सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २५ जुलै इ.स.१६४८
विजापूर बादशाहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने जिंजी नजीक शहाजी राजांना कैद केले.शहाजीराजांवर वजीर मुस्तफाखानाचा विश्वासघातकी छापा पडला.
आपल्यावर काही तरी घातकी संकट येणार आहे आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असूनसुद्धा शहाजीराजे गाफील राहिले आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले. हातापायात बेड्या ठोकल्या.
राजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरास झाली.
ही घटना तामिळनाडमध्ये मदुरेजवळ घडली.
शहाजीराजांना अपमानास्पदरीतीने विजापुरात आणण्याची कामगिरी अफझलखानाने केली. राजांना 'सत्मंजिल' या हवेलीत आदिलशहाने कैदेत ठेवले, पुढे १६ मे १६४९ रोजी विजापुरच्या आदिलशहाकडून शहाजीराजांची सुटका झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏 प्रेरणादायक बॅनर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/zdaGrzExypU
📜 २५ जुलै इ.स.१६६६
छत्रपती श्री शिवराय आग्र्याच्या कैदेत बंदीस्त होते. तेव्हा त्यांच्यासोबत शेकडो मावळे होते व ते पण बंदिस्त झाले होते. त्यावेळी महाराजांच्या मनात आपल्या सुटकेसंबंधितचा आराखडा तयार केला. त्याच वेळी त्यांनी बंदिस्त झालेल्या शेकडो मावळ्यांना दक्षिणेत जाण्यासाठी बादशहाकडे फुलादखानातर्फे परवानगी मागितली. औरंगजेबने ही महाराजांची शर्त मंजूर केली.त्यानुसार मावळ्यांना दक्षिणेत जाण्यासाठी हवे असलेले परवाने दि.२५ जुलै इ.स.१६६६ रोजी मागणी केल्यानंतर महाराजांकडे सुपूर्त केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जुलै १७००
भुषनगड औरंगजेबाच्या ताब्यात
परळीहून औरंगजेब बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात जून १७०० ला कूच केली. ज्या जनावरांवर सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली. कृष्णा नदीला पूर होता. त्यातून सैन्य मोठ्या मुष्किलीने पैलतीरी पोहोचले. शेकडो उपासमारीने मेले, पुढे हळूहळू मार्ग आक्रमत मोगली लष्कर २५ जुलै रोजी भूषणगडास पोहोचले व गडाचा ताबा मिळविला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जुलै इ.स.१७५५
रामसिंगाचा सरदार जगन्नाथ पुरोहित आणि जयाप्पा शिंद्यांचा सरदार संताजी साबळे यांनी जोधपुरास वेढा घातला. विजयसिंगास ही सारी परिस्थिती अवघड झाली तो कासावीस होऊन गेला. त्याच्या फौजेस अन्नपाणीहि दुर्मिळ झाले. आणि तो अगदी टेकीला आला. अशा प्रकारे बिजेसिंगाचे लोकांवर कठीण प्रसग गुदरल्यामुळे त्याने जयाप्पा शिंद्यांबरोबर तहाचे बोलणे सुरू केले. शिंद्यांनी ५० लाख रुपये दंड मागितला. बिजेसिंगाचा वकील गोड थापा मारून शिंद्यास झुलवू लागला. पेशव्यांनी शिंद्यांस लिहिले होते की, “एकंदर परिस्थिति लक्षात घेऊन राठोडांशी लढण्याच्या ईर्षेत न पडता आपले हित साधावे. शिवाय मल्हाररावास मायेत घेऊन तह करून मोकळे व्हावे असाही निरोप पाठविला होता. पण शिंद्यांनी आपल्या मनसब्यात होळकरास घेतले नाही. तहाच्या वाटाघाटी नागोरच्या बाहेर ताऊस सरोवरावर जयाप्पाची छावणी होती तिथे चालू असता दिनांक २५ जुलै १७५५ ला जयाप्पा दुपारचे स्नान करून उठत असताच त्याचा खून विजेसिंगाने करविला. जयाप्पा चौरंगावरून एकदम खाली कोसळले. जिकडे तिकडे आरोळी पडली. तहाच्या वाटाघाटीस आलेले बिजेसिंगाचे वकील विजयभारती व जगनेश्वर, राजासिंग चव्हाण आदिंना जागच्या जागीच मराठ्यांनी कंठस्नान घातले आणि त्या दगाबाज अवलादीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मराठ्यांनी छावणीतील प्रत्येक रजपूत हुडकून काढून ठार केला. नागोर, जालोर, व जोधपूर येथील पूर्वी दिलेले वेढे मराठ्यांनी तसेच कायम ठेविले आणि शह न सोडता रांगडे कापून काढावे हा विचार केला. बिजेसिंगाने सलोखा घडवून आणण्यासाठी पुणे दरबारकडे वकील पाठविला होता, परंतु प्रकरण या थरावर गेले तेव्हा पेशव्याने बिजेसिंगाचे वकीलास सांगितले की, या उपर आम्हास तह करणे अनुकूल पडत नाही. मराठ्यांनी हिंमत धरून मारवाडच्या मनसुब्यास हात घातला. तो सिद्धीस जावा म्हणून पेशव्याने ग्वाल्हेर प्रांतातून अंताजी माणकेश्वर यास मारवाडातील मराठे फौजेच्या कुमकेस पाठविले. तसेच यशवंतराव पवार व समशेर बहादूर यांना १० हजार फौजेनिशी रवाना केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जुलै इ.स.१७६९
२५ जुलै इ.स.१७६९ शके १६९१ आषाढ व.सप्तमी रोजी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आणि जयपूर संस्थानचे राजे पृथ्वीसिंह यांच्यात सलोख्याचा तह झाला.पानिपतच्या भयंकर संहरामुळे उत्तर हिंदुस्थानातील मराठयांची सत्ता कमजोर झाली होती. शत्रू पक्ष बळावत चालला होता.आपल्या पराक्रमाने,तेजाने आणि बाणेदारपणाने पुन्हा एकदा उत्तरेत सर्वांच्यावर विजय मिळवावा या प्रयत्नांत श्रीमंत थोरले माधवराव पेशवे हहोते
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀