:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४७३ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
जे विठ्ठलाचे गीत अखंड गातात त्यांच्या पायी मी माझे चित्त ठेवीन. ज्यांना विठ्ठलाचे नाम आवडते ते माझे परम प्राणसखे आहेत. ज्यांना विठ्ठलाला आपल्या लोचनाने म्हणजे डोळ्यांनी पाहणे आवडते त्यांच्या पायाचे तीर्थ देखील मी स्वीकारील. ज्यांनी विठ्ठलाच्या ठिकाणी सर्व भक्ती भाव दिला आहे त्यांच्या पायी मी माझा जीव ठेवीन. तुकाराम महाराज म्हणतात हरीचा दास मी आहे असे जे म्हणून घेतात त्यांच्या पायाची माती मी होईल.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०४/०६/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏


