🔱 🕉 🔱 *" बाळूमामांच्या नावाने चांगभलं.."*🔱🕉️🔱
🙏🏻 *" मामांना फसविणे म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारणे.."* 🙏🏻
*हणीमनाळ हे एक गडहिंग्लज जवळचे गाव. त्या गावचा एक व्यापारी कोल्हापुरात राहत असे. चटणी विकण्याचा त्याचा व्यवसाय होता. तो गरीब असताना मामांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मालाची खरेदी आणि विक्री करत असे. पुढे त्याची आर्थिक स्थिती बरीच सुधारत गेली आणि तो श्रीमंत झाला. चटणीसोबतच मिरचीपूड आणि कापड यांचाही व्यापार तो करु लागला. मिरचीपूड, कापड वगैरे साहित्य त्याच्याकडूनच मामा मागवीत असत. हळूहळू त्याने आपला व्यापारी खाक्या सुरू केला. तो मालात भेसळ करु लागला. मामांनाही भेसळ केलेला मालच तो देऊ लागला आणि हे मामांजवळील माणसांना चांगलेच जाणवू लागले. तेव्हा ही मंडळी मामांना याविषयी वारंवार सांगू लागली. अशा अनेक तक्रारी मामांकडे येऊ लागल्या, तरीही मामांनी याकडे कानाडोळा केला होता.*
*एकदा मामांनी भंडारा यात्रेनिमित्त बराच माल त्या व्यापऱ्याकडून आणविला होता. त्या मालाचे बिल द्यायचे होते तेव्हा मालाचे तीन हजार रुपये झाल्याचे व्यापाऱ्याने मामांना सांगितले. मुळात मालाचे तेवीसशे रूपये झाले होते म्हणून मामा त्याला म्हणाले, ''तुझे मी तेवीसशे रुपये द्यायचे आहेत." हा वाद तीन दिवस चालला होता. अखेर व्यापाऱ्याचे कपट जाणून मामांनी त्याला तीन हजार रुपये रोख दिले. यानंतर विजयी मुद्रेतच तो व्यापारी कोल्हापूरास गेला.*
*कोल्हापूरात घरी गेल्यानंतर व्यापाऱ्याच्या पोटात अचानक कळा येऊ लागल्या. त्याचे पोट फार दुखू लागले होते व त्याला बेचैन झाल्यासारखे वाटू लागले. त्याला अन्नही खाण्यास होईना. मामांशी केलेल्या कपटामुळेच त्याची ही अवस्था झाली होती.*
*व्यापाऱ्याची पत्नी सोनाबाई ही व्यापाऱ्याला घेऊन मामांकडे आली. तेव्हा व्यापाऱ्याने त्याच्या बाबतीत घडलेले सारे-काही मामांना सांगितले..*
*मामा त्याला म्हणाले, "मी तुला भंडारा देतो. दररोज स्नानानंतर मी सांगतो तेवढा भंडारा खात जा."*
*व्यापारी म्हणाला, "मामा.. भंडाऱ्यामुळे माझे पित्त वाढते.''*
*यावर मामा म्हणाले, "भंडारा खाऊ नकोस. तराजूच्या एका पारड्यात मी तुला बसवतो. दुसऱ्या पारड्यात तुझ्या वजनाएवढी रक्कम घाल. तेवढी रक्कम घेऊन तरी कोणता डाॅक्टर तुला बरा करु शकतो ते मला बघायचं आहे. अरे, भंडाऱ्याला अव्हेरायचं म्हणजे सरळ वर जायचं. खाली राहायचं नाही."*
*मामांचा भंडारा न घेताच तो व्यापारी पत्नीसह कोल्हापूरला माघारी गेला. पुढे त्याचे पोटाचे दुखणे अधिकच वाढले. ते पाहून त्याची पत्नी निडसोशी भागात मामा होते तेथे एकटीच मामांना भेटावयास आली. ती मामांना म्हणाली, "मामा.. माझं मालक अजिबात अन्न खाईनात. अंथरुणाला खिळून राहिले आहेत. त्यांना बरं करण्यासाठी आता काय करु सांगा?"*
*पुर्वीचा अनुभव जाणून मामा तिला म्हणाले, "मी एक धनगर. मला त्यातलं काय कळतय ? तु चांगल्या शहाण्या डाॅक्टरला दाखव."*
*बाई म्हणाली, " डाॅक्टर ऑपरेशन केलं पाहिजे म्हणतात."*
*मामा म्हणाले, ''डाॅक्टर सांगतात तसं कर जा.''*
*पुढे व्यापारी पतीला घेऊन पत्नी सोनाबाईने उपचारार्थ मिरजेस प्रयाण केले. तेथे एका प्रसिद्ध दवाखान्यात व्यापाऱ्याचे ऑपरेशन झाले. परंतु ऑपरेशन अयशस्वी होऊन दवाखान्यातच तो मरण पावला. अखेर कोल्हापुरास त्याचे प्रेतच आणावे लागले आणि व्यापाऱ्याची पत्नी सोनाबाई ही विधवा झाली.*
*ज्या महापुरुषाच्या कृपेने आपण सधन होत गेलो, त्यांच्याशीच कृतघ्नपणे वागणाऱ्या व भंडाऱ्याचा अवमान करणाऱ्या व्यापाऱ्याचे भवितव्य याहून वेगळे तरी कसे असणार ?*
🙏🏻 *" बोलाss, बोलाss बाळूमामांच्या नावाने चांगभलं.."* 🙏🏻 #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग☀️ #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞

