71 shares
More like this
- शंभू रामेश्वर ढेरे पाटील 🚩शरद ढेरे पाटील 🚩#🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #👣पाऊले चालती पंढरीची वाट #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर340233
- Nashik MH15#🙏शिवाजी महाराज वॉलपेपर6340
- ꯭꯭̽🇮🇳⃪꯭𝐒⃪꯭𝗐⃪꯭ᴀ⃪֟፝ᴘ⃪꯭ɴı⃪ʟ⃪꯭🩷⃪꯭➛꯭꯭आईसाहेब🧡🚩#😍छत्रपती शिवाजी महाराज Video Status📱 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #⚔शिवाजी महाराज स्टेटस😍1426
- sachin mohite#🙏शिवाजी महाराज वॉलपेपर3749
- 乂❤ ★♟ ❤乂❚█══तुषार══█❚#🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर561402
- ꯭꯭̽🇮🇳⃪꯭𝐒⃪꯭𝗐⃪꯭ᴀ⃪֟፝ᴘ⃪꯭ɴı⃪ʟ⃪꯭🩷⃪꯭➛꯭꯭आईसाहेब🧡🚩#😍छत्रपती शिवाजी महाराज Video Status📱 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #⚔शिवाजी महाराज स्टेटस😍82109
- ꯭꯭̽🇮🇳⃪꯭𝐒⃪꯭𝗐⃪꯭ᴀ⃪֟፝ᴘ⃪꯭ɴı⃪ʟ⃪꯭🩷⃪꯭➛꯭꯭आईसाहेब🧡🚩#⚔शिवाजी महाराज स्टेटस😍 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #😍छत्रपती शिवाजी महाराज Video Status📱213181
- KiranMore#🚩शिवराज्याभिषेक दिन (तिथीनुसार)🌹 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #🚩शिवराय #⚔शिवाजी महाराज स्टेटस😍2017
- सचिन दादा पानसरे शिरवळ शहर⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ३ ऑगस्ट इ.स.१३४७ दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलख याच्या कारकिर्दीत दक्षिणेत जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसन याने बंड करून गुलबर्गा इथे ३ ऑगस्ट १३४७ ला बहामनी राज्याची स्थापना केली. या बहामनी राज्यात १३४७ ते १५३८ या काळात एकूण १८ सुलतान होऊन गेले. बहामनी राज्यातील १४ वा सुलतान शिहाबुद्दीन महमूद याच्या कारकिर्दीच्या दरम्यान बहामनी सत्तेचा कर्तबगार वजीर महंमद गवान याची हत्या झाल्यानंतर बहामनी सत्तेचे वेगवेगळे सुभेदार जसे युसुफ आदिलखान (आदिलशाही), फतहुल्लाह इमाद (इमादशाही), कुत्ब उल्मुख (कुतुबशाही), अमीर कासीम बरीद (बरीदशाही) व मलिक अहमद बहिरी (निजामशाही) यांनी बहामनी सत्तेतून बाहेर पडत आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्या आदिलशाहीचा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/xwCZFxsw9n4 📜 ३ आगस्ट इ.स.१६६४ (श्रावण वद्य षष्ठी, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार बुधवार) महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी १० गलबतांचा ताफा रवाना ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराने हेरांनी आणलेल्या माहितीवरून पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी १० गलबतांचा ताफा रवाना केला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ३ ऑगस्ट इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम् येथे मुक्कामी आले. इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. वृद्धाचलम, कावेरीपट्टम, चिदंबरम तसेच शहाजीराजे यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही व हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला पण त्यात त्यांचा पराभव झाला. अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ आगस्ट इ.स.१७६४ माधवराव पेशवे यांनी व्हिसेरेईस पाठविलेल्या पत्राची नोंद ! या दरम्यान माधवराव पेशवे मात्र स्वस्थ बसून नव्हते. त्यांना पोर्तुगिजांनी घेतलेला किल्ले मर्दनगडाचा टापू हवा होता. त्यांनी व्हिसेरेईला पत्र पाठवून किल्ले मर्दनगड व त्याच्या कक्षेतील प्रदेश खाली करून तो मराठा अंमलदाराच्या करारान्वये हैदरअलीविरुद्ध आपणास मदत करण्याचे आवाहन केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३ ऑगस्ट इ.स.१९०० स्वातंत्र्यपूर्व काळात पत्री सरकार म्हनजेच प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान असलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे "क्रांतिसिंह नाना पाटील" होत. महाराष्ट्रातील एक देशभक्त, झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जात. त्यांचा जन्म ३ आॅगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकीपरीक्षा उत्तीर्ण झाले (१९१६) यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली पुढे सत्यशोधक चळवळीकडे ते आकृष्ट झाले. त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून तत्कालीन अंधश्रद्धा, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा व चालीरीती यांविरुद्ध लोकमत जागृत केले. अनेक अनिष्ट चालीरीतीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. 🙏क्रांतीसूर्य नाना पाटील यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀1212