#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#२०_जून_१६६०
अथणीच्या पेठेवर मराठा सैन्याचा छापा🚩
आजच्या दिवशी शिवरायांच्या मावळ्यांनी अथणीच्या पेठेवर छापा टाकून ते धन स्वराज्यास जोडले. वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व घडत होते स्वतः शिवराय पन्हाळगडावर सिद्दी जोहर च्या वेड्यात अडकले असताना.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#२०_जून_१६७६
औरंगजेबने कंदहारच्या मोहीमेवर असलेल्या नेताजी पालकर यांना बोलावून दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहीमेसाठी पाठवले.मे १६७६ रोजी पच्छाताप झालेले नेताजी मुघल छावणीतून पळून रायगडावर आले.'नेताजी पालकर' उर्फ 'महंमद कुलीखान' पुनश्च हिंदू झाले.छत्रपती शिवरायांनी वैदीक पद्धतीने पुन्हा नेताजींना हिंदू धर्माचे द्वार खुले केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🏻
#२०_जून_१६८२
औरंगजेबपुत्र अकबराने शंभूराजाकडे आश्रय घेतल्यापासून त्या दोघाविरुध्द हालचाली सुरु झाल्या होत्या, औरंगजेब स्वतः अकबराला पकडण्यासाठी व हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत बुर्हानपूर येथे सैन्यानिशी आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांचे संभाजीविरुध्द सहाय्य मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्या दृष्टीने त्याने पोर्तुगीज विजरईला आजच्या दिवशी पत्र पाठवले, पुढे सहा महिन्यांनी ते पत्र विजरईला मिळाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
#२०_जून_१७३३
छत्रपती शाहुंचे रायगड संरक्षणासाठीचे पत्र
रायगड हा मराठ्यांचा तख्ताचा गड ता.८ जून १७३३ ला मराठ्यांना पुन्हा हस्तगत झाला..
रायगड राजधानी हस्तगत झाल्याचे वर्तमान ऐकून शाहूनी ता.२० जून १७३३ स्वहस्ताने पत्र लिहिले त्यात हा मजकूर आहे,
घेतल्या स्थळाचे संरक्षण होय ते करणे.
आम्ही ईश्वरी इच्छा आहे तर श्रावणात रायरी व बाजे किल्ला पहावयास येऊ.
शिवाजीमहाराज व आबासाहेब संभाजीमहाराज व काकासाहेब (राजाराम महाराज) व मातुश्री ताराबाई साहेब यास कोणास न जाहले ते कार्य चि.फत्तेसिंगबाबा व रा. प्रधान यांनी केले ही कीर्त जगत्रयी व निजाम उल मुल्क व दिल्ली पावेतो जाहली.
हा लौकिक जेणेकरून कायम राहील ते करणे.
अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम् । जे सांगणे ते जाते समयी सांगितलेच आहे.....
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


