:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४२४ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
द्वारकेच्या बंदरावर असलेले भगवान श्रीकृष्ण हे आता एकदम आपल्या घरी म्हणजे पंढरीला आले आहे त्यामुळे ते अतिशय सवंग म्हणजे अतिशय स्वस्त झाले आहे. भक्ती रस अतिशय गोड आहे व आता त्याचा हेवा करून त्याचाच मनाला छंद लावून घेऊ. पंढरीला जाण्याकरता पावलाने चालले तर कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही आणि हरीची प्राप्ती होण्यासाठी कोणतेही संकट आड येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जर मनुष्य एकदा पंढरीला गेला की त्याचे सर्व पूर्वसंचित नाहीसे होऊन तो भाग्यवान होतो.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१६/०४/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏आई माझी काळुबाई #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝


