ShareChat
click to see wallet page
search
औसा तालुक्यातील गोंद्री गावातील दारू विक्री कोणी रोखेल काय? गावातील नागरिकांच्या उध्वस्त होत असलेल्या संसाराचा विचार पोली तुमच्या भागातील सर्व व्हायरल व्हिडिओंसाठी डाउनलोड करा शरू अ‍ॅप (Shuru App) 👇🏻 https://shuru.co.in/dl/65BZNQ #आजची ताजी बातमी
आजची ताजी बातमी - ShareChat
औसा तालुक्यातील गोंद्री गावातील दारू विक्री कोणी रोखेल काय? गावातील नागरिकांच्या उध्वस्त होत असलेल्या संसाराचा विचार पोलीस अधीक्षक अमोल तांबे करणार का? सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार 24 एप्रिल 2026. जिल्ह्यातील अवैध धंद्याना थारा देणार नसल्याचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले असले तरी ग्रामीण भागातून तसेच गोंद्री गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील परिसरात अवैध दारू विक्री करणारा मोठ्या रुबाबात छुप्या पध्दतीने अवैध दारु विक्री करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या अवैध व बिंदासपणे दारू विक्री करणाऱ्यांवर लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांवर आळा बसविणे त्यांच्यासमोर आव्हानच ठरणार आहे. दरम्यान गावातील नागरिकांनी उध्वस्त होत असलेले संसाराचा विचार करुन अवैध दारुधंद्यावर आळा घालण्याची मागणी केली आहे. अवैध दारु विक्रीचे रॅकेट स्ट्रॉंग असल्याचे दिसून येते. दारुची छुप्या पद्धतीने होणारी वाहतुकीला आळा घालण्यास पोलिस प्रशासन कमी पडल्याचे बोलले जाते. ग्रामीण भागात काही ठिकाणी दारुच्या आहारी जावून अनेक मारामारी तर काही खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. नुकतेच बदली करण्यात आलेले पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी धडक कारवाई करत अनेक अवैध धंद्यावर आळा बसविला होता. त्यांच्या बदलीनंतर जिल्ह्यात पुन्हा अवैध दारु, मटका व जुगाराची पाळे रुजू लागली. ही पाळेमुळे खणुन काढण्यात पोलीस अधीक्षक अमोल तांबे कोणत्या नव्या युक्‍त्या वापरतात. याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. पोलिस अधीक्षकाकडून अवैध दारू विक्रीला कायमचा आळा बसणार का? जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागांतील दारु धंदे जोमाने चालु आहेत. कारवाई झाली तरी पुन्हा हा धंदा जोमाने सुरू होतो. अशा काही धंद्याना खाकी वर्दीचे अभय असल्याचे ग्रामस्थांकडून बोलण्यात येते. दारु धंद्यावर धाड पडायची असल्याचे त्याची माहिती आधीच अवैध धंदे करणाऱ्यांना कशी मिळते. याविषयी आश्‍चर्य व्यक्त होत आहे.