🟢धाराशिव खरीप २०२५ च्या पिकविमा वितरणाचा मार्ग मोकळा , पुढील ७ दिवसांत रक्कम खात्यात जमा करण्याचे निर्देश.. 👁️‍🗨️धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२५ हंगामातील सोयाबीन पीकविमा प्रकरणात शेतकऱ्यांच्या बाजूने अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीने Central Technical Advisory Committee (TAC) विमा कंपनीने दाखल केलेले अपील फेटाळून लावले आहे. महाराष्ट्र राज्य तांत्रिक सल्लागार समितीने (STAC) शेतकरी बांधवांच्या बाजूने दिलेला निर्णय केंद्रीय समितीने कायम ठेवला आहे. विमा कंपनीचे अपील ग्राह्य धरण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण झाल्या नसल्याचे केंद्रीय समितीने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना ७ दिवसांच्या आत प्रलंबित पीकविमा देण्याचे आदेशही विमा कंपनीला देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास विमा कंपनीवर आर्थिक दंडासह प्रशासकीय कारवाई होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील हजारो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग आता पूर्णतः मोकळा झाला आहे. 🪀 अधिक माहितीसाठी👇👇 🫧🇨 O̶M̶A̶N̶ S̶E̶R̶V̶I̶C̶E̶ C̶E̶N̶T̶E̶R̶🔰 https://whatsapp.com/channel/0029VafbbiSG3R3qVCnuj51k 🌐टेलिग्राम ग्रुप👇 https://t.me/villanonlinecenter #📄सरकारी योजना #आपले सरकार ऑनलाईन केंद्र #🎭Whatsapp status #CSC digital seva #🌾शेती आणि व्यवसाय⚙
13 likes
18 shares

More like this