वैशाख पौर्णिमा दुसरी घटना - युवराज्ञी यशोधरेचा जन्म
१) यशोधरा कपिलवस्तु गणराज्याचे राजकुमार सिद्धार्थ गौतम यांची पत्नि, कपिलवस्तुच्या जवळच रामग्राम नगरीचे राजे दण्डपाणी व आई पपिता यांची अनुपम सर्वांगसुंदर कन्या यशोधरा, तिचा वर्ण गोरा, त्वचा मृदु आणि बाणीत माधुर्य होते. आईवडिलांची अत्यंत आवडती. तिचा जन्म ही वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच झाला. तो दिवस होता इ.स.पू. ५६३.
तिसरी घटना राजकुमार सिद्धार्थ गौतमाचा विवाह
१) कपिलवस्तुच्या शेजारी रामग्राम नावाचे नगर होते. तेथील राजा दण्डपाणि. त्यांची कन्या यशोधरा. ती आपल्या सौंदर्याविषयी व चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण केले व राजा दण्डपाणि तिच्या
२) लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दण्डपाणीने आपल्या मुलीच्या स्वंयवरात भाग घेण्यासाठी शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणणे पाठविली होती. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते.
३) सिद्धार्थ गौतमालाही सोळा वर्षे पूर्ण झाली होती. त्याच्या मात्या पित्याला देखील त्याच्या विवाहाची काळजी लागली होती.
४) यशोधरा निसर्गताच अतिशय सुंदर होती. केस काळे कुरळे, वाट व लांब सडक चमकदार होते. ती मंद मंद मोहक चालीने चालायची तेव्हा तिचे हे सुंदर केस पिंडरीपर्यंत रूळायचे. राजकुमार सिद्धार्थाची माता-मावशी प्रजापतीच्या डोळ्यात ती लहानपणापासूनच भरली होती.
५) सिद्धार्थ गौतमाच्या आई व वडिलांनी त्याला स्वंयवरास जाण्यास व यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. त्याने आई वडिलांच्या इच्छेला मान दिला.
६) स्वंयवरात भाग घेतला. जमलेल्या सर्व युवकातून यशोधरने सिध्दार्थ गौतमालाच वरिले, दण्डपाणि या बावत विशेष प्रसन्न नव्हता पण यशोधररच्या आईने दण्डपाणीस विवाहान संमती देण्यास सांगितले दंडपणीने तशी संमती दिली
७) प्रतिस्पर्धी युवकांना हे पसंत पड़ने नाही. त्यांना आपला अपमान वाटला. त्यांनी निवड करतांना काही परीक्षा घेतली पाहिजे अशी मागणी केली.
८) धनुर्वियेचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेण्याचे ठरले, सुरवातीला सिद्धार्थ याचाचतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा करत प्रसंग येईल, हे त्याच्या सारथी छन्नाने त्याच्या निदर्शनास आणून दिले स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले
९) गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली. परंतु त्याची विनचुक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. अन्य स्पर्धेतही त्याने आपले प्राविण्य सिद्ध करुन दाखविले.
१०) त्यानंतर विवाह समारंभ झाला, राजा शुद्धोजन व दडपाणी ह्या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधन व महाप्रजापतिलाही अत्यानंद झाला.
११) महाकवी अश्वघोष बुद्धचरितम् संस्कृत महाकाव्यात या प्रसंगाचे वर्णन करतांना लिहितात तेव्हा स्थिरसदाचार संपन्न कुलीन, साध्वी, सुशरीरी, लज्जा व नम्रता संपन्न आणि विशाल यशस्विनी, स्त्रियांमध्ये लक्ष्मीप्रमाणे दिसणारी, यशोधरा नावाची कन्या त्या राजकुमारासाठी निवडली."
- बुद्धचरितम - सर्ग १ ला श्लोक २६
व तो मंगल परिणयाचा शुभ दिवस होता वैशाख पौर्णिमा इ.स.पू. ५४५ .
१०) युवराज्ञी यशोधरेस लोक-गौतम पत्नि, गोपा, राहुलमाता, उत्पलवर्णा बिम्बादेवी, बिम्बासुंदरी या नावाने ओळखत होते. ती जेव्हा भिक्खूणी झाली.
संघात आली तेव्हा भद्दा कच्चाना हे नाव धारण केले होते.
संदेश तुपसुंदरे कार्यसंपादक
मुक्तीदाता बुद्ध पौर्णिमा विशेषांक
#तथागत गौतम बुद्ध #बुद्ध पौर्णिमा



