांना नमस्कार करून धन्यता मानतो. त्यावर स्वामी म्हणतात, "माग तुला काय हवे ते!' भक्त म्हणतो, "परमेश्वरा, तुझे दर्शन घडले बस्स. बाकी काही नको!' त्यावर स्वामी त्याला सोबत येण्यास सांगतात, दोघेही मिळून एका समुद्रकिनारी पोचतात. तेथे वाळूवर चित्रपटातील पडद्याप्रमाणे एक पडदा भक्ताला दिसतो. स्वामी त्याला म्हणतात, "बघ, तुझे आतापर्यंत आयुष्य मी तुला या पडद्यावर दाखवतो.' त्यानंतर भक्ताच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट घटना एकामागून एक दिसू लागतात. चांगली घटना दिसल्यावर समोरच्या वाळूवर चार पावले दिसू लागतात. भक्त म्हणतो, "स्वामी माझ्या चांगल्या काळात तुम्ही माझ्या सोबत होता.' त्यानंतर वाईट घटना दिसू लागते. त्यावेळी मात्र वाळूत केवळ दोनच पावले दिसतात. भक्त स्वामींना म्हणतो, "देवा माझ्या चांगल्या काळात तुम्ही माझ्या सोबत होतात, मात्र वाईट काळात तुम्ही मला सोडुन निघून गेलात.' त्यावर स्वामी शांतपणाने म्हणतात, "अरे, ती दोन पावले तुझी नाहीत. ती माझी पावले आहेत. तुझ्या अडचणीच्या-वाईट काळात मी तुला कडेवर उचलून घेतले होते.* *🙏🙏श्री स्वामी समर्थ*🙏🙏 #श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 - 3m /0 04 98 4 07 3m /0 04 98 4 07 - ShareChat