Savita Pisal Konde Deshmukh.(H.S.C.D.ed)🎷🚩📚🛵
भाजपवाले केंद्रात, राज्यात, महानगरपालिकेत, ग्रामपंचायतीत कुठेही सत्तेत असले तरी त्यांच्या नेत्या/कार्यकर्त्यांमध्ये एक गुण समान आहे- चूक मान्य न करणं.
सत्ता राबवण्याचा बिलकुल अनुभव नसल्याने हे मुख्यतः अधिकाऱ्यांच्या अनुभवावर अवलंबून असतात.
रस्ते बांधणे, नगर-नियोजन किंवा शेती-आपत्ती-नियोजन या तिन्ही क्षेत्रातली उदाहरणं आज आपल्या समोर आहेत.
मिसिंग लिंक बांधताना प्रचंड भ्रष्टाचार तर झालेला आहेच पण अतीशय मूर्खासारख्या चुका करून ठेवण्यात हे सरकार तज्ज्ञ आहे हे पुन्हा दिसले. मीरा भाईंदर मधला दोन लेनमधून अचानक एक लेन होणारा रस्ता आपण बघितलेला आहेच. आता शक्तिपीठ नावाचा महाकाय हत्ती शेतकऱ्यांवर चढवायचा सुरू आहेच. कोल्हापूर-पुणे हायवेची झालेली दुरवस्था पण एकदा बघून घ्या. मुंबईत गटार सफाईचं काम मे महिन्याच्या शेवटी पूर्ण होत असतं, त्याच्या पद्धतशीर बातम्या व्ह्यायच्या. यावेळी तसलं काहीही केलेलं नाहीये. पाऊस जोरात पडला असला तरी पाणी जितकं साचलं आहे त्याचं महत्वाचं कारण निचरा न होणं आहे. पवना डॅमचा जॅकवेल काल रात्री बंद पडलाय आणि हिंजवडी आणि आजूबाजूला पाणी पुरवठा २/३ दिवस बंद असणारे. त्याआधी २ महिने पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये कमी वेळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा झालेला आहे. (पुण्यातली परिस्थिती मला माहीत नाही.)
अल-निनो मुळे दुष्काळ येणार आहेच. पण दुष्काळाच्या कामाचे शून्य नियोजन आहे. शेततळी बनवली गेलेली नाहीयेत, पेरणी नियोजनासंबंधी सूचना नीट पोहचल्या नाहियेत. खतांच्या किंमती तर त्या हॉर्मुझच्या घोळामुळे जवळपास दुप्पट झालेल्या आहेत आणि उपलब्धता पण कमी आहे. बियाण्याचा तुटवडा आहे. पिक विमा योजनेचा बोजवारा उडलेला आहे. शेतकरी सावकारी कर्ज काढून पेरण्या करत आहेत. आता या आर्थिक वर्षात शेतकरी आत्महत्येचा आकडा खूप मोठा असेल अशी भीती आहे.
भाजपचे काही लोक पहिल्या वेळी सत्तेत आलेत. त्यांना काहीच अनुभव नाही त्यामुळे रूटिन काय असतं आणि कुठल्या काळात कुठल्या विषयावर लक्ष द्यायचं असतं हे त्यांना माहीत नसतं. ते मुख्यतः अधिकारी लॉबीवर अवलंबून असतात आणि सध्या कामचुकारपणा करण्यात सगळ्यात पुढे ही लॉबी आहे. पूर्वीची सरकारं त्यांच्या विचारसरणीच्या इकोसिस्टीममधल्या तज्ज्ञांची अश्या वेळी मदत घ्यायचे. सरकारी बाबू लोकांचे चुकीचे सल्ले बाजूला ठेऊन तज्ज्ञ काय म्हणतो हे ऐकलं जायचं. त्यासाठी छोट्या-मोठ्या खूप समित्या आणि अभ्यासमंडळं असायची. भाजपने हे सगळं बंद केलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या इकोसिस्टीममध्ये लोकांना मूर्ख बनवणं हेच तज्ज्ञ असल्याचं लक्षण मानलं जातं. थोडे-बहुत शहाणे असलेले लोक बऱ्याचदा सरकारवर, नेत्यांवर टीका करतात तेंव्हा त्यांना भाजपच्या इकोसिस्टीममधून बाजूला केलं जातं.
कमीतकमी शिक्षण असलेले लोक भाजपमध्ये चांगले रुळतात उदा.- स्वतः मोदीजी, अमित शहा, मनोहर कुलकर्णी (उर्फ भिडे), एकनाथ शिंदे, आणि कमी बुद्धिमत्ता असलेले नेते सर्वोच्च स्थानी पोहोचतात उदा. अजयकुमार बिष्ट, फडणवीस, गडकरी. भाकपला वाहून घेतलेले कार्यकर्ते असेच कमी बुद्धिमत्तेचे असलेले तुम्ही बघू शकाल. बुद्धी दाखवली की भाजपच्या इकोसिस्टीममध्ये तो माणूस टिकत नाही. असो!
#😍Marathi Status King #🏛️राजकारण #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #👌प्रेरणादायी स्टेट्स