ShareChat
click to see wallet page
search
#किरण झेंडे सोशल फाउंडेशन गुरसाळे #किरण झेंडे विचारधारा
किरण झेंडे सोशल फाउंडेशन गुरसाळे - टेब्याल , टमरेल , टेब्रेल .. उच्चार कसाही करा पण ही वस्तू आहे एकच ! ज्या काळी घरोघरी शौचालये नव्हती तेव्हा घराच्या बाहेर एका खिळ्याला अडकवलेली 3-4 डबडी दिसायची त्यांना टंब्याल असं म्हणायचे . शेतात वापरलेल्या ग्लायसिलची बाटली वरून कापली आणि दोन्ही बाजूंनी छिद्र पाडून तार गुंफली की तयार झालं टपाल अशी तयार केलेली टंब्यालं गावाकडील सगळ्यात ' फेमस ' टॅब्र्यालं असायची . किफायतशीर आणि टिकाऊ ग्रामीण महाराष्ट्रात आधीच्या काळात वापरलं जाणारं एक सोशल टूल म्हणजे टेव्याल .. होय सोशल टूलच . जेव्हा या ग्रामीण जगात व्हाट्सअप , ट्विटर , फेसबुक नव्हतं , तेव्हा होतं फक्त आणि फक्त टंब्याल गावाबाहेर शौचासाठी एक जागा ठरलेली असायची त्याला पानदी पांद किवा माळ म्हटलं जायचं . इथेच भरायचा गावातल्या सगळ्या ' टेब्पालांचा ' मेळा . सगळे गावकरी सकाळ - संध्याकाळ , पोटाला वाटेल तेव्हा एका हातात पाण्याने भरलेले टंब्याल आणि दुसऱ्या हातात मिसरी घेऊन तर कोणी गायछाप मळत पांदीकडे पळायची येता जाता रामराम झाडले जायचे आणि ' बसल्यावर गावातील राजकारण , गावातील लफडी अशा गहन प्रश्नांवर चर्चा केली जायची . तिथे व्हाट्सअप सारखे च्याटींग वगैरे असायचे . फेसबुकसारख्या नोटिफिकेशन मिळायच्या आणि पोस्ट शेअर आणि लाईक्स च्या ऐवजी हास्य आणि शिव्या . लोकांची नाती जुळायची , मेत्री होऊन ती घट्ट व्हायची ती या टंड्यालामुळेचा जिगरी दोस्तांच्या येण्याजान्याच्या वेळा ठरलेल्या असायच्या . सामोरासमोर बसून बोलणं व्हायचं .... अगदी आजच्या व्हिडिओ कॉलिंग सारखं . इथून मी थेट पांदीकडे चालली अशा डायलॉगखाली कित्येक प्रेमकथा गावात चालू झाल्या त्या या टंब्यालामुळेच . गावकऱ्यांच्या अंगात असणारा कलाकार बाहेर काढला तो याच टंब्यालानेच . ' माझं टंब्याल चांगलं की तुझ अशी अव्यक्त स्पर्धा लागलेली असायची . त्या काश्याचं टेम्पाल बघितलं का ? काय झ्याक हाय सांगू ' अश्या कॉम्प्लिमेंट्स कानी पडायच्या . ' पाणी वाचवा ' योजनेला मोलाचा हात लागला तो याच सुंदर उबड्यामुळे . ब्याल वापरलं की प्रतिव्यक्ती एक लिटरपेक्षाही कमी पाणी लागायचं . दुष्काळी भागात पाणी वाचवलं ते याच कल्पकतेने . शोचालय निधीतले गैरव्यवहार रोखले गेले ते फक्त आणि फक्त या टंब्यालाच्या वापरामुळेच . नंतर सरकारने हागणदारी मुक्त गावाची योजना आणली आणि टॅब्रेल संस्कृतीचा व्हास होऊ लागला . गावातल्या लोकांच्या हातात फेसबुक आलं आणि टंब्यालाला उतरती कळा लागली . त्या चर्चा , त्या प्रेमकथा इतिहासजमा झाल्या . आजही गावाकडे काही लोक आहेत ज्यांना चार भिंतींमध्ये बसण्याचा कंटाळा असतो . त्यांच्या हाती ब्याल पाहिलं की डोळ्यांत चमक येते .. अभिमान वाटतो ही ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या शिलेदारांचा ColorOS Notes - ShareChat