ShareChat
click to see wallet page
search
#📜इतिहास शिवरायांचा *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६५७* *औरंगजेब बादशहा बीदर काबीज करून कल्याणीकडे!* *२९ मार्च इ.स.१६५७ रोजी बीदरच्या किल्ल्याला वेढा दिला.२३ एप्रिल इ.स.१६५७ रोजीच्या पुर्वी तो त्याच्या ताब्यातही आला. बीदर काबीज करून औरंगजेब बादशहा २८ एप्रिल इ.स.१६५७ रोजी कल्याणीकडे निघाला. कल्याणीचा किल्ला मीर जुमल्याने वेढला होता. औरंगजेब बादशहा व मीर जुमला पुन्हा एकत्र आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६६१* *छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील “प्रचीतगड उर्फ उचीतगड” जिंकला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६६५* *मोगलांनी रोहिडा ते राजगड भागात ठाण मांडले. कुत्बुद्दीनखान व बलुदीखान (लोदीखान) हे अनुक्रमे जुन्नर तर्फ व तळकोकणात मिर्झाराजे जयसिंग यांच्या आज्ञेनूसार धुमाकूळ घालीत होतेच. आता जोडीला शव्वाल महिण्याच्या २१ एकवीस तारखेस, म्हणजेच दि. २७ एप्रिल इ.स.१६६५ रोजी दाऊदखानही किल्ले रोहिडा जवळ पोहचला आणि मोगली धुमाकूळाला चहू अंगांनी ऊत आला. किल्ले रोहिडा ते किल्ले राजगड या भागातील हिंदवी स्वराज्याची ५० खेडी मोगलांनी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली. त्या भागातील मराठे डोंगरातील खिंडीच्या आश्रयाने ४, चार खेड्यांत जमा झाले. मोगलांची एक तुकडी त्या भागात चालून गेली. पण मराठ्यांनी जबर झुंज मांडली. तेव्हा तिकडील मोगलांनी दाऊदखानाकडे अधिक कुमक पाठवा म्हणून कळविले. त्याप्रमाणे त्याने राजा रायसिंह व अचलसिंह कछवाह यांना फौजेसह पाठविले. ही फौज येत असलेली दिसताच मराठे डोंगरात निसटून गेलेत. मोगलांनी ही चार गावेही बेचिराख करून टाकली. तेथील गरीब प्रजा, गुरे-ढोरे व मालमत्ता मोगलांच्या हाती पडली. अनेक माणसे कैद#🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:15