Savita Pisal Konde Deshmukh.(H.S.C.D.ed)🎷🚩📚🛵
2K views • 8 days ago
माझ्या बालपणीची गोष्ट..
१९९७-९८ चा काळ असेल. पप्पांची भोर झाली होती त्यामुळे नर्सरी ते चौथीपर्यंत मी भोर शिकले. तर ही गोष्ट तिसऱ्या वर्गाची. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होणार होतं. त्यात कुणी गाणी गाणार होतं, कुणी डान्स करणार होतं. मला डान्स हा प्रकार अजिबातच जमत नाही यावर दुसऱ्या वर्गातच शिक्कामोर्तब झाले होते. गाण्यातही मी फार सरस नव्हते. मग आता भाग कशात घ्यावा हा प्रश्न माझ्यासह माझ्या मम्मीला आणि सोबत वर्गशिक्षिका असणाऱ्या बाईंना देखील पडला होता. मग बाईंनी एक शक्कल लढवली. आचार्य विनोबा भावे रचित गीताई पठण स्पर्धेत मला त्यांनी भाग घ्यायला सांगितला. मलाही ते हायसं वाटलं. नाचता येत नाही,गाता येत नाही.. मग निदान बडबड करून आपलं नाव राखून ठेवण्याची ही संधी मला फार पटली. आणि मी आपला अभ्यास सुरू केला. स्पर्धेचा दिवस उजाडला. मी अस्खलितपणे 'गीताई' बोलून दाखवली. एकही शब्द चुकला नाही. परीक्षक देखील खुश झाले. 'अजून काय येतं तुला?' असं विचारताच मी तुकोबारायांचं 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' पद्य कमी गद्यात म्हणून दाखवलं. सोबतच 'रामरक्षा म्हणून दाखवू का?' असे विचारत तीदेखील अस्खलितपणे म्हंटली. परीक्षक म्हणून एक पांढऱ्या केसांच्या आजी त्या पॅनलमध्ये बसून होत्या. त्या संस्कृत भाषेच्या तज्ञ होत्या. त्यांनी माझं खूप कौतुक केलं. शाबासकी दिली. तो दिवस माझ्यासाठी फार आनंदाचा होता.
या गोष्टीला आता ३० वर्ष उलटून गेली. मात्र तेव्हा जो आनंद मला झाला होता, अगदी तश्याच आनंदाची अनुभूती मला पुन्हा एकदा आली. डॉ. शशी थरुरांसारख्या विद्वान आणि लेखनाच्या दुनियेतील बादशाह माणसाने जेव्हा माझं पुस्तक चाळलं आणि 'Tejasvee, I'm going to read this Book asap and will write a review for sure' असं म्हंटलं, तेव्हा 'गीताई' पठण केल्यानंतर त्या संस्कृततज्ञ आजीने मला कौतुकाने जे सर्टिफिकेट दिलं होतं, अगदी तसाच आणि त्याच कौतुकाचा भास मला पुन्हा झाला. एवढा मोठा माणूस आपल्या पुस्तकाबद्दल बोलतोय, वाचायला सुरुवात करतोय हे माझ्यासारख्या नवख्या लेखिकेसाठी फार मोठं आहे. खूप आनंददायी आहे.
त्यामुळे छंद म्हणून लिहिणारी मी आता अभ्यास करून professional writing करते आहे. एक पुस्तक आलं आहे. पण अशी अनेक पुस्तकं आता लिहायची आहेत. हे पुस्तक माझ्यातील पेशन्सची टेस्ट घेणारं होतं. माझ्यातील तळमळ तपासणारं होतं. मी ते जिद्दीने पूर्ण केलंय. आणि दिल्लीपर्यंत पोहोचवलंय. मला आता दिल्लीची चव कळलीय. National policies, Governance,Progress, Ideas आणि आपली अर्थव्यवस्था हे महत्वाचे मुद्दे आहेत. आणि त्यावरच मला भरपूर लिहायचं आहे. लोकांपर्यंत विषय पोहचवायचे आहेत. पुस्तकं, कॉलम्स, ब्लॉग्स सगळं सगळं लिहायचं आहे. लहरीपणातून सुरू झालेला पुस्तकाचा हा प्रवास आता जिद्दीने पुढे जातोय. लिहिताना माझ्यातील प्रगल्भता देखील वाढत असल्याचे मला जाणवत आहे. कारण शेवटी जे आपण लिहितो ते जगत असतोच कुठेतरी.
देश कुठे चाललाय हे आता उघड्या डोळ्याने सर्वचजण बघतोय आपण. मात्र त्यात आपण आपल्या पद्धतीने योगदान देणं गरजेचं आहे. राष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण हे मुद्दे अत्यंत महत्वाचे आहे. त्यावर लिहीत राहील. बोलत राहील. संविधानाने जो अधिकार दिलाय त्याचा पुरेपूर वापर करावा या मताची मी आहेच. तसाही पुढचा काळ स्पष्ट बोलण्याचा आणि सडेतोड लिहिण्याचाच आहे. ते योग्यप्रकारे मी पार पाडेन.
बाकी.. सोबत रहा.. ऐकत रहा.. वाचत रहा.. व्यक्त होत रहा..
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांनी समाजावर अमिट ठसा उमटवला.
त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील कुटुंबीयांना तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
@satejp
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #👌प्रेरणादायी स्टेट्स #🏛️राजकारण #📲व्हायरल व्हिडिओ
15 likes
8 shares