ShareChat
click to see wallet page
search
*ठाण्यात ५० गुणवंतांचा गौरव, हृदयस्पर्शी मदतीने निरगुडकरही भावुक!* तुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि *बातम्या शेअर करून कमाई करण्यासाठी सुरू अॅप* (Shuru App) डाउनलोड करा 👇🏻 https://shuru.co.in/dl/xnpX1J #news #लोक हिंद न्युज #breaking news #shurubreking #लोक हिंद
news - ShareChat
ठाणे: ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ , लोक हिंद चॅनल,जनक्रांती संघटना, साप्ताहिक शिवमार्ग व डी वाय फाउंडेशन यांच्या वतीने शिवप्रतिपाचार्य डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेला लोक हिंद गौरव राज्य पुरस्कार सोहळा ठाणे शहरातील ज्ञानराज सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ज्येष्ठ आयटी तज्ञ व झी 24,तास ,IBN लोकमत वाहिनीचे माजी संपादक उदय निरगुडकर आणि आवाज महाराष्ट्राचा फेम महेश कंटे यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 50 व्यक्तींचा सन्मान चिन्ह सन्मानपत्र सुवर्णपदक , ज्ञानेश्वरी ग्रंथ,पुरस्कार पट्टा पुष्प गुच्छ सह लोक हिंद गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी लोक हिंद चॅनल च्या वतीने किसन बोंद्रे यांनी प्रेक्षकांना भावनिक आवाहन केल्यानंतर कल्याण - मुरबाड रोडवर अपघातात मृत पावलेल्या मुरबाड तालुक्यातील तीन भावंडांच्या एकमेव बहिणीस सुमारे एक लाखापर्यंत रक्कम जमा करून देण्यात आली. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर म्हणाले की मी पुरस्काराचे अनेक कार्यक्रम पहिले असून हा पुरस्कार सोहळा भावनिक व अस्सल ग्रामीण उदात्त संस्कृतीचा ओलावा असणारा आहे, आत्तापर्यंत शहापूर मुरबाडची ओळख निसर्गाने नटलेला एवढीच होती मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून या तालुक्यातील माणसे व त्यांचा दिलदारपणा ओळखता आला, पुरस्कार प्राप्त व्यक्ती खरोखरच आदर्श असून यापुढे लोक हिंद गौरव पुरस्कार सोहळे अधिक भव्य दिव्य व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचा लाडका गायक आवाज महाराष्ट्राचा फेम महेश कंटे याने भावगीत सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक महेश धानके यांनी केले.तर नगरसेवक राजेश मोरे, मुरबाडचे माजी उपसभापती उल्हास बांगर यांनी कार्यक्रमाचे आयोजक महेश धानके व किसन बोंद्रे यांचे भरभरून कौतुक केले.शिवक्रांती प्रतिष्ठानचे डॉक्टर राजू चौधरी यांनी मराठी माणसाचे स्फूल्लिंग जागवण्यासाठी शिवमंदिर बांधले असून शिव मंदिराला भेट देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी किशोर ठाकरे, अजित मराठे,धीरज सांबरे ,स्वप्नजा जाधव, किसनराव तारमळे ,प्रकाश कंटे,भानुदास भोईर,सुरेश बांगर, तुकाराम बांगर,परशुराम पितांबरे अशोक घोलप, प्रथमेश आकरे, पी एन पाटील, एन ए कदम, दशरथ हरड ,विजय जाधव ,गजानन व्यापारी, खंडू शेठ चौधरी, गुरुनाथ निपुर्ते ,लहुजी देसले, जैतू दादा भोईर ,सागर राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते सुमारे 50 व्यक्ती व संस्थांना लोक हिंद गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोक हिंदचे कार्यकारी संपादक लक्ष्मण घरत, उपसंपादक संतोष ठाकरे, रायगड जिल्हा निवासी संपादक नवज्योत पिंगळे, पालघर जिल्हा निवासी संपादक मकरंद बात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. लोक हिंद गौरव पुरस्काराचे हे नववे वर्ष असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी पुरस्कार सोहळा अतिशय भव्य दिव्य व उत्तम असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी दिल्या.
Shuru अ‍ॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा