#इतिहास छत्रपतींचा
⛳ #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
⛳
📜 #८_एप्रिल_इ.स._१६६७
महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. आपण वाचा.
त्यातील मुख्य विषय असा की , ‘ मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. ‘
औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली. सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜#८_एप्रिल_इ.स._१६७४
महाराज चिपळूण येथे आले. महाराज लष्कर पाहणीसाठी व नवे सरनौबत नियुक्त करण्यासाठी चिपळूणला आले. लष्कराची पाहणी करून थोर लष्करास व पायदळ लोकांस खजिना फोडून महाराजांनी वाटणी केली. याच वेळी चालू वर्षाचा खर्डा ठरवून लष्कराच्या छावण्या, नव्या नेमणुका करून टाकल्या. सरनौबतीची वस्त्रे हंसाजीराव मोहिते "हंबीरराव" यांना दिली. हंबीरराव हा मोहीते घराण्यास किताब होता. ममोहित्यांचे मूळ आडनाव चव्हाण असावे. असा कयास आहे. चिपळूणला महाराजांचा मुक्काम सुमारे महिनाभर होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜#८_एप्रिल_इ.स._१६७६
मार्च अखेरीस मराठ्यांनी कोल्हापूर जिंकले. महाराज कुडाळहून फोंड्यास गेले आणि फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला (८ एप्रिल). फोंड्याचा किल्लेदार महमदखान हा शर्तीने किल्ला लढवीत होता. त्याला जवळचे पोर्तुगीज गुप्तपणे मदत करीत होते. मराठ्यांनी ही मदत पकडली आणि पोर्तुगिजांस त्याबद्दल जाब विचारला, तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले. आमचा ह्या मालाशी संबंध नाही असा जबाब त्यांनी दिला. विजापुराहून बहलोलखान फोंड्याच्या मदतीस १५ हजार फौज घेऊन येत होता. तो मिरजेस आल्यावर त्याच्या वाटेत मोठमोठी झाडे पाडुन महाराजांनी त्यास मिरजेतच गप्प बसविले. मराठी फौजा कार्यरत राहिल्या. त्या फौंड्यांत घुसल्या. त्यांनी विजापूर फौजेची कत्तल केली. पुढे किल्लेदार महमदखान यास कैद करून फोंडा किल्ला ६ मे रोजी हिरवी स्वराज्यात सामील झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜#८_एप्रिल_इ.स._१७०३
सिंहगडाच्या तटबंदीवर तोफांची मारगिरी मोगलांनी केली. पण किल्ला तोफांच्या मारगिरीने हस्तगत होईल असे मोगलांना वाटत नव्हते. तेव्हा तरबियतखानाने मराठा शिबंदीशी वाटाघाटी केल्या. भली मोठी रक्कम किल्लेदारास दिल्यावर किल्ला ८ एप्रिल १७०३ रोजी मोगलांचे ताब्यात आला. त्या किल्ल्याचे नाव बाख्शीदाबखा (ईश्वरदत्त) असे ठेविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜#८_एप्रिल_इ.स._१७२८
ऊत्तर पोर्तुगालच्या सल्लागार मंडळाच्या सचिवाने व्हिसेरेईला पाठविलेल्या पत्राची नोंद! "डिचोलीचा किल्ला पाडून टाकावा अशी आज्ञा महाराजांनी केली आहे". वसईच्या युद्धात वाडीकर सावंत यांनी तटस्थतेचे धोरण पत्करले असावे. कारण, पेशव्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यातच कुलाबेकर आंग्रे यांच्याशी त्यांच्या कटकटी चालू होत्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜#८_एप्रिल_इ.स._१८५७
क्रांतिकारी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा ब्रिटिशांवर इतका जबर्दस्त प्रभाव पडला होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे’ याच नावाने संबोधू लागले होते.
बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜#८_एप्रिल_इ.स._१९२९
भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी संसदेत बाँब फेकले
बटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत केलेल्या बॉम्बस्फोटामुळे. तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला. या गोंधळात आपल्या विचारांची पत्रके उधळून त्यांनी बॉम्बस्फोटाचा उद्देश सर्वाना कळवण्याचा प्रयत्न केला. अन तिथून पळून न जाता स्वतःला अटक करून घेतली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


