:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४५३ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
आहार आणि निद्रा या गोष्टी तुमच्याजवळ आपोआप येतात त्यासाठी इतर कष्ट करावे लागत नाही. आहार व निद्रेला जास्त महत्त्व देऊ नये तसेच मऱ्यादा सोडून कधीही जास्त बोलू नये तसेच व्यर्थ बोलूं नये त्यामुळे आपल्या शरीराला फार नाही पण थोडे तरी कष्ट होतातच. जो आत्मस्थितीत प्राप्त होतो त्याला होणारे समाधान हे तोच एक जाणत असतो. तुकाराम महाराज म्हणतात जेणेकरून आपल्याला व दुसऱ्याला पीडा होईल असे काहीच करू नये मग तो कोणत्याही स्थितीत राहिला तरी हरकत नाही.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१५/०५/२०२६
वार-शुक्रवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏आई माझी काळुबाई


