डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मातंग समाजाबद्दल प्रेम...
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सात कोटी अस्पृश्य मानलेल्या जनतेचे अनभिषिक्त राजे होते. त्यांना या सात कोटी जनतेबद्दल अत्यंत जिव्हाळा-आपुलकी, प्रेम होते. सात कोटी समाज म्हणजे एक विशिष्ट जमात नसून महार, मांग, चांभार, भंगी, कोर वगैरे जमातींचा एकजिनसी समाज होय. अस्पृश्य समाज भारतात अल्पसंख्य असल्यामुळे, अल्पसंख्य जमातीवर होणारा अन्याय-जुलूम यांची स्वानुभावाने मनस्वी चीड होती. म्हणूनच डॉ. बाबासाहेब हे अस्पृश्यांतील अल्पसंख्य मातंग जातीबद्दल, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम दाखवित, अशा मातंग जातीवर अन्याय होऊं नये म्हणून अत्यंत तळमळीने त्यांना आपले समजून त्यांच्या उत्कर्षाची काळजी वाहात.
इ.स. १९३७ सालचीच गोष्ट, मुंबई असेंब्लीच्या निवडणुकीसाठी, -अस्पृश्यांतील अल्पसंख्यक मातंग जातीतील लोकांचे अर्ज मागितले व श्री. के. एम. काळोखे, मांग यांना मुंबईतून उमेदवार म्हणून उभे केले. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या व्यासपिठावरून जाहीर केले की, मांग लोकांच्या कल्याणासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन एवढेच नव्हे तर मांग लोकांवर कोणी अत्याचार केला तर मी माझे सर्व प्रयत्न मांग जातीवरील अन्याय दूर करण्यासाठीच करीत राहीन.
त्या नंतर १९३८ साली मुंबई इलाखा मातंग परिषद भरविण्याचा प्रयत्न मी, माझे स्नेही करीत असता डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला बोलावणे केले. त्या प्रमाणे भाऊसाहेब रोकडे, शंकरराव शिंदे, पवार, श्री. के. एम. काळोखे व मी राजगृहावर मुंबईस गेलो, तेथे त्यांनी आम्हास परिषदेबद्दल मार्गदर्शन केले, व या परिषदेस मी हजर राहीन असें वचन दिले. शिवाय आम्हाला सांगितले की,
मांग जातीवर स्पृश्य अस्पृश्य यांनी जर अन्याय, जुलूम, केला तर मी मांग जातीस संरक्षण देईन व मांग जातीच्या उद्धारासाठी झटेनं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मजूरमंत्री होते; त्यावेळी उच्च शिक्षणासाठी परराष्ट्रांत मागासलेल्या वर्गातील जी मुले गेली होती, त्यामध्ये मांग समाजाचे श्री. आवळे हे होते. पुढे १९४६ साली श्री. फत्तुजी गांगुर्डे यांस आणि १९५२ साली मला (खंडाळे) मुंबई असेंब्ली निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे केले. इ.स.१९५१ साली औरंगाबाद येथे शे.का.फे. च्या मेळाव्यापुढे डॉ. बाबासाहेब यांनी सांगितले कों, शे.का.फे. मध्ये या अल्पसंख्य जाती आहेत त्यांना मी प्रथम संधी देईन. ज्या ज्या वेळेस मी डॉ. बाबासाहेबांना भेटलो, त्या त्या वेळी मातंग समाजाच्या उद्धाराकरितां जिव्हाळ्याने ते विचारपूस करीत. त्यामुळे मातंग समाजास डॉ. बाबासाहेब आशास्थान वाटे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर मुक्कामी आपल्या पांच लाख अनुयायांसह बौद्ध धम्मदीक्षा घेतली. अर्थात मी त्या पवित्र सोहोळ्यांत सामील होतो. दीक्षा समारंभ संपला. नागपूरच्या शाम हॉटेलमध्ये डॉ. बाबासाहेबांना भेटण्यासाठी पूज्य दादासाहेब गायकवाड, बॅ. खोब्रागडे, बी. सी. कांबळे, आर.डी. भंडारे, कु. शांताबाई दाणी, रुपवते वकील, अॅ. शंकरराव खरात, श्री. तळींकर, श्री. कवाडे, श्री. मेश्राम, श्री. आवळे वगैरे नागपूर-मुंबई महाराष्ट्रातील आम्ही बरेच कार्यकर्ते भेटण्यास गेलो. डॉ. बाबासाहेब यांनी सर्वांची विचारपूस केल्यावर डॉ. बाबासाहेब मला म्हणाले काय रे खंडाळे "मांग लोक काय करतात." त्यावर मी म्हणालो, बाबा आपल्या पक्षाचे काम करतात. लगेच बाबा म्हणाले आता पुढे काय करणार? त्यावर मी विनयाने, नम्रपणे म्हणालो, आता मांग लोक बौद्ध धर्म प्रचार व स्वीकार करणार अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब नेहमी आस्थेवाईकपणे मातंग समाजाची चौकशी करून मातंग समाजाचा उद्धार व्हावा, अशी नेहमी ते तळमळ करीत असत...
संकलन संदेश तुपसुंदरे कार्यसंपादक
मुक्तीदाता विशेषांक
संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर गौरव गाथा
लेखक आर.जी. खंडाळे, दाँड.
#🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #☸️जय भीम
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ पत्र व मराठी हस्ताक्षर.
"हे पत्र बाबासाहेबांनी लंडनहून शिवतरकरांना पाठवलेले असून वाघमारे गुरूजी यशवंतराव व मुकुंदराजांची शिकवणी घेत असत."
आमच्या मुलांच्या शिक्षणाकडे आपण
विशेष लक्ष पुरवावे अशी माझी विनंती
आहे. तूर्त रा. वाघमारे यास तीन
रुपयावर चालत असल्यास सांगणे. घरी
जरा तंगी आहे. मी परत आल्यानंतर
त्यांच्या उपकाराची फेड करीन. ते
कबूल नसतील तर, आहे तो मुषाहिरा
चालू ठेवावा.
गडकर्यांची नाटके पाठवण्यास
विसरू नये. रा. रा. भातणकर बाळकृष्ण
यास नमस्कार सांगणे.
आपला स्नेहाळू
भीमराव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : हस्ताक्षर ❤️☘️🌿
कृपया मला जेवढ या पत्रामध्ये हस्ताक्षर समजलं ते मी इथे लिहिला आहे..
#ThanksAmbedkar #महामानव #jaibhim #ambedkar #jaybhim #जयभीम #सही #rarephotos
#letter
#🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम
राजधानी राजगडवरून रायगडला हलवण्यामागे शिवाजी महाराजांची प्रचंड दूरदृष्टी होती.
मिर्झा राजा जयसिंह आणि शाइस्तेखान यांच्या मोहिमांमुळे महाराजांना स्पष्ट जाणवले की राजगडाजवळ शत्रू सहज पोहोचू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन, अधिक सुरक्षित आणि सामरिक राजधानीची गरज निर्माण झाली.
रायगड निवडण्याची मुख्य कारणे अशी —
तो समुद्राजवळ होता, त्यामुळे आरमार, बंदरे आणि कोकणावर नियंत्रण सोपे झाले.
रायगडाभोवती मोठा डोंगर नव्हता, त्यामुळे कोणत्याही बाजूने तोफेचा मारा करणे कठीण होते.
सुमारे 4000 फूट उंची, दाट जंगल, कठीण घाटमार्ग, काळ–गांधारी नद्यांचा नैसर्गिक वेढा यामुळे रायगड अत्यंत अभेद्य होता.
महाडसारखे बंदर जवळ असल्याने रसद, व्यापार आणि सागरी हालचाली अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येत होत्या.
तसेच रायगडावरून मोगल, आदिलशाही, सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज या सर्वांवर दबाव ठेवणे शक्य होते.
राजगड हा स्वराज्याच्या संघर्षकाळाचा दुर्ग होता, पण रायगड हा स्वराज्याच्या सार्वभौम साम्राज्याचा सिंहासनदुर्ग ठरला.
#shivajimaharaj
#chhatrapatishivajimaharaj
#shivajimaharaj
#मराठा_साम्राज्य
#छत्रपती
#छत्रपतीप्रेमी
#🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
"उपवर्गीकरण आणि महार जातीवरील
अप्पलपोटेपणाचे निराधार आरोप"
बाबासाहेब तितकेच प्रासंगिक, तितकेच समर्पक, कालही ...आजही... उद्याही...
"महारेतर जातींना महारांपासून निराळे राहण्याची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल तसे करावे. त्यांनी स्वतंत्र राहून अस्पृश्योद्धाराचे काम केले तरी आमची ना नाही, पण त्यांनी विशिष्ट लोकांच्या छत्राखाली मात्र राहु नये अशी माझी विनंती आहे.
...मुस्लिमांपासून बचाव व्हावा म्हणून अस्पृश्य निवारण करण्याचा डाव सध्या हिंदू सभा खेळत आहे. असे मला वाटते. अश्या स्थितीत महारेतर बंधूंना माझी एवढीच विनंती आहे, त्यांनी कोणाच्याही कच्छपी लागू नये. निराळे रहा परंतु कोणाचे बगलबच्चे होऊ नका एवढेच माझे तुम्हाला सांगणे आहे..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संपूर्ण भाषण...
बुधवार, ता. २०जुलै १९२७ रोजी सायंकाळी साडे सात वाजता पुण्याच्या "दीनबंधु" पत्राचे संपादक डॉ. नवले यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य लोकांची जाहिर सभा भरली होती. सदर सभेला डॉ बाबासाहेब आंबेडकर, के. के .सकट, वायदंडे, आर्यसेवक रा. ओघळे इ. मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. सदर प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हटले...
"... मी आज मनमोकळे करुन बोलणार आहे. माझ्या भाषणाचा कोणीही विपर्यास करू नये. मि. सकट आणि मि. वायदंडे यांनी सध्या माझ्यावर विनाकारण टिका सुरु केली आहे. पुढाऱ्यावर नेहमी टिका व्हायचीच हे मी जाणून आहे. मी महार जातीचा आहे . हे आपणास माहितच आहे. महार जात स्वार्थी आहे हे टिकाकारांचे म्हणणे आहे. परंतु अस्पृश्य वर्गाच्या महारेतर जातीतील पुढाऱ्यांनी महारांकरिता निस्वार्थी बुद्धिने काम केले आहे काय ? असा माझा त्यांना उलट स्पष्ट सवाल आहे. त्याचप्रमाणे नाशिक व जळगाव येथे वसतिगृह काढून महार व महारेतर जातींच्या उन्नतिकरिता आम्ही सदोदित झटत आहोत. असे करीत असताना महार जातीविरुद्ध गिल्ला करण्यात काय हाशिल आहे. हे आम्हास समजत नाही.
सरकारकडून मिळणाऱ्या सवलती अस्पृश्य जातीत योग्य प्रमाणात वाटल्या न जाता फक्त महार जात अप्पलपोटेपणा करून सर्व सवलती बळकावून बसते असे टीकाकारांचे म्हणणे आहे. मुंबईत मि. निकाळजे नावाच्या महार जातीतील गृहस्थास मुंबई कारपोरेशनमधे नॉमिनेट केले होते. पण अखिल अस्पृश्य वर्गाची कामे त्यांच्या हातून व्हावी तशी होत नाही. ही गोष्ट माझ्या लक्षात आली तेंव्हा त्यांची जागा चांभार जातीतील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मि. बाळू यांना मीच सरकारकडून देवविली. सातारा शहरात महार लोकांची पुष्कळ वस्ती असून सुद्धा येथील म्युनिसिपालटीत सरकार नियुक्त सभासद चांभार जातीतीलच आहे. ह्या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्या असता महार जातीवरील अप्पलपोटपणाचा आरोप किती फोल आहे, हे दिसून येण्यासारखे आहे.
काही अज्ञानी महार लोक व्यापक दृष्टीचे नसतील. पण एवढ्याच कारणावरुन अखिल महार जातीस दूषण लावणे चांगले नाही. महार जातीतिल पुढारी काय करतात हे अवलोकन करा आणि नंतर दुषणे देण्यास पुढे या असे माझे इतर जातीतिल लोकांना अग्रहाचे सांगणे आहे. मी स्वतः मांग जातीशि रोटी बेटी व्यवहार करण्यास तयार आहे. अशी स्थिती असताना महार मांगाना तेढ का असावी हे समजत नाही. मी स्वतः माझ्या घरी मांगाचा मुलगा पोटच्या पोरा प्रमाणे पाळला होता. अजुन कोणी मला जर एखाद्या मांगाचा मुलगा आणून देईल तर मी त्याचे पालनपोषण करिन. आम्ही नुसते बोलके पुढारी नसून प्रत्येक गोष्ट कृतीत करून दाखवतो.
वास्तविक पाहता , महारेतर जातीच शैक्षणिक आणि सांपत्तिकदृष्टया श्रेष्ट आहेत. मुंबईत तर चांभार आणि ढोर जातीतिल काही गृहस्थ इनकमटॅक्स देण्याइतके सधन आहेत. असे असताना त्यांनी महार लोकांच्या उन्नत्तिप्रीत्यर्थ काही प्रयत्न केल्याचे माझ्या एकिवात नाही. उलटपक्षि, आम्ही अनेक उपयुक्त संस्था काढून नुसत्या महार जातीच्याच नव्हे तर अस्पृश्यांच्या सर्व जातीच्या उन्नत्तिकरिता काया वाचा मने झटत आहोत. बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन करुन अस्पृश्योंन्नतीचे काम आम्ही हाती घेतले आहे. सोलापुरात आम्ही अस्पृश्यांकरिता वसतिगृह काढले आहे. त्यास चांभरांनी मदत दिलेली नाही. तरीपण महार मांग चांभार सर्व जातीतिल मुले त्या गृहात आम्ही घेतली आहेत. "आणखी मांग विद्यार्थी त्या गृहात आपण जरूर पाठवावा." अशी मी मि. सकट यांणा समक्ष विनंती केली आहे.
इतकेहि असून जर महारेतर जातींना महारापासून निराळे राहण्याची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल तसे करावे. त्यांनी स्वतंत्र राहून अस्पृश्योद्धाराचे काम केले तरी आमची ना नाही, पण त्यांनी विशिष्ट लोकांच्या छत्राखाली मात्र राहु नये अशी माझी विनंती आहे.
...मुस्लमानांपासुन बचाव व्हावा म्हणून अस्पृश्य निवारण करण्याचा डाव सध्या हिंदू सभा खेळत आहे. असे मला वाटते. अश्या स्थितीत महारेतर बंधूंना माझी एवढीच विनंती आहे, त्यांनी कोणाच्याही कच्छपी लागू नये. निराळे रहा परंतु कोणाचे बगलबच्चे होउ नका एवढेच माझे तुम्हाला सांगणे आहे..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(सन्दर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे खंड १८ भाग २ पृ ५७-५८)
टीप : महारेतर म्हणजे महार सोडून इतर लोक
संकलक : Anand Arkade
-------------------------------------------------------------
#DrBabasahebAmbedkar #JayBhim #Ambedkarite #BhimArmy #Samata #SocialJustice #EqualityForAll #ConstitutionOfIndia #WeAreAmbedkarite #JaiBhimArmy
#जयभीम #बाबासाहेब #आंबेडकरवादी #समता #संविधान #मानवाधिकार #दलितएकता #बहुजन #जयभीम_ट्रेंडिंग
#उपवर्गीकरण #आरक्षण #सामाजिकन्याय #संघर्ष #आंबेडकरीविचार #दलितआवाज #EqualityMatters #CasteFreeIndia
#TrendingNow #ViralPost #ShareNow
#SupportJustice
#VoiceOfPeople
#inspirationalquotes
#TruthMatters
#StandForJustice
#🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम
कामगार नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य परळसारख्या कामगार वस्तीत असल्याने कामगारांच्या प्रश्नांची व परिस्थितीची त्यांना चांगली माहिती होती. अस्पृश्यांच्या मुक्तीचे कार्य करीत असतानाच शेतकरी व कामगार यांची हलाखीची
स्थिती व त्यांच्यावरील अत्याचार दूर करण्यासाठी ऑगस्ट १९३६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'स्वतंत्र मजूर पक्षाची' स्थापना केली. या पक्षाचा उद्देश आणि धोरण ठरविताना काही मुद्यांवर भर दिला.
१. कामगारांच्या मजुरीची किमान मर्यादा ठरवून देणे.
२. कामाचे तास कमी करणे.
३. कामाचे योग्य वेतन.
४. कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या बालकांसाठी शिक्षणाची सोय करणे.
५. कामगारांसाठी स्वस्त घरे, भरपगारी रजा, आजारी रजा, वयोवृद्धत्त्वाचे पेन्शन, अपघाती नुकसान भरपाई.
६. कामगारांच्या नोकरीची शाश्वती, बढती यासंबंधी थेट कायदेशीर तरतूद करणे.
कामगार नेतेपदाच्या कारकिर्दीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून केली. खोती नष्ट होऊन कुळांच्या ताब्यातील जमीन रयतवारी पद्धतीने त्यांच्याच मालकीची व्हावी असा हेतू होता. परंतु राज्यकर्त्यांनी हा प्रश्न रेंगाळत ठेवला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी सरकारच्या विधिमंडळावर मोर्चा न्यायचा निर्णय घेतला. 'या विधेयकाला पाठिंबा द्या' अशी घोषणा देत मोर्चा विधिमंडळाकडे निघाला. आझाद मैदानाजवळ मोर्चा अडविण्यात आला. प्रचंड सभेसमोर भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, 'जगामध्ये दोन वर्ग आहेत. गरीब व श्रीमंत, पिळले जाणारे व पिळणारे, तिसरा मध्यमवर्ग परंतु तो अगदी लहान आहे. म्हणून शेतकरी व कामगार यांनी दैन्याची कारणे कोणती आहेत याचा विचार करावा. त्यांच्या दैन्याची कारणे त्यांना पिळणाऱ्यांच्या श्रीमंतीत आहेत असे दिसून येईल. त्याला उपाय एकच, तो म्हणजे त्यांनी जातीनिरपेक्ष बुद्धीने मजुरांची आघाडी संघटित करून आपले खरे हित करतील असेच कार्यकर्ते विधिमंडळावर निवडून देणे. त्यांनी असे जर घडवून आणले तरच त्यांना आसरा आणि वस्त्र यांचा लाभ होऊ शकेल. राष्ट्रासाठी जे अन्न व इतर संपत्ती निर्माण करणारे ते तुम्ही भुकेकंगाल होणार नाही.'
शेतकऱ्यांप्रमाणे रेल्वे कामगारांचीही संघटना बांधण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाती घेतले. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे रेल्वे कामगारांची भव्य परिषद भरविली. या परिषदेसमोर बोलताना ते म्हणाले, 'ब्राह्मणशाही व भांडवलशाही हेच कामगारांचे दोन मुख्य शत्रू आहेत. ब्राह्मणशाही याचा अर्थ ब्राह्मणांना लाभलेली सत्ता, त्यांचे विशेष हक्क अगर जात असा करीत नाही. माझ्या मते, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय यांचा अभाव म्हणजे ब्राह्मणशाही. ब्राह्मणशाहीचे उत्पादक ब्राह्मणच असले तरी तिची मर्यादा ब्राह्मण समाजापर्यंत नाही. ब्राह्मणशाहीचे दुष्परिणाम केवळ सामाजिक हक्क, आंतरजातीय विवाह आणि सहभोजने यावर होत नाही तर या ब्राह्मणशाहीने सामाजिक हक्क, नागरी हक्क नाकारले आहेत, याची नोंद घेतली पाहिजे. दलित वर्गातील कामगारांना काम मिळण्याची व नोकरीतील बढतीची संधी या ना त्या कारणाने नाकारली जाते. रेल्वेतील कामगार, गँगमन नोकरीतच आयुष्यभर कुजत आहे. रेल्वे मास्तरच्या घरी चोवीस तास गुलामाप्रमाणे रेल्वे हमाल राबतो, पण खलाशीची अगर फायरमनची नियमित नोकरी मात्र त्याला नाकारली जाते. ही अवस्था दूर करण्यासाठी सर्व रेल्वे कामगारांनी संघटनेत एकत्र येऊन त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा मुकाबला केला पाहिजे.' या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आवाहनामुळे रेल्वे कामगारांत चैतन्य निर्माण झाले.
सप्टेंबर १९३८ च्या सुमारास औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात विचारार्थ मांडले गेले. या विधेयकाला विरोध करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
पुढील भागात
मुक्तिदाता विशेषांक
#🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
28 April 1932
को पूना में अपने स्वागत कार्यक्रम में
स्वागत भाषण के उत्तर में डॉ. अंबेडकर ने कहा "वर्तमान में मैं इस हिन्दू भारत में सबसे घृणित व्यक्ति हूं। मुझे एक देशद्रोही की संज्ञा दी जाती है तथा हिन्दुओं का शत्रु बताकर बदनाम किया जाता है। मुझे हिन्दू धर्म का विनाशक तथा देश का सबसे बड़ा शत्रु कहा जाता है। परन्तु मेरी इस बात का विश्वास करें कि कुछ समय बाद गोलमेज अधिवेशन की प्रकाशित रिपोर्ट का निष्पक्ष अध्ययन इतिहासकारों द्वारा किया जाएगा तो भविष्य में आने वाली हिन्दू पीढ़ियाँ मेरी देश सेवा की प्रशंसा करेंगी। अगर वे इसे स्वीकार न भी करें तो मुझे इसकी कोई चिन्ता नहीं उन्होंने बड़े शांत भाव से यह कहते हुए समापन किया कि मेरी बड़ी सन्तुष्टि इसमें है कि दलित वर्ग की मेरे काम के प्रति अव्यक्त आस्था है और वे मेरे लक्ष्य प्राप्ति में अविभाजित मेरे साथ खड़े हैं। मैं दलितों के यहां पैदा हुआ, उन्हीं में मेरा पालन पोषण हुआ व उन सबके बीच मैं रह रहा हूं उस दलित वर्ग की मरने तक भी सेवा करने तथा उनके अधिकारों की लड़ाई लड़ने की पूर्ण गंभीरता से प्रतिज्ञा करता हूं। मैं अपने सही उद्देश्य के मार्ग से तनिक भी विचलित नहीं होऊंगा और हिंसक तथा मुझे नीचा दिखाने वाले अपने निंदकों की आलोचनाओं की परवाह नहीं करूंगा।
डॉ.अंबेडकर के भाषण में कई अतिरिक्त पहलू भी थे जो "बम्बई क्रानिकल" समाचार पत्र में छपे थे। वे पहलू इस प्रकार हैं
डॉ.अंबेडकर ने उत्तर देते हुए कहा, मुझे अपने लोगों के लिए मुझे न मंदिर चाहिए, न पानी के कुएं चाहिए और न ही अंतर्जातीय भोज मुझे तो केवल सरकारी नौकरी, अनाज, कपड़े, शिक्षा व दूसरे सुवअसर चाहिए।"
संदर्भ : बाबासाहेब डॉ.अंबेडकर संपूर्ण वाङ्मय खंड 37 पृष्ठ 77-78 कोटेशन पृष्ठ 77
#🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम
❝ मुसलमान सत्ताधारी हिंदूंवर सतत अत्याचार करीत होते. त्यात हिंदू समाजाच्या व देशाच्या दीर्घकालीन हानीस कारण झालेला सर्वांत मोठा अत्याचार म्हणजे बळजबरीने अनेक हिंदूंचे केलेले धर्मांतर होय. मुसलमानांनी बाटविलेल्यांना हिंदू धर्मात परत घेण्यास हिंदू समाजाचा फार मोठा विरोध होता. समाजाचा हा विरोध मोडून काढणे मोठमोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींनाही त्याकाळी शक्य नव्हते. उलट, बाटविलेल्यांना स्वधर्मात घेण्याची गोष्ट राहोच; परंतु त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्यांनाही स्वधर्मात मुकावे लागे.
अशा त्या कठीण काळात, विशेषतः सर्व देशभर मुसलमानी सत्तेचा फार मोठा प्रभाव असताना, शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकर या प्रतिष्ठित व बलाढ्य सरदारास पुन्हा हिंदू धर्मात आणले. बजाजी निंबाळकर हा विजापूर दरबाराच्या बळजबरीमुळे मुसलमान झाला होता. शिवाजी महाराजांनी त्यास शुद्ध करून हिंदू धर्मात परत घेतले. अफजलखानाने बळाने बजाजीस बाटविले असल्याने त्याचा काही दोष नसल्याचे शिवाजी महाराज व मातोश्री जिजाबाई यांनी समाजास पटवून दिले. त्यामुळे त्याच्या शुद्धीकरणास मान्यता मिळाली. शिखर शिंगणापूरच्या उपाध्यांकडून हे शुद्धीकरण विधीपूर्वक करून घेण्यात आले.
तसेच, शुद्धीकरणानंतर ती व्यक्ती पुन्हा हिंदू समाजात पूर्णपणे एकरूप होण्यासाठी तिला समाजात मानाने स्थान मिळणे आवश्यक आहे, ही महत्त्वाची बाब शिवाजी महाराजांनी लक्षात घेतली. म्हणूनच त्यांनी आपली मुलगी सखुबाई हिचा विवाह बजाजी निंबाळकरांचा मुलगा महादजी याच्याशी लावून दिला. तसेच त्याला पुणे परगण्यातील वाळे येथील पाटीलकीही दिली. अशा प्रकारे महाराजांनी केवळ शुद्धीकरणच केले नाही, तर त्या शुद्धीकरणास समाजात प्रतिष्ठाही मिळवून दिली.
दुसरे महत्त्वाचे शुद्धीकरण म्हणजे प्रसिद्ध योद्धा नेताजी पालकर यांचे. नेताजी पालकर मुसलमान बनल्यानंतर जवळजवळ दहा वर्षे औरंगजेबाच्या चाकरीत राहिला. इ.स. १६७६ मध्ये शिवाजी महाराजांवर औरंगजेबाने काढलेल्या मोहिमेत तो दिलेरखानाबरोबर महाराष्ट्रात आला. त्यानंतर तो सरळ रायगडावर जाऊन महाराजांच्या पाया पडला.
शिवाजी महाराजांचे मोठेपण असे की, जवळजवळ आठ-दहा वर्षे इस्लाम धर्मात राहिलेल्या नेताजी पालकरांना त्यांनी शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले. त्यांच्या बायका-मुलांनाही शुद्ध करून घेतले. यानंतर जबरदस्तीने ख्रिस्ती वा मुसलमान झालेल्या अनेक लोकांनी आपल्यालाही शुद्ध करून घ्यावे, अशी मागणी केली.
या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शिवाजी महाराजांनी शुद्धीकरण खाते सुरू केले.
©GoldenHistoryOfMarathas
#🚩शिवराय
#🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर
आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका...
चेंबूर, मुंबई येथील 'अस्पृश्य संघटना मंडळा' तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हीरक महोत्सवाच्या रूपाने इमारत फंडास १००१ रु. दिले. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुक्रवार दिनांक २९ मे १९५३ रोजी चेंबूर विभागाला भेट दिली. सदर प्रसंगी हँडबिले काढली नव्हती तरीही स्त्री-पुरूषांचा अफाट जनसमुदाय जमला होता.
सदर प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी अस्पश्यांनी वापरावयाचा पोषाख आणि दागदागिने याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले,
भगिनींनो व बंधुंनो,
तुम्ही आतापर्यंत हे एक हजार एक रुपये धरून चा हजारावर रक्कम इमारत फंडाला दिली आहे, अशी माहिती माझे मित्र व शे.का. इंप्रुव्हमेंट ट्रस्टचे सेक्रेटरी श्री. उपशाम यांनी मला दिली आहे. तुमच्या वस्तीच्या मानाने ही रक्कम बरीच मोठी आहे. एवढी रक्कम तुम्ही दिल्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. तुम्ही जसे आपले कर्तव्य पार पाडले तसेच आपले सर्व लोक जर इमारत फंडाबद्दलचे आपले कर्तव्य पार पाडतील तर मुंबईतच हा फंड एक लाखावर जमेल व आपली इमारत टोलेजंग होईल अशी मला आशा वाटते.
अलिकडे आपल्या समाजातील तरुणांचा व तरुणींचा पोशाख मला आवडतो. नेहमी आपणाजवळ कमीतकमी दोन पोशाख पाहिजेत. आपण जो धंदा करतो त्यावेळी घालावयाचा एक पोशाख व धंदा संपल्यानंतर, श्चिर्भूत झाल्यानंतर घालावयाचा दुसरा पोशाख, मी पाहातो की आमचे काही लोक निरनिराळ्या ऑफिसात व कंपन्यात कामाला असतात. तेथे त्यांना खाकी युनिफॉर्म मिळतो. हा पोशाख त्यांनी कामापुरताच घालावा. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्याला शोभेल असा पोशाख करावा. नोकरी-धंद्यातलाच पोशाख सभा, समारंभात किंवा लग्नकार्यासारख्या खाजगी प्रसंगी वापरणे बरे दिसत नाही....
संकलन संदेश तुपसुंदरे कार्यसंपादक
मुक्तीदाता विशेषांक
संदर्भ जनता, दि. ६ जून, १९५३,
सर्व भारत बौद्ध करणे हे माझे उद्दिष्ट...
बाबासाहेबांना जे कार्यकर्ते भेटावयास येत असत, त्यांच्यापाशी ते बौद्ध धर्म दीक्षेसंबंधी चर्चा करीत असत. साधारणपणे दहा लक्ष लोकांना दीक्षा देण्याचा समारंभ उरकता येईल. या दहा लक्ष लोकांच्या जेवणाची व दोन दिवस राहण्याची सोय (दरडोई फक्त एक रुपया दर घेऊन) ज्या ठिकाणी करता येईल, असे ठिकाण नक्की करणे, याबद्दल बाबसाहेबांच्या दृष्टीपुढे मुंबई, औरंगाबाद, सारनाथ व नागपूर ही ठिकाणे होती. या ठिकाणी व्यवस्था करता येईल, याबद्दल चर्चा होत असत. तारीख ५ ऑगस्ट १९५६ ला व्हरांड्यात बसून बाबासाहेबांनी आलेल्या लोकाबरोबर चर्चा केली. या बैठकीत दिल्लीतील अस्पृश्यवर्गीय कार्यकर्ते सोहनलाल शास्त्री यांनी बाबासाहेबांना अनेक प्रश्न विचारले व त्या प्रश्नांना बाबासाहेबांनी उत्तरे दिली. या प्रश्नोत्तरांवरून बाबासाहेबांच्या मनात धर्मदीक्षेबद्दलच्या विचारांचे कसे आंदोलन चालले होते हे दिसेल.
शास्त्री : बाबासाहेब ! बौद्ध धर्मापेक्षा ख्रिस्ती किंवा इस्लामी धर्म आपणाला जास्त फायदेशीर होणार नाही का?
बाबासाहेब : ते धर्म आपणाला फायदेशीर कदाचित होतील, पण ते भारतात निर्माण झालेले धर्म नाहीत. त्या धर्माचा आपण स्वीकार केला तर आपणाला इतर देशांतून, आपल्या लोकांच्या भौतिक उन्नतीकरिता खूप पैसाही मिळेल. आपणाला भारतीय राजकारणात खूप बळही कमावता येईल. पण या सर्व गोष्टी परस्वाधीन होऊन आपणाला करता येतील. दुसऱ्यांच्या ओंजळीने दुसऱ्यांचे पाणी पिऊन आपल्या सर्वांगीण प्रगतीची तहान भागविणे हा पुरुषार्थ नव्हे स्वतःच्या हिंमतीने स्वावलंबनाने व स्वाभिमानाने आणि स्वदेशी नव्या धर्माच्या आश्रयाने आपण आपली प्रगती केली तर तो खरा पुरुषार्थ ठरेल. आणि भारतीय इतिहासात आपला पुरुषार्थ सोनेरी अक्षरांनी लिहिला जाईल. खिस्ती अगर इस्लामी धर्मानी आपली भारतीय संस्कृती नष्ट होईल. आणि जातिवंत संस्कृती राखणे हे बौद्ध धर्माच रहस्य आहे. ते ज्यांना उमगेल तेच माझ्या धर्मदीक्षेबद्दल मनात किंतु बाळगणार नाहीत. बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे व सर्व भारत बौद्ध करणे हे माझे उद्दिष्ट आहे.
शास्त्री : हे आम्हाला मान्य. पण मग आम्हाला अस्पृश्य समाज म्हणून विद्यार्जन व नोकऱ्या यासंबंधात ज्या सरकारी सवलती मिळतात त्या प्रतिरानंतर चालू राहतील का?
बाबासाहेब : अलबत ! आणि सरकारने त्या जर बंद केल्या तर
आम्ही त्या मिळविण्यासाठी झगडत राहू. कारण त्या घटनेत नमूद आहेतच. आपल्या समाजात महार, चांभार वगैरे जे भेद आहेत ते नष्ट करून सर्व समाज बौद्धधर्मीय तयार करणे व त्यांच्यातर्फे हक्कांसाठी झगडत राहणे व इतर समाजातील लोकांना बौद्ध करून आपल्यात घेणे, असा आपला दुहेरी लदा राहील आणि तो आपल्या ऐक्यशक्तीने यशस्वी होईल.
शास्त्री : बौद्ध धर्माबद्दल आपल्या लोकांना काही माहिती नाही. आपण आतापर्यंत तसा प्रचार केलेला नाही. याच्यापुढे एकाएकी दीक्षा समारंभ घेतला तर लोक बुजतील, संभ्रमात पडतील. कदाचित लोकांचा विरोधही होईल. मग मोठा पेचप्रसंग उत्पन्न होईल.
बाबासाहेब : अशी परिस्थिती उत्पन्न होणार नाही, याची मला खात्री आह. लोक दीक्षेसाठी उत्सुक आहेत. जे उत्सुक नाहीत ते १०-१५ वर्षांनी दीक्षा घेतील, अशी उत्तेजक परिस्थिती उत्पन्न करू.
शास्त्री : मग दीक्षा समारंभ कोठे घेणार?
बाबासाहेब : माझ्या दृष्टीसमोर चार ठिकाणे आहेत. मुंबई, औरंगाबाद, सारनाथ व नागपूर. सुमारे दहा लाख लोकांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था मामुली आकार घेऊन करायची. हे प्रमुख कार्य करण्यास जेथील लोक उत्साहाने पुढे येतील तेथेच दीक्षा समारंभ होईल. पण माझ्या मनाचा कल म्हणाल तर नागपूरकडे जास्त आहे !
शास्त्री : का? नागपूरच का?
बाबासाहेब : त्याला ऐतिहासिक कारणे आहेत. नागपूर हे नावच सांगते की हे नागवंशीय लोकांचे शहर होते. हे नागसंस्कृतीचे केंद्र होते. बुद्ध हा नावंशीय टोळीत जन्मला. आपणही सारे नागवंशीय आहोत. आपण हजारो वर्षापूर्वी बौद्ध होतो. पुन्हा आपण बौद्ध होणार हे बौद्धनाग संस्कृतीच्या केंद्रात. तेथून धर्मदीक्षेचा झेंडा सर्व भारतात फिरेल...
दिल्ली - तारीख ५ अगस्त, १९५६ सोहनलाल शास्त्री यांनी धम्मदीक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले उत्तर..
संदेश तुपसुंदरे कार्यसंपादक
मुक्तीदाता बुद्ध पौर्णिमा विशेषांक
संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र, खंड १२ वा, लेखक चांगदेव खैरमोडे, पृष्ठ-४४-४५.
#🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर














