शिवचरित्रकार
ह भ प सर्जेराव महाराज टेके वारीकर
🚩🌹🌹🚩
सार्थ तुकाराम महाराज गाथा
अभंग क्र.३७९६(गवळणींची अवस्था)
गाई गोपाळ यमुनेचे तटी । येती पाणिया मिळोनी जगजेठी । चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहू दृष्टी वो ॥१॥
ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ ते देखावया हरी । मिस पाणियाचे करितील घरी । बारा सोळा मिळोनी परस्परी वो ॥ध्रु.॥
चिरें चोळीया त्या धुतां विसरती । ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्ण मूर्ती । कोणां नाठवे हा कोण कुळ याती । झाल्या तटस्थ सकळां नेत्रा पातीं वो ॥२॥
दंत धावनाचा मुखामाजी हात । वाद्यें वाजती नाईके जनमात । करी श्रवण श्रीकृष्णवेणूगीत । स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ वो ॥३॥
अर्थ
जगजेठी श्रीकृष्ण गाई व गोपाळांसह यमुनेतिरि पाणी पिण्यासाठी आला; त्यानंतर सवंगडी वाटून वळवंटात चारि दिशांनी चेंडूचा खेळ खेळू लागले.त्या वेळी श्रीकृष्णला पाहन्याच्या ओढिनि गौळणी म्हणाल्या, "चला आपण तिकडे हरिला पाहू" .त्या गोपिका कामातुर झाल्या होत्या.हरिच्या दर्शनासाठी त्यांचे चित्त कासाविस झाले होते.पाणी आनंयाच्या किंवा धुनें धुन्याच्या निमित्ताने बाहेर पडायचे, असे बारा-सोळा गौळणींनि ठरवून ठेवलेले होते.परंतु पानी भरने, धुनें धुनें ही कामे त्या पूर्णपणे विसरून गेल्या.त्यांचे लक्ष् कृष्णकडे लागलेले होते.आपले कुळ, गोत्र, जात, कुटुंब या कशाचेच त्या कुणाल भान उरले नव्हते.कृष्णकडे पाहताना सार्यांची दृष्टी तटस्थ झाली .तुकाराम महाराज म्हणतात, काही गुळणींना दांत घासन्यासाठी तोंडात हात घातला होता., तो तसाच राहिला.त्या वेळी दूर वाद्यांचा आवाज येत होता.लोकांचा गलबलाही चालला होता; परंतु त्यांना काहीही एकु येत नव्हते.श्रीहरिच्या मुखातून येणारे वेणु गीत एकन्यामध्ये त्यांचे कान तल्लीन झाले होते.तुकाराम महाराज म्हणतात, की याप्रमाने माझा स्वामी सार्यांचे मनोरथ पूर्ण करीत होता .
संत तुकाराम महाराज
🚩🙏🚩 #🌻आध्यात्म 🙏