मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
ShareChat
click to see wallet page
@rahul7385363088
rahul7385363088
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
@rahul7385363088
"मराठीचा अभिमान" 'मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास'👌
राज्यात 20-22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता नागपूर: राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण् तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/FYtJ1x #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताजी बातमीं #✍🏽 माझ्या लेखणीतून
आजची ताजी बातमी - ShareChat
राज्यात 20-22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता नागपूर: राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
उद्या राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जिल्हा प्रतिनिधी नागपूर नागपूर: (दि १९) राज्यातील सरकारी, निमसरकारी तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/LYNT1u #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताजी बातमीं
आजची ताजी बातमी - ShareChat
उद्या राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जिल्हा प्रतिनिधी नागपूर नागपूर: (दि १९) राज्यातील सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या १५ महिन्यांपासून मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवार (ता. 21) पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संपात रायगड जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आणि शिक्षक पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती समन्वय समितीने दिली आहे. कर्मचारी संघटनांनी एकूण १८ मागण्यांचे निवेदन दिले आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे स्पष्ट नियम जाहीर करणे आणि १ मार्च २०२४ पासून निवृत्त झालेल्यांना तात्पुरते निवृत्ती वेतन देणे. निवृत्तीचे वय इतर राज्यांप्रमाणे ६० वर्षे करणे. पदोन्नती व लाभ मिळावा. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा (१०:२०:३०) लाभ त्वरित देणे. रिक्त असलेली ३५% पदे भरणे, तसेच चतुर्थश्रेणी व वाहन चालक भरतीवरील बंदी उठवणे. सर्व कर्मचाऱ्यांसाठी व्यापक 'कॅशलेस' आरोग्य विमा योजना लागू करणे. दीर्घकाळ काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेणे आदी मागण्या आहेत. गेल्या वर्षभरात सात वेळा आंदोलने करूनही शासनाने केवळ आश्वासने दिली, ठोस कृती केली नाही. त्यामुळे आता संपाशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी भावना रायगड जिल्हा कर्मचारी शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक प्रभाकर नाईक, अध्यक्ष सुरेश पालकर आणि जिल्हा अध्यक्ष संदीप नागे यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील १७ लाख कर्मचारी एकाच वेळी संपावर गेल्याने प्रशासनासमोर मोठे पेचप्रसंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आता चेंडू शासनाच्या कोर्टात असून, शासन काही ठोस तोडगा काढणार की राज्याची प्रशासकीय यंत्रणा ठप्प होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भंडारा: अंगणवाडी मदतनीस व प्रगतशील शेतकरी सुनंदा अमृतजी मदनकर (४९) राहणार खोलमारा(जुना) तालुका लाखांदूर यांचे अल्पशा आजार तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/BK6pNo #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताजी बातमीं
विचोडा (रै) येथे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून साकारलेल्या भव्य, देखण्या आणि थरारक इनामी शंकरपट स्पर्धेचा उद्घाटन स तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/K5wwI7 #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताजी बातमीं
SIR प्रक्रियेत न्यू तोतलाडोह, ग्रामपंचायत वडंबा येथील ३५० नागरिकांची नावे गायब नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट नागपूर शह तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/0BTB95 #ताजी बातमीं #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
ताजी बातमीं - ShareChat
SIR प्रक्रियेत न्यू तोतलाडोह, ग्रामपंचायत वडंबा येथील ३५० नागरिकांची नावे गायब नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट नागपूर शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज मिडीया नागपूर :- विशेष पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेदरम्यान ग्रामपंचायत वडंबा अंतर्गत न्यू तोतलाडोह परिसरातील तब्बल ३५० नागरिकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, SIR प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीचे अद्ययावतीकरण करण्यात येत असताना अनेक पात्र नागरिकांची नावे कोणतीही पूर्वसूचना न देता वगळण्यात आली. विशेषतः न्यू तोतलाडोह भागातील कुटुंबांना याचा मोठा फटका बसला असून, काही कुटुंबांतील सर्व सदस्यांची नावेच यादीतून गायब झाल्याचे आढळून आले आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, त्यांनी वेळोवेळी आवश्यक कागदपत्रे सादर करूनही त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क गमावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “आम्ही वर्षानुवर्षे येथे राहत असूनही आमची नावे यादीतून कशी काय वगळली?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल घेत स्थानिक प्रतिनिधींनी निवडणूक विभागाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून पात्र नागरिकांची नावे त्वरित पुन्हा समाविष्ट करावीत, अशी मागणीही करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने मात्र, “SIR प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांची अपूर्णता यामुळे नावे वगळली जाऊ शकतात. संबंधित नागरिकांनी आवश्यक पुरावे सादर करून पुनर्नोंदणी करावी,” असे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लवकरात लवकर तोडगा न काढल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
प्रतिनिधी हिंगणा/ अमरावती मधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालयाच्या परिसरात एका वकिलाला महिला कडून मारहाण करण्या तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/uBmAyS #✍🏽 माझ्या लेखणीतून #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
✍🏽 माझ्या लेखणीतून - ShareChat
प्रतिनिधी हिंगणा/ अमरावती मधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालयाच्या परिसरात एका वकिलाला महिला कडून मारहाण करण्यात आली आहे.कौटोबिंक वादातून हि मारहाण झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या परिसरात वकील शिंदे यांच्या कार्यालयात एक महिला असिस्टंट चे काम करीत होती. त्या महिलेच्या पतीने गैरसमजातून वाद निर्माण केला होता आणि इतर महिलांच्या मदतीने शिंदे यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आल्याची परिसरात चर्चा आहे. या प्रकरणात कोणतीही पोलिस तक्रार दाखल केली नाही. मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपूरच्या कलाकारांसाठी सुवर्णसंधी ! पाटील ग्रुप आणणार दोन मोठे चित्रपट प्रोजेक्ट मुंबई-नागपुरात लवकरच सुरू होणार चित्रीक तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/LgI4tZ #✍🏽 माझ्या लेखणीतून #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
✍🏽 माझ्या लेखणीतून - ShareChat
नागपूरच्या कलाकारांसाठी सुवर्णसंधी ! पाटील ग्रुप आणणार दोन मोठे चित्रपट प्रोजेक्ट मुंबई-नागपुरात लवकरच सुरू होणार चित्रीकरण गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी बिनधास्त न्यूज मिडीया नागपूर/ हिंगणा : (दि १९ एप्रिल) शहरातील कला, संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पाटील ग्रुपकडून लवकरच दोन मोठे चित्रपट प्रोजेक्ट सुरू केले जाणार आहेत, ज्यामध्ये हिंदी चित्रपट "कुंती राघव" तसेच मराठी चित्रपट "कस्तुरी" यांचा समावेश आहे. या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण लवकरच मुंबई आणि नागपूर येथे सुरू होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती निर्माता व कलाकार गणेश पाटील यांनी त्यांच्या नव्या कार्यालयात 201 कृष्ण कुंज रेसिडेन्सी, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन जवळ आयोजित विशेष बैठकीत दिली. गणेश पाटील यांनी सांगितले की, या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून नागपूरसह विदर्भातील प्रतिभावान कलाकार, तंत्रज्ञ आणि नवोदित युवकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागपुरात वाढत असलेल्या चित्रपट क्षेत्राच्या संधी लक्षात घेता हा प्रोजेक्ट शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई सारख्या मोठ्या चित्रपट नगरीसोबत नागपुरात शूटिंग होणार असल्याने स्थानिक कलाकारांना थेट मोठ्या प्रोडक्शन हाऊस बरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. या विशेष प्रसंगी मराठी चित्रपट "प्रेमासाठी वाटेल ते" मधील कलाकार प्रकाश मेंडुले तसेच सामाजिक कार्यकर्ते गजानन ढाकुलकर उपस्थित होते. सर्वांनी गणेश पाटील यांना नव्या प्रोजेक्ट्ससाठी शुभेच्छा देत चित्रपटांच्या यशासाठी शुभकामना व्यक्त केल्या. उल्लेखनीय म्हणजे, गणेश पाटील यांचा याआधी "तू तिथे असावे" हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये त्यांनी नागपूर शहरातील अनेक स्थानिक कलाकारांना संधी देऊन अभिनय क्षेत्रात नवी ओळख निर्माण करून दिली होती. त्यामुळे आज नागपूरमधील अनेक युवा कलाकार त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत. चित्रपट निर्मिती सोबतच गणेश पाटील हे संगीत क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यांचे अनेक गाण्यांचे अल्बम प्रदर्शित झाले असून त्यामध्ये त्यांनी स्वतःचा आवाज दिला आहे. कला क्षेत्रातील त्यांची जिद्द आणि नवोदितांना पुढे आणण्याची भूमिका यामुळे ते सातत्याने चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले, जिथे शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गजानन ढाकुलकर यांनीही त्यांचे अभिनंदन करत नागपूरच्या कलाकारांना पुढे नेण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आता सर्वांचे लक्ष या आगामी "कुंती राघव" आणि "कस्तुरी" या दोन्ही चित्रपटांकडे लागले असून, यामुळे नागपूरच्या चित्रपट क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वानाडोंगरी शासकीय वस्तीगृहात गंभीर प्रकार गृहपालावर विद्यार्थ्यांवरील अत्याचाराचे आरोप हिंगणा शहर प्रतिनिधी बिनधास्त न्य तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/SLaUV1 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
✍🏽 माझ्या लेखणीतून - ShareChat
वानाडोंगरी शासकीय वस्तीगृहात गंभीर प्रकार गृहपालावर विद्यार्थ्यांवरील अत्याचाराचे आरोप हिंगणा शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर : (दि १९) हिंगणा वानाडोंगरी शहरातील वानाडोंगरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याची माहिती समोर येत आहे. वस्तीगृहाच्या गृहपालाकडून मुलांवर मानसिक व अत्याचार केल्याचे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केले असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी गृहपालाच्या वागणुकीबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, किरकोळ कारणांवरून अपमानास्पद भाषा वापरणे, धमकावणे तसेच अनुचित वर्तन करणे असे प्रकार सतत घडत होते. काही विद्यार्थ्यांनी तर या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे. यापूर्वीही नागपूरातील शासकीय वसतिगृहांमध्ये सुरक्षेच्या त्रुटी आणि गैरवर्तनाच्या घटना समोर आल्या असून अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही प्रकरणांत वॉर्डन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली होती. दरम्यान, या नव्या प्रकरणाची माहिती समोर येताच संबंधित विभागाने चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वस्तीगृहांमध्ये कडक देखरेख, सीसीटीव्ही व्यवस्था आणि जबाबदार प्रशासन आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गृहपाल विजया रायसने यांची प्रतिक्रिया : आमच्या प्रतिनिधींनी गृहपाल रायसने यांना फोन द्वारे संपर्क केले असता त्यांनी सांगितले की मी नियमानुसार विद्यार्थीना शिस्तीमध्ये राहत नाही मी फक्त शिस्त लावले, त्यांना समजावले समज दिले नियम लावले, हॉस्टेलच्या काही सीनियर्स विद्यार्थ्यांनी एका लहान मुलाचं रॅगिंग पण घेतली, असे पण सांगितले. विद्यार्थ्यांचा रात्री बे रात्री अकरा बारा वाजता येणे जाण्याचा काही टाइमिंग नाही, जेवणाचा काही टाइमिंग नाही मी फक्त नियमाप्रमाणे त्यांच्यावर नियम व शिस्त लावले, आणि समज दिली. मी त्यांना कोणत्याही गलिच्छ भाषेत वापर केला नाही व अनैतिक वागणूक केली नाही असे ते म्हणाले.
♾️♾️♾️♾️🦋🦋🦋♾️♾️♾️♾️ *✍️ मराठी वाक्प्रचार आणि अर्थ✍️* *संकल्पना/निर्मिती* *राहुल पाटील* ७३८५३६३०८८ *©मराठीचे शिलेदार समूह* ♾️♾️♾️♾️🦋🦋🦋♾️♾️♾️♾️ #ताजी बातमीं #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏽 माझ्या लेखणीतून
ताजी बातमीं - मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम ನ1r @` मराठी वाक्प्रचार आणि अर्थ भापा  रकषमी करण ११४अगावरमूठभर मांस चढणे  धन्यता वाटणे. नुकसान सोसावे लागणे. १२ अंगावर शेकणे मगरुरी करणे. १३.अंगी ताठा भरणे   मनात खोलवर रुजणे. १४.अंगी बाणणे ऐपतीनुसार खर्च कर १५.अंथरूण पाहून पाय पसरणे मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय व प्रकाशन संस्था, नागपूर मख्य आयोजकः राहल पाटील ७३८५३६३०८८ मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम ನ1r @` मराठी वाक्प्रचार आणि अर्थ भापा  रकषमी करण ११४अगावरमूठभर मांस चढणे  धन्यता वाटणे. नुकसान सोसावे लागणे. १२ अंगावर शेकणे मगरुरी करणे. १३.अंगी ताठा भरणे   मनात खोलवर रुजणे. १४.अंगी बाणणे ऐपतीनुसार खर्च कर १५.अंथरूण पाहून पाय पसरणे मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय व प्रकाशन संस्था, नागपूर मख्य आयोजकः राहल पाटील ७३८५३६३०८८ - ShareChat
➿➿➿➿🙏🔹🙏➿➿➿➿ *📗चला सहभागी होऊ या...!! ५ विश्वविक्रमी प्रातिनिधिक कविता संग्रहाचे शीर्षक📗* ➿➿➿➿🙏🔹🙏➿➿➿➿ *📗मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे विश्वविक्रमी पाच कविता संग्रह निर्मितीसाठी आपण सर्वांनी 'शीर्षक' सुचवून आम्हास उपकृत केल्याबद्दल आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार.* *🔰पाच प्रातिनिधिक कविता संग्रहासाठी विषय खालीलप्रमाणे:* १) महाराष्ट्र माझा २) आम्ही काव्यसारथी ३) काव्यमंजिरी ४) विद्रोही वादळ ५) देव्हारा (बालकाव्यसंग्रह) *🙏उपरोक्त सर्व संग्रहासाठी कवी, कवयित्रींनी सहभागी व्हावे असे आम्हास वाटते.* *〽️परंतु आपण कुणासही जबरदस्तीने सहभागी करू इच्छित नसल्याने दिनांक २० एप्रिल २०२६ पर्यंत इच्छुक सभासदांनी वरील विषयावरील ५ कविता तयार करून मुख्य संपादक "राहुल पाटील" यांना 7385363088 यावर पाठवावे. सोबत पाच कविता संग्रहासाठी अत्यल्प शुल्क रू ६५० रू आकारण्यात येत असून कवितेसोबत शुल्क संस्थेच्या फोन पे, गूगल पे वर (9834739798) पाठवावे.* *💥सभासद नसलेल्या सदस्यांनी किमान वार्षिक सभासद नोंदणी शुल्क भरूनच वरील पूर्तता करावी* *🙏कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण समारंभ, महाराष्ट्र दिन विशेषांक प्रकाशन, सशुल्क सूचना दिनांक २०/०४/२०२६ नंतर प्रसारित करण्यात येईल* *(🚩वरील सूचनांचे वाचन करून इतर साहित्यिकांची सहभागी होण्याची इच्छा असल्यास त्यांचेही स्वागत👇)* ♾️♾️♾️♾️🔻🔹🔻♾️♾️♾️♾️ *मुख्य संपादक/ संस्थापक* *मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्था, नागपूर* https://chat.whatsapp.com/Cwj59G4RnVyCjhdHOgtKZj?mode=gi_t #ताजी बातमीं #आजची ताजी बातमी #✍🏽 माझ्या लेखणीतून ♾️♾️♾️♾️🔻🔹🔻♾️♾️♾️♾️