ShareChat
click to see wallet page
search
काव्यत्रिवेणी परीक्षण #आजची ताजी बातमी #✍🏽 माझ्या लेखणीतून #ताजी बातमीं #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
आजची ताजी बातमी - बिनधास्त राजकारणाचा स्वच्छ आरसा न्यूज 2 संपादक : राहुल पाटील Tue , 12/05/2026 यथावकाश या शब्दातच संयमाचा अंतर्भाव ; वृंदा करमरकर BREAKING NEWS सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण * यथावकाश म्हणजे योग्य वेळ आल्यावर , क्रमाने किंवा नैसर्गिक गतीने घडणारी प्रक्रिया . प्रत्येक गोष्ट तात्काळ घडत नाही ; काही गोष्टींना वेळ , संयम आणि सातत्य आवश्यक असते . जीवनातील अनेक घटना यथावकाश घडत असतात . रात्री नंतरच दिवस उगवतो . ओहोटी नंतर ठराविक कालावधीने सागराला भरती येते . शिशिराची पानगळ झाल्यावर , धरणीचा दाह झाल्यानंतरच वसंताचा बहार येतो . एका ऋतूनंतर दुसरा ऋतू ठराविक काळाने येतो . निसर्ग मानवाला संयम , सोशिकपणा शिकवतो . ★ मानवी जीवनातही यथावकाश या तत्त्वाचे महत्त्व फार मोठे आहे . शिक्षण घेतल्यानंतर अनुभव मिळतो , अनुभवातून प्रगल्भता येते आणि त्या नंतर यश प्राप्त होते . एका दिवसात कोणीही महान होत नाही . सततचा प्रयत्न , धैर्य आणि वेळ यांच्या साहाय्याने माणूस प्रगती करतो . विवाह ठरण्याचे उदाहरणही यथावकाश या संकल्पनेला समर्पक आहे . योग्य वेळ येईपर्यंत अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात . स्वभाव , विचार , कुटुंब , पत्रिका परिस्थिती आणि परस्पर समजूत . घाईघाईने घेतलेले निर्णय अनेकदा अडचणी निर्माण करतात , यथावकाश घडणारे नाते अधिक दृढ आणि टिकाऊ ठरते . * समाजातील बदलसुद्धा एका क्षणात होत नाहीत . जुन्या विचारांना बदलण्यासाठी काळ जावा लागतो . सुधारणा , प्रगती आणि परिवर्तन यांना संयमाची जोड आवश्यक असते . म्हणूनच यथावकाश हा शब्द केवळ वेळेचा नाही , तर संयम , विश्वास आणि सातत्य यांचा संदेश देतो . आजच्या वेगवान युगात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते . कारण हा इन्स्टंट चा जमाना आहे . पण घाईमुळे अनेकदा चुकाही होतात . यथावकाश घडणाऱ्या गोष्टी अधिक स्थिर , सुंदर आणि परिणामकारक असतात . त्यामुळे जीवनात संयम ठेवून योग्य वेळेची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे . काही वेळा चांगले शिक्षण घेतले असले , तरी नोकरी लगेच लागत नाही . त्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागते . जर संयम नसेल तर कधीकधी नैराश्य आल्याची उदाहरणे असतात . पण धैर्य , आत्मविश्वास असेल तर योग्य वेळेस संधी चालत येते . शेवटी असे म्हणता येईल की , यथावकाश घडणाऱ्या प्रक्रियेतच जीवनाचे खरे सौंदर्य दडलेले आहे . योग्य वेळ आल्यावरच फुल उमलते , फळ पिकते आणि माणसाचे स्वप्नही पूर्णत्वाला जाते . बी पेरल्यावर लगेच झाड तयार होत नाही . प्रथम बी मातीमध्ये शांतपणे रुजते . त्यानंतर छोटासा अंकुर बाहेर येतो , हळूहळू त्याचे रोप बनते . योग्य प्रमाणात पाणी , सूर्यप्रकाश व | खत मिळाल्यावर ते रोप वाढू लागते . कालांतराने त्याला फुले येतात आणि पुढे फळधारणाही होते . ही संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात घडत नाही ; ती सर्व यथावकाश म्हण जे योग्य वेळेनुसारच घडते . * निसर्ग आपल्याला संयमाचा मोठा धडा शिकवतो . शेतकरी बी पेरल्यानंतर दररोज मेहनत करतो . पण त्याला माहिती असते की , पीक योग्य ऋतू आणि वेळ आल्यावरच तयार होणार , जर त्याने घाई केली , तर अपेक्षित फळ मिळणार नाही . म्हणूनच प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो . मानवी जीवनही याच नियमाने चालते . शिक्षण , अनुभव , नाती , यश किंवा स्वप्न सर्व गोष्टी हळूहळू विकसित होतात . जसे बीजापासून वृक्ष तयार होतो , तसेच माणूसही प्रयत्न , संयम आणि काळ यांच्या साहाय्याने घडत जातो . त्यामुळे यथावकाश हा शब्द केवळ वेळ दर्शवत नाही , तर जीवनातील नैसर्गिक वाढ , परिपक्वता आणि योग्य क्षणाची जाणीव करून देतो . आजच्या ' सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी ' यथावकाश ' हा वैचारिक विषय दिला आहे . शिलेदारांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिला . मला या काव्य स्पर्धेचे परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल मी राहुल सरांची मनापासून आभारी आहे . News Banner Maker RHR Developers - ShareChat