#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१६६१* *(वैशाख शुद्ध ११, एकादशी, श्रीनृपशालिवाहन शके १५८३, संवत्सर प्लव, वार सोमवार)* *शृंगारपुर स्वराज्यात दाखल!* *शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे जास्तच शेफरला होता. आदिलशहाच्या हुकूमानुसार महाराजां सोबत अकारण वैर धारण केले होते. शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या लाथेनी उडवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये तळकोकण मोहिमेत राजापुर घेतल्यानंतर आपला मोर्चा शृंगारपुरकडे वळवला. तिथे सूर्यराव सुर्वे आपल्या दहा हजार लोकांसह शेजारील स्वराज्याच्या मुलखात पुंडावा करत उपद्रव देत असे. हा उपद्रव नाहिसा करण्यासाठी शिवरायांनी शृंगारपुरावर अचानक छापा टाकला, पण त्याआधीच सूर्यराव सुर्वे पळून गेला. चकमक चांगली झाली, सूर्यराव सुर्वे यांचे सैनिक शरण आले आणि मराठयांनी शृंगारपूर जिंकत त्या भागात असलेला प्रचितगड देखील स्वराज्यात दाखल केला. संगमेश्वर येथे रस्त्याचे दुरुस्तीचे काम करीत असताना सुर्यरावणे विनाकारण तानाजी काकांच्या छावणीवर हल्ला केला. पण तो हल्ला तानाजी काकांनी क्षणात सावरून उधळून लावला व सुर्वेला पळून जाण्यास भाग पाडले. महाराजांना हे कळताच तानाजी काकांचा सत्कार केला आणि सुर्वेला अजून एक संधी द्यायची ठरविले व ते पत्राद्वारे महाराजांनी सुर्वेला कळविले आणि भेटीसाठी बोलावले. होकार देऊन ही सुर्वे काय भेटीला येईना. मग, महाराजांनी शृंगारपुरीकडे १५००० खड्या स्वारांसह मोहरा वळविला. घाबरून स्वतःच्या रक्षणासाठी सुर्वे पळून गेला. महाराज शृंगारपुरीत पोहोचले आणि सुर्वे पळून गेल्याचे समजताच महाराज संतापले आणि सुर्वेचे सिंहासन लाथेने उडवून लाविले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१६७५* *उत्तर कोकणात पोर्तुगी#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#📜इतिहास शिवरायांचा *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६५७* *औरंगजेब बादशहा बीदर काबीज करून कल्याणीकडे!* *२९ मार्च इ.स.१६५७ रोजी बीदरच्या किल्ल्याला वेढा दिला.२३ एप्रिल इ.स.१६५७ रोजीच्या पुर्वी तो त्याच्या ताब्यातही आला. बीदर काबीज करून औरंगजेब बादशहा २८ एप्रिल इ.स.१६५७ रोजी कल्याणीकडे निघाला. कल्याणीचा किल्ला मीर जुमल्याने वेढला होता. औरंगजेब बादशहा व मीर जुमला पुन्हा एकत्र आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६६१* *छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील “प्रचीतगड उर्फ उचीतगड” जिंकला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६६५* *मोगलांनी रोहिडा ते राजगड भागात ठाण मांडले. कुत्बुद्दीनखान व बलुदीखान (लोदीखान) हे अनुक्रमे जुन्नर तर्फ व तळकोकणात मिर्झाराजे जयसिंग यांच्या आज्ञेनूसार धुमाकूळ घालीत होतेच. आता जोडीला शव्वाल महिण्याच्या २१ एकवीस तारखेस, म्हणजेच दि. २७ एप्रिल इ.स.१६६५ रोजी दाऊदखानही किल्ले रोहिडा जवळ पोहचला आणि मोगली धुमाकूळाला चहू अंगांनी ऊत आला. किल्ले रोहिडा ते किल्ले राजगड या भागातील हिंदवी स्वराज्याची ५० खेडी मोगलांनी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली. त्या भागातील मराठे डोंगरातील खिंडीच्या आश्रयाने ४, चार खेड्यांत जमा झाले. मोगलांची एक तुकडी त्या भागात चालून गेली. पण मराठ्यांनी जबर झुंज मांडली. तेव्हा तिकडील मोगलांनी दाऊदखानाकडे अधिक कुमक पाठवा म्हणून कळविले. त्याप्रमाणे त्याने राजा रायसिंह व अचलसिंह कछवाह यांना फौजेसह पाठविले. ही फौज येत असलेली दिसताच मराठे डोंगरात निसटून गेलेत. मोगलांनी ही चार गावेही बेचिराख करून टाकली. तेथील गरीब प्रजा, गुरे-ढोरे व मालमत्ता मोगलांच्या हाती पडली. अनेक माणसे कैद#🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवसंस्कृती
*शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२७ एप्रिल इ.स.१६४५* *२७ एप्रिल हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, ज्याला 'स्वराज्य शपथ दिन' म्हणून ओळखले जाते. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या १६ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रतिज्ञा केली होती.* *दिनांक आणि वर्ष: २७ एप्रिल १६४५ काही ऐतिहासिक स्थळ: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर मंदिर.* *पार्श्वभूमी: छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या पवित्र मंदिरात आपल्या सवंगड्यांसोबत ही शपथ घेतली. त्यांनी आपली करंगळी कापून रक्ताचा अभिषेक शिवलिंगावर केला आणि 'हिंदवी स्वराज्य' स्थापन करण्याची शपथ घेतली.* *उद्देश: परकीय सत्तांच्या (आदिलशाही) जोखडातून महाराष्ट्राला मुक्त करणे आणि रयतेचे स्वतंत्र राज्य स्थापन करणे हा या शपथेचा मुख्य उद्देश होता.* *प्रमुख उपस्थिती: या ऐतिहासिक प्रसंगी कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर यांसारखे निष्ठावान मावळे उपस्थित होते.* *रायरेश्वर मंदिर: हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात समुद्रसपाटीपासून १४०० मीटर उंचीवर आहे.* *शपथेचे महत्त्व:* *ही केवळ एक प्रतिज्ञा नव्हती, तर गुलामगिरी नाकारून स्वातंत्र्यासाठी लढण्याची ती एक ठाम भूमिका होती. या दिवशी रोवलेल्या स्वराज्याच्या बीजातूनच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य मराठा साम्राज्याची उभारणी केली* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ एप्रिल इ.स.१६६३* *छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५८ साली उत्तर कोकणवर स्वारी केली. तेव्हा पोर्तुगिजांच्या चौल आणि दमण ठाण्यांना मराठा सैनिकांकडून उपसर्ग पोचला. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६१ सा#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 🚩आजचे_शिव_दिनविशेष*🚩 **२४ एप्रिल इ.स.१६७४* भोर, वाई प्रांतातील एकमेव असा किल्ले केंजळगड जिंकायचा बाकी राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकाच्या ४२ दिवस आधी स्वराज्यात दाखल करून घेतला. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !!#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती



