सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 १० ऑगस्ट इ.स.१६००
अहमदनगर अकबर बादशहाने जिंकले
अहमदनगर ही निजामशहाची राजधानी होती. इस १५९५ मधे बुर्हाण निजामशहा मरण पावला व निजामशाहीत गादीविषयी तंटे सुरु झाले. मात्र इथे एक गडबड अशी झाली की, वजीराने गुजरातचा अंमलदार शहजादा मुराद याच्याकडे मदत मागितली. हा मुराद अकबराचा मुलगा होता. इस १५५६ मधे मुघल बादशहा बनल्यानंतर अकबराने अनेक पराक्रम करून मुघल साम्राज्यात काश्मीर, काबुल, कंदाहार, सिंध असे अनेक प्रदेश जोडले. मात्र दख्खन मोहिमेमधे १५९५ सुमारास त्याचा पराभव झाला होता. आता यावेळी दख्खनमधे शिरकाव करण्याची हिच संधी आहे हे ओळखुन अकबराने मुरादला अहमदनगरला जायची परवानगी दिली. मीर्झाखान व मुरादच्या फौजेने येऊन अहमदनगरला वेढा घातला. मात्र गेली काही वर्षे स्वपराक्रमाने निजामशाही टिकवुन ठेवणारी चांदबिबी यावेळी कंबर कसुन उभी राहिली. ही चांदबिबी म्हणजे निधन पावलेल्या बुर्हाण निजामशहाची सख्खी बहीण होय. तिचा निकाह विजापुरचा पहिला आदिलशहा याच्याशी होऊन ती काही वर्षे विजापुरलाच होती. मात्र पुढे काही कारणाने ती परत तिच्या माहेरी निजामशाहीत आली होती. याही वेळी तिने मुघलांच्या नाकी नऊ आणले. मात्र दोन्हीकडच्या फौजा जेरीस आल्याने वर्हाड प्रांत चांदबिबीने मुघलांना तह करून दिला. मात्र प्रत्यक्षात त्याचा ताबा मुघलांना मिळाला नाही. त्यातच मीर्झाखान शत्रूला फितुर झाला आहे या संशयावरून अकबराने त्याला परत बोलावुन त्याचा नवरत्नांपैकी एक जिवलग अबुल फजलला नगरकडे धाडले. मात्र लवकरच शहजादा मुराद मोहिमेवर असतानाच अचानक मरण पावला. तेव्हा पुढे नेतृत्व चालु ठेवण्यासाठी व अहमदनगर काबीज होत नाहीये हे पाहुन अबुल फजलने अकबरालाच दख्खनमधे येण्याची विनंती केली. अकबर गेली १४ वर्षे सिंधू नदीच्या परिसरात रहात होता. तिथुन तो आग्र्याला येऊन नंतर प्रथमच नर्मदा नदी ओलांडून दख्खनमधे आला. तोपर्यंत दौलताबादचा (मुळचे देवगिरी) किल्ला मुघल सैन्याने जिंकुन घेतला होता. त्यात परत गडबड अशी झाली की, निजामशाहीतीलच काही शत्रूंनी व फितूरांनी पराक्रमी चांदबिबीचा दगाबाजीने जुलै १६०० मधे खून केला आणि मुघलांच्या मार्गातील मुख्य अडसर दूर झाला आणि १० ऑगस्ट १६०० रोजी शहजादा दानियाल व खान ई खानान यांनी निजामशाही राजधानी अहमदनगर जिंकले. मात्र तरीही संपूर्ण अहमदनगर अकबराला जिंकता आले नाही कारण आता चांदबिबीच्या जागी एक निजामशाहीतील पराक्रमी सरदार मलिक अंबर मुघलांविरूद्ध लढायला उभा राहिला. लवकरच त्याने अहमदनगर व दौलताबाद पुन्हा मुघलांकडुन जिंकुन घेतले व पुढे बरेच वर्षे निजामशाहीत वजिरी केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/C5wfx7B5qdM?feature=share
📜 १० ऑगस्ट इ.स.१६६०
(श्रावण पोर्णिमा, शके १५८२,संवत्सर शार्वरी, वार शुक्रवार)
सिद्दी जौहरचे परत आक्रमण!
"छत्रपती शिवराय" किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटल्यावर त्यांच्या पाठलागावर "सिद्दी जौहर" स्वराज्यात शिरला होता. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० ऑगस्ट इ.स.१६६६
(श्रावण वद्य ५, पंचमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)
महाराजांनी आजारपणाचे सोंग घेतले!
"छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० आगस्ट इ.स.१६८०
(श्रावण वद्य ११, एकादशी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)
इंग्रजांच्या वखारीत दंगल!
सिद्दीच्या लोकांची दंडेली सुरूच होती. एका प्रकरणात सिद्दी यांना एका इंग्रज सराफाकडून १८ हजार अशरफ्या घ्यावयाच्या होत्या, त्यासाठी इंग्रजांच्या बरोबरच्या वादात वखारीत दंगल झाली. अखेर इंग्रजांनी तोफा डागल्या तेव्हा सिद्दीचे लोक पळून गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० ऑगस्ट इ.स. १७५५
इस.१७५३ ते १७५५ श्रीमंत रघुनाथराव उर्फ राघोबादादांची दुसरी स्वारी उत्तरेत झाली.त्यांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी राजपुतांना, कुंभेरी इथे जबरी खंडण्या वसूल करून चांगलीच दहशत निर्माण केली होती.जून ते डिसेंम्बर १७५४ दरम्यान राघोबादादा दिल्लीची व्यवस्था पाहण्यात दिल्ली मुक्कामी होते.३ मार्च रोजी सर्व व्यवस्था करून राघोबादादा परतीच्या प्रवासाला निघाले.पुष्कर, ग्वाल्हेर असा प्रवास करत राघोबादादासाहेब १० ऑगस्ट इस. १७५५ रोजी पुण्यात दाखल झाले.याच दरम्यान मराठ्यांचा उत्तरेतील आणखी एक बलाढ्य बुरुज कोसळला. जयप्पा शिंदे यांचा नागोर येथे खून झाला. एकंदरीत या स्वारीत मराठयांचे उत्तरेत बरेच वर्चस्व वाढले होते. येथील भौगोलिक, सामाजिक, आणि राजनैतिक, परिस्थिती चा अंदाज त्यांना आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀