मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
ShareChat
click to see wallet page
@rahul7385363088
rahul7385363088
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
@rahul7385363088
"मराठीचा अभिमान" 'मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास'👌
जे. एस. एम. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न प्रतिनिधी अलिबाग बिनधास्त न्यूज मिडीया अलिबाग/रायगड: (दि १६) तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/jJm94h #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏽 माझ्या लेखणीतून #आजची ताजी बातमी
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ShareChat
जे. एस. एम. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न प्रतिनिधी अलिबाग बिनधास्त न्यूज मिडीया अलिबाग/रायगड: (दि १६) जे. एस. एम. व अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा बुधवार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अ‍ॅड. गौतम पाटील हे उपस्थित होते. तर उपाध्यक्षा मा. डॉ. साक्षी पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर जे. एस. एम. कॉलेजच्या प्राचार्य मा. डॉ. सोनाली पाटील, अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मा. डॉ. नीलम हजारे आदि मान्यवर उपस्थित होते. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीने या कार्यक्रमास प्रारंभ झाला. अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य अ‍ॅड. डॉ. नीलम हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी सर्व यशस्वी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात जे. एस. एम. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांनी पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा व अविस्मरणीय क्षण असून विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा स्वत:च्या व समाजाच्या उत्कर्षासाठी विनियोग करावा असे आवाहन करत त्यांनी भावी आयुष्यात विशेष कर्तृत्व करून दाखवावे असे प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अ‍ॅड. गौतम पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यासंबधीची उद्घोषणा केली. यावेळी जे. एस. एम. महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांमधून पदवी प्राप्त केलेल्या २०७ विद्यार्थ्याना तर विधी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या ८० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अध्यक्ष मा. अ‍ॅड. गौतम पाटील, उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, प्र. प्राचार्य अ‍ॅड. नीलम हजारे व विविध विषयांचे विभागप्रमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली . यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारण्याचा संस्मरणीय अनुभव प्राप्त झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमास महाविद्यालायातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पदवी प्रमाणपत्र वितरण समितीचे प्रमुख प्रा. डॉ. प्रेम आचार्य व प्राध्यापक सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास अनुपस्थित राहिलेल्या शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ च्या पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध असून संबंधित विद्यार्थ्यांनी दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत ती घेऊन जावीत असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.
राज्यात उष्णतेचा 'हाय अलर्ट'; 'या' जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/4fPOsT #✍मराठी साहित्य #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
✍मराठी साहित्य - ShareChat
राज्यात उष्णतेचा 'हाय अलर्ट'; 'या' जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर: (दि १६ एप्रिल) राज्यात सध्या उन्हाचा पारा झपाट्याने वाढत असून नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच परिस्थितीचा विचार करून वर्धा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून गुरुवार, 16 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अंगणवाडीपासून ते प्राथमिक व माध्यमिक शाळांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाचा निर्णय : भारतीय हवामान विभागाने वर्धा (Wardha) जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून उष्ण वारेही वाहू लागले आहेत. 16 एप्रिल रोजी तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही परिस्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत अधिकार वापरून हा निर्णय घेतला आहे. सर्व सरकारी आणि खासगी शाळांना हा आदेश लागू करण्यात आला आहे. राज्यातील तापमानाची भीषण स्थिती: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. अकोल्यात 44 अंश, वर्ध्यात 43.5 अंश, तर सोलापूरमध्ये (Solapur) 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. यवतमाळ (Yavatmal), जळगाव, नागपूर (Nagpur) आणि परभणी (Parbhani) या जिल्ह्यांमध्येही तापमान 42 अंशांच्या आसपास पोहोचले आहे. मालेगाव, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड आणि सातारा या भागांतही तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत उष्णतेचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पश्चिम नागपूर (भाकरे ले आऊट) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: पश्चिम नागपूर तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/4RIFQ4 #✍मराठी साहित्य #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
✍मराठी साहित्य - ShareChat
पश्चिम नागपूर (भाकरे ले आऊट) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: पश्चिम नागपूर (भाकरे ले आऊट) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करण्यात आली तथा सांस्कृतिक कार्यक्रम व भोजनदाण आयोजित करण्यात आले होते. अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे, नगरसेवक श्री.विक्रम ग्वालबंसी, काँग्रेस पक्षाचे नेते श्री.आकाश भारद्वाज, युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.कैलाश शेडामे इत्यादि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात श्री.आकाश भारद्वाज यांचे मोलाचे सहयोग होते.
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना *आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सकाळच्या सत्रावर भर* आ. म तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/5WO22C #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍मराठी साहित्य
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ShareChat
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना *आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सकाळच्या सत्रावर भर* आ. मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; सकाळी १० वाजेपर्यंत शाळा सुरू असावी अशा सूचना चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची गंभीर दखल घेत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये तातडीने बदल करण्याची सूचना केली आहे. उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा वाढता धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक असून सध्या उन्हाचा तीव्र तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशा परिस्थितीत दुपारच्या वेळेत शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळी १० नंतर उष्णतेची तीव्रता अधिक वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करून सकाळी सुरू करून जास्तीत जास्त सकाळी १० वाजेपर्यंत शाळा सुरू असावी, अशा सूचना आ. मुनगंटीवार यांनी केल्या आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत आवश्यक असून प्रशासनाने याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
बचत गट कर्ज वितरण कार्यक्रम. व्याहाड खुर्द शाखेत संपन्न चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री रोहितभा तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/wChfWZ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍मराठी साहित्य
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ShareChat
बचत गट कर्ज वितरण कार्यक्रम. व्याहाड खुर्द शाखेत संपन्न चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री रोहितभाऊ बोम्मावार यांच्या प्रमुख उपस्थितीत, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तथा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल (मुन्नाभाऊ) स्वामी यांच्या शुभहस्ते बँकेच्या व्याहाड खुर्द शाखेत कर्ज वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पाच महिला बचत गटांना कॅश क्रेडीट कर्ज म्हणून एकूण *पंधरा लाख पन्नास हजार* रुपयांची रक्कम धनादेश स्वरूपात कर्ज वितरित करण्यात आले. या प्रसंगी श्री. विवेकजी नागरे, nrlm व्यवस्थापक कक्ष पं.स. सावली, श्री. विपुलजी बोरेवार nrlm पं.स. सावली, व्याहाड खुर्द शाखेचे शाखा अधिकारी श्री.पाझारे सर,शाखा निरीक्षक श्री. ननावारे व शाखेचे सर्व कर्मचारी irv बैंक सखी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री मोतीराम नागापूरे यानी केले, तर आभार प्रदर्शन श्री महादेव कलसार यांनी केले.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुन्हा समजून घेण्याची गरज"; आर्या कलोडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष लेख ज्ञानसूर्य तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/rtKRDz #आजची ताजी बातमी #ताजी बातमीं #✍🏽 माझ्या लेखणीतून #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍मराठी साहित्य
आजची ताजी बातमी - ShareChat
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुन्हा समजून घेण्याची गरज"; आर्या कलोडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष लेख ज्ञानसूर्य आणि समानतेचा बुलंद आवाज असलेल्या महामानवाला विनम्र अभिवादन. आपण दरवर्षी १४ एप्रिल रोजी डॉ. बी.आर. आंबेडकर यांचे स्मरण करतो. हार अर्पण केले जातात, भाषणे दिली जातात आणि आदरांजली वाहिली जाते. तथापि, या औपचारिक स्मरणाच्या गदारोळात त्यांच्या योगदानाची विशालता अनेकदा संकुचित केली जाते. त्यांना एका अशा मर्यादित चौकटीत किंवा ओळखीमध्ये बंदिस्त केले जाते, जी त्यांच्या कार्याची खरी व्याप्ती दर्शवण्यात अपयशी ठरते. डॉ. आंबेडकर हे केवळ एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते; ते भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार आणि आधुनिक भारताच्या लोकशाही रचनेचा एक आधारस्तंभ होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांवर आधारलेली ही राष्ट्रनिर्मिती त्यांच्या दूरदृष्टीचाच परिणाम आहे. त्यांचे योगदान केवळ संविधान निर्मितीपुरतेच मर्यादित नव्हते. ते कामगारांच्या हक्कांचे खंबीर पुरस्कर्ते होते. कामगारांच्या कामाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. याच प्रयत्नांचे पर्यवसान पुढे 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी अधिनियम, १९५२' (Employees' Provident Funds and Miscellaneous Provisions Act, 1952) सारख्या कायद्यांच्या निर्मितीमध्ये झाले. महिला सक्षमीकरणाबाबतची त्यांची दृष्टीही तितकीच पुरोगामी होती. 'हिंदू कोड बिल'च्या माध्यमातून त्यांनी महिलांना मालमत्ता, वारसा हक्क, घटस्फोट आणि दत्तक विधान यांसारख्या बाबींमध्ये अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन समाजात प्रचलित असलेल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध उचललेले हे एक क्रांतिकारक पाऊल होते. त्या काळात या विधेयकाचा पूर्णपणे स्वीकार झाला नसला, तरीही भविष्यातील सुधारणांचा पाया रचण्याचे कार्य यातूनच झाले. सामाजिक आणि आर्थिक समतेशिवाय राजकीय लोकशाही अपूर्ण राहते, असे डॉ. आंबेडकरांचे ठाम मत होते. त्यांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी' (The Problem of the Rupee) या ग्रंथाचा प्रभाव भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आणि तिच्या रचनेवर पडला; यावरूनच त्यांच्या आर्थिक जाणिवेची खोली सिद्ध होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. बालपणी त्यांना जातीय भेदभावामुळे मूलभूत अधिकारांपासून वंचित राहावे लागले होते; तरीही, तीच व्यक्ती पुढे जाऊन इतिहास घडवणारी ठरली आणि ज्ञान, संघर्ष व न्याय यांचे जागतिक प्रतीक म्हणून उदयास आली. आणि कदाचित त्यांचा सर्वात महत्त्वपूर्ण संदेश आजही दुर्लक्षितच राहिला आहे. डॉ. आंबेडकरांना लोकांनी आपली केवळ पूजा करावी, अशी अपेक्षा कधीच नव्हती. त्याऐवजी, त्यांनी लोकांना विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि शिक्षण, विवेक व सामाजिक परिवर्तनाच्या मार्गावरून चालण्यास प्रेरित केले. आज आपण ज्या अधिकारांना गृहीत धरतो. समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि संधी ते सर्व त्यांच्या विचारांचाच वारसा आहेत. हे अधिकार प्रत्येक नागरिकाचे आहेत; अगदी अशा नागरिकांचेही, जे त्यांच्या योगदानाला मान्य करत नाहीत. डॉ. आंबेडकरांना केवळ एकाच ओळखीपुरते मर्यादित करणे, हा केवळ त्यांच्यावरच नव्हे, तर त्यांनी कल्पिलेल्या 'भारता'च्या संकल्पनेवरही केलेला अन्याय आहे. जर आपल्याला त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करायची असेल, तर केवळ त्यांची आठवण काढणे पुरेसे नाही, तर त्यांनी प्रकाशित केलेल्या मार्गावरून आपण चालले पाहिजे. कारण, 'डॉ. बाबासाहेबांची निर्मिती ही केवळ त्यांची पूजा करण्यासाठी नव्हे, तर त्यांचे अनुकरण करण्यासाठी झाली होती'. कु.आर्या सविता कलोडे ता. जिल्हा नागपूर
बुटीबोरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परिवर्तनवादी महारँलीचे आयोजन महाकारुणिक बहुउद्देशीय महिला संघटन समितीचा पुढा तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/acj18O #आजची ताजी बातमी #✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य
आजची ताजी बातमी - ShareChat
बुटीबोरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परिवर्तनवादी महारँलीचे आयोजन महाकारुणिक बहुउद्देशीय महिला संघटन समितीचा पुढाकार शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर/ बुटीबोरी :(दि १५ एप्रिल) “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश घेऊन महाकारुणिक बहुउद्देशीय महिला संघटन समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परिवर्तनवादी महारँलीचे आयोजन करण्यात आले. या महारेलीमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाला दिलेला समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, प्रज्ञा, शील, करुणा आणि लोकशाही मजबूत करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. बुटीबोरी येथील लाकूडकर ले-आऊट परिसरातून महारेलीची सुरुवात करण्यात आली. तथागत गार्डन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून संविधान, मानवता आणि सामाजिक परिवर्तनाच्या मूल्यांशी बांधिलकी व्यक्त केली. महारेली दरम्यान मराठा ले-आऊट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केक कापून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसरात “जय भीम”, “संविधान जपा” तसेच “समता, बंधुता आणि न्याय”च्या घोषणा देत वातावरण भारावून गेले होते. या परिवर्तनवादी महारेलीला बोथली ग्रामपंचायतचे उपसरपंच अरुण वानखेडे तसेच अनिल भाऊ ठाकरे यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचे सांगितले. महारेलीमधून उपस्थितांना संविधानाच्या पावित्र्याचे जतन करण्याचे, सामाजिक ऐक्य वाढविण्याचे आणि अन्यायाविरुद्ध संघटितपणे उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या संदेशासोबतच “लोकशाही मजबूत करा” हा विचारही प्रभावीपणे मांडण्यात आला. या कार्यक्रमात महाकारुणिक बहुउद्देशीय महिला संघटन समितीच्या पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महारेलीमुळे बुटीबोरी परिसरात परिवर्तनवादी विचारांची जागृती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. अध्यक्ष वैशाली चव्हाण, उपाध्यक्ष माया मेश्राम, सचिव स्वाती पाटील ,सहसचिव लक्ष्मी नारनवरे, कोषाध्यक्ष उज्वला थूल, सदस्य गण मंदा वंजारी शकुंतला शंभरकर रीता पिल्लेवान दीक्षा पिल्लेवान नीलिमा ताम गाडगे मध्ये कुसुम थूल कल्पना लाउत्रे दर्शनाला लावतरे अश्विनीथून सुचिता भगत गीतामेंढे मनीषा मेंढे मनीषा वाहने करुणागणवीर स्नेहा भस्मे पौर्णिमा बनसोड विजया खोब्रागडे सविता भाले सिंधू भगत प्रिया शेंद्रे उपस्थित होते.
डॉ.भीमराव अंबेडकर की 135 वां जयंती पर सीआरपीएफ नागपुर परिसर में सादगी, श्रद्धा और प्रेरणा से भरपूर समारोह का आयोजन नागपुर तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/E6fXkB #आजची ताजी बातमी #✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य
आजची ताजी बातमी - ShareChat
डॉ.भीमराव अंबेडकर की 135 वां जयंती पर सीआरपीएफ नागपुर परिसर में सादगी, श्रद्धा और प्रेरणा से भरपूर समारोह का आयोजन नागपुर - ग्रुप केंद्र सीआरपीएफ नागपुर परिसर में भारतरत्न डॉ.भीमराव अंबेडकर की 135 वां जयंती अत्यंत श्रद्धा, गरिमा एवं प्रेरणास्पद वातावरण में मनाई गई। कार्यक्रम का शुभारंभ अनिल कुमार, उप महानिरीक्षक, ग्रुप केंद्र नागपुर द्वारा डॉ.अंबेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण से हुआ। इसके उपरांत उपस्थित सभी अधिकारियों, जवानों तथा परिजनों ने सामूहिक वंदना किया। इस कार्यक्रम में श्रीमती पूनम गुप्ता, अध्यक्षा, क्षेत्रीय कावा, नागपुर, डॉ.संदीप पर्थोंडीकर उप महानिरीक्षक (चिकित्सा) संयुक्त अस्पताल नागपुर, डॉ यशवंत लामतूरे, एम्स नागपुर, श्रीमती पूजा पंवार कमांडेंट 213(म) बटा, कैलास स्वागत सहायक कमांडेंट, कमल भट्टाचार्य सहायक कमांडेंट सहित अन्य अधिकारी एवं जवान उपस्थित रहे। अनिल कुमार ने अपने संबोधन में कहा कि डॉ. भीमराव अंबेडकर जी की सोच, संघर्ष और समर्पण ने न केवल भारत को एक नया संविधान दिया, बल्कि करोड़ों लोगों के जीवन को नया आयाम, नया आत्मविश्वास और एक नई दिशा दी। उन्होंने कहा कि डॉ.अंबेडकर जी एक समाज सुधारक और दलितों के मसीहा भी थे। जातिवाद और भेदभाव को समाज से दूर करने के लिए उन्होंसने काफी संघर्ष किया। उन्होंने कहा कि जब तक जाति रहेगी, भारत सच्ची आज़ादी का अनुभव नहीं कर पाएगा। वे मानते थे कि जाति व्यवस्था केवल सामाजिक नहीं, बल्कि मानसिक गुलामी का रूप है। उन्होंने 'जाति तोड़ो' आंदोलन को गति दी और एक मजबूत सामाजिक क्रांति का नेतृत्व किया। डॉ.अंबेडकर महिलाओं के अधिकारों के पक्षधर भी थे तथा महिलाओं की स्वतंत्रता और समानता के भी बड़े पैरोकार थे। उन्होंने कहा कि आज, जब हम जातिगत भेदभाव, लैंगिक असमानता और सामाजिक विषमताओं से जूझ रहे हैं, तब डॉ.अंबेडकरजी की सोच और ज्यादा जरूरी हो जाती है। डॉ. अंबेडकर जी ने जो हमें संविधान दिया, वह हमें याद दिलाता है कि भारत केवल एक राष्ट्र नहीं, बल्कि एक विचार है – जिसमें हर व्यक्ति को समान अधिकार और सम्मान है। हम सभी को उनसे सीख लेते हुए उनके सिद्धांतों पर चलते हुए जाति धर्म से उपर उठकर देश के सर्वांगीण विकास में अपना महत्वएपूर्ण योगदान देने की आवश्यकता है। डॉ. अंबेडकर जी के सामाजिक न्याय, समता एवं संविधान निर्माण में अतुलनीय योगदान का स्मरण करते हुए उनके आदर्शों को आत्मसात करने का संकल्प लिया गया। कार्यक्रम में उपस्थित सभी को प्रसाद वितरण किया गया तथा शाम को परिसर में सामूहिक रैली का भी आयोजन किया।
वन प्रशासनाला 'महाराष्ट्र वन कर्मचारी व अधिकारी दक्षता दला'चा अंतिम आवाहन, विनंती आणि इशारा! २५ एप्रिलपर्यंत 'सुरक्षा संच तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/eXxyl6 #आजची ताजी बातमी #✍🏽 माझ्या लेखणीतून
आजची ताजी बातमी - ShareChat
वन प्रशासनाला 'महाराष्ट्र वन कर्मचारी व अधिकारी दक्षता दला'चा अंतिम आवाहन, विनंती आणि इशारा! २५ एप्रिलपर्यंत 'सुरक्षा संचां'बाबत (Safety Kits) कोणताही निर्णय न झाल्यास, २६ एप्रिलनंतर नागपूर येथे 'एल्गार' (उठाव) पत्रकार परिषद—आणि त्यानंतर वन कर्मचाऱ्यांचे व्यापक जनआंदोलन—आयोजित केले जाईल! नागपूर: राज्यातील वनांचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या वन कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळखंडोबा करणाऱ्या वन प्रशासनाविरुद्ध, आता 'महाराष्ट्र वन कर्मचारी व अधिकारी दक्षता दला'ने निर्णायक लढ्यासाठी कंबर कसली आहे. एप्रिल महिना आता संपत आला असतानाही, वणवे विझवण्याच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना अद्याप त्यांचे 'सुरक्षा संच' (संरक्षक साधने) प्राप्त झालेले नाहीत; ही बाब लक्षात घेऊन, संघटनेने प्रशासनाला २५ एप्रिल २०२६ ची अंतिम मुदत देत एक कडक इशारा (अल्टिमेटम) दिला आहे. *प्रमुख मागण्या आणि इशारे:* १. *तात्काळ अधिसूचना:* वन प्रशासनाने २५ एप्रिलपर्यंत सुरक्षा संचांची खरेदी आणि वितरणाबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी करणे अनिवार्य आहे. २. *१ मे रोजी वितरण:* या संचांचे आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष वितरण १ मे २०२६ रोजी, 'आंतरराष्ट्रीय कामगार दिना'च्या शुभमुहूर्तावर सुरू झाले पाहिजे. *फौजदारी खटल्याचा इशारा:* आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत, वणवे विझवण्याच्या कामादरम्यान कोणत्याही कायम किंवा हंगामी कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यास—किंवा दुर्दैवाने त्यात त्यांचा मृत्यू झाल्यास—त्यासाठी संबंधित नियंत्रक अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांना थेट जबाबदार धरले जाईल. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध 'सदोष मनुष्यवधा'चे (culpable homicide not amounting to murder) फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि त्यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केल्या जातील.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी सहकारी पतसंस्था परभणी येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी परभणी तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/HJhyzu #आजची ताजी बातमी #✍मराठी साहित्य